(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

  • सरोदवादक आशिष खान देबशर्मा

    आशिष खान देबशर्मा हे अली अकबर खान यांचे चिरंजीव, अलाउद्दीन खान हे त्यांचे आजोबा. सरोदवादक आशिष खान देबशर्मा यांचा जन्म ५ डिसेंबर १९३९ यांचा जन्म खाला. त्यांची मावशी, म्हणजे अन्नपूर्णादेवी. आशिष खान देबशर्मा यानी वयाच्या ५ व्या वर्षी आपल्या आजोबांच्या मार्गदर्शना खाली शिक्षण घेण्यास सुरवात केली, व पुढे अली अकबर खान यांच्या कडे तालीम घेतली. वयाच्या १३ व्या वर्षी त्यांनी ऑल इंडिया रेडिओ नॅशनल प्रोग्राम मध्ये आणि व तानसेन म्युझिक संमेलन मध्ये आपल्या वडिलांसोबत आणि आजोबांबरोबर वादन सादर केले होते.

    २००२ मध्ये त्यांना अमेरिकेतील इलिनॉय आर्ट्स कौन्सिलची फेलोशिप आणि २००५ मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २००७ साली रोजी आशिष खान ग्रेट ब्रिटन आणि आयर्लंडमधील रॉयल एशियाटिक सोसायटीचे फेलोशिप मिळाली. आशिष खान देबशर्मा यांना २००६ सालासाठी त्याला "गोल्डन स्ट्रिंग्स ऑफ द सरोद" अल्बमसाठी 'बेस्ट वर्ल्ड म्युझिक' श्रेणीमध्ये ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कारही मिळाला आहे.

    आशिष खान यांनी जॉन बारम, जॉर्ज हॅरिसन, रिंगो स्टार, द बीटल्स, एरिक क्लॅप्टन, चार्ल्स लॉयड, जॉन हाडी, अॅलिस कोलट्रणे, एमिल रिचर्ड्स, डॅलस स्मिथ, डॉन पोप, जॉर्ज स्ट्रुनझ, अरदिशर फराह अश्या अनेक संगीतकारांसोबत काम केले आहे. आशिष खान सध्या न्यू ऑरलियन्स संगीतकारांसोबत टिम ग्रीन आणि जेसन मार्सलिस यांच्यासारखे आशिष खान सध्या कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ आर्टस, लॉस एन्जेलिस, यूएस येथे भारतीय शास्त्रीय संगीताचे सहायक प्रोफेसर आणि अमेरिकेतील सांताक्रुझ येथे कॅलिफोर्निया विद्यापीठातील संगीत विभागाचे सहायक प्राध्यापक आहेत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    https://www.youtube.com/watch?v=z0kt_vRo_Qo
    https://www.youtube.com/watch?v=-rU1QGYm65s

    गोल्डन स्ट्रिंग्स ऑफ द सरोद
    https://www.youtube.com/watch?v=_bpsXIJUxPI

  • आनंदराव विठोबा अडसुळ

    शिवसेनेचे खासदार. माजी केंद्रिय अर्थ राज्यमंत्री, सहकारी बॅंकांच्या युनियनचे नेते.

  • रघुनाथराव पेशवे

    (१ ऑगस्ट १७३४ - ११ डिसेंबर १७८३)

    उत्तर पेशवाईतील अल्पकाळ सत्तेवर असलेला एक पेशवा. पहिला बाजीराव व काशीबाई यांचा हा दुसरा मुलगा असून तो राघो भरारी, राघोबा, दादासाहेब इ. नावांनीही ओळखला जातो. त्याचा जन्म माहुली येथे झाला. बालपण छ. शाहूंजवळ गेले. लहानपणी हा उनाड होता. १७५३ पासून तो स्वतंत्रतेने स्वार्‍या काढू लागला. त्याची पहिली स्वारी १७५३ ते १७५५ पर्यंत चालली. तीत तो दिल्लीस गेला होता. या स्वारीत राजस्थानातून त्याने खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न केला. त्याची दुसरी स्वारीही दिल्लीवरतीच झाली, पण १७५७ मध्ये अब्दाली दिल्लीहून अफगाणिस्तानात परत गेल्यावर मग हा दिल्लीस पोहोचला. तेथून तो दिल्लीच्या उत्तरेकडील प्रदेश ताब्यात घेत घेत अटकपर्यंत पोहोचला व काही मराठे घोडदळाच्या तुकडया तर पेशावरला जाऊन राहिल्या होत्या, पण हा काही कारण नसता १७५८ मध्ये पूण्यास परत आला. १७६० मध्ये भाऊसाहेब पानिपतमध्ये अडकले असता त्यांना साहय करण्यासाठी बाळाजी बाजीराव राघोबास घेऊन उत्तरेत जात होता. तेव्हा राघोबास निजामाला मदतीस आणण्यासाठी दक्षिणेत पाठविले, पण निजामाचे मन वळविण्याचा कोणताच प्रयत्न न करता हा दक्षिणेस स्वस्थ बसून राहिला.

  • प्रमोद हिंदूराव

    प्रमोद हिंदूराव यांनी लोकप्रतिनिधी या आपल्याला मिळालेल्या समाजसेवेच्या सुवर्णसंधीचा पुरेपूर फायदा उचलला आहे. ठाणे जिल्हा परिषदेने प्रथम त्यांच्या नेतृत्वाखाली, ठाणे जिल्ह्यामध्ये शिक्षण परिषद उत्तम प्रतिसादामध्ये घेतली होती. शिक्षण, महिला सक्षमीकरण, रस्ते विकास, आरोग्य संवर्धन, सांस्कृतिक, सामाजिक अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी केलेली विकासकामे अतुलनीय आहेत. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व त्यांच्यामधील अभिजात व निरागस कलेला प्रोत्साहन मिळावे, यासाठी त्यांनी सुरू केलेली निबंध व चित्रकला स्पर्धा अवघ्या जिल्ह्यात चर्चिली गेली.

    जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणार्‍या मुलांना उच्च दर्जाच्या शैक्षणिक सुविधा मिळाव्यात म्हणूने त्यांनी अफाट कार्य केले आहे. शाळांमधून बाक सुविधा, तसेच मोफत गणवेष वाटप, दप्तर वाटप, शूज-रेनकोट वाटप ही त्यांची उपलब्धी मानावी लागेल. जिल्हा नियोजन समितीमार्फत ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणार्‍या गावठाणचे विस्तारीकरण करण्याबाबतची मागणी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य म्हणून त्यांनी केलेली आहे. विशेष म्हणजे आरोग्याच्या प्रगत सेवा ग्रामीण भागापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी केलेला “मोबाईल ओ.पी.डी.” हा अभिनव उपक्रम फारच यशस्वी झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना प्रगत आरोग्य सेवा उपलब्ध झाल्या आहेत.

    याशिवाय रेल्वे प्रवाशांचे प्रश्न रेल्वे प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी रेल्वे परिषदेचे आयोजन ते सतत करीत होते. त्याच अनुषंगाने माळशेज रेल्वे सुरू करण्याबाबत जागृत रेल्वे प्रवासी परिषदेमार्फत दिल्ली येथे रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी सहाय्य रेल्वे बोर्डाकडे खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेवून या प्रलंबित प्रस्तावाबाबत चर्चा केली होती.

    त्यांनी सिडकोचे अध्यक्षपदह भूषविले आहे.

  • आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे 

    सत्यजित रे यांना प्रेमाने “माणिकदा‘ असे म्हटले जाई. नावाप्रमाणे ते भारतीय सिनेमातील एक “माणिक‘ होते. अमूल्य रत्न होते.

  • बॉलिवूड अभिनेते राजेन्द्र कुमार

    तसा राजेंद्रकुमार म्हणजे म्हटला तर स्टार, म्हटला तर नट तरी पण ६० च्या दशकात त्यांचे अनेक चित्रपट सिल्वर जुबली झाले. या मुळे त्यांचे नाव ‘ज्युबिली कुमार’ म्हणून पडले.

  • महान गायक मोहम्मद रफी

    शास्त्रीय संगीताची तालीम मोहम्मद रफी यांनी उस्ताद बडे गुलाम अली खाँ, उस्ताद अब्दुल वाहिद खान, पंडित जीवनलाल मट्टो आणि फिरोज निजामी यांच्याकडे घेतली. त्यांचा जन्म २४ डिसेंबर १९२४ रोजी झाला. रफीजींचा पहिला पब्लिक परफॉर्मन्स हा त्याच्या वयाच्या १३ व्या वर्षी लाहोर मध्ये झाला. पहिले गाणे 'गाँव की गोरी' या चित्रपटात त्यांनी १९४५ मध्ये गायले. त्याच दरम्यान गायना बरोबरच त्यांनी एक दोन चित्रपटात छोट्या छोट्या भुमिकाही केल्या.

    १९४७ मध्ये फाळणीनंतर रफीजींनी भारतात राहण्याचा निर्णय घेतला. १९४९ ते १९७० च्या दरम्यान रफीजींनी चित्रपट क्षेत्रात आपल्या जबरदस्त गायनाने चांगला जम बसवला व तो टिकवला देखील. १९६० चे दशक हे रफीजींसाठी खास होतं, त्याच वर्षी त्यांना 'चौदहवी का चाँद' च्या शीर्षक गीतासाठी पहिल्यांदाच फिल्मफेअर अॅ्वॉर्ड मिळालं. याच दशकात रफीजींनी दिग्गज संगीतकारांबरोबर काम करून अनेकानेक हिट गाणी दिली. रफीजी हे त्यांच्या उदार स्वभावासाठी प्रसिद्ध होते. किशोरकुमारजींच्या सिनेमातल्या गाण्यासाठी त्यांनी निव्वळ 'एक रुपया' मानधन घेतलं असही म्ह्टलं जातं.

    शम्मीसाठी त्यांनी ज्या धाटणीत गाणी गायली आहेत, ती गाणी कुणीही पडद्यावर न पाहता फक्त ऐकून सांगेल किंवा अंदाज बांधू शकेल की ही गाणी बहुतेक शम्मीवरच चित्रित झाली असतील असं ऐकिवात आहे की गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळेला शम्मी स्वतः स्टुडिओत रफीजींना भेटून सांगत असे की ह्या गाण्यावर मी असे हावभाव करणार आहे किंवा इथे थोडा अंगविक्षेप आहे. इ. 'दोस्ती' चित्रपटासाठी त्यांनी सुधीरकुमार या नवोदित कलाकारासाठी ३ ते ४ गाणी गायली. तीही त्याच्याच लकबीत. त्यापैकी 'चाहूंगा मैं तुझे... ' या गीताला फिल्मफेअर मिळाले. चित्रपटसृष्टीत सगळय़ांत गाजलेला दुरावा म्हणजे मा.लता मंगेशकर व मोहमद रफी यांच्यातील साठच्या दशकातील दुरावा मानतात. मानधनावरून एका बैठकीत काही वाद होऊन रफी यांनी ‘ये महारानी (लता) जैसा चाहेगी वैसा ही होगा’ अशी कॉमेंट केल्याने केल्याने लताजींना खूप राग आला व त्यानंतर जवळपास पाच-सहा वर्षे दोघांमध्ये दुरावा होता.

    लता व रफी यांनी युगलगीते गाणे बंद केल्यावर दोन गट पडले. त्या काळचे काही नायक, शम्मी कपूर, राजेंद्रकुमार, प्रदीपकुमार इ. हे मोहमद रफी यांचा आग्रह धरायचे, लता मंगेशकर व मोहम्मद रफी यांच्या दुराव्याचे पर्यावसान एकमेकांबरोबर न गाण्याच्या निर्णयात रूपांतरीत झालं. पण 'दिल ने फिर याद किया' या चित्रपटाचं शिर्षकगीत गाण्यासाठी सोनिक ओमी यांना रफी, लता आणि मुकेश यांची निवड केली होती. पण नेमकं त्याचवेळी 'लता आणि रफी हे एकमेकांबरोबर गाणार नाहीत' असं दोघांनी जाहीर करून टाकलं. सुमन कल्याणपूर या नव्या तरूण गायिकेला ते गाणं दिलं. त्यांनी एकवेळ लताजींना वगळल, पण रफीजी मात्र त्या गाण्यात त्यांना जास्त महत्त्वाचे वाटले. ‘लक्ष्मीकांत प्यारेलाल’ यांच्या यशामध्ये मो. रफी यांचा खूप मोठा वाटा होता. लक्ष्मीकांत प्यारेलाल रफी यांना आपला गुरु मानायचे.

    लक्ष्मीकांत प्यारेलाल यांना सुरुवातीला संगीतकार म्हणून प्रोत्साहन देण्यात ज्या दोन व्यक्ती समोर होत्या त्यातील पहिले म्हणजे ‘रफी साहेब’ तर दुसऱ्या गानकोकिळा ‘लतादीदी’. रफी साहेबांनी आपल्या हिंदी चित्रपट संगीतातील सर्वात जास्त गाणी लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या सोबतच गायलेले आहे. आपल्या एकूण ३५ वर्षांच्या गायनाच्या कारकिर्दीत मा.रफीजीनी ४००० च्या वर गाणी गायली. ज्यात हिंदी, मराठीसह अन्य भाषेतल्या अनेक प्रकारच्या गाण्यांचा समावेश होता. गैरफिल्मी, गझल, भजन, क्लासिकल, सेमिक्लासिकल इ. या अनेक प्रकारांमध्ये रफीजींचे अनेक मूडही समाविष्ट आहेत.

    रफींना गाडय़ांचीही खूप आवड होती. या छंदापोटी त्यांनी थेट लंडनहून होंडा कार मागविली होती आणि ऑडी हे नाव सिनेमासृष्टीत फारसं कोणाला ठाऊक नव्हतं तेव्हा त्यांच्या दारात दिमाखात ऑडी उभी होती. त्यांना करमणूकीसाठी कॅरम, बॅडमिंटन व पत्ते खेळायला आवडत. तसंच पतंग उडवणे हा ही त्यांचा छंद होता.मा.मोहम्मद रफी यांचे ३१ जुलै १९८० रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे मा.मोहम्मद रफी यांना आदरांजली. मा.मोहम्मद रफी यांच्या जयंती निमीत्त गुगलने डुडल बनविले आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • मराठी लेखिका, कवयित्री – कविता महाजन

    गुरुवर्य नरहर कुरुंदकर यांचे निकटचे स्नेही ‘प्रतिभानिकेतन’चे सेवानिवृत्त प्राचार्य स. दि. महाजन यांच्या त्या कन्या. कविता महाजन यांचे शालेय शिक्षण नांदेडच्या प्रतिभा निकेतन माध्यमिक विद्यालयामध्ये झाले. नांदेडच्या पीपल्स महाविद्यालयात आणि औरंगाबादच्या शासकीय कला महाविद्यालयात त्यांनी उच्च शिक्षण घेतले.

  • प्रल्हाद केशव अत्रे

    मराठीतील नावाजलेले लेखक, कवी, नाटककार, संपादक, पत्रकार, चित्रपट निर्माते, शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी व वक्ते प्रल्हाद केशव अत्रे यांचा जन्म १३ ऑगस्ट १८९८ रोजी झाला. १९३४ साली सरस्वती सिनेटोनच्या दादा तोरण्यांच्या आग्रहाखातर नारद-नारदी चित्रपटाची कथा व संवाद अत्र्यांनी लिहून दिले. 'हंस पिक्स्चर्स'साठी १९३७ साली त्यांनी इब्सेनच्या 'पिलर ऑफ द सोसायटी' या कथेवरून धर्मवीर, स्वतःच्याच कथांवरून प्रेमवीर ह्या मराठी व 'बेगुनाह' ह्या हिंदी चित्रपटांच्या पटकथा लिहून दिल्या. १९३८ साली 'हंस'साठीच 'ब्रह्मचारी' चित्रपटाची कथा त्यांनी लिहून दिली. त्यांनी लिहिलेला 'ब्रँडीची बाटली' हा चित्रपटही लोकप्रिय ठरला. अत्र्यांनी राजगुरू व अभ्यंकर या इतर दोन भागीदारांसोबत एआरए या नावाने 'नवयुग चित्रपट कंपनी' काढली. पुढे 'हंस पिक्चर्स'मधले मास्टर विनायक, पांडुरंग नाईक, बाबूराव पेंढारकर हेदेखील भागीदार झाल्यावर या कंपनीने ’नवयुग पिक्चर्स’ असे नाव बदलून घेतले. १९४० साली नवयुग पिक्चर्सतर्फे 'लपंडाव' चित्रपटाची कथा अत्र्यांनी लिहिली. 'लपंडाव' चित्रपटानंतर त्यांनी 'संत सखू' या चित्रपटाचे संवाद लिहिले. परंतु 'प्रभात'ने ही हाच विषय घेतला आहे या कारणाने मास्टर विनायकांनी त्याला विरोध केला. नवयुग पिक्चर्सने मग वि.स. खांडेकरांची 'अमृत' ही कथा घेऊन चित्रपट काढावयाचे ठरवले. या वादामुळे अत्र्यांनी नवयुग पिक्चर्स सोडले. अत्र्यांनी दिग्दर्शित केलेल्या "श्यामची आई" चित्रपटाला १९५४ साली सुरू झालेल्या "राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार" सोहोळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे पहिले "सुवर्ण कमळ" मिळाले होते.

    १९२३ साली अत्र्यांनी 'अध्यापन' मासिक सुरू केले. १९२६ मध्ये 'रत्नाकर' , १९२९ साली 'मनोरमा', आणि पुढे इ.स. १९३५ साली 'नवे अध्यापन' व १९३९ साली 'इलाखा शिक्षक' ही मासिके काढली. १९४० साली त्यांनी नवयुग साप्ताहिक सुरू केले. १९५६ साली त्यांनी मराठा हे दैनिक सुरू केले. ते त्यांच्या हयातीनंतरही काही काळ प्रकाशित होत होते. समाजातील दुर्बल घटक, गोरगरीब, तळागाळातील माणसे, अज्ञजन, उपेक्षित, दलित यांचा आपल्या सामर्थ्यानिशी अत्र्यांनी सतत कैवार घेतला. आचार्य अत्रे हे महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी उभ्या राहिलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील प्रमुख नेते होते.
    आचार्य अत्रे यांचे १३ जून १९६९ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:- इंटरनेट

  • दिलीप नरहर हेर्लेकर