पुस्तकांच्या पलीकडे
Category:
इ-पुस्तके इ-पुस्तके-ललित-वैचारिकडॉ. अनिल कुलकर्णी यांचा शिक्षण क्षेत्रासंबंधी लेखांचा हा संग्रह अतिशय वाचनीय आणि उद्बोधक आहे.
Category:
इ-पुस्तके इ-पुस्तके-ललित-वैचारिकडॉ. अनिल कुलकर्णी यांचा शिक्षण क्षेत्रासंबंधी लेखांचा हा संग्रह अतिशय वाचनीय आणि उद्बोधक आहे.
Category:
लेखसंग्रहनुकतेच टीव्हीवर पाण्यावरचा तरंगता दगड कुंभमेळा दरम्यान दाखवला होता. अनेक जण त्याला पाया पडताना दाखवले जात होते. कोणीही वैज्ञानिक दृष्टिकोन जाणून घेऊन थांबत नव्हतें, थांबणार नाहीत.अध्यात्मासमोर कधीकधी विज्ञानही हतबल होतं. कोणताच हेतू नसलेले, कोणता तरी हेतू असलेले तर काही जण केवळ बघे म्हणून यात सामील होतात.
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनरात्र असते हिमनगाच टोक,त्याच्याखाली असंख्य विचार सुस्त पहुडलेले असतात. रात्र कुणाला प्रणयाचा अध्याय सुरू करणारी असतें,कुणाला नकोशीअसतें. विवाहा नंतर एकमेकांच्या स्वभावावर शिक्कामोर्तब करणारं रात्र हे नक्षत्रांचे देणं असतं. रात्र म्हणजे शरीर व मनाच्या समाधानाचं परिमाण. जेवढं समाधान अधिक तेवढा परिणाम चांगला.
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनमाणसाला अवयव नाही चालवत तर मन त्याला चालवतं.अवयव शरीरांचे असतात पण मन त्यांना नियंत्रित करतं. शरीराचे अवयव तक्तात पण मनाचे अवयव ज्याचे मजबूत असतात तो थकत नाही इतिहास घडवतो. जीवनात अनेक निराशेचे प्रसंग तुम्हाला निराश करतात, थांबवतात, पुढे जाण्यापासून परावृत्त करतात.
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनवेळेअभावी ज्यांना पुस्तके वाचणे जमत नाही ते पुस्तकातील आशय ऑडिओ स्वरूपात ऐकू शकतात. नेत्रहीनावांसाठी सुद्धा ऐकून ज्ञान मिळवता येते. पण सगळाच आशय ऑडिओ स्वरूपात उपलब्ध नसतो. नेत्रहीनांसाठी अशी खास व्यवस्था प्राची गुर्जर यांनी त्यांच्या ‘यशोवाणी’ या स्वयंसेवी गटामार्फत गेल्या पंधरा वर्षांपासून दृष्टिबाधित व्यक्तींसाठी ध्वनिमुद्रित वाचनसेवा विनामूल्य देशभर पुरवली आहे.
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनछंद हेमानवीजीवनातील केवळ विरंगुळा असत नाहीत तर जीवनाला आकारही देतात. अभ्यास जेव्हां छंद बनतों तेव्हां नाविन्यपूर्ण व सृजन आकाराला येतं. प्रत्येक सृजन पायवाट असते प्रेरणेची. कोणत्याही छंदाचा अभ्यास केला की त्यात प्राविण्य मिळतं आणि यशा कडे जाण्याचा रस्ता मोकळा होतो.बुद्धीला व्यायाम देणारी शब्दकोडी म्हणजे अनेकांचे वेळ घालवण्याचे साधन असते.
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनसृजन प्रकाशन तर्फे नामदेव माळी यांनी सुद्धा बरीच पुस्तके लहान मुलांची प्रकाशित केली आहेत. ज्यांना रस्ता शोधायचा असतो त्यांना पायवाट आपोआप मिळतें. असंख्य पायवाटा आपल्या अवतीभवती असतात, फक्त शोधक दृष्टी हवी व एक होती तरी पाऊल पुढे टाकण्याची इच्छाशक्ती हवी.
Category:
लेखसंग्रहप्रत्येकाचा एक काळ असतो तसा तलतचा ही काळ होता, नव्हे आजही आहे. वार्धक्यामुळे व्यक्तिमत्त्वाला घरघर लागते पण प्रसिद्धीला कधीच घरघर लागत नाही. पुस्तके कपाटात बंद असली तरीही त्यांचा इतिहास कधीच बंद होत नाही. तरल अनुभव काय असतो हे तलत कडून शिकावं.
टेलिफोनवर गाणं म्हणणं ही कल्पना आपल्याला एका वेगळ्या विश्वात घेऊन जाते. गाणं म्हणजे नायक नायिकेंचा धुसमुसळेपणा पाहण्याच्या सवयीला छेद देणारं हे गाणं तरलतेचा रेशमी अनुभव देतं.आपल्या मनातील दर्द सांगत असताना किती संयमीत पद्धतीने तलत यांनी ते गाणं म्हटलं आहे.
Category:
लेखसंग्रहओठाकडे लक्ष द्यायला मला अभ्यासातून ना वेळ मिळाला न मिळणार आहे मला आयआयटी करायचे आहे, त्यांना जे वाटते ते त्यांनी लिहिले मला त्यांच्या बोलण्याची काहीच वाटत नाही ते तितके महत्त्वाचे नाही सुद्धा. 55 लाख विद्यार्थ्यांमधून यु.पी.बोर्डातून प्रथम येणारी प्राची निगम वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आली. अस्तित्वाचा स्विकार करतांना वैगुण्यावर व वैगुण्यासह सत्वता:वर प्रेम करता आलं की लोकांना अस्तित्वाच्या चांगल्या अंगाची दखल घ्यावीच लागते. बाह्य सौंदर्यापेक्षा अंतरिक सौंदर्य शेवटी मनुष्याला घडवतं.मनुष्य हा परिपूर्ण कधीच नसतो. प्रत्येकामध्ये गुण आणि वैगुण्य असतातच. आपल्यातलं एखादं वैगुण्य विसरून स्वतः स्वतःवर प्रेम करत ध्येयाकडे वाटचाल केली की यश आपलच असतं. धडधाकट लोकच इतिहास घडवितात असं नव्हें, तर अंध, अपंग,लुळेपांगळे, वाळीत टाकलेले यांनी सुद्धा इतिहास घडविला आहे, प्रेरणेची पायवाट निर्माण केली आहे. शेक्सपियरने म्हटल्याप्रमाणे नावात काय आहे तसंच दिसण्यात काय आहे हे प्राची ने दाखवून दिले आहे. ब्रेन अंध असूनही त्याने ब्रेल लीपी तयार करून अंधासाठी प्रेरणेची पायवाट निर्माण केली. समाज माध्यमातील स्वैराचारा मुळे आज कुणालाही टारगेट केले जात आहे.
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनप्रत्येक गोष्टीकडे सकारात्मकपणे पाहण्याची सवय मनाला केवळ असून चालत नाही. शरीराला सुद्धा मनाची साथ द्यावी लागते. मी विजेता होणारच या पुस्तकाची शंभरावी आवृत्ती केवळ निघाली नाही तर अनेकांना यशाची पायवाट दाखवणारे उमेश कणकवलीकर यांनी अनेकांच्या जीवनात अमुलाग्रह बदलही केला आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti