जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
“काळ” साप्ताहिकाचे संस्थापक, वा “काळ-कर्ते” ही निबंधकार, पत्रकार, साहित्यिक-समीक्षक, फर्डे वक्ते शिवराम महादेव परांजपे यांची ओळख.
२०१४ मध्ये मोदी सरकारमध्ये त्यांचा समावेश झाला. त्यांच्याकडे पर्यावरण आणि माहिती नभोवाणी खात्यांचे स्वतंत्र पदभार असलेले राज्यमंत्रीपद सोपविण्यात आले. त्यांनी केंद्रात केंद्रीय मनुष्य बळ विकास मंत्री म्हणून काम केले आहे. सध्या ते पक्षासाठी कार्यरत आहेत.
जॉन यांनी २०११ मध्ये आपली सॉफ्टवेअर कंपनी इन्टेलला विकली होती. मात्र, सॉफ्टवेअर प्रोग्रॅम अजूनही त्यांच्याच नावानं सुरू आहे. सध्याच्या घडीला जगात 50 कोटी ग्राहक जॉन यांच्या अँटी व्हायरसचा वापर करतात.
लहानपणापासून जे पाहिले, अनुभवले त्या क्रित्येक प्रसंगाची, व्यक्तीची, व्यंगाची, चालीरीतींची अनेक प्रतिबिंब मनावर कोरली गेली आहेत. अशीच एक व्यक्ती समईच्या प्रकाशात शिवपिंडीवर विराजमान असलेल्या बेलपत्रावर गुलाबाच्या फुलाने छानपैकी विराजावे त्याप्रमाणे मनाच्या सांदीकोपऱ्यात दडलेली आहे. ती महानता आपणां सर्वाना ठाऊक असेलही.पण त्या व्यक्तिमत्वाकडे पाहिले तरी एक गोड कहर उसळतो. वामनमूर्ती ... गव्हाळवर्णाची आणि सदैव प्रसन्न आणि हसतमुख चेहरा.बोलण्यात ऐट होती. अदब होती. पण लाचारी दिसत नव्हती. त्यांच्याविषयी लिहिताना डोक्यात भुंगे अनेक घोंघावत आहेत पण शब्द अपुरे पडतील असा त्यांचा जीवन परिचय. शून्यातून विश्व निर्माण करणारा हे विशेषण सर्वार्थाने एखाद्या व्यक्तीला लावतो. पण मी यांच्याविषयी असं लिहिणं टाळतो.कारण हा माणूस किती मोठा असला तरी त्याने आपले आयुष्य घोडपदेवच्या छोट्याश्या घरात व्यतीत केले आणि करीत आहेत. कुणालाही मैत्री करावीशी वाटावी असा लोभस माणूस सन्माननीय श्री मोहन लोके.
आठवणीतील माणसं लिहिताना सुंदर सुंदर आठवणींची ओंजळ रीती केली परंतु अफाट सागरातून मुठभर वाळू घेताना शिंपले हाताला लागले आणि त्यातल्या मोत्याविषयी माझ्याकडून झरझर उतरत गेले. त्यावर आलेल्या प्रतिक्रिया म्हणजे स्वर्गीय सुखाचा अभिषेक झाल्यासारखे वाटले. आज मला आपल्याबरोबर राहत असलेले श्री मोहन लोके गेली ५ दशके मराठी चित्रपटसृष्टीसाठी योगदान देणाऱ्या.... कॅमेऱ्याने सिनेतारे- तारकांना ग्लँमर मिळवून देणारे .... दादा कोंडके पासून आजच्या निर्मात्यापर्यंत आणि अभिनेत्यापर्यंत सलोख्याचे संबंध असलेले... सहकलाकार म्हणून अनेक चित्रपटात काम करून आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणारे.... भावनिक अविष्कारांना कॅमेऱ्यात कैद करणारा... जवळ जवळ १५८ चित्रपटात स्थिरचित्रणाचे काम करून स्टुडीओ एक तुही निरंकारचे नांव झळकविणारा...आपला माणूस.
एक वेळा लेखनाचा इतिहास बदलता येतो पण फोटोग्राफीचा इतिहास बदलता येत नाही. श्री लोके यांची छायाचित्रण या विषयावरील आस्था ही त्यांची जीवनमूल्य ठरली आहेत. कौशल्य उत्तम रंगसंगतीची जाण, नवनिर्मितीची क्षमता, कलात्मक भान, दृश्यमांडणीची कल्पकता, निरीक्षण शक्ती, आत्मविश्वास, प्रसंगावधान, जागरूकता, मेहनत आणि मुळात छायाचित्रण हा आपला आत्मा मानणारा एक मनस्वी छायाचित्रकार. फोटो काढताना डोक्याने न काढता आपल्या हृदयापासून काढून त्या भावनांचे तांत्रिक क्षण टिपणारा एक प्रतिभावंत माणूस.
जीवनात अनेक दुर्दैवाचे प्रहार झेलीत, आव्हानं, संकट यांचा स्विकार करीत त्यांनी आयुष्यात आपल्या निराशमनावर गुलाबपाण्याचे शिंतोडे शिंपडून आनंद फुलवीत जीवनाला खरा आकार दिला. १९४२ साली गरीब कुटुंबात जन्मलेल्या या भूषणावह व्यक्तीचे सध्या अमृतमहोत्सवी वर्ष सुरु आहे. पांडू हवालदार, येऊ का घरात, आली अंगावर,शूर आम्ही सरदार, बजरंगाची कमाल, सून लाडकी सासरची, जिवलगा, नवरा माझा नवसाचा आदि अनेक चित्रपटात त्यांच्या छोट्या भूमिका कौतुकास्पद आहेत. असे अभिनय करीत असताना दादा कोंडके यांना भारी खुमखुमी यायची. असाच प्रसंग आली अंगावर या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु असताना एक छोटीशी भूमिका होती.. भगवान दादा पोलीस इन्स्पेक्टर होते. लोके गावातल्या टपोरी माणसाची भूमिका करीत होते. नुकतीच सासू निर्वतल्यामुळे सर्व कार्य त्यांना करावे लागले होते.त्यामुळे डोक्यावर केस नाहीत म्हणून दादांनी केसाचा विग त्यांच्या डोईवर घातला होता. त्यावेळेस भगवानदादांनी टपोरीला खोटं खोटं मारायचा शॉट घ्यायचा होता. तसं ठरले होते पण मध्येच भगवानदादांच्या कानात दादा कोंडके कुजबुजले. तेव्हा भगवानदादांनी सहनायकाला डोक्यातला विग काढून बुटाने मारला तेही खरेखुरे. सर्व शूटिंग स्टाफ अवाक होऊन पाहत राहिला पण परत शॉट घेण्याचा प्रसंग दादांवर आला नाही. त्यांना हवा असलेला प्रसंग प्रत्यक्षात त्यांना मिळाला होता. पण शूटिंग संपेपर्यंत मात्र दादाच नव्हे सारा स्टाफ पोट धरून हसत होता. दादा कोंडके यांचे या माणसावर अतीप्रेम. घरातल्याची चौकशी नेहमीच करीत. अशा या माणसाला सन २०११ साली अखिल भारतीय चित्रपट महामंडळाने *स्टील फोटोग्राफी* क्षेत्रात भरीव योगदानाबद्दल त्यांना चित्रकर्मी पुरस्कार देऊन गौरविले. रविंद्र नाट्य मंदिरात झालेल्या सोहळ्यात आपल्या श्री मोहन लोके यांना सन्मानचिन्ह घेताना पाहिलेला क्षण आम्हां घोडपदेव समूहाच्या दृष्टीने अविस्मरणीय आहे. अभिनंदनीयच. त्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त त्यांना उदंड आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
-- अशोक भेके
घोडपदेव
डॉ. सौ. मंजिरी देव एक कथ्थक नृत्यांगना व गुरु असल्यामुळे, त्यांनी नृत्यविषयक भरपूर कार्य (सांस्कृतिक) केले आहे.
त्यांनी पन्नासहून अधिक चित्रपटांचे संकलन केले होते व एक उत्कृष्ट संकलक म्हणून नावलौकिक मिळविला होता. ज्येष्ठ निर्माते दिग्दर्शक दादा कोंडके, कमलाकर तोरणे, अण्णासाहेब देऊळगावकर, जब्बार पडेल, महेश कोठारे आदींच्या चित्रपटांचे संकलन वैद्य यांनी केले होते.
आनंद दिघे हे ठाण्यातील नावाजलेलं राजकीय व्यक्तिमत्व होतं. त्यांना ठाणेकर नागरिकांकडून ‘ धर्मवीर ‘ ही पदवी प्राप्त झाली होती. आनंद दिघे ह्यांनी प्रचंड प्रमाणात समाजकार्य केलं आणि जनमानसात प्रचंड मान मिळवला.
१९७२ साली चीनच्या जनता-प्रजासत्ताकास अधिकॄत भेट देऊन अमेरिका-चीन राजनैतिक संबंध पुन्हा स्थापण्यात पुढाकार घेतला, तसेच त्याच वर्षी सोव्हियेत संघाशी क्षेपणास्त्रविरोधी क्षेपणास्त्रांवर मर्यादा घालून घेण्याचा तह केला. चंद्रावर मानव पाठवण्याच्या अमेरिकी प्रयत्नांना अपोलो ११ च्या रूपाने निक्सन प्रशासनाच्या कार्यकाळातच यश लाभले; तरीही एकंदरीत दॄष्टिकोनातून पाहता निक्सन प्रशासनाने समानव अंतराळ मोहिमा सीमित करण्याचेच धोरण अनुसरले.
कादंबरीकार, समीक्षक, वृत्तसंपादक गजानन त्र्यंबक माडखोलकर यांचा जन्म २८ डिसेंबर १८९९ रोजी झाला. माडखोलकर यांचे वडील त्र्यंबकराव मुंबईत भिक्षुकी करीत. त्यांच्या आई पार्वतीबाई या त्याकाळी शिक्षित असलेल्या स्त्रियांपैकी एक होत्या. आईने केलेल्या संस्कारामुळे लहानपणीच माडखोलकरांनी मराठी आणि संस्कृत भाषेवर प्रभुत्व मिळवले होते. मुंबईच्या आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत त्यांचे सर्व शिक्षण झाले होते.
राष्ट्रसभेच्या अधिवेशना- पासून स्फूर्ती घेऊन त्यांनी जागृती नावाचे हस्तलिखित सुरू केले. त्याचे संपादन माडखोलकर करीत असत. नवयुग, विविध ज्ञान विस्तार इ. मासिकातून त्यांच्या काव्यलेखनाला सुरुवात झाली. केशवसुतांचा संप्रदाय या नवयुगमध्ये लिहिलेल्या टीकालेखामुळे माडखोलकर एकदम प्रसिद्धीस आले. त्यानंतर केसरीत त्यांचे लेख छापून आले. त्यावेळी रविकिरण मंडळाशी त्यांचा संबंध आला. तेथे अनेक साहित्यिकांशी त्यांचा स्नेह जडला.
१९२२ साली माडखोलकर पुण्याला आले. त्यावेळेस रेव्हरंड टिळक, केशवसुत, विनायक, गोविंदाग्रज आणि बालकवी यांच्या काव्याची मीमांसा करणारे आधुनिक कवी पंचक हे पुस्तक त्यांनी प्रकाशित केले. १९३३ नंतर नागपूरला आल्यावर त्यांच्या कादंबरी लेखनाला सुरुवात झाली. मुक्तात्मा, भंगलेले देऊळ, शाप, कांता, दुहेरी जीवन, मुखवटे, नवे संसार या त्यांच्या गाजलेल्या कादंब-या. शुक्राचे चांदणे, रातराणीची फुले हे कथासंग्रह तर वाङ्मयविलास, स्वैरविचार, परामर्श हे समीक्षात्मक लेखनही त्यांनी केले. १९४४ पासून माडखोलकर तरुण भारत चे संपादक म्हणून काम पाहू लागले. १९४६ साली महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष झाले.
बेळगाव येथे झालेल्या संमेलनाच्या अध्यक्ष पदावर संयुक्त महाराष्ट्राचा ठराव सर्व प्रथम माडखोलकरांनी मांडला. याशिवाय पुढील काळात काही नाटकं आणखी काही कादंब-या, साहित्य समस्यांवरील लेख व्यक्ति तितक्या प्रकृती, मी आणि माझे वाचक इ. विविधपूर्ण लेखन माडखोलकरांनी केले. त्यातून वृत्तपत्रीय लेखनाप्रमाणे त्यांचे विविधांगी लेखन प्रतिबिंबित झाले आहे. मा.गजानन त्र्यंबक माडखोलकर यांचे २७ नोव्हेंबर १९७६ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
…… आणि डॉ. काशीनाथ घाणेकर’ असे जाहिरातीमधून प्रसिद्ध होताच नाट्यगृहे हमखास ‘हाऊस फुल्ल’ होत व त्यांच्या एन्ट्रीलाच टाळ्यांचा कडकडाट होई. डॉ.काशीनाथ घाणेकर व्यवसायाने डेंटीस्ट होते. त्यांनी मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीला दिलेले योगदान अतुलनीय आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti