(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

  • सिद्धहस्त लेखक अशोक शेवडे

    अन्य प्रसार माध्यमांमधून चित्रपट व कलाकारांविषयी सातत्याने लेखन करणाऱ्या अशोक शेवडे यांची पाच हजार मुलाखतींचा बादशहा अशी ख्याती होती. देशभरातील नामवंत साहित्यिक, तसेच चित्रपट दिग्दर्शक, लेखक, कवी यांसह शिक्षक यांच्यासह सांस्कृतिक क्षेत्रातील दिगगजांच्या मुलाखती शेवडे यांनी घेतल्या होत्या.

  • चंडिकादास अमृतराव देशमुख

    क्रांतिसिंह नाना पाटील हे मराठी सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांनी समाजास आत्मनिर्भर बनविण्यासाठी अथक प्रयत्न केले. भारतीय शासनाने त्यांना त्यांच्या कार्यासाठी पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवले.

  • मनोहर कुलकर्णी

    वेगवेगळे कार्यक्रम, भव्य स्टेज शो आदींच्या व्यवस्थापनासाठी हल्ली ‘इव्हेंट मॅनेजर’ कार्यरत असतो. पुण्याच्या ‘मनोरंजन’ संस्थेचे मनोहर कुलकर्णी हे याच प्रकारचे कार्य गेल्या पाच दशकांहून अधिक काळ करीत आहेत. आजच्या काळाचा निकष लावल्यास कुलकर्णी हे मोठे ‘इव्हेंट मॅनेजर’ ठरतात. त्यांच्या या कार्याची, त्यांनी निरलसपणे व तत्परपणे केलेल्या सेवेची दखल नाट्य परिषदेच्या पुणे शाखेने घेतली असून, त्यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला आहे.

  • ज्येष्ठ साहित्यिक डॉ. निर्मलकुमार फडकुले

    डॉ. निर्मलकुमार फडकुले हे मराठी संत साहित्यातले विद्वान होते. त्यांना भैरुरतन दमाणी साहित्य पुरस्कार मिळाला होता.

  • संत तुलसीदास

    गोस्वामी संत तुलसीदासाचे जन्मगाव उत्तर प्रदेशातील राजापुरा असावे असा अंदाज आहे. ‘रत्नावली‘ या सौंदर्यशालिनीशी त्यांचा विवाह झाला. तिच्यावरील प्रेमाने तो पागल झाला. तिचा विरह त्याला सहन झाला नाही. ते गंगानदी पोहून मृत सर्पाची दोरी करून तिच्या माहेरी तिला भेटला, ‘एवढं प्रेम ईश्वरावर केलेत तर.... ?‘ तिने त्यांना विचारले., तेव्हा त्यांना उपरती झाली. तो रामभक्तीत लीन झाला. भक्तीमार्गाचे उपासक असलेल्या तुलसीदासांना लहानपणी काशीच्या नरहरीदास स्वामींनी सांभाळलेले होते. वेद, उपनिषदे, पुराणे, अठरा शास्त्रे इत्यादी प्राचीन ग्रंथांचे ज्ञान त्यांना शिकविले होते. रत्नावलीच्या ईश्वर, राम शब्दाने केवढे परीवर्तन घडवून आणले याची तिलाही कल्पना आली नाही. हिंदु समाजात त्यांच्या काव्यग्रंथाने प्रचंड परीवर्तन घडवून आणले, ‘रामचरितमानस‘ हा श्रीरामाच्या आदर्शांचे सूक्ष्म दर्शन घडवितो. तत्कालिन बहूजन समाजाच्या लोकभाषेत हे काव्य लिहले आहे. इस्लामी लोक ‘कुराण‘ वाचतात, ख्रिश्चन लोक ‘बायबल‘ वाचतात, त्याच भक्तीभावानेने हिंदु लोक ‘रामचरितमानस‘ वाचतात. अकबराच्या उदारमतवादी दृष्टीकोन स्वीकारणारा राजा मानसिंग हा तुलसिदासाचा निस्सीम भक्त होता.

    तुलसीदासांच्या रामचरितमानसात तात्त्विक चिंतनासमवेतच हिंदी भाषेचा डौल आहे. शब्दालकार, अर्थालंकार, नवरसयुक्त मधुर शब्दांचे भांडार आहे. हिंदू धर्मातील पावित्र्य व धार्मिक निष्ठा मुस्लिम आक्रमणामुळे ढेपाळल्या होत्या. स्वच्छंदीपणा, स्वैराचार बोकाळळा होता. अज्ञानाचा सागर पसरला होता; परंतु तुलसीदासाने हे सामाजिक परिवर्तन घडवून आणले. जनसामान्यांच्या भाषेत सांस्कृतिक-मानस परिवर्तन केले. माणसाने ‘मर्यादापुरूषोत्तम राम‘ आदर्श मानला. रामभक्तीत सदाचरणाचे, श्रध्देचे धडे आहेत. हिंदी साहित्यसागरातील तुलसीचे ‘रामचरितमानस‘ हा कौस्तुभमणी आहे. जगभर भारतीय संस्कृतीच्या आध्यात्मिक ज्ञानासाठी या ग्रंथाचा अभ्यास केला जात आहे.

    युगप्रवर्तक हिंदी महाकवी . त्यांची जन्मतिथी, जन्मस्थान, जात, गुरु, मातापिता या सर्वाबद्दल मतभिन्नता आढळते. हाजीपूर, तारी, राजापूर, सोरो सूकर क्षेत्र अयोध्या इ. गावांची नावे गोस्वामी तुलसीदासांचे जन्मस्थान ठरविताना पुढे आली आहेत. पंडित रामदत्त भारद्वाज यांनी या सर्व संशोधनांचा अभ्यास करुन तुलसीदासांचा जन्म सारो या स्थानाजवळच रामपूर येथे झाला. असे निश्चित केले आहे. ते सवरिया, सारस्वत, सरयू पारीण, सनाढय आणि कान्यकुब्ज या ब्राम्हण जातींपैकी निश्चित कोणत्या जातीचे होते याबद्दल मतभेद आहेत. ते ब्राम्हण नसावेच, असेही एक मत पुढे आले आहे. जगन्नाथदास, रामदासजी, नहर्यानंद, नरहरिदास, नृसिंह अशी त्यांच्या गुरुची नावे दिली जातात. बहुसंख्य विद्वान त्यांचा विवाह झाला होता, असे मानतात.

    त्यांच्या जन्मतिथीसंबंधी सहा संवत तिथी सामान्यतः पुढे आल्या आहेत. त्या अशा संवत १५५४, १५६० , १५६८, १५८३, १५८९ आणि १६०० बहुसंख्य विद्वान भाद्रपद शुध्द एकादशी मंगळवार, संवत १५८९ म्हणजे इ.स. १५३२ ही तिथी मान्य करतात. मृत्यू मात्र संवत १६८० श्रावण वद्य तृतीया, शनिवार या तिथिला म्हणजे १६३२ मध्ये झाला, याविषयी सामान्यतः एकमत आहे.

  • अभिनेते टॉम अल्टर

    ज्येष्ठ चित्रपट, टीव्ही आणि नाट्य अभिनेते टॉम अल्टर यांचा जन्म २२ जून १९५० मसुरी येथे झाला. सोनेरी केस, निळे डोळे आणि टॉम अल्टर या नावामुळे चटकन अमेरिकन किंवा ब्रिटिश वाटणारा हा ज्येष्ठ अभिनेता-लेखक जन्माने आणि मनाने मात्र पक्का भारतीय होता.

  • वेणूताई यशवंतराव चव्हाण

    यशवंतराव हे दिल्लीत महाराष्ट्राचे वैभवस्थान होते, तर वेणूताई महाराष्ट्रीय संस्कृतीचे प्रतीक. त्यांच्या डोक्यावरचा पदर कधी घसरला नाही. मंत्र्याची पत्नी कशी असावी, तिचा पेहेराव व वागणूक कशी असावी, याच्या त्या आदर्श होत्या. वेणूताईंचे आदरातिथ्य पाहुण्यांना, नातेवाईकांना आश्चर्यचकित करीत असे. त्यांच्याकडे काम करणाऱ्यांची सुख-दु:खे त्या आपलीच समजत. महाराष्ट्रातील सर्व सण त्या उत्साहाने साजरे करीत. नरक चतुर्थीला बंगल्यातील सर्वाच्या घरी अगदी साडेसात-आठलाच फराळाचे ताट येत असे. वेणूताईंना मंगळसूत्राखेरीज इतर दागिन्यांची हौस नव्हती.

  • प्रवीण तरडे

    अनेक चित्रपटातून प्रवीण तरडे यांनी छोट्या पण उल्लेखनीय भूमिकाही केल्या. ‘चिनू’, ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘तुकाराम’, ‘मसाला’, ‘रेगे’, ‘कोकणस्थ’, ‘मुळशी पॅटर्न’ ह्या चित्रपटातील त्याच्या भूमिका प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिल्या.

  • कृष्ण गणेश फुलंब्रीकर (मास्टर कृष्णराव)

    आपलं सगळं आयुष्य नाटकाला वाहिलेला, सर्वार्थाने रंगभूमी कलाकार म्हणजे मास्टर कृष्णराव तथा कृष्ण गणेश फुलंब्रीकर. २० जानेवारी १८९८ ला यांचा जन्म झाला.

  • रामकृष्णबुवा वझे तथा वझेबुवा

    रामकृष्णबुवांना लहानपणापासून गायक होण्याचाच ध्यास होता. त्यांच्या आईनेही मुलाला गायकीचे शिक्षण देण्यासाठी काबाडकष्ट घेतले. त्यांचा जन्म २८ नोव्हेंबर १८७४ रोजी झाला. लहान वयातच बुवांचा संगीताकडील ओढा स्पष्ट झाल्यावर त्यांनी संस्थानातील राजगायकांकडे संगीत शिकण्यास सुरुवात केली. त्यांच्याकडे दोन वर्षे गाणे शिकल्यावर ते मालवण येथे पुढील संगीत शिक्षणासाठी गेले. घर सोडल्यानंतर रामकृष्णबुवा आधी पुण्याला गेले. तेथून संगीत शिक्षणासाठी मुंबई, इंदूर, उज्जैन, वाराणसी असा त्यांचा प्रवास चालू राहिला. ग्वाल्हेर येथे उस्ताद निसार हुसेन खाँ यांचे शिष्यत्व पत्करल्यानंतर त्यांच्या कारकीर्दीला खरे वळण मिळाले. त्यांनी काही काळ जयपूर येथे मनरंग परंपरेतील मुहम्मद अली खान यांच्याकडूनही शिक्षण घेतले. जयपूर येथे त्यांची गाठ पुन्हा निसार हुसेन खाँ यांच्याशी पडली. ह्या खेपेस खाँसाहेबांनी वझेबुवांना कसून तालीम दिली. वाराणसी येथे त्यांना स्वामी विवेकानंदांच्या सहवासात १५ दिवस राहण्याची संधी मिळाली. नेपाळमध्ये दरबारगायक म्हणून त्यांनी वर्षभर सेवा केली. गायक नट कै. केशवराव भोसले यांच्या आग्रहावरून बुवांनी ललितकलादर्श या कंपनीच्या नाटकांना चाली दिल्या.

    स्वातंत्रवीर सावरकर लिखित रणदुंदुभी आणि सन्यस्त खड्ग ह्या संगीत नाटकातली पदे वझे बुवांनी स्वरबद्ध केली होती. वधुपरीक्षा, संन्यासाचा संसार, शहा शिवाजी, श्री, रणदुंदुभी, नेकजात मराठा, सोन्याचा कळस अशा अनेक नाटकांतील त्यांनी संगीत दिलेली पदे लोकांच्या विशेष पसंतीस उतरली. त्यांनी देशभर भ्रमंती करून अनेक मैफली गाजविल्या. त्यांनी तयार केलेल्या गायकीचा 'वझेबुवांची गायकी' म्हणून खास गौरव झाला. दुर्मिळ संगीत रागांमधील दुर्मिळ चीजांचे त्यांनी संकलन केले होते, ते 'संगीत कला प्रकाश' या शीर्षकाखाली प्रकाशित झाले. गायनावर निस्सीम प्रेम केलेल्या या थोर गायकाने गाणे हे श्रोत्यांसाठी आहे असे सतत मानले. गोव्यात तसेच महाराष्ट्रात दीनानाथ मंगेशकर, केसरबाई केरकर, व्ही.ए. कागलकरबुवा, तानीबाई, केशवराव भोसले, भास्करराव जोशी, बापुराव पेंढारकर, भार्गवराम आचरेकर, हरिभाऊ घांग्रेकर, भालचंद पेंढारकर, गुरुराव देशपांडे, दिनकरपंत फाटक, गजाननबुवा जोशी, शिवरामबुवा वझे, लक्ष्मणराव वझे, मोहनबुवा कर्वे, विनायकराव पटवर्धन अशा पुढे नावारूपाला आलेल्या कलाकारांना रामकृष्णबुवांनी गायनाचे शिक्षण दिले. रामकृष्णबुवा वझे यांचे निधन ५ मे १९४५ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट