(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

  • मराठी कवी व गीतकार कवी संजीव

    कवी संजीव यांचे नाव कृष्ण गंगाधर दीक्षित. आपल्या लहानपणी वडिलांचे छत्र हरवलेले संजीव त्यांच्या काकांच्या घरी वाढले. त्यांचा जन्म १२ एप्रिल १९१४ रोजी सोलापुराजवळील 'वांगी' गावात झाला.त्यांचे शालेय शिक्षण सोलापुरात झाले. पुढे कलाशिक्षणाकरता त्यांनी मुंबईच्या 'बाँबे स्कूल ऑफ आर्ट' या संस्थेत प्रवेश घेतला. तेथून १९३९ साली ते जी.डी. आर्ट पदविका परीक्षा उत्तीर्ण झाले. मा.संजीव व्यवसायाने छायाचित्रकार व मूर्तिकार होते. त्यांनी काही काळ सोलापूर महानगरपालिकेच्या मुलींच्या शाळेत कलाशिक्षकाची नोकरी केली. तात्यासाहेब श्रोत्रिय यांच्या संपर्कात संजीवांना काव्यशास्त्राची, वृत्तछंदांची गोडी लागली. सुरुवातीच्या काळात गणेशोत्सवाच्या मेळ्यांकरता त्यांनी पुष्कळ गाणी लिहिली. १९३०-३२ च्या सुमारास 'माझा राजबन्सी राणा कोणी धुंडून पहाना' हे कवी संजीव यांनी लिहिलेले आणि लोकप्रिय गायिका मेहबूबजान हिने गायलेले गाणे अतिशय लोकप्रिय झाले. १९३५ साली 'दिलरुबा' हा त्यांचा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला. १९५०-६० सालांच्या दशकांत संजीवांनी मराठी चित्रपटांची गीतेही लिहिली. मा.संजीव यांचे २८ फेब्रुवारी १९९५ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • नासिकराव तिरपुडे

    महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्रीपद भूषविणार्‍या नासिकराव तिरपुडे यांनी आदिवासी व मागासवर्गीयांचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला.

  • (डॉ.) राजू मानकर

    लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाने गेल्या दोन दशकांच्या कालावधीत नेमकी काय कामगिरी केली, याची उच्चशिक्षणविश्वाला फारशी माहिती नाही. या विद्यापीठामध्ये प्रवेश घेण्यासाठी अभियांत्रिकीच्या ‘सीईटी’त चढाओढ नसते, कोकणच्या भूमिपुत्रांनाही मुंबई-पुण्यातील संस्थांचीच भुरळ पडते. म्हणूनच या विद्यापीठाचे पाचवे कुलगुरू म्हणून कार्यभार स्वीकारताना डॉ. राजू मानकर यांच्यासमोर अपेक्षांचा ‘कोकणकडा’च सर करण्याचे आव्हान आहे! नागपूर विद्यापीठातून केमिकल इंजिनिअरिंगमध्ये ‘एमटेक’ला सुवर्णपदक पटकावून त्यांनी जर्मनीतून ‘पीएच.डी.’ संपादन केली. त्यानंतर डॉ. मानकर राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधन, अध्यापन प्रकल्पांमध्ये सहभागी झाले.

    भारती विद्यापीठातून प्राध्यापकीला प्रारंभ केल्यानंतर लोणेरे तंत्रज्ञान विद्यापीठातच १९९२ ते २००५ या कालावधीत पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंगचे असिस्टंट प्रोफेसर म्हणून त्यांनी काम पाहिले. नागपूरच्या लक्ष्मीनारायण इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीचे संचालक म्हणून जबाबदारी सांभाळल्यानंतर आता ते कुलगुरू होत आहेत. साहजिकच, तंत्रज्ञान विद्यापीठाकडून समाजाला नेमकी कोणती अपेक्षा आहे, याची डॉ. मानकर यांना पूर्ण जाणीव आहे. ‘अभियांत्रिकी संशोधनाचा वेग व दर्जा वाढविण्याची किती गरज आहे, याची मला कल्पना असून, त्या दिशेनेच विद्यापीठातर्फे विविध प्रकल्प राबविण्यात येतील,’ असे डॉ. मानकर सांगतात.

  • हिंदी रंगमंचावरील प्रख्यात रंगकर्मी हबीब तन्वर

    सर्जनशीलता, व्यासंग, नव्याचा ध्यास आणि रंगमंचावर नवनवे प्रयोग करणारे तन्वर यांनी जीवनात नेहमी साधेपणाचीच कास धरली, त्यामुळे आपले शिष्यगण, मित्र, आप्तेष्ट यांच्यात ते कमालीचे लोकप्रिय होते. त्यांचा जन्म १ सप्टेंबर १९२३ रोजी झाला. चरणदास चोर व आगरा बाजार या सारख्या नाटकातून लाखो नाट्य रसिकांच्या ह्रदयावर त्यांनी राज्य केले. शतरंज के मोहरे, लाला शोहर राय, मिट्टी की गाडी, गाव का नाम ससुराल, हमारा नाम दामाद, पोंगा पंडित, जिसने लाहोर नही देखा या सारख्या असंख्य नाटकांद्वारे त्यांनी रंगमंचावर अक्षरशः राज्य केले.

    "जहरीली हवा' हे भोपाळ विषारी वायू पीडितांवरील त्यांचे नाटकही कमालीचे गाजले. पद्मश्री, पद्मभूषण या सारख्या पुरस्कारांनी सन्मानित झालेले व राज्यसभा सदस्य होण्याचा मान मिळालेले तन्वर यांची नाट्य क्षेत्रातील अभिरुची उच्च कोटीची होती. प्रयोगशीलता हा त्यांच्या स्वभावाचा स्थायिभाव होता. याशिवाय अन्य अनेक विदेशी पुरस्कारांनी त्यांचा सन्मान झाला होता. हबीब तन्वर यांचे निधन ८ जून २००९ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • ज्येष्ठ कथाकार सखा कलाल

    सखा कलाल मूळचे बेळगावचे. ज्येष्ठ कथाकार सखा कलाल यांचा जन्म १० डिसेंबर १९३८ रोजी कोल्हापूर येथे झाला. ग्रामीण जीवनातल्या वेदना आणि दु:ख सखा कलाल यांनी आपल्या कथांमधून मांडलं आहे. त्यांच्या कथांमधल्या व्यक्तिरेखांच्या तोंडचे संवाद परिणामकारक असतात. सखा कलाल हे कोल्हापूर भागातले प्रसिद्ध साहित्यिक आहेत. सखा कलालांनी आपल्या कथेतून माणसापुढे निर्माण होणाऱ्या अनेक गुंतागुंती मांडल्या. दुःखाची जटीलता माणसाचे सहजसुलभ जगणे कसे अवघड करते याविषयी विचार मांडला.

    ग्रामीण माणसाचे दुःख किती गहिरे असते हे त्यांची कथा वाचून समजते. त्यांच्या कथेत दुःखांनी घेरलेली माणसे येतात. गरिबीतून बाहेर पडता येत नाही, मृत्यूचे सावट सतत असते, अकाली वैधव्यामुळे संघर्ष निर्माण होतो आणि संकटांना टाळता येत नाही, अशा हवालदिल जीवनाचा उलगडा त्यांच्या कथा करतात. एकूणच दुःखांनी बांधून टाकणाऱ्या माणसांची अस्वस्थ करणारी कथा सखा कलाल लिहितात. त्यामधील संवाद हे वाचकांना चिंतनशील बनवतात. 'ढग' आणि 'सांज' हे दोन कथासंग्रह त्यांनी 'पार्टी'आधी प्रसिद्ध केले. त्यातल्या 'ढग'ला महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार लाभला, तर 'सांज'ला ते ज्या विद्यापीठात शिकले, त्याच विद्यापीठात क्रामिक पुस्तकाचा दर्जाही मिळाला. कलालांचं लेखन त्याउप्परही सुरु होतंच.

    विविध नियतकालिकांतून कलालांनी लेख लिहिले. त्या लेखांचा संग्रह म्हणजे 'पार्टी'. हे फावल्या वेळचं लेखन नव्हे, हे स्पष्ट होतंच पण लेखकाची त्यामागची आंतरिक तळमळही जाणवत राहते. लेखनातला नितळ आत्मपर भाव आणि त्यांची घटना- प्रसंगांच्या निवेदनाची समर्थ शैली हळुवार बोचकारे घेत वास्तवाचं भान देत जाते, संस्कारांचं दर्शन घडवीत जाते आणि जगण्याचं वेगळं भान आणि अर्थ देऊन जाते. एक चांगला, विचारगर्भ लेखसंग्रह वाचल्याचा आनंद 'पार्टी' देत राहतो.

    सखा कलाल यांच्या ‘सांज’ या कथासंग्रहातील ‘नीती’ ही कथा वाचकांना अस्वस्थपणाचा अनुभव देते. समाजशास्त्र आणि तत्त्वज्ञानाचाही त्यांचा अभ्यास आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • हिंदी चित्रपटसृष्टीतील निर्माता, दिग्दर्शक व पटकथा लेखक के आसिफ

    इटावामध्ये करीमुद्दीन आसिफ उर्फ के. आसिफ यांचे वडील फाजल करीम हे डॉक्टर होते. त्यांचा जन्म १४ जून १९२२ रोजी झाला.चित्रपट क्षेत्रात करिअर करण्यासाठी के. असीफ नंतर मुंबईला गेले. तेथे त्यांनी फेमस फिल्म लॅब येथे नोकरी केली. त्यांच्या मनात चित्रपट काढण्याचे खूळ होते. या संस्थेचे मालक सिराज अली हकीम यांनी त्यांच्या गोष्टी ऐकून त्यास भांडवल द्यायचे कबूल केले. त्या वर त्यांनी फूल नावाचा एक चित्रपट काढला व त्या चित्रपटाने चांगला व्यवसाय केला. त्यानंतर त्याने आपले नाव के. आसिफ असे केले. त्याच्या वाचण्यात मुगल-ए-आझम नावाचे नाटक आले.
    मुघल-ए-आझम’ या चित्रपटाचा इतिहास.
    ‘‘१९२२ साली इम्तियाझ अली ताज या लेखकाने लिहिलेलं ‘अनारकली’ हे नाटक लाहोरमध्ये सादर झालं. के. आसिफ यांनी ते पाहिलं आणि त्यानं ते एवढे भारावले, की यावर आपण सिनेमा बनवायचाच, या ध्यासानं त्यांना पछाडलं. पण मनात आलं म्हणून सिनेमा बनवता येत नाही. त्यासाठी अनेक गोष्टी जुळून याव्या लागतात. १९४० मध्ये के. आसिफ यांचं हे स्वप्न सत्यात येईल अशी आशा निर्माण झाली. निर्माते शिराझ अली यांच्या साथीने त्यांनी या चित्रपटाचं काम सुरू केलं. मात्र, बॉम्बे टॉकिजमध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू व्हायला प्रत्यक्षात १९४६ साल उजाडलं. चंद्रमोहन (अकबर), डी. के. सप्रू (सलीम) आणि नर्गिस (अनारकली) हे त्यात प्रमुख भूमिकेत होते. चित्रपट काहीसा मार्गी लागत असतानाच १९४७ साली भारत-पाकिस्तान फाळणी झाली आणि चित्रपटाचं काम थंडावलं. शिराझ अली पाकिस्तानला निघून गेले. त्यांनी के. आसिफ यांना सुचवलं, की तुम्ही उद्योगपती शापूरजी पालनजी यांना भेटा, ते या सिनेमाला फायनान्स करतील. खरं तर शापूरजी पालनजींचा सिनेसृष्टीशी काहीच संबंध नव्हता. परंतु तरीही त्यांनी चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी स्वीकारली याचं कारण- त्यांचं इराणी कनेक्शन आणि अकबरबद्दल त्यांना वाटणारी आपुलकी. म्हणून त्यांनी अट घातली की, चित्रपटाचं नाव ‘मुघल-ए-आझम’ ठेवायचं. खरं तर ही सलीम-अनारकली यांची प्रेमकहाणी; परंतु निर्मात्यांच्या आग्रहाखातर सिनेमाचं नाव ठेवलं गेलं- ‘मुघल-ए-आझम’!’’ ‘‘पण अडचणी इथंच संपल्या नाहीत. सिनेमातील कलाकार चंद्रमोहन यांचं दरम्यान निधन झालं. त्यामुळे हा चित्रपट डबाबंद करावा लागला. आणि पुन्हा नव्यानं दिलीपकुमार, मधुबाला, पृथ्वीराज कपूर, दुर्गा खोटे आदी कलाकार घेऊन चित्रपटाचं चित्रीकरण सुरू झालं. या सिनेमाच्या निर्मितीवर तेव्हा सुमारे सव्वा कोटी रुपये खर्च झाले. प्यार किया तो डरना क्या या एकाच गाण्यासाठी त्यांनी ३५ लाख रूपयांचा सेट उभारला. या एका गाण्यावरच झालेल्या खर्चात तेव्हा एक सिनेमा निघाला असता असं म्हटलं जातं. वेगवेगळ्या कारणास्तव हाही सिनेमा बरीच वर्षे रखडला. चित्रपटाच्या निर्मितीखर्चानं निर्माते मेटाकुटीस आले. पण के. आसिफना आपल्या भव्य-दिव्य स्वप्नापुढे कशाची तमा नव्हती. शेवटी एकदाचा चित्रपट तयार झाला. प्रदर्शितही झाला. पुढचा इतिहास सर्वानाच ज्ञात आहे. मुंबईत ५ ऑगस्ट १९६० रोजी मराठा मंदिर चित्रपटगृहात तो झळकताना अॅ डव्हान्स बुकिंगसाठीच्या प्रचंड धक्काबुक्कीत एकावर चाकूने हल्ला झाल्याचा किस्सा आजही रंगवून सांगितला जातो. फर्स्ट डे फर्स्ट शोसाठी तर हत्तीवरून वाजत-गाजत प्रिंट आणत. मुळचा हा कृष्णधवल चित्रपट (अपवाद फक्त प्यार किया तो डरना क्याफ गाण्याचा) २००३ च्या दिवाळीत रंगीत स्वरूपात दिवाळीच्या दिवशी प्रदर्शित करतानाही इरॉस चित्रपटगृहात त्याची प्रिंट अशीच हत्तीवरून आणली होती. मराठा मंदिरला सलग तीन वर्षे तो हाऊसफुल्ल गर्दी खेचत होता. ‘शोले’ येई तो ‘मुघल-ए-आझम’चा हा विक्रम अबाधित राहिला. त्याकाळी एकाच वेळी देशातल्या १५० चित्रपटगृहांत हा सिनेमा प्रदर्शित केला गेला. हाही तेव्हाचा विक्रम होता. उत्पन्नाचे नवे मापदंड ‘मुघल-ए-आझम’ ने निर्माण केले. हा चित्रपट पूर्ण झाला व एक अजरामर कलाकृती निर्माण झाली. मा.के. आसिफ यांच्या मा.सितारादेवी या पत्नी. मा.के.आसिफ यांचे ९ मार्च १९७१ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

    के.आसिफ यांचा मुघल-ए- आझम चित्रपट.

    https://www.youtube.com/watch?v=WLKUdiTCrkg.

  • अभिजीत फाळके

    तुकडोजी महाराजांचा वारसा घरात असल्याने त्या संस्काराने मार्ग दाखविला आणि 'आपुलकी' चा जन्म झाला. कम्पयुटर क्षेत्रात करिअर असतानाही वर्धा जिल्ह्यातील अभिजीत फाळके यांनी शेतकर्‍यांना स्वावलंबी बनविण्याचा निर्धार केला. केवळ आर्थिक मदत नव्हे, तर त्यांना अवजारे पुरविणारी 'अॅग्रो टुल बॅंक' सारखी कल्पना राबविली. हे काम सचिन तेंडुलकरलाही थक्क करुन गेलं...

    अभिजीत फाळके यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला 'आपुलकी' चे उड्डाण हा लेख पुढील पानावर वाचा.

    अभिजीत फाळके यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला 'आपुलकी' चे उड्डाण हा लेख वाचा.

    phalke-abhijit-modified

  • झांशीची राणी लक्ष्मीबाई (लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर)

    (१९ नोव्हेबर १८३५-१८ जून १८५८)

    इंग्रजाविरूद्ध लढणारी १८५७ च्या उठावातील एक पराक्रमी स्त्री. पूर्ण नाव लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर. ही वाईच्या मोरोपंत तांबे यांची कन्या मोरोपंत हे दूसरे चिमाजी आप्पा यांचे कारभारी होते. मनूबाई हे तिचे पूर्वाश्रमीचे नाव आईच्या मृत्यूनंतर ती वडिलांबरोबर दूसर्या बाजीराव पेशव्यांकडे ब्रहयावर्तास गेली. तेथील मुक्कामात तिचे झांशीच्या गंगाधरराव नेवाळकर या संस्थानिकाबरोबर १८४२ मध्ये लग्न झाले.

    गंगाधरराव व लक्ष्मीबाई यांना मुलगा झाला पण तो अल्पवयीन ठरला तेव्हा मरणापूर्वी एक दिवस अगोदर गंगाधररावनी पाच वर्षाचा आपल्या घराण्यातील आनंदराव हा मूलगा दत्तक घेतला व त्याचे नाव दामोदर ठेवण्यात आले. १८५३ मध्ये गंगाधरराव मरण पावले डलहौसीने १८५४ मध्ये दत्तक पूत्र नामंजूर ठरवून झांशी संस्थान खालसा केले. या निर्णयाचा जाहीरनामा जेव्हा लक्ष्मीबाईस वाचून दाखविण्यात आला, तेव्हा तिने ‘मेरी झांशी देएंगा नही‘ असे उदगार काढले. दत्तक वारस नामंजूर केला, याबद्धलचे गार्हाणे तिने अनेक खलित्याद्धारे ब्रिटिश सरकारपूढे मांडले; पण त्याचा काहिच उपयोग झाला नाही.

    अखेर झांशी संस्थान खालसा करून लक्ष्मीबाईस दरमहा रू.५,००० निवृत्तिवेतन व राजवाडा वगैरं खाजगी मिळकत देण्यात आली. खजिन्यातील सूमारे सहा लाख रू.रक्कम दामोदर याच्या अज्ञान दत्तक पूत्राच्या नावे ठेवण्यात येऊन झांशी संस्थानावर ब्रिटिशांचा अंमल सूरू झाला. परतुं १८५७ च्या उठावात त्यांनी इंग्रजांविरुद्ध लढई लढली व पराक्रम दाखविला त्यातच तिला विरगती प्राप्त झाली.

    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

  • नंदकिशोर कलगुटकर

    नंदकिशोर कलगुटकर हे अनेक मराठी चित्रपटांचे प्रसिद्धीप्रमुख होते. कलगुटकर यांनी विशेषतः दादा कोंडके यांच्या पांडू हवालदार, तुमचं आमचं जमलं, रामराम गंगाराम, मुका घ्या मुका, सासरचं धोतर आदी मराठी आणि तेरे मेरे बीच में, आगे की सोच अशा हिंदी चित्रपटांचे प्रसिद्धीप्रमुख म्हणून काम पाहिले.

  • व्ही. ए. माळी

    माळी, व्ही. ए.

    महाराष्ट्राच्या कला परंपरेमध्ये कोल्हापूरला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या कोल्हापूराने राज्याला एक श्रेष्ठ कलापरंपरा दिली. चित्रकार व्ही. ए. माळी, नव्हे माळीसर हे या कलापरंपरेतील शिरोमणी. या माळी सरांनी रविवारी शंभराव्या वर्षांत पदार्पण केले. त्या दिवशी सरांच्या अभिष्टचिंतनासाठी आलेल्या अध्र्याहून अधिक चित्रकारात सध्याच्या प्रख्यात चित्रकारांचा समावेश होता. ते सारे माळी सरांचे विद्यार्थी. सरांनी चितारलेली लोकमान्य टिळक, गोपाळ कृष्ण गोखले, सेठ लालचंद हिराचंद, न्या. एम. सी. छागला, महात्मा फुले आदींची व्यक्तिचित्रे आदर्श मानली जाणारी.

    त्या कलाकृतींनी केवळ नामवंतांच्याच संग्रहात नव्हे, तर कोलकात्याच्या व्हिक्टोरिया म्युझियमपासून ते मुंबई-बडोद्यातील म्युझियमपर्यंत अनेक महत्त्वाच्या संग्रहालयांमध्ये स्थान पटकावले आहे. त्यांच्या कलाकृती लंडनमधील इंडिया हाऊसमध्येही आहेत. माळी सरांचे वडील अनंत माळी हेही चित्रकारच. मात्र त्यांचा सहवास त्यांना फार काळ लाभला नाही. मुंबईमध्ये नशिब अजमावण्यासाठी आलेल्या अनंत माळी यांचे निधन झाले, त्यावेळेस सर अवघे १० वर्षांंचे होते. शालेय शिक्षणानंतर केतकरांच्या कला संस्थेत दोन वर्षे प्रशिक्षण घेतलेल्या माळी सरांनी जे. जे.मध्ये प्रवेश घेतला. १९३२ साली जी. डी. आर्ट झाल्यानंतर माळी सरांनी कोळवणकरांच्या स्टुडिओमध्ये काम सुरू केले. कोळवणकर हे माळी सरांच्या वडिलांचे जिगरी दोस्त. किंबहुना मुंबईत नशिब अजमावण्यासाठी येण्याचा निर्णय अनंत माळी व कोळवणकर यांनी एकत्रितरीत्या घेतलेला होता. माळी सर व्यक्तिचित्रण करीत ते फोटोवरून किंवा प्रत्यक्षात व्यक्तीला समोर बसवून. इथेच त्यांना व्यक्तिचित्रणाची प्रमुख गोडी लागली. हातातले काम संपल्यानंतर सर स्वत बाहेर पडत आणि आजूबाजूला दिसणाऱ्या सामान्यांना स्डुडिओमध्ये आणून बसवून त्यांची व्यक्तिचित्रे चितारत. व्यक्तिचित्रण हा रईसांचा शौक मानला गेल्याच्या कालखंडात त्याकाळी माळीसरांनी मात्र माकडवाला, गोंधळी, पोतराज, भिल्ल स्त्रिया यांना स्थान दिले. व्यक्तिचित्रण म्हणजे केवळ सुंदर किंवा दिमाखदार दिसणाऱ्या व्यक्तीचे चित्रण या समजाला त्यांनी यशस्वीरित्या छेद दिला. माळी सरांच्या व्यक्तिचित्रणात म्हणूनच कृष्णवर्णाच्या व्यक्तींचे चित्रण पाहायला मिळते. माळी सरांच्या चित्रणशैलीचे वेगळे वैशिष्टय़ म्हणजे, या गडद रंग छटांचे चित्रण त्यांच्या चित्रांमध्ये प्रभावी पद्धतीने येते. त्यात त्यांचा शैलीदार जोरकसपणाही आहे आणि रंगांची केलेली वेगळी हाताळणीही आहे. रूढार्थाने आपण ज्याला यश म्हणतो असे यशही माळी सरांना दीर्घकाळ लाभले. १९४० साली त्यांना कलकत्ता अ‍ॅकॅडमी ऑफ फाईन आर्टचे सुवर्णपदक मिळाले. त्यानंतर माळीसरांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. १९४४ साली आर्ट सोसायटी ऑफ इंडियाचा रौप्यचषक तर ४५ साली मोर विकणाऱ्या तरुणीच्या चित्रास बॉम्बे आर्ट सोसायटीचे सुवर्णपदक. या चित्राचे प्रचंड कौतुक आणि माळी सरांचे नाव सर्वतोमुखी झाले. गेल्या पंधरा- वीस वर्षांंत आणखी काही महत्त्वाचे बहुमान माळी सरांच्या दिशेने चालत आले. त्यात बॉम्बे आर्ट सोसायटीच्या रूपधर पुरस्काराचाही समावेश आहे. शरीराच्या थोडय़ा कुरबुरी सुरू झालेल्या असल्या तरी आजही चित्रकलेचा विषय निघाला की, सर तरतरीत होतात. कुणी चित्र दाखवायला गेले की, आजही मार्गदर्शन करतात, प्रसंगी सुनावतातही. त्यांच्या सुनावण्यात आशीर्वाद असतोच, पण मोलाचे मार्गदर्शनही असते. ते टीकाही करतात आणि तेवढय़ाच अधिकाराने चूक सुधारण्याचा मार्गही सांगतात. राज्याच्या स्थापनेचा सुवर्णमहोत्सव साजरा होत असताना वयाची शंभरी साजरी करणाऱ्या या दिग्गज चित्रकाराचा राज्य सरकारने यथोचित गौरव केला तर तो राज्याचाच मोठा सन्मान ठरेल. माळी सरांना शताब्दी वर्षांच्या खूप खूप शुभेच्छा.