(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • पल्लवी रेणके

    पल्लवी रेणके या भटक्या-विमुक्तांसाठी पूर्ण वेळ काम करणार्‍या एक कर्तुत्ववान कार्यकर्त्या आहेत. शिक्षणाने त्या एल एल बी असल्या तरी स्वतःची नाळ मात्र त्या विसरलेल्या नाहीत. शहरात, चांगल्या प्रतिष्ठीत उद्योजकांच्या फिर्यादी लढवून बक्कळ पैसा कमवण्याच्या संध्या उपलब्ध असूनसुध्दा त्या उच्च न्यायालयात किंवा इतर कोर्टांमध्ये जी काही वकिली करतात ती भटक्या-विमुक्तांच्या हितासाठीच. त्या स्वत: ‘गोंधळी’ कुटुंबात जन्मलेल्या आहेत.

  • कविवर्य वासुदेव गोविंद ऊर्फ वा.गो.मायदेव

    कविवर्य वासुदेव गोविंद ऊर्फ वा.गो.मायदेव यांचा जन्म २६ जुलै १८९४ रोजी झाला.

    कवी मायदेव म्हटले की, कवितांची आवड असणाऱ्या जु्न्या पिढीतील वाचकांना हटकून आठवणार ती त्यांची 'गाइ घरा आल्या' ही सुंदर कविता. सकाळी चरायला गेलेल्या गाई संध्याकाळी घरी आल्या तरी गाई राखायला गेलेला 'वनमाळी' मात्र काही घरी आलेला नसतो. कातरवेळ उलटते, रात्रही होते, तरी वनमाळी न आल्यामुळे आईच्या जिवाची जी उलघाल होते, तिचे वर्णन मायदेव यांनी या कवितेत अतिशय साध्या-सोप्या शब्दांत केले आहे. ही कविता हीच मायदेव यांची ओळख होती. १९२९ साली त्यांनी ती लिहिली. १९१५ ते १९२९ या कालखंडात त्यांच्या हातून ज्या कविता लिहून झाल्या, त्या सर्व कविता 'भावतरंग' या संग्रहात वाचायला मिळतात. 'गाइ घरा आल्या' ही कविता याच संग्रहात आहे.

    कवी मायदेव रविकिरण मंडळातील कवींचे म्हणजे, माधवराव पटवर्धन ऊर्फ माधव ज्यूलियन, यशवंत, गिरीश, श्री. बा. रानडे आदींचे समकालीन कवी. गंभीर विचारवृत्तीच्या; तसेच बालांसाठीच्या विपुल कविता मायदेव यांनी लिहिल्या. त्या काळी लहान मुलांमध्ये मायदेव यांच्या बालकविता विशेष आवडीच्या असत. कवी वनमाळी या टोपणनावानेही ते साहित्यक्षेत्रात परिचित होते.

    'काव्यमकरंद', 'भावतरंग', 'भावनिर्झर', 'सुधा', 'भावविहार' हे त्यांचे काव्यसंग्रह; तर 'बालविहार', 'किलबिल', 'शिशुगीत', 'क्रीडागीत' हे बालगीत संग्रह प्रसिद्ध आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भा. रा. तांबे यांच्या कवितांचेही संपादन मा.मायदेव यांनी केले होते. मा.मायदेव यांचे ३० मार्च १९६९ रोजी निधन झाले. मा.मायदेव यांना आदरांजली.
    मायदेव यांची गाइ घरा आल्या कविता

    गाई घरा आल्या

    गाई घरा आल्या । घणघण घंटानाद
    कुणीकडे घालू साद । गोविंदा रे? ।। १ ।।

    गाई घरा आल्या । धूळ झाली चहूंकडे
    घनश्याम कोणीकडे । माझा गेला? ।। २।।

    गाई घरा आल्या । वासरे हंबरती ।।
    कुणीकडे बालमूर्ती । कृष्ण माझा? ।।३।।

    गाई घरा आल्या । ब्रह्मानंद वासरांना
    काय करू माझा कान्हा । चुकला का? ।।४।।

    गाई घरा आल्या । घोटाळती पाडसांशी
    हाय! नाही हृषीकेशी । माझ्यापाशी ।।५।।

    गाई घरा आल्या । पाडसास हुंगीतात
    माझा मात्र यदुनाथ । दुरावला! ।।६।।

    गाई घरा आल्या । आंवरेना मुळी पान्हा
    राहणार भुका तान्हा । वासुदेव ।।७।।

    गाई घरा आल्या । दूध वाहे झुरूझुरू
    माझ्या जीवा हुरूहूरू । मुकुंदाची ।।८।।

    गाई घरा आल्या । दूधवाट राहियेली
    कुणी माझा वनमाळी । गुंतवीला ।।९।।

    गाई घरा आल्या । झाली बाई कातरवेळ
    आजुनी का घननीळ । ये ना घरा? ।।१०।।

    गाई घरा आल्या । लावियेली सांजवात
    बाळा दामोदरा रात । झाली न का? ।।११।।

    गाई घरा आल्या । पाल चूकचूक करी ।
    राख अंबे माझा हरी । असे तेथे ।।१२।।

    -- संजीव वेलणकर.

    ९४२२३०१७३३

    पुणे.

  • पार्श्वगायिका व अभिनेत्री राजकुमारी दुबे

    राजकुमारी दुबे उर्फ राजकुमारी एक गोड आवाजाच्या पार्श्वगायिका. बोलपटाच्या सुरवातीच्या पार्श्वगायन गायिका म्हणून राजकुमारी दुबे यांना ओळखले जाते. त्या पहिल्या महिला पार्श्वगायिका म्हणून सुद्धा ओळखल्या जात. बाल स्टेज कलाकार म्हणून राजकुमारी यांनी आपले करियरची सुरवात केली १९३३ मधील 'आंख का तारा', 'भक्त और भगवान', व १९३४ मध्ये आलेल्या लाल चिट्ठी, मुंबई की रानी, 'शमशरे आलम' या चित्रपटातील त्यांची गाणी खूपच गाजली होती. दुर्द्व्याने त्याचे रेकॉर्डिंग उपलब्ध नाही. त्यांचे पहिले गाणे त्या दहा वर्षाच्या असतना १९३४ साली एच.एम्.वी ने रेकॉर्ड केले होते. मा.राजकुमारी म्हटले की आठवतात तो मा.मधुबाला आणि मा.लता मंगेशकर या दोघीनाही एकाचवेळी इंडस्ट्रीत नाव मिळवून देणारा "महल". या चित्रपटात 'घबराके हम" आणि "एक तीर चला" ही मा.राजकुमारी यांची दोन गाणी अप्रतिम होती. मा.लता मंगेशकर यांनी राजकुमारी बरोबर काही सुंदर गाणी गायली आहेत. यातील काही कोई नैनो में मेरे आके न जाए (मेहरबानी) संगीत-हफीज खान, हम आह भी करते है (वफा) संगीत-विनोद, जिंदगी बदली मुहब्बत का मजा आने लगा (अनहोनी) मा.श्यामसुंदर, नौशाद, बर्मनदा, ओ.पी.नय्यर आदी दिग्गजांकडे काम मिळूनही मा.राजकुमारी फार गाजल्या नाही. रोशन यांनी "बावरे नैन", "अनहोनी" अशा गाजलेल्या चित्रपटात त्यांना संधी दिली होती.

    राजकुमारी यांची उतरत्या वयात इतकी वाईट परिस्थिती झाली की त्या पाकीजा चित्रपटात कोरस गाताना दिसल्या, संगीत कार नौशाद हे होते,त्यांना हे न बघवल्याने त्यांनी पाकीजासाठी राजकुमारी यांना चित्रपटासाठी काही ठुमरी गाण्याला सांगीतल्या,पण त्या कमाल अमरोही यांनी न वापरता बॅगराऊंडला वापरल्या,त्या अजुन ही एच.एम.व्ही व अमरोही कुटुंबाकडे असल्याचे म्हणतात.
    राजकुमारी दुबे यांचे १७ मार्च २००० रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    अमित सयानी यांनी घेतलेली राजकुमारी दुबे यांची मुलाखत.

    https://www.youtube.com/watch?v=gVWMPSI2SNo#action=share

    राजकुमारी यांची काही गाजलेली गाणी
    'सुन बैरी बलमा कछू सच बोल', नजरिया की मारी-मरी मोरी दइया', 'मुझे सच सच बता दो कब मेरे दिल में समाए थे', 'जब तुम पहली बार देखकर मुस्कराए थे','आंख गुलाबी जैसे मद की प्यालियां', जागी हुई आंखों में है शरम की लालियां', 'एक तीर चला और घबरा के जो हम सर को टकरायें तो अच्छा हो', 'चुन चुन घुंघरवा'

  • कवी यशवंत

    स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ या गाजलेल्या कवितेचे कवी यशवंत. १९५० साली मुंबईस भरलेल्या तेहतिसाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कवी यशवंत हे अध्यक्ष होते.

  • बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन

    १९९२ साली तिने पत्थर के फूल ह्या हिंदी चित्रपटात नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ह्या भूमिकेसाठी तिला फिल्मफेअरचा सर्वोत्तम महिला पदार्पण पुरस्कार मिळाला.

  • (डॉ.) वामन दामोदर गाडगीळ

    डॉ. वामन दामोदर गाडगीळ हे कथा-कादंबरीकार होते.

  • संगीतकार इक्बाल कुरेशी

    संगीतकार इक्बाल कुरेशी

    औरंगाबाद येथे जन्मलेले इक्बाल कुरेशी यांना लहान पणापासून संगीताची आवड होती. औरंगाबाद सोडून ते हैद्राबाद येथे फाईन आर्ट अकॅडमीला नोकरीसाठी गेले. ती बदलीची नोकरी असल्याने ते मुंबईत आले. ६.४ इंच उंची असलेले मा.इक्बाल कुरेशी त्या काळी बॉलीवूड मधील एक भारदस्त व्यक्तिमत्व होते. इक्बाल कुरेशी यांचा यांचा संगीतकार म्हणून १९६० साली आलेला पहिला चित्रपट पंचायत,कि जो मनोज कुमार यांचा सुद्धा पहिला चित्रपट होता. फिल्मालयचा लव्ह इन सिमला या चित्रपटातील इक्बाल कुरेशी यांची सगळी गाणी गाजली. बिंदिया, ये दिल किसको दु, उमर केंद हे त्यांचे संगीत दिलेले इतर चित्रपट. मा.इक्बाल कुरेशी यांच्या वाट्याला "ब" अथवा "क" दर्जाचे निर्माते व दिग्दर्शक आले. परन्तु त्यातील काही गाणी खूप लोकप्रीय झाली होती. त्यांनी एकूण २८ चित्रपटाना संगीत दिले. इक्बाल कुरेशी यांचे २१ मार्च रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    इक्बाल कुरेशी यांची गाणी
    https://www.youtube.com/watch?v=81z-a7IxSHY

  • चित्रपट निर्माते गुलशन कुमार

    लहानपणी गुलशकुमार वडिलांच्या दुकानावर ज्यूस विक्रीत त्यांना मदत करत होते. त्यांचा जन्म ५ मे १९५१ रोजी झाला. येथूनच त्यांना उद्योगाचे धडे मिळाले आणि त्यातील रस वाढत गेला. ते २३ वर्षांचे असताना त्यांनी कुटुंबियांच्या मदतीने एक दुकान खरेदी केले आणि रेकॉर्डर्स आणि ऑडिओ कॅसेट विक्री सुरु केली. त्यानंतर पुढे त्यांनी नोएडा येथे स्वतःची कंपनी सुरु केली आणि म्युझिक इंडस्ट्रीमध्ये स्वतःची वेगळी छाप निर्माण केली.

    गुलशन कुमारांनी त्यांच्या कॅसेट बिझनेसला 'सुपर कॅसेट इंडस्ट्रिज लिमिटेड' हे नाव दिले. याच कंपनीला टी-सीरीज नावानेही ओळखले जाते. गुलशन कुमारांनी ओरिजनल गाणी दुसऱ्या गायकांच्या आवाजात रेकॉर्ड करुन त्या कॅसेट कमी किंमतीत विक्री करण्यास सुरुवात केली होती. त्याचवेळी त्यांनी भक्ती संगीताकडेही मोर्चा वळवला.

    देवा-धर्माची गाणी रेकॉर्ड करुन ती त्यांनी प्रसिद्ध केली. काही गाणी ते स्वतः गात होते. ७० च्या दशकात गुलशन कुमार यांच्या कॅसेटची डिमांड वाढत गेली आणि म्यूझिक इंडस्ट्रीमध्ये ते यशस्वी बिझनेसमध्ये गणले जाऊ लागले. ऑडिओ कॅसेट्समध्ये यशस्वी झाल्यानंतर गुलशन कुमार फिल्म इंडस्ट्रीकडे वळले आणि त्यासाठी ते मुंबईला पोहोचले. बॉलिवूडमध्ये बस्तान बसविल्यानंतर ते हिंदू पौराणिक कथांवर आधारित चित्रपट आणि सीरियल्स देखील प्रोड्यूस करु लागले.

    फिल्म इंडस्ट्रीमध्ये यशस्वी झाल्यानंतर गुलशन कुमार यांनी त्यांच्या कमाईचा एक हिस्सा सामाजिक कामासाठी देण्यास सुरुवात केली. वैष्णोदेवीचे ते निस्सीम भक्त होते. त्यांनी वैष्णोदेवीच्या भक्तांसाठी भंडारा सुरु केला होता. आजही तो भंडारा अविरत सुरु आहे. या भंडाऱ्याच्या माध्यमातून भक्तांना मोफत भोजन दिले जाते गुलशन कुमार यांनी वैष्णोदेवीची अनेक गाणी गायली आहेत. गुलशन कुमार यांचे १२ ऑगस्ट १९९७ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:- इंटरनेट

  • होमिओपॅथीचे संस्थापक डॉ. सॅम्युअल हॅनेमन

    “निरोगी माणसात निर्माण झालेल्या लक्षणांप्रमाणेच लक्षणे असलेला रोगी आसल्यास ते औषध ती लक्षणे दूर करतं” असा सिद्धांत त्यांनी या अभ्यासाअंती मांडला आणि हा “सम लक्षण चिकित्सा ” होमिओपॅथीचा मूलभूत सिद्धांत ठरला. १७९६ मध्ये हानिमान यांनी या विषयांची माहिती प्रथम ‘हॉफलॅंड जर्नल’ मध्ये लिहिली . त्यानंतरच्या काळात त्यांनी स्वतःवर, मित्रांवर, कुटुंबीयांवर ९० औषधांचं सिद्धीकरण केलं. त्याची क्रमवार माहिती ” होमिओपॅथिक मटेरिया मेडिका ” या नावाच्या पुस्तकात संकलित केली .याच पुस्तकाचे पुढे १८११ ते १८२१ या काळात सहा भाग निघाले .

  • दिग्दर्शक अभिनेते सतीश पुळेकर

    सतीश पुळेकर मुख्यतः त्यांच्या नाट्य क्षेत्रातील अभिनयासाठी ओळखले जात असले तरी त्यांनी अनेक मराठी चित्रपटात महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांचा जन्म ४ नोव्हेंबर १९५० रोजी झाला. १९७६ मध्ये सतीश पुळेकर यांची चांगुणा’ नाटकातून कारकिर्दीला सुरवात झाली. यात सतीश पुळेकर आणि रोहिणी हट्टंगडीनं काम केलं होतं आणि या नाटकाला राज्यस्तरीय स्पर्धेत पहिलं पारितोषिक मिळालं. ‘आविष्कार’ या संस्थेकडून हे नाटक रंगमंचावर आलं होतं. या नाटकाचे दिग्दर्शक होते जयदेव हट्टंगडी. त्या नंतर सतीश पुळेकर यांनी अनेक नाटकांमध्ये काम केली. सख्खे शेजारी, पुरुष, कुणी तरी आहे तिथे, करार, प्रकरण दुसरे, दुर्गाबाई जरा जपून व चल थोडे एन्जॉय करू ही त्यांच्या कारकिर्दीतील ठळक नाटके आहेत. प्रकरण दुसरे या नाटकासाठी सतीश पुळेकर यांना नाट्यदर्पणचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.

    १९९२-९३ साली आलेल्या ‘करार’ या नाटकात सतीश पुळेकर यांची दुहेरी भूमिका होती. आणि त्या भूमिकेसाठी सगळेच पुरस्कार मिळाले. ‘करार’ हे नाटक त्यांच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरलं. त्यांची ‘येडा’ ‘अभिमन्यू’ हि नाटके खूप चालली. ‘हॅपी बर्थ डे’ हे नाटकही खूप सुंदर सादर केलं गेले.
    ‘येडा’ चित्रपटाने सतीश पुळेकर यांना या चित्रपटातील भूमिकेसाठी दादासाहेब फाळके यांच्या नातवाने सुरू केलेल्या पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. ‘हळद रुसली कुंकू हसलं’ हा चित्रपट पण खूप गाजला. ‘युथ’ आणि ‘पोलिस लाइन’ या चित्रपटात काम केले आहे.

    सह्याद्री वाहिनीवरच्या ‘लाइफ मेंबर’ व ‘चिरंजीव’ या त्यांच्या दोन मालिका खूप गाजल्या होत्या. चित्रपटांमध्ये "सांगाती", "काय राव तुम्ही" , "आभरण", "चार्ली", "येडा", "आम्ही चमकते तारे", "श्री पार्टनर", "गोळा बेरीज", "फक्त लढ म्हणा", "आरम्भ", "आटापिटा", "वैकेशन", "मी मन आणि ध्रुव", "बे दुने साढ़े चार", "विश्वास", "सार कस शांत शांत", "हळद रुसली कुंकु हसली", "अत्याचार" प्रमुख आहे. सतीश पुळेकर त्यांच्या अभिनयासाठी ते प्रसिद्द आहेतच सोबत ते अतिशय चांगले कार्टूनिस्ट आहेत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट