जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
पदरमोड करून त्यांनी अनेक गरीब आणि गरजू मुलांना कलाशिक्षण दिले. ज्या तुळशीबागेमध्ये बालपणापासून वास्तव्य होते त्या गणरायाची मूर्ती खटावकर यांच्या कसबी हातांनीच घडली आहे.
पुरातत्त्व शास्त्राची मुहूर्तमेढ रोवणारे आणि या क्षेत्रातील अभ्यासकांसाठी पितामह असलेले प्रा. डॉ. मधुकर केशव
ढवळीकर यांना यावर्षी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला.
प्रा. ढवळीकर यांचा जन्म १९३०चा. त्या काळात पुरातत्त्वशास्त्र अगदीच दुर्लक्षित होते. अर्थात आजही त्याबाबत सरकारी पातळीवर उदासीनता आहेच. त्यामुळे पदवी-शिक्षण पूर्ण झाल्यावर भारतीय पुरातत्त्व विभागामध्ये १९५३ पासून टेक्निकल असिस्टंट म्हणून कामाला सुरुवात करून ढवळीकर यांना वेगळी दिशा पकडली. प्रा. ढवळीकर यांची अभ्यास, चिकाटी आणि विषयाचा चारी बाजूंनी विचार करण्याची वृत्ती यामुळे त्यांनी या शास्त्राच्या संशोधनात मूलभूत स्वरूपाचे कार्य केले.
प्रांत आणि भाषेची बंधने संगीताच्या सुरेल स्वरावर ओलांडून हिंदी, मराठी, तेलगु, मल्याळम, कन्नड भाषिक रसिकांची लोकप्रियता मिळवणारे अशी संगीतकार आणि गायक शंकर महादेवन यांची ओळख आहे.
सुमारे तीन दशके आपली रोमँटिक गाणी देणारे हिंदी चित्रपट गीतकार लालजी पांडेय उर्फ अंजान यांचा जन्म २८ ऑक्टोबर १९३० वाराणसी येथे झाला. अंजान गंगेकाठच्या वाराणसीतच लहानाचे मोठे झाले. गंगेच्या घाटावर फिरताना त्यांच्या काव्यप्रतिभेला एक आगळी खोली लाभली. त्यातूनच पुढे आला एक प्रतिभावंत गीतकार. आपल्या अद्वितीय गीतरचनांमुळे त्यांनी रसिकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले.
कीर्ती शिलेदार ह्या जयराम व जयमाला शिलेदार यांच्या कन्या. त्यांचा जन्म १६ ऑगस्ट १९५२ रोजी झाला. आपल्या आई, वडिलांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रीय संगीताची आराधना केलेल्या कीर्ती शिलेदार यांनी वयाच्या दहाव्या वर्षी रंगभूमीवर पहिले पाऊल टाकले. त्यांचे शास्त्रीय संगीताचे उच्च शिक्षण नीलकंठबुवा अभ्यंकर यांच्याकडे झाले. कीर्ती शिलेदार यांची भूमिका असलेल्या नाटकांचे आजवर ४००० हून अधिक प्रयोग झाले आहे. देशातल्या मराठी रसिकांसाठीही त्यांनी देशाच्या विविध शहरांत मराठी संगीत नाटकांचे प्रयोग केले.
संगीत कान्होपात्रासह जुन्या नाटकातल्या गाण्यांचा गोडवा त्यांनी नव्या पिढीपर्यंत पोहोचवला. गोड गळा आणि शास्त्रीय संगीतासाठी केलेल्या प्रचंड परिश्रमामुळे कीर्ती शिलेदार यांनी संगीत मराठी नाटकात केलेल्या सर्वच भूमिका गाजल्या. बालगंधर्वांच्या सुवर्ण युगाची आठवण यावी, अशा एकरूपतेने कीर्ती शिलेदार यांनी गायलेली गीते रसिकांनी डोक्यावर घेतली.
संगीत नाटक हेच त्यांच्या आई, वडिलांचा श्वास आणि ध्यास होता. आपल्या आई, वडिलांची संगीत मराठी नाटकांच्या सेवेचा हाच वारसा जपताना कीर्ती शिलेदार यांनी, कीर्ती आणि पैशाचा मोह बाजूला ठेवत, मराठी संगीत रंगभूमीची सेवा पन्नासहून अधिक वर्षे अविरतपणे केली आहे. मराठी संगीत रंगभूमीच्या त्या सर्वार्थाने बिनीच्या शिलेदार आहेत. रंगभूमीवर भूमिका रंगवताना त्यांनी नेहमी अभ्यासपूर्ण सौंदर्यशोध घेतला. त्यामुळेच त्यांच्या सर्व भूमिका आगळ्या व वैशिष्ट्यपूर्ण ठरल्या आहेत. संगीत रंगभूमीवर त्यांनी स्वतःचे आगळे स्थान निर्माण केले आहे.
संगीत नाटके व स्वतंत्र मैफलींच्या निमित्ताने भारतभर तसेच इंग्लंड-अमेरिकेत त्यांचे कार्यक्रम झाले आहेत. सौंदर्यशोधक दृष्टीने शास्त्रीय संगीतातील अकारण होणारे शब्दोच्चारांचे दुर्लक्ष टाळले जावे, या हेतूने त्यांनी ’स्वर ताल शब्द संगती’या नावाचे हे संशोधनात्मक पुस्तक लिहिले आहे. संगीत स्वरसम्राज्ञी हे कीर्ती शिलेदार यांचे अत्यंत गाजलेले नाटक आहे. या नाटकाव्यतिरिक्त कीर्ती शिलेदार, लता शिलेदार आणि सुरेश शिलेदार हे तिघेही मिळून जे तीनपात्री सौभद्र सादर करतात.
कीर्ती शिलेदार यांनी ’स्वर ताल शब्द संगती’या नावाचे एक पुस्तक लिहिले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
कीर्ती शिलेदार यांची गाजलेली नाटके
‘अभोगी’, ‘एकच प्याला’, ‘कान्होपात्र’, ‘द्रौपदी’, ‘भेटता प्रिया’, ‘मंदोदरी’, ‘मानापमान’, ‘मृच्छकटिक’, ‘ययाति आणि देवयानी’, ‘रंगात रंगला श्रीरंग’, ‘रामराज्यवियोग’, ‘रूपमती’, ‘विद्याहरण’, ‘शाकुंतल’, ‘शारदा’, ‘श्रीरंग प्रेमभंग’, ‘संशयकल्लोळ’.
जगदाळे, संजय
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदावर एन. श्रीनिवासन यांची वर्णी लागल्याने सचिवपदाच्या शर्यतीसाठी बरीच नावे चर्चेत आली होती. त्यामध्ये रणजिब बिस्वाल हे बाजी मारतील असे वाटत असले तरी अमिताभ चौधरी यांनी त्यांच्याविरोधात अर्ज दाखल करण्याचे ठरविले होते.तथापि, बीसीसीआयमधील वरिष्ठ पदांवरील व्यक्ती निवडणूक होऊ नये, यासाठी आग्रही होते. त्यामुळे बिस्वाल आणि चौधरी यांचा पत्ता कट झाला.
बीसीसीआयच्या धुरीणांना यावेळी अनुभवी, पण वाद-विवादात न पडणारी आणि आपले सारे काही ऐकणारी व्यक्ती हवी होती. त्यावेळी बीसीसीआयच्या वरिष्ठ पदांवरील व्यक्तींपुढे एकच नाव आले आणि त्यांनी त्यावर शिक्कामोर्तब केले, ते नाव म्हणजे संजय जगदाळे. बीसीसीआयच्या कारभाराचा असलेला अनुभव आणि स्वच्छ प्रतिमा असल्यामुळे जगदाळे यांच्या नावाला कोणीही विरोध केला नाही आणि बिनविरोधपणे जगदाळे बीसीसीआयच्या सचिव पदावर विराजमान झाले. १९६८-८३ या दरम्यान स्थानिक क्रिकेटमध्ये जगदाळे हे एक गुणी अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखले जायचे. या दरम्यान त्यांनी ५५ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये २,०७७ धावा केल्या, ज्यामध्ये दोन शतकांसह नऊ अर्धशतकांचा समावेश होता. त्याचबरोबर गोलंदाजीमध्ये त्यांनी ८५ विकेट्स घेतल्या होत्या, ज्यामध्ये १३२ धावांत ६ बळी ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी होती. १९८३ नंतर क्रिकेट खेळायचे सोडल्यावर त्यांनी प्रशासकाची भूमिका वठवली. त्यानंतर १९९० मध्ये त्यांची ज्युनिअर निवड समितीचे सदस्य म्हणून निवड करण्यात आली आणि त्यांनी व्ही.व्ही.एस. लक्ष्मण, ऋषीकेश कानिटकर, मुरली कार्तिक, एस. श्रीराम आणि नमन ओझासारखे गुणवान खेळाडू शोधून काढले. त्यांनी हेरून काढलेले खेळाडू आणि त्यांचे काम पाहून २००० साली त्यांना मध्य विभागातून राष्ट्रीय निवड समितीमध्ये स्थान देण्यात आले. चंदू बोर्डे यांच्या निवड समितीमध्ये त्यांची २०००-२००१ साली पहिल्यांदा निवड झाली, त्यानंतर ब्रिजेश पटेल, सय्यद किरमाणी यांच्या अध्यक्षतेखालीही त्यांनी निवड समितीचे काम पाहिले. २००० ते २००३ पर्यंत ते भारतीय निवड समितीमध्ये होते. त्यानंतर पुन्हा एकदा किरण मोरे आणि दिलीप वेंगसरकर यांच्या अध्यक्षतेखालीही त्यांनी निवड समितीमध्ये काम केले. २००७ साली त्यांच्यावर संघव्यवस्थापकाची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली. २००७ च्या विश्वचषकासाठी गेलेल्या भारतीय संघाचे जगदाळे हे व्यवस्थापक होते. २००७ नंतर मात्र त्यांची बीसीसीआयला आठवण झाली ती थेट २०११ साली. कारण बिस्वाल आणि चौधरी यांच्यामधील भांडणामुळे बीसीसीआयची प्रतिमा डागाळण्याची शक्यता होती. जगदाळेंचा स्वभाव मितभाषी असला तरी त्यांच्याकडे असलेला राष्ट्रीय निवड समितीचा दांडगा अनुभव, त्याचबरोबर प्रशासकीय कामांचा अनुभव, शांतपणे सुसंवाद साधण्याची शैली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वच्छ प्रतिमा या साऱ्या गोष्टींमुळे जगदाळे यांची सचिवपदी निवड करताना बीसीसीआयच्या वरिष्ठ पदांवरील व्यक्तींना जास्त वेळ घ्यावा लागला नाही. आता नुकताच मी या पदावर विराजमान झालो आहे. आव्हाने बरीच आहेत, याची मला पूर्णपणे कल्पना आहे. ही फार मोठी जबाबदारी आहे, याचीही मला पूर्णपणे जाणीव आहे, असे जगदाळे यांनी सचिवपदी नियुक्त झाल्यावर सांगितले होते. त्यामुळे ही महत्त्वपूर्ण जबाबदारी ते कसे पार पाडतात, यावरच साऱ्यांचे लक्ष असेल.
स्काउट व गाईड्स या अवघ्या जगाला व्यापून टाकणाऱ्या विधायक चळवळीचे जनक लेफ्टनन्ट जनरल लाॅर्ड बेडन पावेल यांचा जन्म २२ फेब्रुवारी १८५७ रोजी लंडन येथे झाला.
त्यांचे पूर्ण नाव रॉबर्ट स्टीफन्स स्मिथ बेडन पॉवेल. लंडन मधील चार्टर औस ह्या शाळेत शिष्यवृती मिळवून त्यांनी शिक्षण केले. १८७६ साली लष्करात त्यांना कमिशन मिळाले. त्यानंतर त्यांनी दक्षिण अफ्रीका, अफगाणिस्थान, भारत अशा विविध ठिकाणी कामगिरी बजावली. आपल्या कर्तुत्वावर ते लेफ्टनंट जनरल या पदापर्यंत पोचले.
१९०७ साली त्यांनी; बालवीर’ चळवळ सुरु केली.थोड्याच दिवसात हि चळवळ अनेक देशात पसरली. १९१० साली आपली बहिण ओंग्रेस हिच्या मदतीने त्यांनी मुलींसाठी ‘वीरबाला’ हि संघटना स्थापन केली.विवाहा नंतर ह्या संघटनेची जबाबदारी त्यांच्या पत्नीने लेडी-बोडन- पॉवेल यांनी सांभाळली संघटनेच्या स्थापने पासून ६-७ वर्षातच या संघटनेची पथके बेल्जियम, हॉलंड, अमेरिका, भारत, चीन, रशिया राष्ट्राने मध्ये सुरु झाली. संघटनेची पाहणी करण्या करीता. या पती-पत्नी ने सर्व देशाना भेटी दिल्या. त्यात भारतालाहि त्यांनी १९२१व १९३७ साली भेट दिली होती.
भारतात १९१७ साली पं. मदनमोहन मालवीय यांनी बॉइज स्काउट चळवळ सुरु केली. १९२१ साली लॉर्ड बेडन पॉवेल यांनी सर्व संस्था एकत्र केल्या व त्याचे नाव बाय स्काउट ठेवले.१९३८ हिंदुस्थानात स्काउट असोसीएेयन ची स्थापना केली. त्यात हिंदुस्थान स्काउट. बायस्काउट ,गर्ल गाईड हे भाग होते. ७ नोहेंबर १९५० मध्ये एकत्रित होऊन ‘ भारत स्काउट & गाईड ‘ असोशियन हे नाव दिले.
भारतीय मुलांना मातृभूमीचे उत्तम नागरिक बनविण्यात सहकार्य करणे हा उद्द्येश होय. ईश्वरा विषयी पूज्य भावना, स्वहितापेक्षा देशहित मोठे, शेजारी व इतराच्या विषयी सेवाभावाचे बीज रुजावे हा उद्देश होय. सर्वजगात बंधुभाव, ऐक्य , व शांतता नांदावी, समान ध्येयाच्या संस्थांशी मित्रत्व राहील हे धोरण स्काउट चे आहे. लॉर्ड बेडन पॉवेल यांचे ८ जानेवारी १९४१ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
अभिषेकींनी मराठी रंगभूमीसाठी खूप मोठं योगदान दिलेले आहे. प्रयोगशीलता हा त्यांच्या संगीत दिग्दर्शनातला महत्वाचा गुणधर्म. त्यांनी त्यांच्या संगीतदिग्दर्शनात केलेले प्रयोग लोकांनाही खूप आवडले. उदा. मैलाचा दगड ठरलेल्या कट्यार काळजात घुसली या नाटकाची सुरुवात त्यांनी भैरवीने केली होती. तर १९६६ साली रंगभूमीवर आलेल्या लेकुरे उदंड झाली या नाटकात मुक्तछंदातल्या संवादांना आणि छंदाला प्राधान्य असलेल्या गोव्यातल्या किरिस्तावांच्या तियात्राया नाट्यप्रकारातल्या संगीताचा बाज त्यांनी वापरला.
“अधिकारयोग” हे पुस्तक तसेच पाच नाटके, समुद्र ही काव्यरचना व १७२६ श्लोकांचे “यशवंतराय” हे महाकाव्य, असा त्यांचा ग्रंथसंभार होता. त्यांनी दोन नाटके लिहिली व “यशवंतराय” या खंडकाव्यासह काही पद्यरचनाही केल्या.
गोविंद पै हे आधुनिक कन्नड कवी व एक श्रेष्ठ संशोधक होते. गोविंद पै यांचे शिक्षण बी.ए.पर्यंत. विविध भारतीय भाषा, जागतिक वाङ्मय, तत्त्वज्ञान आणि इतिहास या विषयांचा त्यांनी स्वयंप्रेरणेने व्यासंग केला. विसहून अधिक भाषा त्यांना उत्तम प्रकारे अवगत होत्या त्यांत ग्रीक व हिब्रू यांचाही समावेश होता. त्यांच्या वाङ्मयीन कारकीर्दीचा काल ६० वर्षांहून अधिक होता.
Copyright © 2025 | Marathisrushti