जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
१९८०च्या दशकात प्रियदर्शिनी कुलकर्णी यांनी एका संगीत समारंभात जयपुर-अत्रौली घराण्याचे मल्लिकार्जुन मन्सूर यांचे गाणे ऐकले आणि त्या मंत्रमुग्ध झाल्या आणि काही वर्षांनंतर त्यांचे पुत्र आणि शिष्य राजशेखर मन्सूर यांना भेटल्या आणि त्यांना गाणे शिकवण्याची विनंती केली. हे शिकणे पुढे दहा वर्षे चालले.
June 18, 2022
मराठी गायक, संगीतकार रामचंद्र कृष्णाजी फाटक ऊर्फ राम फाटक यांचा जन्म २१ ऑक्टोबर १९१७ रोजी झाला.
शिक्षणाने एम.ए., बी.टी. असलेल्या राम फाटकांनी काही वर्षे शिक्षकी पेशा पत्करला. पुढे १९५६ पासुन पुढील १० वर्षे नागपूर आकाशवाणी केंद्रावर तर त्यापुढील १० वर्षे पुणे आकाशवाणीवर त्यांनी नोकरी केली. इथेच भास्करराव गोडबोलेआणि जे.एल.रानडे ह्यांसारख्यांचे मार्गदर्शन त्यांना मिळाले.
पुणे आकाशवाणी केंद्रावर असतानाच ज्येष्ठ गायक आणि संगीतकार सुधीर फडके ह्यांच्याशी त्यांचा स्नेह जुळला. सुधीर फडक्यांच्या गीतरामायणामधील काही गाणी ते गायले. आकाशवाणीच्या पुणे केंद्रासाठी त्यांनी शास्त्रीय संगीत गायिका बेगम परवीन सुलताना यांच्याकडून काही मराठी भावगीते गाऊन घेतली.
१९७२ साली त्यावेळचे नवोदित गीतकार सुधीर मोघे ह्यांच्या 'सखी मंद झाल्या तारका' ह्या गीताला रामभाऊंनी स्वरबद्ध करून भीमसेन जोशी ह्यांच्याकडून हे गाणे गाऊन घेतले. पुढे हे गाणे ध्वनीफितीद्वारे सुधीर फडक्यांच्या स्वरात प्रकाशित करण्यात आले. रामभाऊंनी ’संतवाणी’ मधील 'तीर्थ विठ्ठल', 'माझे माहेर पंढरी', 'पंढरी निवासा', 'अणुरेणीया थोकडा' हे पंडित भीमसेन जोशींकडून गाऊन घेतलेले अभंग खूपच लोकप्रिय झाले. ह्याबरोबरच 'दिसलीस तू', 'डाव भांडून मांडून मोडू नको' आणि 'सखी, मंद झाल्या तारका' ही सुधीर फडक्यांनी गायलेली भावगीते प्रचंड गाजली.
राम फाटक यांचे २६ सप्टेंबर २००२ रोजी निधन झाले.
-- संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
राम फाटक यांचे संगीत असलेली काही गाणी
अणुरेणिया थोकडा
अंतरीच्या गूढ गर्भी
अधिक देखणें तरी
अबीर गुलाल उधळीत
October 31, 2017
६ नाटके, २ प्रवासवर्णन, २ व्यक्तिचित्रे, २८ कथासंग्रह, १८ लेखसंग्रह, निवडक कथा संग्रहाचे दोन भाग इतके त्यांचे साहित्य प्रसिद्ध झाले.
August 13, 2021
ज्येष्ठ नाट्य समीक्षक, विचारवंत प्रा. पुष्पा भावे यांचा जन्म २६ मार्च १९३९ रोजी मुंबई येथे झाला.
एक विचारवंत लेखिका, नाटक आणि रंगभूमी विषयी भरपूर लेखन आणि टीकात्मक समीक्षा करणार्याव लेखिका म्हणून पुष्पा भावे ओळखल्या जात. मुंबईतल्या मध्यमवर्गीय कुटुंबात पुष्पा भावे यांचा जन्म झाला. माहेरच्या त्या पुष्पा सरकार. उत्कृष्ट लेखनाबरोबर त्या एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणून ही प्रसिद्ध होत्या. सामाजिक कार्याची त्यांना मुळातच आवड होती त्या मुळे पुष्पा भावे या एक प्रभावी वक्त्या राहिल्या होत्या. विद्यार्थिदशेपासून राष्ट्र सेवा दल आणि लोकशाहीवादी चळवळींशी पुष्पाताईंचा संपर्क होता. त्यांचे उच्चशिक्षण एलफिस्टन महाविद्यालयात झाले. मराठी व संस्कृत हे विषय घेऊन त्यांनी एम. ए. ची पदवी प्राप्त केली आणि त्यानंतर मुंबई येथे सिडनहॅम महाविद्यालयात त्या प्राध्यापक म्हणून रूजू झाल्या. त्यानंतर दयानंद कॉलेज, म. ल. डहाणूकर महाविद्यालय आणि चिनॉय महाविद्यालय येथे त्यांनी मराठीचे अध्यापन केले आणि रुईया कॉलेजमधून त्या निवृत्त झाल्या. रूढार्थाने मराठीच्या प्राध्यापक आणि विद्यार्थिप्रिय शिक्षक या नात्याने अध्यापन क्षेत्रात कार्यरत असताना केवळ हस्तिदंती मनोऱ्यात राहण्याऐवजी क्रियाशील स्वभावामुळे त्या सातत्याने समाजाशी जोडल्या गेल्या.
संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, गोवामुक्ती आंदोलन अशा सत्याग्रहांमध्ये भाग घेत त्यांनी ही नाळ यशस्वीपणे सांभाळली. म्हणूनच स्वातंत्र्योत्तर काळात महागाईविरोधी आंदोलनामध्ये अहिल्याताई रांगणेकर आणि मृणाल गोरे यांच्यासमवेत पुष्पा भावे यांनी लाटणे मोर्चात हिरिरीने सहभागी झाल्या होत्या. मुंबईतील गिरणी कामगार संघर्ष समितीच्या चळवळीला वैचारिक मार्गदर्शन करण्यापासून कामगारांना हक्काचे घर मिळावे यासाठी सरकारशी संघर्ष करण्यात पुष्पाताई अग्रभागी होत्या. स्त्रीवादी चळवळीची पाठराखण करणाऱ्या पुष्पा भावे यांनी दलित स्त्रियांच्या संघटनेमध्ये स्वतंत्र वैचारिक भूमिका घेत संघटन केले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये त्या आरंभापासून काम केले होते. डॉ. बाबा आढाव यांच्या असंघटित कामगार चळवळीत हमाल, रिक्षावाले, कागद-काच-पत्रा वेचणारे अशा कष्टकऱ्यांच्या आंदोलनांमध्ये त्या समर्थक राहिल्या होत्या. सामाजिक कृतज्ञता निधी या सामाजिक कार्यकर्त्यांना मानधन देणाऱ्या उपक्रमामध्ये पुष्पा भावे सतत अग्रभागी असत.
साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक निधी, अनुवाद सुविधा केंद्र, भारत-पाकिस्तान पीपल्स फोरम फॉर पीस अॅुण्ड डेमॉक्रसी, मृणाल गोरे साऊथ एशियन सेंटर, केशव गोरे स्मारक ट्रस्ट, मानवी हक्कांसाठी काम करणारी मेहेर संस्था अशा विविध संस्था-संघटनांमध्ये पुष्पाताई पदाधिकारी म्हणून काम केले होते. त्यांनी अनेक विषयांवर लेखन केले. त्यापैकी ‘अभिरूची:ग्रामीण आणि नागर’ (संपादक – गो. म. कुलकर्णी, ‘मराठी टीका’ (संपादक – वसंत दावतर), ‘महात्मा फुले गौरव ग्रंथ’ इ. ग्रंथांसाठी त्यांनी लिखाण केले आहे. या शिवाय विविध ज्ञानविस्तार लेख सूचीचे संकलनही त्यांच्या नावावर आहे.
‘गुड मुस्लीम, बॅड मुस्लीम’ या महमूद ममदानी यांच्या गाजलेल्या इंग्रजी पुस्तकाचाही पुष्पा भावे यांनी मराठी अनुवाद केला आहे. गेल्या अर्धशतकाहून अधिक काळ सामाजिक प्रश्न आणि चळवळी यांच्याशी केवळ जोडल्याच गेलेल्या नव्हे तर आधारस्तंभ राहिलेल्या पुष्पाताईंना समाजकार्याबद्दल महाराष्ट्र फाऊंडेशनतर्फे जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले होते. तसेच त्यांना मराठवाडय़ातील ध्येयवादी संपादक अनंतराव भालेराव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिल्या जाणाऱ्या पुरस्काराने गौरवण्यात होते.
पुष्पा भावे यांचे निधन ३ ऑक्टोबर २०२० रोजी निधन झाले.
-- संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
March 26, 2022
कार्यकाळ : २६ जानेवारी १९५० ते १२ मे १९६२
स्वतंत्र भारत देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद पेशाने वकील होते. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यादरम्यान काँग्रस पक्षात सामील झालेले राजेंद्र प्रसाद बिहार भागामधील प्रमुख नेते होते. महात्मा गांधींचे समर्थक असलेल्या डॉ. राजेंद्र प्रसाद यांना ब्रिटिश सरकारने १९३१ मधील मिठाचा सत्याग्रह व १९४२ मधील भारत छोडो आंदोलनादरम्यान तुरुंगात डांबले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २६ जानेवारी १९५० रोजी भारताने नवीन संविधानाचा स्वीकार केला व राजेंद्र प्रसादांची राष्ट्रपती म्हनून निवड केली गेली. डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी १२ वर्षे राष्ट्रपतिपदाचा कार्यबार सांभाळला.
डॉ. राजेंद्र प्रसाद यांचे वडील महादेव सहाय हे संस्कृत व फारशीचे अभ्यासक होते. पाच वर्षांचे असतानाच मौलानांकडून राजेंद्र प्रसाद यांनी फारशीचा अभ्यास सुरु केला. त्यानंतर त्यांना प्राथमिक शिक्षणासाठी छपरा येथे पाठविण्यात आले.
त्यांनी पाटणा येथील टी. के. घोष अकादमीत शिक्षण घेतले. डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी १८ व्या वर्षी कोलकाता विश्वविद्यालयाची प्रवेश परीक्षा दिली आणि त्यात ते प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्यांनी १९०२ मध्ये कोलकात्याच्या प्रेसिडेंसी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. १९१५ साली त्यांनी विधिज्ज्ञ म्हणजे विकिलीच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवले त्याबद्दल ते सुवर्णपदकाचे मानकरी ठरले. त्यानंतर त्यांनी विधीशास्त्रात डॉक्टरेटही मिळवली.
April 29, 2017
पेशावर मधील किस्सा खवानी बाजारात एका फळविक्रेत्या पठाण कुटुंबात जन्माला आलेल्या युसूफ खान यांनी कधीही हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनय करण्याचे स्वप्न पाहिले नव्हते. वडिलांनी व्यवसायाचे बस्तान बसविल्यानंतर इतर कुटुंबीयांसोबत मुंबईला आल्यावरही किशोरवयीन युसूफच्या तसे मनातही कधी आले नव्हते. उलट लवकरात लवकर स्वत:च्या पायावर उभे राहून बारा मुले, इतर नातेवाईक आणि पै-पाहुण्यांचे करता करता थकून गेलेल्या अम्मीचे कष्ट काही प्रमाणात कमी करता यावेत यासाठी लवकरात लवकर कमावता होणे याच एका उद्देशाने झपाटलेल्या युसूफने एकदा वडिलांशी उडालेला खटका मनाला लावून घेत तिरमिरीत घर सोडून थेट पुणे गाठले.
July 7, 2021
जन्म - १२ ऑगस्ट १८८०
१८८०> “दादासाहेब खापर्डे यांचे चरित्र” लिहिणारे दादासाहेबांचे पुत्र, बाळकृष्ण गणेश खापर्डे यांचा जन्म, “साहित्याची प्रेरणा, पद्धती आणि ध्येय” हे पुस्तकही त्यांनी लिहिले होते.
mss
August 2, 2017
युनिसेफ आणि इतर काही सामाजिक संस्थांसोबत काम करताना त्यांनी राज्यातील दुर्गम आणि आदिवासी भागातील अनेक शाळांना भेट दिली आहे.
July 26, 2022
संगीत रंगभूमीवर नायकाच्या भूमिका गाजवणाऱ्या मोजक्या अभिनेत्री मध्ये दीप्ती भोगले यांचे नाव वरती आहे. त्यांच्या कृष्ण, धेर्यधर या भूमिका खूपच गाजल्या होत्या. दीप्ती भोगले यांनी संगीत रंगभूमीवर स्त्री भूमिके पासून पुरुष भूमिके पर्यत आपले स्वतःचे वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण केले.
October 26, 2021
वीरसेन आनंदराव कदम ऊर्फ बाबा कदम हे मराठी लेखक होते.
March 1, 2011
Copyright © 2025 | Marathisrushti