जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
“आहुती’, “गुन्हेगारी आणि शासन’, “गुन्हेगारांचे जग’, “पुरुषप्रधान संस्कृती’, “दुर्दैवाशी दोन हात’ अशा अनेक पुस्तकांच्या लेखिका सरोजिनी मधुसूदन शारंगपाणी यांचे चिरंजीव श्रीनिवास शारंगपाणी यांनी जागवलेल्या त्यांच्या आठवणी…
शिर्डी माझे पंढरपूर, नमन श्री एकदंता, शांताई मंगेशी, गजानन शेगावी आले, स्वामी समर्थ कथामृत्त असे अनेक भक्तिमय अल्बम त्यांनी केले. भक्तिगीते आणि भावगीते असा प्रवास करीत असतानाच त्यांनी जवळपास ९४ हून अधिक चित्रपटांना संगीत दिले.
यत शिक्षण शाळेत ते मुख्याध्यपक होते. त्यांचा त्यावेळच्या अनेक साहित्यकांशी मैत्री होती.
मराठ्यांचा इतिहास घडविणाऱ्या प्रसिद्ध घराण्यांपैकी आंग्रे घराणे हे एक. पुणे जिल्ह्यातील काळोसे हे आंग्रे घराण्याचे मूळ गाव व शखपाळ-शंकपाळ-संकपाळ हे त्यांचे मूळ आडनाव; परंतु आंगरवाडी ह्या काळोसेतील एका छोट्या भागावरून त्यांस पुढे आंग्रे हे उपनाव प्राप्त झाले. सेखोजी हे या घराण्यातील पहिले ज्ञात पुरुष. त्यांचे चिरंजीव तुकोजी हे उत्तर कोकण काबीज करीत असता शहाजी महाराजांनी चौलजवळ १६४० मध्ये जी दर्यावरील लढाई केली, त्यात प्रथम प्रसिद्धीस आले. १६५९ मध्ये ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदरी गेले. त्यांना मराठी आरमारातील २५ असामींची मुखत्यारी होती. पुढे ते आपल्या कर्तबगारीने सरनौबतीच्या हुद्द्यापर्यंत चढले. इ.स. १६८० तुकोजीं आंग्रेंचे निधन झाल्यावर त्यांचा मुलगा कान्होजी आंग्रे ह्यांनी त्यांचे कार्य पुढे चालू ठेवले.
हिमाचल प्रदेशातील एकल महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी अहनिर्श झटणार्या 'सुत्र' संस्थेचे संस्थापक सुभाष मेंढापुरकर.
हिमाचल प्रदेशातील निराधार, अविवाहित, विधवा, परित्यक्त्या, वृद्ध महिलांच्या पुनर्वसनासाठी 'सोशल अपलिफ्टमेंट थ्रू रुरल अॅक्शन' अर्थात 'सुत्र' या संस्थेची स्थापना करणारे मेंढापूरकर हे मूळचे सोलापूरचे. पुण्यात राहून त्यांनी मराठीत एमए आणि त्यानंतर टीआयएसएस मधून एमएसडब्ल्यू केल्यानंतर १९७७ साली एका प्रकल्पाच्या निमित्ताने ते हिमाचल प्रदेशात गेले. महिलांवर होणारे अत्याचार, कौटुंबिक हिंसा, दारू पिऊन महिलांना मारहाण असे प्रकार तेथे सर्रास सुरू होते. त्या परिस्थितीत गरज होती ती तेथील महिलांच्या सक्षमीकरणाची तसेच त्यांना संघटित करण्याची. मेंढापूरकरांनी हे आव्हान उचलले आणि वंचित महिलांना 'सुभाष भय्या'चा मोठा आधार मिळाला. सुरूवातीच्या काळात मेंढापूरकरांना गावकर्यांचा बराच रोष पत्कारावा लागला, पण ते मागे हटले नाहीत. महिला सक्षमीकरण, आथिर्क स्वावलंबन, बचतगट, आरोग्य सुविधा, विधवांच्या मुलांना शिष्यवृत्या अशा विविध पातळ्यांवर त्यांचे काम सुरू राहिले.
स्त्री भ्रूण हत्येच्या विरोधात आवाज उठवणारी पहिली संस्था म्हणून 'सुत्र'कडे पाहिले जाते. आज मात्र सामाजिक आणि आथिर्क संदर्भ बदलले असल्याचे मेंढापूरकरांना प्रकर्षाने जाणवते आहे. आजच्या राजकारण्यांना सभ्यतेचा आदर करण्याची सवय राहिलेली नाही. पूर्वी विरोधकांनाही इज्जत होती, पण आता सगळे चित्रच बदललेय असे ते सांगतात.
महाराष्ट्रात संस्था-संघटना खूप आहेत. पण मनापासून काम करण्याची त्यांची तयारी नाही. एकीकडे व्यावसायिक संस्था तर दुसरीकडे राजकारणाबाबत जागृती नसणार्या संघटना भरपूर झाल्या आहेत, हेही त्यांचे एक निरीक्षण. आत्ताच्या लोकांना राजकारणाचे मर्म कळत नसल्यामुळे त्यांना आपल्या कामाचे राजकारण करता येत नाही म्हणूनही ते मागे पडतात किंवा दुर्लक्षित राहतात असे त्यांचे मत बनले आहे. याला कारण म्हणजे १९८० नंतर महाराष्ट्रात विद्यार्थ्यांचा किंवा युवकांचा कोणताच लढा उभा राहिलेला नाही. त्यामुळे आत्ताची पिढी प्रगल्भ असली तरी राजकारणाचे भान, जाण त्यांना नाही असे ते सांगतात. पूर्वीच्या लोकशाहीत सर्वसामान्यांमध्ये संघर्ष करण्याची ताकद होती. आता लढ्यांमध्ये मध्यमवर्ग कुठेच दिसत नाही. लोकशाहीच्या लढ्यांची जागा हिंसेने, दंडुकेशाहीने घेतली आहे आणि लोकशाहीला ते सर्वात घातक ठरू शकते याची चिंता मेंढापूरकरांना सतावते आहे.
शेती करू इच्छिणार्या महिलांना जमीन द्या यासाठी सध्या त्यांचा लढा सुरू आहे. शेती करून महिला स्वत:च्या पायावर उभ्या राहू शकतात असा विश्वास मेंढापूरकरांना असून त्यासाठी ते लढताहेत.
त्यांना 'सारडा समान संधी पुरस्कार' बहाल करण्यात आला आहे.
(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)
संगीतावर हुकूमत गाजविणारा कुशल कलाकार, प्रतिभासंपन्न संगीतकार व जागतिक कीर्तीचे पियानोवादक व्हिताज बलसारा उर्फ व्ही.बलसारा यांचा जन्म २२ जुन १९२२ रोजी झाला.
व्हिताज अर्देशर बलसारा उर्फ व्ही. बलसारा हे पारशी असून सुद्धा व्ही.बलसारा यांनी एकेकाळी आपला हार्मोनियम, ऑर्गन व पियानोच्या अप्रतिम साथीने अवघ्या हिंदी फिल्मी संगीतावर हुकूमत गाजवली.
‘‘भारतीय संगीताचं बाळकडू त्यांना आईकडून मिळालं. तीच पहिली गुरू. संगीताची गोडी त्यांना बालपणापासूनच होती. घरी पियानो नव्हता. गोव्याच्या शिक्षकांनी त्यांना पियानो व व्हायोलिनचं शास्त्रशुद्ध शिक्षण दिलं. गायनाचे प्राथमिक धडे त्यांनी फ्रामरोज श्रॉफ व पुढे बडोदा संस्थानचे उस्ताद बच्चूमियाँ यांच्याकडे गिरवले. १९३८ साल होतं. जुहूर राजा यांच्या ‘बादल’ चित्रपटासाठी बरेलीचे खानसाहेब मुश्ताक हुसैन संगीत दिग्दर्शक होते. ध्वनिमुद्रणाच्या वेळी त्यांचा नेहमीचा साजिंदा आला नाही, तेव्हा आयत्या वेळी व्ही. बलसारा पियानो वाजवण्यास बोलवले. तेव्हा वय होतं फक्त १६ वर्ष. व्ही. बलसारा यांच्या वादनशैलीवर खुश होऊन खानसाहेबांनी तिथल्या तिथे माझी दुय्यम सहायक म्हणून नेमणूक केली.’’ व्ही. बलसारा यांनी ‘जिना सिखो’मध्ये पं. हनुमान प्रसादबरोबर, जुहूर राजासाठी ‘मझाक’मध्ये, ‘दोस्त’मध्ये सज्जाद हुसैनबरोबर, ‘रंगमहल’मध्ये मा.दत्ता कोरगावकर यांचा सहायक म्हणून काम केलं. त्यावेळी अॅ रेंजरचं नाव चित्रपटाच्या श्रेयनामावलीत येत नसे. मास्टर गुलाम यांनी व्ही. बलसारा यांना स्वत:च्या मुलाप्रमाणे सांभाळलं. दत्ता कोरगावकर व मदन मोहननी सख्ख्या भावाचं प्रेम दिलं.
शंकर-जयकिशननी तर अगदी ‘बरसात’पासून ते ते मुंबई सोडेपर्यंत एकही गाणं मी ऑर्गन अथवा हार्मोनियमवर असल्याशिवाय ध्वनिमुद्रित केलं नाही. पूर्वी प्रत्येक संगीतकाराची स्वत:ची वैशिष्टय़पूर्ण शैली होती. गाण्याच्या चालीवरून संगीतकार ओळखू येत असे. यामध्ये वादक कलाकारांचा सिंहाचा वाटा होता, हे विसरून चालणार नाही.’’
व्ही. बलसारा यांनी ‘‘‘आऽ इन्तजार हैं तेरा’ (बडी माँ), ‘चकोरी का चंदा से प्यार’ (दामन), ‘कोई प्रेम का दे के संदेसा’ (दोस्त), ‘कैसे कोई जिए’ (बादबान), ‘तारा री यारा री’ (दास्तान), ‘लो प्यार की हो गई जीत’ (जादू), याशिवाय शंकर-जयकिशन यांची ‘आवारा’, ‘बरसात’, ‘बादल’, ‘दाग’, ‘आंस’, ‘आह’, ‘पतिता’, ‘बादशहा’, ‘श्री ४२०’, ‘काली घटा’, ‘चोरी चोरी’ अशा अनेक चित्रपटांतील वाजवलेली गाणी अजून लोकांच्या लक्षात आहेत.’’ मा.व्ही.बलसारा हे पियानो, हार्मोनियमशिवाय व्हायोलिन, मेंडोलिनही वाजवत असत. त्या वादनामध्ये सतत ते निरनिगळे प्रयोग करीत असत. ते हार्मोनियमवर पाश्चिमात्य संगीत वाजव असत, त्यावेळी हार्मोनियमचा सूर अॅ कॉर्डियनसारखा येत असे. उदा. ‘ऐ मेरे दिल कही’ (दाग), ‘याद किया दिलने’ (पतिता) हे गाणं, पियानोवर जेव्हा ते वाजवत असत त्याला भारतीय संगीताची जोड देऊन तेव्हा पियानोवर सरोद, जलतरंग अथवा संतूरसारखा आवाज आणत असत. त्यांनी काउंटर मेलडी वाजवण्याची एक वेगळी शैली निर्माण केली ती सिनेशौकिनांना आवडली.’
१९५३ साली व्ही.बलसारा यांनी ‘‘स्वीट पिक्चर्स निर्मित जगदीश पंतच्या ‘मदमस्त’ चित्रपटात स्वतंत्ररीत्या संगीत दिग्दर्शन केले. त्यातील मा.लता मंगेशकर यांच्या ‘सुनाए हाल दिल का हमारा’ गाण्यात व्हायोलिन्सचा मारा कटाक्षाने टाळण्यात आला आहे. मा.व्ही.बलसारा यांना ‘‘आयझ्ॉक डेव्हिड (स्पॅनिश मेंडोलिन), रामसिंग (सॅक्सोफोन), रामनारायण (सारंगी), अब्दुल करीम लाला (ढोलक व ढोलकी), कर्नाड, नार्वेकर (व्हायोलिन) यांसारखे अनेक कलाकारांनी साथ दिली. व्ही.बलसारा यांचे निधन २४ मार्च २००५ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट / अरुण पुराणिक
पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते आणि आपलं घर या संस्थेचे संचालक श्री विजय गजानन फळणीकर…
बोचऱ्या पण विखारी नसलेल्या, सहजसाध्या पण सामान्य पातळीवर न घसरलेल्या प्रसन्न विनोदाच्या माध्यमातून सामान्य माणसाला भेडसावणाऱ्या प्रश्नांना वाचा फोडणारे आणि आधुनिक काळात दूरचित्रवाणीद्वारे विनोदाला देशव्यापी लोकमान्यता मिळवून देणारे जसपाल भट्टी हे इलेक्ट्रिकल इंजिनीयर होते.
रिदमिक जिमनॅस्टिक या खेळात सहसा कुणी रस घेत नाहीत. परंतु ठाण्यातील मुग्धा केतकर हिने मात्र शालेय जीवनातच आपला मार्ग निश्चित केला आणि वयाच्या ९ व्या वर्षापासून राज्यस्तरीय जिमनॅस्टिक स्पर्धेत पदक मिळवायला सुरुवात केली.
भालचंद्र श्रोत्री हे अलिबाग-उरण परिसरातील सामाजिक कार्यकर्ते होते.
Copyright © 2025 | Marathisrushti