जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून आपल्या कलेच्या जोरावर मुंबईसारख्या कलेची पंढरी मानल्या जाणार्या मयानगरीच्या मुख्य प्रवाहात येणे, वाटते तितके सोपे नसते. अनेक कलावंतांचे ते केवळ स्वप्नच ठरले आहे. पण अनेक कलावंत आपले कर्तृत्व व नशीब यांच्या तारा जोडून तिथवर पोहोचण्यात यशस्वी ठरले आहेत व मग कय विचारता त्यांच्या संपुर्ण आयुष्याचेच तिथे सुंदर व सुरमय असे गाणे झाले आहे.
अशा कलावंतांमध्ये बीडच्या संजीवनी बीडकर होत्या. त्यांचे शिक्षण जेमतेम दहावीपर्यंत झाले होते. परंतु त्यांच्याकडे अतिशय अप्रतिम व साक्षात नटराजाचे पृथ्वीवरील दर्शन घडविणारी अशी नृत्यकला होती. व्यक्तिमत्त्व आकर्षक होते.
साहित्यिक, समाजवादी नेते, समाजसुधारक पांडुरंग सदाशिव तथा साने गुरुजी यांचा जन्म २४ डिसेंबर १८९९ रोजी झाला.
कला म्हणजे काय?, मानव जातीची कथा, राष्ट्रीय हिंदूधर्म, दिल्ली डायरी, ना खंत ना खेद याशिवाय भारताचा शोध, अनेक चरित्रपुस्तके, गोड गोष्टी, १४ अनुवादित ग्रंथ, भारतीय संस्कृती हा लेखसंग्रह. सुंदर पत्रे, पत्री तसेच श्यामची आई हे इतिहास घडवणारे पुस्तक, अशी त्यांची ग्रंथसंपदा.
११ जून १९५० रोजी त्यांचे निधन झाले.
पांडुरंग सदाशिव साने तथा साने गुरुजी यांच्यावरील मराठीसृष्टीवरील लेख.
पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजी (3-Jan-2017)
मराठी साहित्यिक पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ साने गुरुजी (11-Jun-2017)
पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजी (26-Dec-2017)
Pandurang Sadashiv Sane alias Sane Guruji
गोविंद मोरेश्वर तथा अप्पा पेंडसे हे ज्येष्ठ पत्रकार होते.
पं.उपेंद्र भट यांनी संगीत विषयात एम.ए. केले असून अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय (मुंबई) तर्फे त्यांना `संगीत विशारद’ आणि `संगीत अलंकार’ पदवी देऊन गौरविण्यात आले आहे.शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीत, नाट्य संगीत, चित्रपट संगीत, भावगीत, राग निर्मिती, संतवाणी, हिंदी द्वंद्वंगीते असे अनेकविध पैलू त्यांच्या गाण्यात आहे.
ठाण्यातील चित्रकला क्षेत्रातील एक तरुण व्यक्तिमत्व म्हणजे शार्दुल संभाजी कदम हे होत. व्यावसायिक चित्रकार म्हणून पुढे येत असलेले शार्दुल कदम हे सर जे.जे. स्कुल ऑफ आर्ट मध्ये अधिव्याख्याता आहेत.
चित्रपट वितरण, साखर कारखाना, अर्थमूव्हिंग अशा व्यावसायिक क्षेत्रात जम बसत असतानाही कोल्हापूरच्या हिम्मतबहादूरांचा वारसा लाभलेले अभयसिंह चव्हाण अभ्यासाची शिडी चढू लागले आणि प्रशासकीय क्षेत्रात शिरण्याचा निर्धार त्यांनी केला. पण तेथे यशाने हुलकावणी देताच त्यांनी थेट चहाच्या मळ्यातच मजल मारली आणि आता अफ्रिकेत चहाच्या कारखान्यांची धुरा ते वाहत आहेत.
अभयसिंह चव्हाण यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला अफ्रिकेत फुलवला चहाचा मळा हा लेख पुढील पानावर वाचा.
अभयसिंह चव्हाण यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला अफ्रिकेत फुलवला चहाचा मळा हा लेख वाचा.
कोकणचे गांधी’ म्हणून प्रसिद्ध असलेेल अप्पासाहेब पटवर्धन यांचा जन्म ४ नोव्हेंबर १८९४ रोजी झाला.
अप्पासाहेब हे देशभरात मुख्यत: रचनात्मक कामाबद्दल ओळखले जातात. त्यांनी ‘कुणबी सेवा संघ’ काढला. ते ‘चरखा संघा’चे तर अध्यक्षच झाले होते. त्यांनी रत्नागिरीत सूतकताई व ग्रामोद्योग प्रसाराचे बहुमोल काम केले. त्यांनीच जिल्ह्यात काँग्रेसची मुहूर्तमेढ रोवली. ते जिल्हा काँग्रसचे अध्यक्षही होते.
ते स्वातंत्र्य चळवळीत सुमारे साडेतीन वर्षें तुरुंगात होते. त्यांनी त्यांना तुरुंगात भंगीकाम करण्यास मिळावे म्हणून केलेला सत्याग्रह गाजला. कारण त्यांच्या समर्थनार्थ गांधीजींनीही उपोषण केले. एवढा परस्पर विश्वास त्या दोघांत होता.
महारबंधूंनी मेलेल्या पशूची कातडी सोडवणे बंद केले तेव्हा त्यांनी मृतपशूची कातडी, खतासाठी मांस आणि हाडे मिळवण्याच्या दृष्टीने अनेक चर्मालये काढली. तेथे भाई सुखी, बाबा फारक, बाळूदादा पानवलकर, शामराव जोशी, बांदेकर हे त्यांचे पहिल्यापासूनचे सोबती व अनेक ब्राह्मण सहकारीसुद्धा काम करत. ते सगळे स्वातंत्र्यसैनिक होते. दलितमित्र रमाकांत आर्ते यांनीही खूप काम केले. अप्पांनी भंगी कष्टमुक्तीसाठी चराचे संडास, गोपुरी संडास, सोपा संडास असे अनेक संडास लोकप्रिय केले.
मानवी विष्ठेसचा खतासाठी उपयोग करताना त्यांपनी शौचघरे शास्त्रीय पद्धतीने बांधली. त्यांनी 3 फूट x 3 फूट x 3 फूट आकाराच्या दोन टाक्या बांधल्या. या टाक्याध एकमेकांना लागून होत्या. टाक्यांच्या वरच्या बाजूस मधोमध शौचविधी करण्यास दीड फूट लांब व नऊ इंच रुंद अशी पोकळ जागा ठेवण्यात आली. शौचविधी झाल्यानंतर त्यावर माती टाकण्यात येई. असे केल्यानंतर सहा महिन्यांत त्यातून सेंद्रिय खत तयार होई. एक टाकी भरली, की दुसऱ्या टाकीचा उपयोग केला जाई.
अप्पासाहेबांनी त्याला 'गोपुरी शौचघर' असे नाव दिले. अप्पांनी त्याकाळात कुकर, पवनचक्की, गोबरगॅस प्लँट असे अपारंपरिक ऊर्जास्रोताचे यशस्वी प्रयोगही केले. त्यावर पुस्तके लिहिली.
अप्पासाहेब पटवर्धन हे प्रसिद्धीपासून अलिप्त राहिले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात गोपुरी आश्रम आहे. कोकणचे गांधी म्हणून प्रसिध्द असलेल्या आप्पासाहेब पटवर्धन यांनी या आश्रमाची स्थापना केली. परिसरातील युवकांना हाताशी धरुन येथे त्यांनी गोबर ग्रॅस प्रकल्प सुरु केला. पंडित जवाहरलाल नेहरु, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, विनोबा भावे यांनी या आश्रमाला भेट दिली आहे.
अप्पासाहेबांचे ५० वर्षा पूर्वीचे विचार आजही जनतेसाठी प्रेरणादायी आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
मुरलीधर रामचंद्र ऊर्फ बापू वाटवे यांना प्रभात चित्रनगरीच्या सुवर्णकाळाचे साक्षीदार होण्याचे भाग्य त्यांना लाभले होते. बापू वाटवेनी प्रभातची प्रसन्न सकाळ, नेत्रदीपक माध्यान्ह, हुरहूर लावणारी संध्याकाळ आणि मन विषण्ण करणारा सूर्यास्त हे सारे अनुभवले होते.
सौंदर्य, अभिनय आणि गायन या माध्यमातून रंगभूमीसह चित्रपटसृष्टीचा पडदा गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री शांता मोडक यांचा जन्म १ एप्रिल १९१९ रोजी पुणे येथे झाला.
शांता मोडक यांनी पुण्यात शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यांनी सर परशुरामभाऊ महाविद्यालयांमधून १९४२ मध्ये कला शाखेची पदवी मिळवली होती. ‘चूल आणि मूल’ चित्रपटाच्या माध्यमातून शांता मोडक यांनी रुपेरी दुनियेत पाऊल ठेवले. विश्राम बेडेकर यांनी १९४६ मध्ये हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. चित्रपटाच्या श्रेयनामावलीत नाव देताना ‘फेमस पिक्चर्स’चे बाबूराव पै यांना शातांबाईंचे नाव आठवले नाही. म्हणून त्यांनी ‘बिंबा मोडक’ असे नाव दिले. तेव्हापासून त्या ‘बिंबा मोडक’ नावाने ओळखू लागल्या.
शांताबाईंनी दामूअण्णा मालवणकर यांच्या ‘प्रभाकर’ नाटक कंपनीच्या माध्यमातून १९४९ मध्ये ‘भावबंधन’ या नाटकाद्वारे मराठी रंगभूमीवर पहिले पाऊल ठेवले. या नाटकातील आनंदीबाईची त्यांची भूमिका खूप गाजली. नाटकात काम करण्याची संधी मिळाल्यावर शांताबाईंनी गाणे शिकण्यास सुरूवात केली. संगीत नाटकातील पदांचे शिक्षण त्यांनी गंधर्व नाटक मंडळीतील बालगंधर्व आणि मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर यांचे पट्टशिष्य व गायक-नट कै. हरिभाऊ देशपांडे यांच्याकडे घेतले. संगीत विद्याहरण ( देवयानी), संगीत स्वयंवर (रूख्मिणी), संगीत सौभद्र (सुभद्रा), संगीत द्रौपदी (द्रौपदी), संगीत एकच प्याला (सिंधू), संगीत भावबंधन, (लतिका), संगीत मृच्छकटिक (वसंतसेना) या संगीत नाटकातील त्यांच्या भूमिका अत्यंत लोकप्रिय झाल्या. त्यांनी भारत नाटक कंपनी, संध्या थिएटर, पंडितराव तरटे यांच्या नाटक कंपनीमधील नाटकांमध्ये कामे केली. यामध्ये छोटा गंधर्व, श्रीपादराव नेर्लेकर, कृष्णराव तोंडकर, जयराम शिलेदार अशा गायक-नटांबरोबर त्यांनी भूमिका केल्या. रंगभूमीबरोबरच चित्रपटांमध्येही त्यांच्या अभिनयाचे दर्शन रसिकांना घडले.
‘चूल मूल’, ‘ऊन-पाऊस,’ ‘इन मिन साडे तीन’ या चित्रपटांमध्येही त्यांनी अभिनयाची चुणूक दाखविली.
राज्य सरकारतर्फे १९८० मध्ये त्यांना मराठी नाटक शताब्दी महोत्सवामध्ये तत्कालिन मुख्यमंत्री बॅ. अंतुले यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. पुणे महापालिकेसह अनेक संस्थांनी त्यांचा गौरव केला होता.
शांताबाई मोडक यांचे निधन २८ एप्रिल २०१५ रोजी झाले.
चित्रपट : चूल आणि मूल, इन मीन साडेतीन, ऊन-पाऊस इ.
नाटके : भावबंध, स्वयंवर, सौभद्र, मानापमान
-- संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Copyright © 2025 | Marathisrushti