जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
‘प्यार तो होना ही था‘ चित्रपटातील दमदार टायटल सॉंग, हम्मा हम्माचा सुपरहिट ताल आणि ओ मेरी मुन्नी सारखा हट के अल्बम, अशा आपल्या मोजक्या कामानेही संगीतकार रेमो फर्नांडिसने मनोरंजन क्षेत्रावर आपली मुद्रा उमटवली आहे. गोमंतकीय संस्कृतीचे वेगळेपण कायम आपल्या संगीतातून देशापुढे रेमो यांनी मांडले आहे. रेमो फर्नांडिस यांचे पूर्ण नावलुईस रेमो डी मारिया बर्नॅर्डो फर्नांडिस. त्यांचा जन्म ८ मे १९५३ रोजी झाला.
रेमोला नवी पिढी ओळखते ती त्याच्या 'ओ मेरी मुन्नी' या एकमेव हिंदी गाण्यांच्या अल्बमवरून. याहून थोडं मागे गेल्यास 'प्यार तो होना ही था' या अजय देवगण-काजोल च्या चित्रपटाच्या शिर्षकगिताचा गायक म्हणून आणि त्यापेक्षाही थोडं मागे गेल्यास 'बॉम्बे' चित्रपटात रेमोने गायलेल्या 'हम्मा, हम्मा' या गाण्यावरून त्याची ओळख अनेकांना पटेल. त्यापेक्षाही जुन्या लोकांना रेमोने गायलेल्या 'ये है जलवा' या गाण्यावर थिरकणारी अर्चना पुरणसिंग आठवेल. मात्र हिंदी चित्रपटात रेमोने गायलेली गाणी ही त्याच्या संगीत क्षेत्रातील कारकिर्दीचा एक टक्का देखील परिचय करून देण्यास समर्थ नाहीत, इतकी त्याची या क्षेत्रातील कारकिर्द मोठी आहे. रेमो फर्नांडिस यांचा पणजी येथे बर्नॅर्डो आणि लुईझा फर्नांडिस या गोवन कॅथोलीक दाम्पत्याच्या पोटी रेमो चा जन्म झाला, तेव्हा त्याचे वडिल गोव्यातील समाजवादी चळवळीतील अग्रणी कार्यकर्ते होते.
घरात रॉक-पॉप संगिताचं वातावरण अजिबातच नव्हतं. एक दिवस रेक्स नावाच्या रेमोच्या चुलत भावाने पुण्याहून 'रॉक अराउंड द क्लॉक' नावाची एक रेकॉर्ड त्याच्यासाठी आणली. 'बिल हॅलॅ ऍण्ड हीस कॉमेटस' या अमेरिकेतल्या गाजलेल्या रॉक ऍण्ड रोल बॅण्डने तयार केलेल्या या रेकॉर्डने रेमोचं आयुष्यच बदलवून टाकलं. या वेळी रेमोचं वय होतं अवघं आठ वर्ष. त्यानंतरची दहा वर्ष रेमोने रॉक-पॉप क्षेत्रातील गुरूंची एकलव्य-स्टाईल मुशाफिरी करण्यात घालवली. ईल्व्हीस प्रिसले, क्लीफ रिचर्डस्, द शॅडोस, द रोलींग स्टोन्स, आणि द बिटल्स -- एक ना अनेक रॉक बॅण्डला ऐकत तो मोठा होउ लागला. सत्तरच्या दशकात रॉक संगिताने अमेरिकेच्या सिमा उल्लंघून जगाला वेड लावायला सुरवात केली. लॅटीन, आफ्रिकन, वेस्टर्न क्लासिकल, आणि जॅझ संगिताबरोबर रॉक म्युजिक चे फ्युजन बनु लागले, आणि हळूहळू 'लेट्स रॉक' हे सगळ्या जगाचंच आवडतं वाक्य बनलं. रेमो त्या वेळी शाळकरी होता. मात्र शाळेतील चार मित्रांबरोबर त्याने 'बिट फोर' नावाचा रॉकबॅण्ड तयार केला होता. या बॅण्डबरोबर काम करतांना त्याच्या हाती गिटार आली, आणि तेव्हापासून बास गिटार आणि रेमो यांचं अतुट नातं जुळलं ते आजतागायत कायम आहे. शालेय शिक्षण संपवून रेमो आर्किटेक़्ट बनण्यासाठी मुंबईला आला. मायानगरी म्हणजे कलाकारांचं नंदनवनच. कॉलेजला बुट्टी मारून गिटार वाजवण्याच्या कार्यक्रमांना जाणे हा रेमोचा आवडता उद्योग बनला. या कालावधीत त्याने हिंदी आणि मराठी भाषा शिकली. सितार आणि बासरी कशी वाजवायची हे तो स्वतःहूनच शिकला. आज हिंदी, मराठी, कोकणी, ईंग्रजी, पोर्तुगिज आणि फ्रेंच या भाषांमध्ये तो गाणी लिहतो.
गोवन, पोर्तुगिज, सेगा, मॉरिशस आणि सिसेलस, आफ्रिकन, लॅटिन, क्युबा, निकाराग्वा या सगळ्या संगितप्रकारांमध्ये ही गाणी कंपोज करतो. आणि जगभर ही गाणी सादर करतो. गोव्यात लहानाचा मोठा होत असतांना रेमोने अनेक युरोपिअन हिप्पी पाहिले होते. तेव्हाच त्याने युरोपमध्ये 'ईंडियन हिप्पी' बनुन जायचं असं ठरवलं होतं. आज आपलं स्वप्न तो जगतोय. मुंबईतील चार वर्षांचं वास्तव्य आणि त्यानंतर वेगवेगळ्या बॅण्डबरोबर केलेले युरोप आफिकेचे दौरे रेमोला गोव्यापासून तोडू शकले नाहीत. युरोपमध्ये स्थायिक होण्याची सुवर्णसंधी जवळ असतांना हा अवलीया भारतात परत आला. गोव्यात मात्र त्याचं हवं तसं स्वागत झालं नाही. 'घर की मुर्गी दाल बराबर' या भारतीय लोकांच्या स्वभावाचा त्याला परिचय आला. ईंग्रजीत लिहलेली आणि कंपोझ केलेली रेमोची गाणी रेकॉर्ड करायला एकही कंपनी तयार होई ना. आणि आपल्या संगित साधनेशी तडजोड करायला रेमो तयार नव्हता. १९८० च्या दशकामध्ये भारतीय रेडिओ स्टेशन्सवरदेखील रॉक पॉप संगिताला अनुकुल वातावरण नव्हते. त्यामुळे गाणं लोकांपुढे आणावं कसं, हा यक्षप्रश्न रेमोपुढे होता. मात्र हार मानेल तो रेमो कसला?
गोवन क्रेझी नावाची एक रेकॉर्ड कॅसॅट त्याने पोर्टास्टुडिओ या घरगुती टेपरेकॉर्डरवर रेकॉर्ड केली. यातली सगळी गाणी रेमोनं स्वतः लिहली, संगितबद्ध केली आणि रेकॉर्ड केली. गाण्यातील विविध आवाज त्याने एकट्याने काढले. सगळी वाद्ये स्वतःच वाजवली. स्वतःच साउंड इजिनिअर बनुन या अल्बमचं मिक्सिंग केलं. अल्बमचं कव्हरही स्वतःच डिझाईन केलं. आणि मुंबईला जाऊन कॅसॅटसच्या प्रती काढून आणल्या. या कॅसॅटस घेऊन तो आपल्या तुटक्या स्कुटरवर गोव्यातील मार्केटमध्ये स्वतः फिरायला लागला. दुकानदारांना आणि ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्याने आपल्या गाण्याच्या बोलांचं एक पुस्तकही स्वतःच्या हस्ताक्षात लिहून स्वतःच सायक्लोस्टाईल प्रिंटरवरती प्रकाशित केलं. शिवाय पोस्टकार्ड, टि शर्ट्स आणि टोप्यांवरती आपल्या अल्बमचं चित्र काढून या गोष्टी कॅसॅटसबरोबर वाटायला सुरवात केली. याला मेहनत म्हणावे की साधना की वेड म्हणावे? हे अविश्वसनिय काम रेमोने एक दोन नव्हे, तर तब्बल सहा वर्षांपर्यंत केलं. 'गोवन क्रेझी' नंतर त्याने ओल्ड गोवन गोल्ड आणि ईतर कॅसॅटसही प्रकाशित केल्या.
सन १९८६ पंतप्रधान राजीव गांधी यांची गोवा भेट. या भेटीदरम्यान रेमोने 'हॅलो राजीव गांधी' हे गाणं स्टेजवर सादर केलं. यात राजीव गांधी यांना 'ड्युड, बडी' अश्या एकेरी संबोधनांनी संबोधीत केल्यामुळे रेमो नव्याच वादामध्ये फसला. मात्र शेवटी राजीव गांधींनीच हे गाणं आपल्याला मनापासून आवडल्याचं जाहीर केलं आणि रेमोची या वादातून सुटका झाली. यामुळे त्याला भारतभर प्रसिद्धी मात्र मिळाली. २००७ मध्ये मिळालेला पद्मश्री पुरस्कार ही याची पावतीच म्हणावी लागेल. रॉक म्युजीकचा उपयोग जन-आंदोलनादरम्यान लोकांच्या भावना बोलत्या करण्यासाठी केला जातो, याची रेमोला जाणीव आहे. त्यामुळेच त्याने भोपाळ गॅस दुर्घटनाग्रस्तांच्या मदतीसाठी झालेल्या संगितमय कार्यक्रमामध्ये स्वतःसाठी दोन गाणी मागुन घेतली. हा कार्यक्रमा आणि त्यानिमित्ताने ही गाणी त्यावेळला दुरदर्शनवरून संपुर्ण देशभर दाखवली गेली आणि रेमोचं नाव युवकांच्या ओठावर येऊ लागलं. याच दरम्यान जलवा चित्रपटाचं शिर्षकगित गाण्याची ऑफर त्याला आली आणि तेव्हा मुंबईतच असल्यामुळे त्याने सहज म्हणुन ते गाणं गायलं. पुढे या गाण्याने काय चमत्कार घडवला ते आपण जाणतोच.
बॉलीवूड मध्ये नावारूपाला आल्यावर मुंबई सोडण्याचं जिगर मोठमोठे कलाकार दाखवू शकत नाहीत. रेमो मात्र या सगळ्याला अपवाद आहे. कुणातरी (रॉक न जाणणार्र्या) संगितकाराने बनवलेलं गाणं कुणातरी (रॉक न जाणणार्र्या) गितकाराने लिहलेलं गित आपण त्यांच्या स्टाईलमध्ये गायचं, म्हणजे आपल्या संगिताचा अपमान आहे असं त्याचं मत होतं. त्यामुळे बॉलीवुडसाठी गाणी म्हणायचं त्याने टाळलं.
१९९५ मध्ये ए आर रेहमान ने मणिरत्नमच्या 'बॉम्बे' चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीमध्ये 'हम्मा हम्मा' हे गाणं गाण्यासाठी रेमो ला विनंती केली. या गाण्याचे हिंदी बोल मात्र मी लिहणार, आणि ते माझ्या पद्धतीने सादर करणार, असा बाणेदारपणा प्रत्यक्ष रहमानला दाखवण्याचं धाडस रेमोच करू जाणे. मात्र या गाण्याने रेमोबरोबरच रेहमानसाठीही रसिकांच्या मनाची कवाडे खुली केली, यात शंका नाही.
या दरम्यान रॉक सिंगर म्हणुन त्याचे अनेक अल्बम्स येत गेले आणि ते भारतीय उपखंडाबरोबरच युरोपातही लोकप्रिय होत गेले. दिग्दर्शक अनुराग कश्यकप दिग्दर्शित ‘बॉंबे वेलवेट‘ चित्रपटातून रेमो फर्नांडिस याने अभिनय केला आहे. मात्र हे सगळं काम रेमोने गोव्यात राहूनच करायचं असं ठरवलं होतं. गोवा या आपल्या जन्मभुमी बद्दल त्याच्या मनात असलेल्या प्रेमाचं ते प्रतिक आहे. ख्रिस्चन आणि हिंदू संस्कृतीचा मिलाप असलेल्या गोवा सिओलीम झागोर फेस्टीवल मध्ये रेमोच्या गाण्याशिवाय लोकांचे मन भरत नाही. शिवाय गोव्याचा गणेशोत्सव रेमोच्या बासरिशिवाय पुरा होत नाही. रेमोच्या घरीदेखील गणपतीबाप्पा येतात आणि दहा दिवसांचा उत्सव साजरा होतो. मुळची फ्रेंच असलेली त्याची पत्नी मिशेल आणि दोन मुले आजही गोव्यातील सिओलीम या खेड्यात असलेल्या त्यांच्या घरातच राहतात. मुले राज्य शासनाच्या शाळेत जातात. गोव्याच्या राजकारणात आपल्या वडिलांचा समाजवादाचा संदेश रेमो आपल्या गाण्याच्या माध्यमातून पसरवत असतो. कोकणी भाषेतील त्याची गाणी निवडणुकीदरम्यान प्रचारात वापरली जातात. गोव्याच्या उत्कर्षासाठी तेथील राजकारण्यांवर आणि राजकारणावर तो नेहमीच कडक शब्दात टिका करत असतो.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट / गौरांग प्रभु
प्रियांका शेट्टी… लावणीची कोणतीही पार्श्वभूमी नसतानाही या लोककलेत स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलंय… नृत्यसमशेर माया जाधव यांच्या तालमीत तयार होऊन गेली तीन दशकं याच कलेचा ध्यास घेत ही कला जीवापाड जपत, त्यावर प्रेम करत आणि ती जगावी यासाठी सर्वार्थाने प्रयत्न करणारी कलावती म्हणजे प्रियांका शेट्टी.
गणेश वासुदेव मावळणकर हे १९५२ साली स्वतंत्र भारतात झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीद्वारे, तत्कालीन मुंबई प्रांतात असलेल्या अहमदाबादमधून लोकसभेवर निवडून गेलेले संसद सदस्य होते.
जिम्बे या वाद्याला भारतामध्ये नावारूपाला आणणारे तसेच आंतराष्ट्रीय पातळीवर संगीतामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेले व उस्ताद अल्लाराखा यांचे सुपुत्र आणि उस्ताद झाकीर हुसेन यांचे लहान भाऊ असलेले सुप्रसिद्ध संगीतकार तौफिक कुरेशी यांनी संगीत क्षेत्रात स्वतःच्या प्रतिभेचा ठसा उमटवला. त्यांचा जन्म ९ ऑगस्ट १९६२ रोजी झाला. उस्ताद अल्लाराखा आणि उस्ताद झाकीर हुसेन हे त्यांचे गुरु होत. त्यांच्या घरी मोठमोठे कलाकार यायचे.
पं. रविशंकरजी, पं. हरिप्रसादजी, पं. शिवकुमारजी, उस्ताद अमजद अलीजी, उस्ताद अली अकबर खांसाहेब असे. त्यांना नुसते पाहणे, त्यांच्या चर्चा ऐकणे, हाही त्यांचा मोठा रियाझ होता. पर्क्युशनिस्ट म्हणून जगभरात नाव कमावलेल्या तौफिक कुरेशी यांना या वाद्याचे अनभिषिक्त सम्राट मानले जाते. एक उत्कृष्ट तबला व ताल वादक असलेल्या कुरेशी यांनी संगीतकार म्हणूनही नाव कमावले आहे.
अभिजात भारतीय संगीतातील पारंपारिकता आणि त्यातील आधुनिकता यांची सांगड कुरेशी यांनी घातलेली आहे. त्यांनी सिनेसृष्टीत अनेक वर्षे विविध तालवाद्य्ो वाजवली आहेत. २००० मध्ये त्यांचा ‘ऱ्हिधून’हा नवा अल्बम आला. त्यात त्यांनी ‘ऱ्हिदमचे, तालाचे वेगळे प्रयोग केले आहेत. उस्ताद अल्लाराखा यांनी त्यात अनेक वर्षांनी गायन केले होते.‘ऱ्हिधून’अल्बमने तौफिक कुरेशी यांची नवी ओळख निर्माण झाली. ग्रॅमी अॅवॉर्डप्राप्त ‘ग्लोबल ड्रम प्रोजेक्ट’या अल्बममधील त्यांच्या सहभागाची आणि त्यांनी सादर केलेल्या वादनाची जागतिक पातळीवर दखल घेतली गेली आहे. पर्क्युशन वाद्याच्या क्षेत्रात स्वतःचा दबदबा निर्माण केलेले तौफिक या वाद्यावरील त्यांच्या पकडीमुळे आणि सादरीकरणाच्या आपल्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीमुळे नेहमीच प्रेक्षकांच्या मनात जागा पटकावून बसले आहेत.
जयपूर-अतरौली घराण्याच्या गायिका गीतिका वर्दे-कुरेशी या तौफिक कुरेशी यांच्या पत्नी होत. १९९३ साली उभयतांनी परस्परांचे आयुष्यभराचे जोडीदार म्हणून नव्या प्रवासाला सुरुवात केली. नझरिया, हम अपने, मीरा, तुम बिन, ले आयिले हे त्यांचे अल्बम गाजलेले आहेत. तौफिक कुरेशी व गीतिका वर्दे यांचा मुलगा शिखरनाद हा तबला वादक आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
रघुनाथ रामचंद्र किणीकर उर्फ रॉय किणीकर हे सुप्रसिद्ध कवी व कलंदर कलावंत होते.
सरदार गोपाळ हरी देशमुख (जन्म : फेब्रुवारी १८, इ.स. १८२३, मृत्यू : पुणे ऑक्टोबर ९ इ.स. १८९२. त्यांचे घराणे मूळचे कोकणातले वतनदार होते. घराण्याचे मूळचे आडनाव सिद्धये. त्यांच्या देशमुखी वतनामुळे देशमुख हे आडनाव रूढ झाले.
नम्र, साधेपणा, कामाप्रती प्रामाणिकपणा या वैशिष्टय़ांनी सुरुचीची छायाचित्रं खुलतात…
अनेक मराठी कलाकारांना शून्यातून यशाच्या शिखरापर्यंत पोहचताना मी पाहिलंय. काहींचा हा प्रवास अगदी वर्षा – दोन वर्षांत झालाय. तर काहींना त्यासाठी बरीच वर्षे खर्ची पाडावी लागलीत. यातील काहीजण अनेक वर्षांच्या अंती अजूनही एका सीमेपर्यंतच पोहोचलेत तर काही या इंडस्ट्रीतूनच बाहेर फेकले गेलेत. या सगळ्यांचा प्रवास पाहता एक वाक्य नेहमीच समोर येत ते म्हणजे,’ अक्रॉस प्रोफेशन्स, कन्सिस्टन्सी इज अ डायरेक्ट प्रोडक्ट ऑफ वर्क एथिक’. आपल्या कामात सातत्य राखण तस फार कमी लोकांना जमत. त्यातही स्त्रियांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातल्या समस्यांमुळे हे सातत्य राखण कठीण जात. आपल्या कामात सातत्य राखत, त्यातल्या नीतिमूल्यांना जरा देखील धक्का लागणार नाही याची नेहमीच काळजी घेत गेली अनेक वर्षे विविध माध्यमांतून आपल्या अभिनयाच्या जोरावर सतत दिसणारा चेहरा म्हणजे सुरुची अडारकर.
सुरुचीने आजवर अनेक माध्यमांसाठी काम केलय. छोटयापडद्यावर, रंगभूमीवर, रुपेरी पडद्यावर ती लीलया वावरलीये. आज प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या याच सुरुचीचा अभिनय क्षेत्रातला हा प्रवास किती खडतर होता हे गेल्या दशकातल्या तिच्या कारकिर्दीवर नजर टाकल्यास दिसून येईल. प्रभाकर पणशीकर निर्मित ’अवघा रंग एकचि झाला’ या नाटकातून सुरुचीने २००७ साली अभिनय क्षेत्राचा श्रीगणेशा केला. यानंतर ’उंच माझा झोका’, ’ओळख, ’कूंकु’, ’जन्मगाठ’, ’राम राम महाराष्ट्र’, ’लेक लाडकी या घरची’, ’पेहचान’, ’एक तास भुताचा’, ’आपलं बुवा असं असतं’, अशा नाना मालिकांतून ती सतत दिसत होती. या मालिकांनी तिच्यातला अभिनय जिवंत ठेवण्याचं काम केलं. मात्र, सुरुचीला ओळख दिली ती झी मराठीच्या ’का रे दुरावा’ या मालिकेनी. या मालिकेतली ’आदिती’ चांगलीच लोकप्रिय ठरली आणि सुरुची या मालिकेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर घरघरांत पोहचली. आदितीने सुरुचीला प्रसिद्धी दिली, चेहरा दिला आणि बघता बघता तिचा चेहरा सातासमुद्रापारही सुपरस्टार झाला. या मालिकेनंतर सुरुचीने कमबॅक केलं ते झी युवाच्या ’अंजली’ मालिकेतून. मालिकेतली मध्यवर्ती भूमिका तरुणाईत चांगलीच लोकप्रिय ठरली आणि सुरुचीला तिच्या यशाचा आलेख चढता राखण्यात यश मिळालं.
सुरुचीने छोटया पडद्यावरच्या अभिनयाच्या अनुभवाच्या जोरावर रुपेरी पडद्यावरही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. ’मात’, ’नारबाची वाडी’, ’तथास्तु’ अशा मराठी आणि हिंदी सिनेमांतून तिचा अभिनय पाहायला मिळाला. मात्र ती लक्षात राहिली आदिती आणि अंजली या भूमिकांमुळेच. आदितीची भूमिका संपल्यानंतर आणि अंजलीच्या भूमिकेत वावरण्यापूर्वी सुरुचीने ’स्ट्रॉबेरी’ नाटकातून रंगभूमीवर काम बॅक करण्याचा प्रयत्न केला. परंतु तिला फारस यश आलं नाही.
साधारण २०१२ साली मला दिवाळी निमित्त विशेष शूट करण्यासंदर्भात विचारण्यात आलं होत. यासाठी मला मराठी चेहरा हवा होता. पारंपरिक वेशभूषा, मराठमोळा शृंगार असल्याने यासाठी आम्ही सुरुचीचा चेहरा निश्चित केला. मेकअप, हेअर, कॉश्च्युम हे सारं आधीच ठरलं होत. चंद्रकोर टिकली, नाकात नथ, गळ्यात, कानात दागिने असा मराठमोळा शृंगार सुरुचीवर फारच शोभून दिसत होता. तिच्या या लुकच्या सोबतीला दिवाळीसाठीच कंदील, दिव्यांच तोरण असं सगळं शूटसाठी वापरलं होत. सुरुची यावेळी फार नम्र होती. शूटच्यावेळी नम्रतेनं सर काही समजून घेऊन अदबीने बोलत होती.
या शूटनंतर सुरुचीच एका मराठी वृत्तपत्रासाठी शूट करण्याची संधी मला मिळाली. त्याकाळात सुरुची थोडी बिझी होती. परंतु ठरल्याप्रमाणे वेळ काढून सुरुची शूटला आली. मराठमोळ्या वेशातली सुरुची मी टिपली होती. वेस्टर्न लूकमधली सुरुची टिपण्यासाठी सुरुचीच दोन – तीन कौस्च्युममध्ये आम्ही शूट प्लॅन केलं. ठरल्याप्रमाणे सुरुची स्टुडिओला आली. सुरुवातीला सुरुचीचे काही पोर्ट्रेट मी टिपले. प्रत्येक चेहरा काहीतरी बोलतो. त्याला त्याची एक विशिष्ट अशी भावमुद्रा असते. त्यावर कितीही रंगरंगोटी केली तराही त्यातली सात्विकता बदलत नाही. आणि असा प्रयत्न केला तर ते खूप कुत्रिम वाटत. सुरुचीचा चेहरा तसा खूप भोळा, नम्र आणि पारंपरिक ठेवणीसाठी उत्तम आहे. हेच लक्षात घेऊन तिला फार मॉडर्न लूक न देता तिच्यातला साधेपणा, सहजपणा टिपण्याचा प्रयत्न मी करत होतो. सुरुचीचा वेस्टर्न लूक आणि तो ग्लॅमरस वाटावा म्हणून लाइटिंगची वेगळी योजना स्टुडिओत केली. तिचा हा लूक तिच्या हावभावातून न दाखवता लाईटिंगच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न होता.
कॅमेयाच्या समोर लाईट ठेवून फोटो टिपण हे खरंतर शास्त्रानुसार चुकीचं मानलं जात. मात्र या शूटसाठीची हि गरज होती. या लाईटिंगमुळे एक ड्रमॅटिक लाईट मला मिळवता आला. कॅमेयाच्या लेन्सवर आलेल्या ग्लेअर्समुळे हा लाईट इफेक्ट आणखी सुंदर वाटत होता. या लाईटिंगमध्ये निळ्या – गुलाबी रंगाची शेड असलेले काही फोटो मी टिपले. यानंतर स्टुडिओत सुरुचीचे काही पोट्रेट आणि कँडिड फोटो टिपण्यात मला यश आलं. साधारणपणे पाच ते सहा तास हे शूट चाललं. सुरुची न कंटाळता, न थकता शूट करत होती. शूटच्यावेळी सुरुची फारच मदतशीत असल्याने शूटसाठीच दडपण माझ्यावर नव्हतं.
सुरुचीने नाटक, मलिका आणि सिनेमा अशा तिन्ही क्षेत्रात आपला ठसा उमटवला. कलाकृती किती गाजल्या यापेक्षा त्यातली सुरुचीची भूमिका, तिचा अभिनय हा किती उंचीचा होता हे तिला पुढे मिळत गेलेल्या अभिनयाच्या संधीवरून समजतं. सुरुचीला नेमकं काय करायचंय हे तिला माहित असतं. परंतु नवीन कलाकृतीला ती नाही म्हणत नाही. कारण त्यातली आव्हानं पेलण्याची तयारी तिने केलेली असते. सुरुचीच्या याच अभिनयातल्या सातत्यामुळे, तिने जपलेल्या नीतिमूल्यांमुळे आणि आव्हानं पेलण्यासाठी नेहमीच दाखवलेल्या तयारीमुळे गेल्या बारा वर्षांत सुरुचीच्या अभिनयाच्या प्रवासानं जोरदार वेग पकडलाय.
धनेश पाटील
मुंबईतील श्री. गाडगे महाराज मिशनच्या धर्मशाळा असोत, वा मेळघाटातील कुपोषणग्रस्त मुलांसाठी अन्नदान, कृष्ठरोग्यांची सेवा असो वा गाडगेबाबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्यासाठीचे अन्नदान... अमरावतीच्या नागरवाडीचे बापूसाहेब देशमुख यांचे अशा विविध क्षेत्रातील सेवाकार्य गेली ४० वर्षे अखंड सुरु आहे. वंचितांची सेवा करा रे, हा संत गाडगेबाबांचा संदेश त्यांनी अंगात भिनवला आहे.
वंचितांच्या सेवेचा पाईक
जलतरंग हे प्राचीन भारतीय वाद्य असून ते वाजविणाऱ्या व्यक्ती दुर्मीळ आहेत. ‘ही ६४ कलांमधील एक कला आहे. या वाद्याला जलवाद्य किंवा ‘जलतंत्री वीणा’ असेही म्हणतात. यात कमीतकमी १२, तर जास्तीत जास्त २६ भांडी असतात. भांड्यांची रचना मोठ्यापासून छोट्यापर्यंत, अर्धवर्तुळाकार स्वरूपात केली जाते. बांबूच्या किंवा प्लास्टिकच्या काठ्यांनी ते वाजवितात.
शास्त्रीय संगीतात आपल्या अनोख्या आणि स्वयंभू गायकीने उच्चस्थान निर्माण करणारे पं. कुमार गंधर्व हे पं.सत्यशील देशपांडे यांचे गुरू!
लहान मुले खेळताना भिंतीआडून डोकावणाऱ्या एखाद्या भिडूला ज्या सहजतेने आपल्या खेळात समाविष्ट करून घेतात, तेवढय़ाच सहजतेने एखाद्या रागातील एखाद्या वज्र्य स्वराला हळूवार कुरवाळणाऱ्या पं. कुमार गंधर्व यांची संगीताकडे पाहण्याची दृष्टीच वेगळी आणि उदात्त होती. त्यांचा जन्म ९ जानेवारी १९५१ रोजी झाला. हाच उदात्त दृष्टिकोन आपल्या जीवनाचे साध्य बनवून संगीताची आराधना करणाऱ्या पं. सत्यशील देशपांडे यांनी ख्याल गायकीचे अक्षरश: झाड फुलवले. विशेष म्हणजे, कुमारजींप्रमाणेच पं.सत्यशील देशपांडेही संगीताच्या बाबतीत कोणत्याही बंधनात अडकून पडले नाहीत. भारतीय शास्त्रीय संगीतातील ख्याल गायकी हा प्रकार लोकप्रिय असला, तरी कलाकारांसाठी तो साधनेचा विषय आहे.
पं. सत्यशील देशपांडे यांनी ख्याल गायकी साधनेने आत्मसात केली. त्यांनी ज्या सहजतेने आणि तन्मयतेने ख्याल गायकी गायली, त्याच तन्मयतेने त्यांनी ‘लेकीन’ किंवा ‘विजेता’ अशा चित्रपटांमधील गाणीही गायली. ख्याल गायकी सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी प्रफुल्ल डहाणूकर आर्ट फाऊंडेशनसाठी ‘पाच मिनिटांचे शास्त्रीय संगीत’ असा एक पाच मिनिटांचा तुकडा तयार केला होता.
संगीताकडे वेगळ्याच दृष्टीने पाहणारा हा सुरांचा गुरू शास्त्रीय संगीत हा फक्त ऐकण्याचा किंवा गाण्याचा विषय नसुन अनुभवण्याचा देखील विषय आहे हे मा.पं.सत्यशील देशपांडे जेव्हा सांगतात ते रसिकांना नक्की पटत असेल. हा अनुभव स्वत: घेण्यासाठी व लुटण्यासाठी सत्यशीलजींनी आयुष्यभर अक्षरशः जीवाचं रान केलं. मुख्य म्हणजे त्यांचे गुरु कुमारजी नेहमीच आधी कुठलीही गोष्ट करुन दाखवायचे व मग त्यावर भाष्य करायचे.
कुमारजींच्या ह्या आगळ्यावेगळ्या शिष्याचीही तीच पद्धत आहे. नुसत्या समीक्षेपेक्षा हे वेगळं व अवघड काम आहे. एखादी नवीन बंदिश बसवणं म्हणजे काय असतं ते गवयांना चांगलेच माहितेय. मग प्रत्येक रागातील पाचपन्नास बंदिशी नुसत्या बसवुनच नाही तर त्यातील सौष्ठव व सौंदर्यासहित स्वत: गाऊन अनुभवण्याचा वसा त्यांनी घेतला व अजुनही तो चालुच ठेवलाय. तसेच त्या बंदिशीचे पोषण कुठल्या गायकिने चांगले होते ही सौंदर्य दृष्टी सुद्धा त्यांच्याकडे आहे. त्यासाठी त्यांनी विविध गायकींचा अभ्यास करुन त्या आत्मसात केल्यायत. त्यामुळे वेगवेगळ्या गायकींचा तुलनात्मक आभास करणं त्यांना शक्य झालंय. टोकाचा व्यासंग, तल्लख बुद्धी व उत्तम प्रतिभा हा त्रिवेणी संगम सत्यशीलजींपाशी आहे.
तरुण संगीतकार कौशल इनामदार हे पं.सत्यशील देशपांडे यांचे शिष्य. कौशल इनामदार आपल्या गुरु बद्दल सांगताना म्हणतात, गुरु अंतर्दृष्टी देतो ती फक्त कलेकडे पाहण्याची नाही तर जगण्याकडे पाहण्याची. त्यांनी गाण्याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टीकोन दिला. ते स्वतः कुमारजींचे शिष्य. तरीही त्यांच्या गाण्यात कुमारजींची नक्कल नाही. कुमारजींनीपण त्यांना सांगितलं होतं की तुमचे खड्डे तुम्ही खणा!
थोडक्यात काय तर अगदी गुरूचीसुद्धा नक्कल न करता स्वतःचं वेगळेपण स्वतः सिद्ध करा. त्यामुळे मी विचार करताना कधीही सत्यशील देशपांडे यांच्यासारखा करत नाही. मी माझ्या सारखा विचार करतो. मला वाटतं की आपल्यासमोर वाट असतेच, ती आपण शोधत जातो. गुरु आपल्याला जाणीव करून देतो की तुमची वाट तुम्ही शोधा. त्यासाठी आवश्यक त्या गोष्टी गुरु पुरवतात. मी गाण्याचा विचार माझ्यासारखा करतो कारण मी त्यांचा शिष्य आहे. एखादी चाल फसली तर ते सांगतात की त्यात काय करता येईल. त्यातलं एक सूत्र सांगतात ज्यामुळे अनेक गोष्टी स्पष्ट होतात.
मी संगीत द्यायला लागल्यापासून माझ्या चालींवर त्यांचा एक वेगळ्या प्रकारचा प्रभाव आहे. ते स्वतः उत्तम संगीतकार आहेत. त्यांना संगीतातले बारकावे अचूक कळतात. त्यांनी दाखवलेलं प्रतिबिंब इतकं स्वच्छ असतं की ‘प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट’ अशी काहीशी स्थिती होते! त्यामुळे असं म्हणायला हवं की गुरु म्हणजे वाटाडय़ा नाही. तो सतत तुमच्याबरोबर राहत नाही. वेगवेगळे मार्ग ते तुम्हाला सांगतात. तिथे जाताना तुम्हाला प्रश्न पडतात. माझ्या गुरुचं वेगळेपण हेच की त्यांनी आम्हाला असे प्रश्न पाडले. आज जवळजवळ १६ वर्ष मी त्यांच्याकडे शिकतोय पण जाऊन त्यांच्याकडे शिकायला बसलोय असं कधीच झालं नाही. मी कधीही त्यांना भेटायला जातो आणि शिक्षण सुरु होतं. त्यांनी मला अगदी मुलासारखं वाढवलं आहे.
सध्या ‘अजिंठा’ या चित्रपटासाठी ते माझ्याकडे गातायत. मला वाटतंय ‘हे गीत जीवनाचे’ नंतर पहिल्यांदाच ते चित्रपटासाठी गातायत. त्यांनी माझ्याकडून चाल समजून घेतली, त्यावर मी जेवढा विचार केला नसेल तेवढा त्यांनी केलाय, त्याच्या शंभरेक तालमीसुद्धा केल्यात! ते नुसते गायक किंवा संगीतकार नाहीत तर एक विचारवंत, लेखकसुद्धा आहेत. त्यांचा भाषेचा सेन्स अतिशय उत्तम आहे. होतं.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Copyright © 2025 | Marathisrushti