(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

  • बहिणाबाई नथूजी चौधरी

    बहिणाबाई चौधरी ह्या पुर्व खान्देशात (आताच्या जळगांव जिल्ह्यातील) असोदा येथे जन्मलेल्या प्रसिध्द कवयित्री होत्या.

  • जनसंघाचे संस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय

    पंडित दीनदयाळ उपाध्याय हे भारतीय जनसंघाचे राष्ट्रीय सचिव होते. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यासह भारतीय जनसंघाच्या पायाभरणीत यांचा महत्त्वाचा वाटा होता. भारतीय जनसंघातून पुढे भारतीय जनता पक्षाचा उगम झाला.

  • उदय पारकर

    एका चष्माविक्रेत्या कंपनीची जाहिरात होती- बाई वर्गात येतात आणि फळ्यावर लिहायला लागतात. मात्र, त्यांना लिहिताना बघून मुले बुचकळ्यात पडतात. कारण बाई फळ्याऐवजी भिंतीवर लिहित असतात. चष्मा कंपनीच्या या जाहिरातीतील कल्पक संकल्पनेचा उदगाता होता एक मराठी तरुण उदय पारकर. कोकणच्या मातीचा ठेवा मनात जपणार्‍या पारकर यांनी जाहिरात जगतात १२७ मानाचे पुरस्कार मिळवले. आता स्वत:ची जाहिरात कंपनी आहेच, पण सिंधुदुर्गात युरोपच्या तोडीचा स्टुडिओ उभारण्याचे स्वप्न ते उराशी बाळगून आहेत...

    उदय पारकर यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला कसदार कल्पकता हा लेख पुढील पानावर वाचा.

    उदय पारकर यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला कसदार कल्पकता हा लेख वाचा.

    parkar-uday-modified

  • गझलविश्व समृद्ध करणारे प्रसिद्ध गझलकार इलाही जमादार

    इलाही जमादार यांनी १९६४ सालापासून काव्यलेखनाला प्रारंभ केला. कविवर्य सुरेश भटांनंतर मराठी गझलेला उत्तुंगतेवर नेणारे गझलकार अशी त्यांची ओळख होती. ते आकाशवाणी आणि दूरदर्शनचे मान्यताप्राप्त कवी व गझलकार होते. विविध मराठी, हिंदी, उर्दू दैनिके व मासिकांतून इलाहींच्या कविता व गझला प्रसिद्ध झाल्या आहेत.

  • चरित्रलेखक, इतिहाससंशोधक यशवंत दिनकर फडके

    चरित्रलेखक, इतिहाससंशोधक यशवंत दिनकर फडके यांचा जन्म ३ जानेवारी १९३१ रोजी सोलापूर येथे झाला. कै यशवंत दिनकर फडके यांचे वडील स्वातंत्र्य चळवळीत उतरले होते. स्वातंत्र्य चळवळीमुळे वडिलांचे कुटुंबाकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे फडके यांना शिक्षणासाठी बरीच धडपड करावी लागली. सोलापुरातील ’हरीभाऊ देवकरण हायस्कूल’ शाळेत त्यांचे शालेय शिक्षण झाले. शालेय शिक्षण चालू असताना त्यांनी द्वा.भ. कर्णिकांच्या ’संग्राम’ वृत्तपत्रातून लेखनही केले. १९४७ साली मॅट्रिक परिक्षा उत्तीर्ण झाल्यावर महाविद्यालयीन शिक्षणाकरता ते पुण्यास गेले. राज्यशास्त्र हा विषय घेऊन पुणे विद्यापीठातून त्यांनी बी.ए. व एम्‌.ए. चे शिक्षण केले. १९७३ साली त्यांनी मुंबई विद्यापीठाकडून पीएच्‌.डी. पदवी मिळवली. य. दि. फडके हे साहित्यिक, साक्षेपी संशोधक आणि राजकीय इतिहासकार म्हणून प्रसिद्ध होते. २००० साली झालेल्या बेळगाव साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

    महाराष्ट्राच्या इतिहासावर त्यांनी मांडलेले संशोधन तसंच राजकीय विचारांवर त्यांनी केलेले भाष्य खूप महत्त्वाचे आहे. त्यांची सत्तरहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसंच र. धों. कर्वे, गोपाळ गणेश आगरकर, सेनापती बापट अशा दिग्गजांची खरी ओळख त्यांनी चरित्र लिहून करून दिली. डॉ. आंबेडकरांवर अरुण शौरी यांनी लिहिलेल्या टीकेला तसेच खणखणीत उत्तर त्यांनी दिले होते. एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्र तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाचा इतिहास लिहून त्यांनी मराठी माणसाला समृद्ध केले आहे. यशवंत दिनकर फडके यांचे ११ जानेवारी २००८ रोजी निधन झाले.

    त्यांची साहित्यसंपदा
    द कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया- य दि फडके आणि आर. श्रीनिवासन, सेनापती बापट यांचे चरित्र
    सोशल रिफॉर्मेशन ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्रातील समाजसुधारक, पॉलिटिक्स अॅन्ड लॅगवेज, वी के चिपळुणकर
    वूमन इन महाराष्ट्र, आगरकर शोध बाळगोपाळांचा, रा. धो. कर्वे, केशवराव जेधे, नथुरामायण, आंबेडकरांचे मारेकरी अरुण शौरी, शाहू छत्रपती आणि लोकमान्य, केतकर लेख संग्रह (संपादन - य. दि. फडके)

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • वसंत दिगंबर कुलकर्णी

    अभ्यासू समीक्षक वसंत दिगंबर कुलकर्णी यांचा जन्म २३ ऑगस्ट १९२३ रोजी झाला.

    “लीळाचरित्र : एक अभ्यास”, “केशवसुतांचे अंतरंग”, “अर्वाचीन मराठी सारस्वतकार”, “संतसाहित्याची संकल्पना” ही त्यांची उल्लेखनीय पुस्तके.

    Vasant Digambar Kulkarni

  • आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष

    आपल्या कॅमेर्यारने सिनेतारे-तारकांना ग्लॅमर मिळवून देणारे, कलाकारांना नवा चेहरा देणारे असे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष यांचा जन्म १६ सप्टेंबर १९५० रोजी झाला. व्यक्तिचित्रण प्रकारातल्या प्रकाशचित्रांसाठी ते विशेष नावाजले जात असत. त्यांचे प्राथमिक शिक्षण सेंट झेविअर्स हायस्कूल आणि पदवी शिक्षण सेंट झेविअर्स महाविद्यायतून झाले होते. आपल्या मितभाषी स्वभावाने, मृदू वाणीने आणि व्यक्तीतील मित्रत्वाचा शोध घेणार्याच दृष्टीने त्यांनी केवळ सिनेजगतातीलच नव्हे तर समाजाच्या विविध प्रांगणातील व्यक्तींना आपल्या मित्रपरिवारात सामावून घेतले होते.

    गौतम राजाध्यक्ष यांना छायाचित्रणासह कलेच्या विविध प्रांतात आवड होती. इतिहास, पुरातत्त्वविद्या, छायाचित्रण, संगीत, इंग्रजी-मराठी साहित्य अशा गोष्टींत रस होता. ते बायो-केमिस्ट्रीतून पदवीधर झाले होते. महाविद्यालयीन काळात त्यांना याच विषयात त्यांना पीएच.डी. करायची होती. सेंट झेविअर महाविद्यालयात त्यांनी दोन वर्षे अध्यापनही केले. त्याच दरम्यान त्यांनी जाहिरात आणि जनसंपर्क या विषयाचा डिप्लोमा केला. त्याच्या प्रकल्पाच्या निमित्ताने १९७७मध्ये त्यांचा संबंध लिंटाजशी आला आणि त्यांना तिथेच नोकरीची संधी मिळाली. फोटोग्राफीेचे तंत्र ते लिंटाजमध्येच शिकले. या काळात त्यांनी लिंटाज इंडियामध्ये मानाच्या जागाही मिळविल्या होत्या. पुढे १९८० पासून १९८७ पर्यंत फॅशन फोटोग्राफर म्हणूनही काम पाहिले. त्यानंतर त्यांनी स्वतंत्र काम केले.

    छायाचित्र काढताना ज्यांचे छायाचित्र काढायचे त्यांचे व्यक्तिमत्त्व त्या छायाचित्रात आणण्याचा त्यांचा कसोशीचा प्रयत्न असायचा. म्हणून त्यांची छायाचित्रे बोलकी असत. त्यांना लेखनाचाही चांगला हात होता. शोभा डे यांच्या ‘सेलेब्रिटी’ या मासिकातून त्यांनी लेखनाला सुरुवात केली. सेलेब्रिटींच्या मुलाखती घेताना तेच त्यांची छायाचित्रे काढत असत. त्यांनी ‘चंदेरी’ या पाक्षिकाचे काही काळ संपादनही केले होते. चंदेरीत असताना त्यांना कलाकारांच्या अंतरंगात डोकावते आले. १९९७ मध्ये त्यांचे ‘फेसेस’ हे छायाचित्रांचे पुस्तक प्रसिद्ध झाले. यात त्यांनी दुर्गा खोटे, साधना समर्थपासून एैश्वार्या रायपर्यंतच्या ४५ भावमुद्रा टिपल्या आहेत. दोन वर्षांपूर्वीच त्यांचे ‘चेहरे’ या कॉफीटेबल पुस्तकाचे प्रकाशन लता मंगेशकर यांच्या हस्ते झाले होते. त्यांच्या छायाचित्रांची प्रदर्शनेही रसिकांच्या चांगल्याच स्मरणात आहेत.

    छायाचित्राबरोबरच स्टील फोटोग्राफीचे कामही त्यांच्याकडे आले. अनेक चित्रपटांची त्यांनी स्टील फोटोग्राफी केली आहे. शालीन, सुसंस्कृत, सुशील, सदा हसमुख आणि मदतीला सदैव तत्पर असलेल्या गौतम राजाध्यक्ष यांना ऑपेरा संगीताची फार आवड होती. या पाश्चारत्य संगीताबरोबरच भारतीय शास्त्रीय संगीताचा त्यांचा कानही उत्तम होता. लता मंगेशकर यांच्याशी ते बर्यासचदा शास्त्रीय संगीताविषयी चर्चा करीत असत. मंगेशकर कुटुंबियांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. बालगंधर्वांच्या काळातील संगीताचेही ते शौकीन होते. कलेची सर्वच क्षेत्रे गौतम राजाध्यक्ष यांनी चांगल्या तर्हेाने हाताळली आहेत. मराठी साहित्याबद्दल त्यांना विशेष आसक्ती होती. त्यांनी ‘सखी’ या मराठी चित्रपटासह ‘बेखुदी’, ‘अंजाम’ या हिंदी चित्रपटांच्या पटकथाही लिहिल्या होत्या.

    गौतम राजाध्यक्ष यांचे १३ सप्टेंबर २०११ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • निरंजन घाटे

    प्रामुख्याने विज्ञान विषयावर लिहिणाऱ्या घाटे यांनी एकीकडे स्त्री-पुरुष आकर्षणाचा शास्त्रोक्त वेध घेणाऱ्या ‘प्रेम, स्पर्श आणि आकर्षण’ किंवा सेक्सबद्दल गैरसमज दूर करणाऱ्या ‘सेक्सायन’सारख्या पुस्तकांबरोबरच, दुसरीकडे युद्धकथा सांगणाऱ्या ‘रणझुंजार’ आणि लोकप्रिय लेखकांच्या आत दडलेल्या काही विक्षिप्त आणि विचित्र स्वभावाच्या माणसांवर प्रकाश टाकणारं ‘लोकप्रिय साहित्यिक’ सारखी पुस्तकंही लिहिली आहेत.

  • दत्तात्रय केसरीनाथ दिघे (द. के. दिघे)

    दत्तात्रय केसरीनाथ दिघे यांचा जन्म मुंबई येथील बारभाई मोहल्ला या मुस्लिम वस्तीत दि. १८ मे १९१९ रोजी झाला.

    वयाच्या विसाव्या वर्षापासून त्यांनी विविध शासकीय कार्यालयात इंग्रजी लघुलिपी लेखक (stenographer) म्हणून ३७ वर्षे काम केले. सन १९७७ मध्ये ते सेवानिवृत्त झाले.
    राष्ट्रभाषेचे प्रचार कार्य :-
    महात्मा गांधी यांची हिंदी राष्ट्रभाषा व्हावी अशी इच्छा होती. त्यानुसार आधी हिंदी भाषेच्या चार परीक्षा उत्तीर्ण करुन गिरगावामध्ये जनतेला हिंदी शिकवण्याचे कार्य सेवानिवृत्तीने केले व सुमारे पाचशे लोकांना ही भाषा शिकवली.
    समाजकार्य : -
    निवृत्तीनंतर सन १९८० पासून समाजसेवेस आरंभ केला कोकणस्थ नामदेव शिंपी समाजाची ३१ डिसेंबर १९८९ ची समाजाची विविध क्षेत्रातील परिस्थिती दर्शविणारा शिरगणती (खानेसुमारी) १९९१ मध्ये एका जाहीर समारंभात प्रकाशीत केली. समाजासाठी “वधूवर सूचक मंडळ” काढले. त्याचा लाभ अनेक विवाहोत्सुक मंडळींनी घेतला.
    १९९२ पासून समाजात असलेल्या “अखिल कोकणस्थ नामदेव शिंपी प्रतिनीधी मंडळ” या संस्थेचे अध्यक्षपद स्वीकारले. या समाजाला लग्न समारंभ व इतर मंगल व सांस्कृतिक कार्यक्रमाची, तसेच विविध संस्थांच्या बैठकांसाठी एका ज्ञातिगृहाची आवश्यकता होती. पूर्वीच्या कार्यकर्त्यांनी सतत ७५ वर्षे यासाठी प्रयत्न केले पण ते असफल राहिले श्री. दिघे यांनी अध्यक्ष झाल्यावर इतर काही संस्थांच्या कठोर प्रयत्नाने हे ज्ञातिगृह बांधून सज्ज केले.
    लेखन कार्य :-
    सन २००९ साली समाजाच्या माहितीसाठी व इतर इतिहास प्रेमींसाठी “कोकणस्थ नामदेव शिंपी” समाजाचा सामाजिक व सांस्कृतिक इतिहास हा ३०० पानी ग्रंथ एका जाहीर सभेत प्रकाशित केला. “दर्याचा राजा” या त्रैमासिकात “एक अल्पसंख्यांक पण विकसनशील पोटजात कोकणस्थ नामदेव शिंपी” या शिर्षकाखाली एक संशोधनावर लेख प्रकाशित केला.
    ज्ञान लालसा :- ६५/६६ व्या वर्षी फला ज्योतिषी शास्त्र, हस्त सामुद्रिक शास्त्र, अंक शास्त्र (Neumerology) या शास्त्रांचा अभ्यास केला. महाराष्ट्र ज्योतिष परिषदेची “ज्योतिष शास्त्री” ही पदवी परीक्षा उत्तीर्ण केली. एका निबंध स्पर्धेत ज्योतिष शास्त्रावरील निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे रु. ५०० चे बक्षीस मिळवले.
    संपर्क :
    श्री. द. के. दिघे
    ए-८७ कमल पुष्प, वांद्रे रेक्लमेशन,
    वांद्रे, (प.) मुंबई ४०००५०
    दूरध्वनी क्र. - २६४२९९५५६

    (संदर्भ : स्वतः पाठविलेल्या माहितीवरुन)

  • खाशाबा जाधव