जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
कोकणातील देवगड सारख्या निसर्गरम्य गावात व सध्या ठाण्यात वास्तव्यास असलेल्या चित्रकार किशोर नादावडेकर हे अनेक राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी आहेत. निसर्गचित्रे व व्यक्तीचित्रे यांची आवड असलेल्या श्री. किशोर नादावडेकर यांना चित्रकार वासुदेव कामत सर व विजय आचरेकर सर यांचे योग्य ते मार्गदर्शन मिळाले.
वहिनींच्या बांगड्या हा त्यांच्या कथेवरुन निघालेला गाजलेला चित्रपट
मनोरमा वागळे यांनी अभिनय शिकावा, संगीत विषयात प्राविण्य मिळवावे अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. त्यामुळे शाळा-महाविद्यालयातून अनेक दर्जेदार नाटकांमधून त्यांनी अनेक भूमिका केल्या. त्यासोबतच गोवा हिंदू असोसिएशन मुळे मास्टर दत्ताराम यांचं मार्गदर्शन त्यांना लाभलं. गोविंदराव अग्नी, बी.आर देवधर, पं.जगन्नाथबुवा पुरोहित यांसारख्या दिग्गज मंडळींकडून संगीत आणि गायनाचं शिक्षण त्यांनी घेतलं, तर ज्येष्ठ पार्श्वगायक आर.एन. पराडकरांकडून सुगम आणि नाट्यसंगीताचं प्रशिक्षण घेतलं. खास गंधर्व गायकीचे नाट्यसंगीत हे त्यांना गोविंदराव वेर्लेकर यांनी शिकवलं.
गोवा हिंदू असोसिएशनच्या महिला शाखेतून त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केलं आणि खडाष्टक या नाटकातील तडाखेबाज रागिणीच्या भूमिकेसाठी सुमती तेलंग यांना उत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कारही मिळाला. पुढे मनोहर वागळेंशी विवाहबद्ध झाल्यानंतर सुमती तेलंगच्या मनोरमा वागळे झाल्या. खरंतर लग्नानंतरच्या चित्रपटात त्यांनी ज्या काही भूमिका रंगवल्या त्यामुळेच त्या नावारुपास येऊ लागल्या.चित्रपटातल्या अनेक खाष्ट, कजाग, खलनायिका आणि सहकलाकारांच्या भूमिकांमुळे प्रेक्षकांना त्यांचा अभिनय आवडू लागला कारण त्यामध्ये कजाग आणि विनोदी ढंगाचं मिश्रण होतं. याचा अनुभव आपल्यापैकी अनेक जणांनी राजा ने वाजवला बाजा या चित्रपटातनं घेतला असेल. सुरुवातीला खाष्ट सासू पण चित्रपटात काही प्रसंगात जेव्हा शत्रूंकडून गोची होते तेव्हाचा तो प्रसंग पाहून हसू आल्याशिवाय राहवत नाही. अनेक विनोदी आणि गंभीरपूर्ण नाटकांतून मनोरमा वागळे यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला.
बबन प्रभूंचे फार्सिकल नाटक दिनूच्या सासूबाई राधाबाई मधली त्यांची सासूबाई ही भूमिका अविस्मरणीय ठरली. १९८५ ते १९९५ पर्यंत या नाटकाचे प्रयोग रंगभूमीवर होत राहिले. सर्व कलाकार बदलले पण सासूबाई मात्र कायम राहिल्या. मनोरमाबाई वागळेंच्या विनोदी चित्रपटांमध्ये गंमत-जंमत, आम्ही दोघे राजा राणी, गडबड घोटाळा, घरजावई या चित्रपटांचा तर स्त्री प्रधान चित्रपटांसाठी उंबरठा आणि आत्मविश्वास यांमधील त्यांच्या भूमिका लक्षात राहतात.
हिंदी चित्रपटांमध्ये लाईफलाईन, आगे की सोच, सिकंदर यांचा समावेश होतो. यासोबतच अनेक जाहिराती, दूरदर्शन, मालिका, नाटकं यामधून मनोरमा वागळे यांनी आपल्या अभिनयाची लक्षात राहण्यासारखी चुणूक दाखवून दिली आहे. मा.मनोरमा वागळे यांचे २७ ऑगस्ट २००० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- सागर मालाडकर / marathisrushti.com
गोडबोले, उदयराज
भारतीय सांस्कृतिक जगतात १९३१ साली बोलणाऱ्या आणि ‘गाणाऱ्या’ चित्रपटांनी प्रवेश केल्यानंतर मराठी संगीत नाटकाच्या लोकप्रियतेला ओहोटी लागणे ही स्वाभाविक प्रतिक्रिया होती. बालगंधर्वासारख्या रसिकांच्या गळय़ातील ताईत बनलेल्या कलावंतालाही चित्रपटात भूमिका करणे क्रमप्राप्त ठरले होते. संगीत नाटक महाराष्ट्राच्या सांस्कृतिकतेचे एक व्यवच्छेदक लक्षण बनले असताना चित्रपटांच्या वाढत्या लोकप्रियतेने या नाटकांची आर्थिक स्थिती हलाखीची होणेही स्वाभाविक होते.
नेमक्या याच काळात म्हणजे १९२५ साली उदयराज गोडबोले यांचा जन्म झाला. आयुष्यभर नाटकच करीन, अशी जणू प्रतिज्ञाच त्यांनी तारुण्यात घेतली आणि तिचे पालन करण्यासाठी येणाऱ्या सगळय़ा संधी नाकारत उदयराजांनी फक्त संगीत नाटकांतच भूमिका केल्या. त्यांच्या निधनाने संगीत रंगभूमीवरील एका ज्येष्ठ आणि तपस्वी कलावंताचा अंत झाला आहे. रंगभूमीच्या पडत्या काळात तिला पुन्हा सोनेरी दिवस यावेत, यासाठी प्रयत्न करणाऱ्या कलावंतांमध्ये गोडबोले यांचे स्थान महत्त्वाचे होते. चित्रपटांच्या झंझावातापुढेही संगीत रंगभूमी टिकवून ठेवण्यासाठी छोटागंधर्व, जयराम-जयमाला शिलेदार, चित्तरंजन कोल्हटकर, वसंतराव देशपांडे यांच्यासारखे बिनीचे कलावंत अथक प्रयत्न करीत होते. त्यांच्या या प्रयत्नांना रसिकांकडून पुरेसा प्रतिसादही मिळत होता. उदयराजांना संगीताचे बाळकडू घरातूनच मिळाले, कारण त्यांचे वडील दिनकर रामचंद्र गोडबोले सांगलीच्या संस्थानात दरबारी गायक होते. त्यांनी संगीताची विद्या अब्दुल करीम खाँ यांचे शिष्य जाधवबुवा यांच्याकडून घेतली होती. असे घराणेदार संस्कार असतानाही उदयराजांचे मन मात्र संगीत रंगभूमीकडेच जास्त होते. त्यामुळेच सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयात शिकत असताना त्यांनी छोटागंधर्वानी अजरामर केलेल्या ‘देवमाणूस’ या नाटकाचा प्रयोग केला आणि जाणकारांची शाबासकी मिळवली. त्याचमुळे असेल कदाचित, पण संगीत रंगभूमीवरील ठेकेदार पंडितराव तरटे यांनी त्यांना नाटकात भूमिका करण्याचे निमंत्रण दिले. उदयराजांच्या दृष्टीने जे हवे होते, तेच घडत होते. घरातूनही त्यांच्या या साहसाला विरोध झाला नाही. त्याच काळात त्यांना एका विमा कंपनीत नोकरी ‘चालून’ आली होती. पण गोडबोले यांचा निर्धार पक्का होता आणि त्यांनी रंगभूमीवरचे पाऊल मागे न घेण्याचे ठरवले. नागेश जोशी यांचे ‘फुलपाखरे’ हे त्यांचे पहिले नाटक. पण ते खऱ्या अर्थाने रसिकमान्य झाले, ते आचार्य अत्रे यांच्या ‘प्रीतिसंगम’ या नाटकामुळे! त्या नाटकातील त्यांची गोविंदबुवाची भूमिका खूपच गाजली. त्याच नाटकात त्यांनी गायलेल्या ‘देह देवाचे मंदिर’ या गाण्याने त्यांचे नाव सर्वतोपरी झाले. त्या नाटकातील गीतांच्या ध्वनिमुद्रिका एवढय़ा गाजल्या की, उदयराज गोडबोले म्हणजे ‘देह देवाचे मंदिर’ असे जणू समीकरणच झाले. ‘अशी बायको हवी’ हे त्यांचे नाटकही गाजले. त्याच वेळी चित्तरंजन कोल्हटकर, रेखा, चंद्रकांत गोखले यांच्यासारख्या कलावंतांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या नटराज थिएटर्सतर्फे ‘संगीत भावबंधन’चे प्रयोग सुरू झाले. उदयराजांना कशाचीच उसंत मिळेना. तरीही त्यांच्या मनात अभिजात शास्त्रीय संगीत शिकण्याची जिद्द होतीच. गाणे शिकायचे तर ते किराणा घराण्याचेच आणि त्यातील तेव्हाचे दिग्गज होते, पंडित भीमसेन जोशी. गोडबोले यांनी गुरुजींना विचारणा केली आणि त्यांचा गंडाच बांधला. त्या गंडाबंधनाच्या कार्यक्रमालाही कुमार गंधर्व, वसंतराव देशपांडे यांच्यासारखे अनेक मोठे कलावंत आवर्जून उपस्थित होते. भीमसेनजी आणि उदयराज या दोघांनाही सततचे दौरे असायचे. त्यामुळे उदयराजांना प्रत्यक्ष गाणे शिकण्याची संधीच मिळाली नाही. आपल्या विनोदी स्वभावाने उदयराजांनी आयुष्यात अनेक मित्र मिळविले. कोणत्याही कठीण प्रसंगाला धैर्याने तोंड देण्याची त्यांची क्षमता होती. कुणापुढेही आयुष्यात हात पसरायचे नाहीत, हे त्यांच्या जीवनाचे ब्रीदच होते. अशा ज्येष्ठ आणि लोकप्रिय कलावंताच्या निधनामुळे संगीताची आणि संगीत रंगभूमीचीही मोठी हानी झाली आहे.
राजाराम महाराजांनी कृष्णाजी अनंत सभासदांकडून “शिवचरित्र’ लिहून घेतले. हा मराठी भाषेचा आणि शिवचरित्राचा ऐतिहासिक ठेवा आहे. राजाराम महाराजांनी महाराणी ताराबाईंना युद्धकला, राजनीतीचे स्वातंत्र्य दिले. त्यामुळे ताराबाईंनी मराठा साम्राज्याचे मोठ्या हिमतीने संवर्धन आणि संरक्षण केले.
पं. डी. के. दातार यांच्या आधी १०० वर्षांची व्हयोलिनवादनाची परंपरा असलेल्या कर्नाटक संगीतात गायकी अंगाने व्हायोलिन वाजवण्याची पद्धत होती. परंतु हिंदुस्थानी संगीतात ती रुजली नव्हती. ती रुजवण्याचे मोठे काम पं. दातार यांनी केले.
आपल्या वाद्यांच्या परीसस्पर्शाने गाण्याचं सोनं करणारे दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते ज्येष्ठ संगीत संयोजक मास्टर केरसी लॉर्ड यांच्या कलाकर्तृत्वाला दिलेला उजळा.
१८७६ साली त्यानं जगातील पहिली इंडस्ट्रियल रिसर्च लॅबोरेटरी मेनलो पार्क, न्यूजर्सी येथे चालू केली. पण त्याला प्रसिद्धी मिळवून दिली ती १८७७ साली लावलेल्या फोनोग्राफच्या शोधाने.
एक वर्षापूर्वी आजच्याच दिवशी जगप्रसिध्द शास्त्रज्ञ व आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी जगाचा निरोप घेतला. माझ्या या अभिमानास्पद मित्राला अंत:करणापासून श्रध्दांजली.
बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानचे विशाल सभागृह विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने ओसंडून वाहत होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम मंचावर येऊन उभे राहिले आणि विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा कडकडाट करून अख्खे सभागृह डोक्यावर घेतले. वातावरण चैतन्याने अक्षरशः भारून जाणे म्हणजे काय असतं हे प्रत्येकाने अनुभवण्यास सुरवात केली. मंचावरील सर्व मंडळी आसनांवर स्थानापन्न झाल्यावर व दीपप्रज्वलन, प्रास्ताविक इ. उपचार आटोपल्यानंतर कलाम साहेब बोलण्यास उभे राहणार एवढ्यात ध्वनिक्षेपण यंत्रणा अचानक बंद पडली आणि आयोजकांचे धाबे दणाणले व यंत्रणा दुरुस्त करण्यासाठी धावपळ सुरु झाली. मी पहिल्या रांगेत बसलो होतो व सर्व घडामोडी मला अगदी जवळून बघायला मिळत होत्या. मला वाटलं, ते आयोजकांजवळ नाराजी व्यक्त करतील, पण तसं न घडता त्यांनी खाणाखुणा करून यंत्रणा नियंत्रित करणाऱ्या माणसाचे स्वतःकडे लक्ष वेधले आणि ती कशी दुरुस्त करायची हे त्याला समजावून सांगितले. काही क्षणातच ध्वनिक्षेपण यंत्रणा सुरु झाली आणि त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यास सुरवात केली. विलक्षण प्रेरणादायक असलेलं ते भाषण टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात संपलं आणि राज्य मंत्री मंडळातील काही मंत्री व बारामतीतील अतिविशिष्ठ व्यक्तींशी संवाद साधण्यासाठी कलाम साहेब त्या परिसरातील अतिथीगृहाकडे रवाना झाले.
कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत मिटींग सुरु होण्यास काही मिनिटं राहिली असताना मी तिथे पोहोचलो. सभागृह अनेक अतिविशिष्ठ मंडळींनी गजबजून गेले होते. डॉ. कलामांना मी स्वतःची ओळख करून देऊन भेटीचा उद्देश सांगताच त्यांनी माझा हात धरून त्यांच्या शेजारच्या खुर्चीवर बसवून घेतले. ‘तुमची मिटींग आटोपल्यावर आपण बोलू’ असं मी म्हणताच ते म्हणाले ‘या मिटींगपेक्षा आपल्या चर्चेचे विषय मला जास्त महत्त्वाचे वाटतात कारण त्यांचा संबंध थेट आपल्या शेतकरी बांधवांशी आहे.’ विजेच्या वापराशिवाय सिंचन, स्वयंपूर्ण खेडी, विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या या विषयांवर मला अनेक प्रश्न विचारून ते थांबले नाहीत तर त्यावर तयार केलेल्या नोट्स तिथेच वाचून त्यांनी उपस्थित मंत्र्यांना काही प्रश्नही विचारले. संसद भवनावर अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर मी तयार केलेल्या सुरक्षा व्यवस्थेच्या आराखडयावरही आमची चर्चा झाली. पाच मिनिटात संपेल असं वाटणारी चर्चा तब्बल वीस मिनिटे झाली तरी सुरूच होती. उपस्थितांमध्ये वाढू लागलेली अस्वस्थता बघून मी कलाम सरांचा निरोप घेण्याची तयारी करताच त्यांनी मला चहा घेण्याची व मान्यवरांच्या मिटींगमध्ये सहभागी होण्याची विनंती केली. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांविषयी वस्तुस्थिती कथन करताना विलक्षण खिन्नतेने त्यांचा चेहरा झाकोळून गेला होता व डोळे पाणावले होते. भारतासारख्या देशाचा एक राष्ट्रपती किती संवेदनशील असू शकतो हे बघून मी थक्क झालो.
मिटींग संपल्यानंतर चर्चेनंतर उपस्थितांची फोटो सेशनसाठी लगबग सुरु झाली. आम्ही सर्वांनी फोटोसाठी पोझ दिली, पण कॅमेऱ्याने फोटो काढण्यास नकार दिला आणि आयोजकांना घाम फुटला. ग्रुपमध्ये माझ्या शेजारी उभे असलेले कलाम साहेब शांतपणे फोटो काढण्याची धडपड करणाऱ्या तरुणाकडे गेले, कॅमेऱ्याचं निरीक्षण करून त्याच्याशी काहीतरी बोलले आणि पुन्हा आमच्या ग्रुपमध्ये येऊन सुहास्य वदनाने उभे राहिले. त्यांचा विलक्षण साधेपणा व निगर्वीपणा बघून मी थक्क झालो असतानाच फोटो सेशन संपले व पुन्हा लवकरच भेटण्याचे ठरवून आम्ही एकमेकाचा निरोप घेतला.
ज्यांच्या भेटीने उभ्या आयुष्याचं सार्थक झाल्याची भावना निर्माण व्हावी, ज्यांच्या विलक्षण प्रेरणादायी पण तितक्याच सध्या व्यक्तिमत्त्वाने भारून जावे, आदर्शांचा दुष्काळ पडलेल्या या देशात ज्यांचा आदर्श जिवापाड जपून एखादे महान कार्य उभे करण्याची प्रेरणा मिळावी असे थोर शास्त्रज्ञ, लेखक, कवी, डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम आज आपल्यात नसले तरी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या प्रेरणादायक स्मृती आपल्या देशातील तरुणांना सतत प्रेरित करत राहतील. या महामानवाला माझी अंत:करणापासून श्रद्धांजली.
श्रीकांत पोहनकर
98226 98100
shrikantpohankar@gmail.com
शत्रूशी बेभान होऊन लढताना तानाजींच्या हातातील ढाल पडल्यावरही, डाव्या हातावर घाव घेत उदयभानाला निपचित पाडूनच स्वतःचे प्राण तानाजींनी सोडले.
Copyright © 2025 | Marathisrushti