युवा-विश्व

जे. कृष्णमुर्ती

Category:

 

काही माणसे आज आपल्यात नसले तरी त्यांच्या विचारांची पायवाट अदृश्य स्वरूपात असतेच. १२ मे १८९५ रोजी जे. कृष्णमुर्ती यांचा जन्म झाला. जे. कृष्णमूर्ती या थोर भारतीय तत्वज्ञाचा आपणास आता विसर पडलेला आहे. कृष्णमूर्तींचे विचार त्यांचे तत्वज्ञान हे नेहमीच समकालीन राहणार आहे. जे. कृष्णामूर्तींचे विचार मानव जातीला तारक ठरू शकतील असेच आहेत.भौतिक सुखाचा अतिरेकी हव्यास, त्यातून निर्माण झालेली जीवघेणी स्पर्धा, चंगळवाद, भोगलोलुप्ता, जीवनशैली या गोष्टी मानव जातीला विनाशाकडे घेऊन जात आहेत. कृष्णमूर्तींनी आपले स्वतंत्र आणि स्वयंभू तत्वज्ञान जगाला दिले आणि एक सत्यदर्शी तत्वज्ञ म्हणून आपली ओळख निर्माण केली.

युवा-विश्व

आयुष्य खूप सुंदर आहे.

Category:

 

आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तुम्हाला ते जगता यायला हवं. केवळ जगणं महत्त्वाचं नाही तर जगताना आस्वाद घेता यायला हवा. जगायला जनावरं सुद्धा जगतात पण आपल्या जगण्यात एखादी गोष्ट नीट समजून घेतली तर आनंदामध्ये कित्येक पटीने वाढ होते. केवळ गुणांची टक्केवारी करिअर, मोबाईल टास्क असल्या गोष्टीमुळे सगळ्यांचे गुंतणं वाढलं आहे इतकं की स्वतःचे भान त्यांना राहत नाही. होण्यासाठी व आनंद घेण्यासाठी स्वतःचे भान हवंच. स्वतःचं आयुष्य संपवण्या इतपत भान हरवलं तर आयुष्य आनंदी व सुंदर कसं लागेल..

युवा-विश्व

जीएंची पत्रवेळा

Category:

 

येणाऱ्या पिढीलाही जीए कळायला हवेत. काही साहित्य तुमचं भावनिक पोषण करतं. जीएंचं साहित्य त्यापैकीच एक. जीवनाच्या अनेक संचितापैकी जीएंचं असणं हे एक संचित आहे. जीएंचं साहित्य अनेकांच्या दृष्टीने मुदतठेव आहे, ज्याच्यामुळे आपलं आयुष्य सुखद आहे. भावणारे साहित्य लिहिणे आपल्या आवाक्यात जरी नसले तरी वाचण्यात व ऐकण्यात ते आपलंच असतं. माणसं येतात आणि जातात पण त्यांचं साहित्य मनात घर करतं. मनात घर करणाऱ्या गोष्टीच मनात तग धरतात. शब्दांच्यापलीकडे गेल्यानंतरच जीएंचं साहित्य व त्यातील सौंदर्य कळतं. काही गोष्टींची अनुभूती घ्यायची असते. काही गोष्टी फक्त जगायच्या असतात. जीएंचं साहित्य या प्रकारात मोडतं. माणसे जाताना केवळ आठवण मागे ठेवून जात नाहीत, तर विचार मागे ठेवून जातात, अस्तित्व मागे ठेवून जातात. माणसाला मरण असतं, विचारांना मरण नसतं. त्यांच्या साहित्यानं दुःखं सहन करण्याची प्रतिकारशक्ती वाढविली आहे, अनेक संकल्पना स्पष्ट केल्या आहेत. अनेकांना जगण्याची उमेद दिली आहे, वास्तवाची जाण करून दिली आहे. जीए म्हणजे एक साहित्यातलं अस्वस्थ करणारं नाव. अस्वस्थ साहित्य मनाला चटका लावतं, चिरकाल स्मरणात राहातं. पु.ल., वि. वा., जी. ए. हे साहित्यातील दीपस्तंभ आहेत. दुर्बोधतेततही जसा ग्रेस असतो तसं अस्वस्थतेत जीए असतात.

युवा-विश्व

ग्रेटा थनबर्ग

Category:

 

मोठा आवाज असलेली एक लहान मुलगी: ग्रेटा
एका मुलाला मी विचारले ग्रेटा कोण आहे माहित आहे कां? त्याने सांगितले की माहित नाही. आमच्या असंख्य मुलांना अनेक व्यक्तिमत्त्वाची ओळख नाही व ती त्यांना करूनही घ्यावीशी वाटत नाही हे दुर्दैव आहे. आजी आजोबा आज गोष्टी सांगण्यापूरतें सुद्धा उरलेले नाहीत. पूर्वीच्या काळी आजी आजोबांचं ऐकलं जायचं,आता नाही.आजी आजोबांनी शिस्त लावण्याचा प्रयत्न केला तर त्यांना सुनावलं जातं, आमच्या मुलाचे पेंरेंटिंग आम्ही पाहून घेऊ, त्यामुळे मुलांना घडवण्याचं आज आई-वडीलावरच अवलंबून आहे, त्यांनीच घडवायला हवं.आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर प्रेरणेच्या पायवाटेवरून जर प्रवास केला तर आयुष्याला एक दिशा मिळते.पायवाट नसली की माणसें भरकटतात.

युवा-विश्व

आठवणीतले शिक्षक

Category:

 

शिक्षक व मुख्याध्यापक यांच्यामुळे शाळा नावारूपाला येते. अशीच एक नावाजलेली शाळा, बीड येथील चंपावती विद्यालय व तिचे मुख्याध्यापक मुकुंद घनश्याम कुलकर्णी यांची ही यशोगाथा. पूर्वी चांगल्या शाळा चांगल्या संस्कारामुळे ओळखल्या जायच्या. तेथून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यावर शिक्षकाची व शाळेची छाप असे. आताही शाळा चांगल्या निकालावरून ओळखल्या जातातच.

युवा-विश्व

प्रेरणेची पालवी

Category:

 

देवाला अनेक ठिकाणी जायला जमत नाही म्हणून काही चांगली माणसे पृथ्वीतलावर कदाचित पाठवले असावीत.काही माणसांचे निष्पाप कर्म पाहून हाच विचार मनात येतो. प्रेरणेची पायवाट अजून काय असते?

युवा-विश्व

मुख्याध्यापक अर्जुन कोळी

Category:

 

२४ नोव्हेंबर १९४६ ला सुरू झालेल्या या शाळेने आज डोळ्यात भरेल असे नेत्रदीपक यश कमावले आहे. महाराष्ट्रात काही ध्येयवादी शिक्षक, पालक हे सरकारी शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपरिषद शाळा, इतक्या चांगल्या बनवत आहेत की, सरकारी शाळांमध्ये प्रवेश घेण्यास विद्यार्थी व पालक रांगेत उभे आहेत. या व अशा अनेक यशोगाथा समाजासमोर यायला हव्यात. त्यांचे सार्वत्रिकरण झाले तर परिस्थिती निश्चित सुधारेल. मुलांना शाळा आवडली तरच ते शाळेत येतात व रमतात.

युवा-विश्व

प्रेरणा अंध नसतें

Category:

 

अंधांना नेहमीच मार्ग दाखवावा लागतो असे नाही.अनेक अंधानी जगाला जगायला व जगवायला शिकविले.अंध असूनही तिने देशासाठी पदक जिंकले, तरीही देशातील जनता रीलवर नाचणाऱ्या पोरींनाच लाईक करणार.

युवा-विश्व

कार्तिक वजीर: लोकशाहीवरचे भाषण

Category:

 

एखादं कौशल्य जनसामान्यात ओळख होण्यास पुरेसं असतं. कौशल्यानं वैगुण्यावरही मात करता येते. कौशल्य ओळखली पाहिजेत आणि जोपासली पाहिजेत. भाषण पाठ असून ते नजरेत भरत नाही; पण त्याचं सादरीकरणाचं कौशल्य लोकांच्या नजरेत भरतं, लक्षात राहातं. नुकताच दूरदर्शनवर एका लहान शाळकरी मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. प्रजासत्ताक दिनी शाळेच्या ध्वजारोहण समारंभात त्याने आपल्या विनोदी भाषणाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. ‘भारतात आजपासून लोकशाही लागू झाली असून लोकशाहीत आपण काहीही करू शकतो. मला स्वतःला मूर्ख बनवायला आवडते.’ त्याने लोकांना अक्षरशः मोठ्याने हसवले.

युवा-विश्व

कीर्ती श्रेष्ठ की मूल्य?

Category:

 

मूल्यं पुस्तकातच असतात असे नाही, वर्तनातही असतात. मूल्यं रुजली तरच ती वर्तनात येतात. शाळेत मूल्यं शिकवली जातात. रुजणं आणि रुजवणं हा ज्याचा त्याचा प्रांत. वैज्ञानिक दृष्टिकोन हे मूल्य शिकवलं जातं, पण एखादाच नरेंद्र दाभोलकर व त्यांच्यासारखे ते प्रत्यक्ष जीवनात अंमलात आणतात.