(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • वसंत देसाई

    नाटयसमीक्षक, नाटककार, चरित्रकार असलेले वसंत शांताराम देसाई यांनी नाटयक्षेत्रात बरेच कार्य केलेले आहे. वसंत देसाई यांचा जन्म २७ डिसेंबर १९०४ साली इंदूर येथे झाला. त्यांचे वडील हे होळकर कॉलेजमध्ये तत्वज्ञानाचे प्राध्यापक होते. १९२८ साली मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यानंतर वसंत देसाई यांनी मुंबईच्या विल्सन महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्याच काळात मराठी रंगभूमी आणि बालगंधर्व हे अवघ्या महाराष्ट्रात गाजत होते, नाटक आणि बालगंधर्व यांच्याबद्दल अतिशय ओढ वाटून नाटक कंपनीतील अनेक नटांशी आणि नाटककारांशी त्यांनी ओळख करुन घेतली. त्याच काळात एल. एल. बी. ची पदवीही त्यांनी मिळविली आणि पुण्यात वकिली सुरु केली. परंतु रंगभूमीचा त्यांनी ध्यास घेतला होता. १९२७ मध्ये वसंत देसाईंना बालगंधर्व यांनी नाटक लिहायला सांगितले. विधिलिखित‘ हे पहिले वसंतरावांनी लिहिले बालगंधर्वानी ते रंगभूमीवर आणले. त्यानंतर ‘अमृतसिध्दी‘ हे नाटक तर त्यांनी लिहिलेच परंतु त्यातील, पदेसुध्दा त्यांनीच लिहिली. ही पदे आणि नाटक दोन्हीला चांगलीच प्रसिध्दी मिळाली. गडकरींच्या प्रेमसन्यासासाठी सुध्दा त्यांनी पदे लिहिली होती. उपवनी गात कोकीळा, सखे मी मुरारी‘ ही हिराबाई बडोदेकरांनी गायलेली पदेसुध्दा वसंतरावांनीच लिहिली होती. वसंत देसाई यांनी नाटयविषयक, रंगभूमीविषयक बरेच लेखन केले आहे. ‘कुलीन स्त्रिया आणि रंगभूमी‘, कलेचे कटाक्ष, ‘मखमलीचा पडदा‘ नट, नाटक आणि नाटककार, इत्यादी पुस्तके तर विद्याहरणाचे अंतरंग , खाडिलकरांची नाटयसृष्टी इत्यादी नाटयसमीक्षा आणि कलावंतांच्या सहवासात , बालगंधर्व व्यक्ती आणि कला, रागरंग इत्यादी ग्रंथांतून त्याचे लेखन प्रकाशित झालेले आहे. विष्णूदास भावे, किर्लोस्कर, देवल, खाडिलकर, गडकरी, गणपतरव जोशी, कोल्हटकर, केशवराव भोसले. भास्करबुवा बखले, गणपतराव बोडस केशवराव दाते, दिनानाथ मंगेशकर, हिराबाई बडोदेकर, ज्योत्सना भोळे अशा अनेक कलावंतांवर त्यांनी लेखन केलेले आहे. अंशीच एकाची गोष्ट हे त्यांचे आत्मचरित्र चांगले गाजले. बडोदा येथे भरलेल्या अखिल भारतीय नाटयसंमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. अशा या श्रेष्ठ रंगधर्मीचे २३ जून १९९४ रोजी निधन झाले.

    वसंत देसाई यांच्यावरील मराठीसृष्टीवरील लेख.

    नाटककार, कादंबरीकार आणि चरित्रकार वसंत शांताराम देसाई (27-Dec-2018)

    नाटककार वसंत शांताराम देसाई (27-Dec-2021)

      March 11, 2015


  • केतकी देसाई

    देसाई, केतकी

    ‘मूळची पुण्याची’ ही केतकी देसाईची ओळख मराठीजनांना सुखावणारी जरूर आहे, पण केतकीने आपले विश्वनागरिकत्व सिद्ध केले आहे.. किंबहुना त्यामुळेच तिचे कौतुक. रवांडासारख्या मागास आफ्रिकी देशात ‘वन लॅपटॉप पर चाइल्ड’ (ओएलपीसी) सारख्या - विद्यार्थ्यांना परवडणारे लॅपटॉप उपलब्ध करून देणाऱ्या योजनेला मर्यादितच यश का मिळते आणि हे यश वाढवून, जगभरातील विद्यार्थ्यांना लॅपटॉपचा लाभ कसा मिळेल, याचा मार्ग दाखवण्याची जबाबदारी केतकीसह तिच्या तिघा सहपाठय़ांनी उत्तमपणे पार पाडली आहे आणि यावर ‘हल्ट ग्लोबल केस चॅलेंज’च्या पुरस्काराची मोहोरही उमटली आहे. केतकी ही कार्नेजी मेलन विद्यापीठातील ‘हाइन्झ कॉलेज’मध्ये सार्वजनिक धोरण-व्यवस्थापनाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम (मास्टर ऑफ पब्लिक मॅनेजमेंट) शिकते आहे. जग बदलण्याचा आटापिटा स्वत: करू नका.. बदलांमध्ये अनेकांचा वाटा असतो, त्यापैकी योग्य वाटेकऱ्यांची सांगड घालून देणे हे काम अधिक महत्त्वाचे माना’ हा संस्कार या अभ्यासक्रमामुळेच केतकीवर झाला आणि हे आपल्याला कितपत करता येईल या विचारातूनच आपण कॉलेजतर्फे या जागतिक महत्त्वाच्या स्पर्धेत सहभागी झालो, असे तिने म्हटले आहे.

    पथकामध्ये चौघेजण असल्याने मतभेदांना वाव भरपूर होता. पण निर्णय म्हणजे मतभेदांचे व्यवस्थापन, हे एकदा ओळखले की प्रश्न सुटतात, असा केतकीचा विश्वास आहे. केतकीचे नेतृत्वगुण यापूर्वीही सिद्ध झाले आहेत. अमेरिकेतून जगभर पोहोतच असलेल्या ‘टेड’ या विचारविनिमय चळवळीचे कार्नेजी मेलन विद्यापीठातील केंद्र केतकीच्या अध्यक्षतेखाली चालते. ‘नेटवर्क ऑफ इंडियन प्रोफेशनल्स ऑफ नॉर्थ अमेरिका’ या संस्थेच्या पीट्सबर्ग शाखेची ती सह-अध्यक्ष होती. वैद्यक आणि सॉफ्टवेअर क्षेत्रांची सांगड घालण्याचे आव्हान असलेले तीन प्रकल्प तिने यापूर्वी पूर्ण केले आहेत. यानंतर, जगभरातील मुलांचे शिक्षणाचे प्रश्न कोणते हे आधी समजून घेऊन मग ‘ओएलपीसी’सारख्या योजनांच्या यशापयशाचा मार्ग कसा आहे व कसा असायला हवा हे ठरवण्याच्या स्पर्धेत आपण उतरायचे आहे, हे केतकीने ओळखले आणि तिथे तिचे विश्वनागरिकत्व झळाळले!

      August 5, 2017


  • मयुरेश शिर्के

    मयुरेश शिर्के हे नाव माध्यम क्षेत्राशी विशेषत: “श्राव्याशी” जोडलं गेलं असून, रेडिओ, दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील व्हि.ओ. (व्हॉईस ओव्हर) तसंच डबिंग शी निगडीत आहे. मुंबई आकाशवाणी केंद्रावर मयुरेश शिर्के यांनी हंगामी निवेदक व आर.जे. (रेडिओ जॉकी) म्हणून काम केलेलं आहे.

      August 23, 2013


  • नारायण गजानन आठवले

    नारायण गजानन आठवले

    तडफदार, धाडसी पत्रकारांपैकी एक अशी नारायण आठवलेंची ओळख महाराष्ट्राला नवी नाही.

      June 24, 2013


  • नितीन ढेपे

    नितीन ढेपे यांना ह्या संकल्पनेचे पेटंट देखील १४ जानेवारी २०१६ रोजी भारत सरकारकडून मिळाले असून ही वास्तू सर्वा्थाने लोकांच्या पसंतीस उतरली आहे. भारतीय पारंपरिक खेळ, खाद्यपदार्थ, पेहराव तसेच विविध कला आणि संस्कृती जोपासण्याचे काम करणाऱ्या ‘ढेपे वाडा’ या वास्तूला भारत सरकारकडून २०१९ मध्ये बौद्धिक स्वामीत्व हक्क मिळाले आहेत.

      July 1, 2022


  • संजीव दयाळ

    पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी पाकिस्तान दौऱ्यावर असताना ठरलेल्या कार्यक्रमानुसार लाहोर किल्ल्याला भेट देणार होते. मात्र त्याचवेळी पंतप्रधानांच्या विशेष सुरक्षा गटातील एका अधिकाऱ्याने त्यास आक्षेप घेतला. रस्त्याची सुरक्षा तपासणी होत नाही तोपर्यंत पंतप्रधानांचा ताफा निघणार नाही, असे या अधिकाऱ्याने ठामपणे सांगितले. या पवित्र्यामुळे राजनैतिक अधिकाऱ्यांची चांगलीच पंचाईत झाली. त्यातही एका पोलीस अधिकाऱ्याने पंतप्रधानांचा ताफा रोखून धरल्याचे वास्तव त्यांना सहनच झाले नव्हते.

    परंतु आक्षेप डावलणेही शक्य नव्हते. त्या रस्त्यावर पोलीस पथक पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आणि लपून बसलेल्या स्थानिक दहशतवाद्यांनी या पथकावर हल्लाबोल केला. या घटनेनंतर मात्र ‘त्या’ पोलीस अधिकाऱ्याची चांगलीच वाहवा झाली. तो अधिकारी म्हणजे दुसरे-तिसरे कोणी नसून, ते आहेत मुंबईचे नवे पोलीस आयुक्त संजीव दयाळ!

    मितभाषी, प्रामाणिक, कर्तव्यदक्ष दयाळ प्रसारमाध्यमांपासून नेहमीच दूर राहिले. १९७७ च्या तुकडीतील दयाळ यांचा आयपीएस वर्तुळातही चांगलाच दबदबा आहे. व्यवस्थापनातील त्यांच्या वादातीत कौशल्यामुळे त्यांना सहकाऱ्यांनी ‘चाणक्य’ ही पदवी दिल्याचे बोलले जाते. ‘आपले काम बरे’ अशा भावनेतून ३३ वर्षांत ते ज्या ठिकाणी नियुक्तीत होते तेथे त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला. दिल्लीजवळच्या गुरगावात त्यांचे बालपण गेले.

    एमएस्सीपर्यंत शिक्षण घेतलेल्या दयाळ यांची, महाराष्ट्राचे केडर मिळाल्यानंतर पहिली नियुक्ती नाशिकचे अतिरिक्त अधीक्षक म्हणून झाली. त्यानंतर १९८२ मध्ये मुंबईत येण्याआधी नांदेड, अमरावती येथे ते अधीक्षक होते. ज्युलिओ रिबेरो हे तेव्हा मुंबईचे पोलीस आयुक्त होते. धारावीत वरदराजन मुदलियार ऊर्फ वरदाभाईची प्रचंड दहशत होती. यादवराव पवार यांनी उपायुक्त म्हणून वरदाभाईची चांगलीच कोंडी केली होती. रिबेरो यांनी पवार यांच्या जागी दयाळ यांना नेमले.

    दयाळ यांनी कसलाही गाजावाजा न करता वरदाभाईला सळो की पळो करून सोडलेच पण धारावीतले मटक्याचे, दारूचे अड्डे साफ उध्वस्त करून टाकले. त्यानंतर त्यांनी इंटेलिजन्स ब्युरोत उपसंचालक म्हणून जाणे पसंत केले. १९८८ ते ९२ पर्यंतचा काळ प्रतिनियुक्तीवर काढल्यानंतर १९९३ मध्ये पश्चिम प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त आयुक्त म्हणून शासनाने त्यांची नियुक्ती केली. त्यावेळी पश्चिम प्रादेशिक विभाग हा वांद्रे ते दहिसपर्यंत पसरलेला होता. त्यावेळीही त्यांनी मटक्याच्या व दारूच्या अड्डय़ांवर लक्ष केंद्रित केले होते. दोन वर्षांचा कालावधी अर्थातच कुठलीही प्रसिद्धी न मिळविता त्यांनी गाजविला. त्यानंतर इतर पोलीस अधिकाऱ्यांप्रमाणे मुंबईतच ठाण मांडून न राहता ते केंद्रात प्रतिनियुक्तीवर पंतप्रधानांच्या विशेष सुरक्षा गटात सामील झाले.

    तब्बल सात वर्षे ते एसपीजीत होते. तेथून त्यांची नियुक्ती मुंबई पोलीस दलाच्या प्रशासन विभागाचे सहआयुक्त म्हणून झाली. येथेही त्यांनी आपल्या वेगळ्या कार्यपद्धतीने ठसा उमटविला. पोलीस शिपायांच्या भरतीत मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार होत होता आणि तो रोखण्याची कोणाचीच तयारी नव्हती. राजकारणी मंडळी या भरतीत हस्तक्षेप करीत होते. दयाळ यांनी राजकारण्यांची मक्तेदारी संपविण्यासाठी भरतीची प्रक्रियाच बदलून टाकली. उमेदवारांच्या नावापेक्षा त्याला विशेष ओळख क्रमांक देण्याची पद्धत दयाळ यांनी रूढ केली ती आजतागायत. तेव्हापासून खरेतर दयाळ यांच्या मि. क्लीन प्रतिमेचा गवगवा झाला. मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती व्हावी यासाठी प्रयत्न करणाऱ्यांपैकी ते कधीच नव्हते.

    नियम आणि कायद्यावर बोट ठेवून प्रसंगी राजकारण्यांनाही सुनावणारे दयाळ सत्ताधारी पक्षाला तसे भारीच पडले असते. त्यामुळे दयाळ हे मुंबईचे पोलीस आयुक्त होतील, असे कुणीही ठामपणे सांगत नव्हते. तरीही आयत्यावेळी दयाळ यांचे नाव घोषित करून सत्ताधारी पक्षाने धक्का दिल्याची चर्चा सुरू आहे. आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांनी त्यांना राजकारण्यांच्या हस्तक्षेपाबद्दल छेडले असता ते शांतपणे उद्गारले की, ‘कायदा आणि घटनेत स्पष्ट तरतुदी आहेत. त्यापेक्षा मोठे कुणीही नाही. आपण नेहमी त्याचाच आदर करतो.’ केंद्रातील गृहमंत्रालयाने २६/११ संबंधातील राम प्रधान समितीने केलेला अहवाल विचारात घेऊन दयाळ यांची नियुक्ती सुचविली, हे उघड आहे. महाराष्ट्र सरकारचा २६/११च्या वेळचा कारभार आणि व्यवहार फारसा आश्वासक नव्हता हेच या नेमणुकीने अप्रत्यक्षपणे अधोरेखित केले आहे.

      August 5, 2017


  • (डॉ.) वासुदेव गाडे

    गाडे, (डॉ.) वासुदेव
    प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. वासुदेव गाडे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आल्याने शिक्षणक्षेत्रातील अनेकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला असेल. उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात गेल्या काही दशकांत पुणे विद्यापीठाने स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले होते. त्यासाठी आजवरच्या कुलगुरूंनी केलेले योगदान महत्त्वाचे ठरले आहे. डॉ. गाडे यांना आता ही संधी मिळते आहे. केवळ बायोटेक्नॉलॉजी या विषयातील तज्ज्ञ म्हणून त्यांना दीर्घ अनुभव असला, तरी विद्यापीठाच्या प्रशासनाचाही अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. विद्यापीठ आणि महाविद्यालय विकास मंडळाचे संचालक म्हणून सध्या ते कार्यरत होते. त्यामुळे महाविद्यालयांची अवस्था आणि दशा, विद्यापीठातील विविध विभागांचे प्रश्न आणि त्याबाबतची कार्यवाही याची त्यांना चांगली जाण आहे. नागपूरजवळील एका खेडय़ात प्राथमिक शिक्षणाची सुरुवात करताना डोक्यावर पुस्तके घेऊन नदी पार करण्याचे कष्ट त्यांनी उपसले होते. ज्ञानार्जनासाठी कराव्या लागणाऱ्या कष्टांची जाणीव असलेला हा माणूस शिक्षणासाठी दिल्लीत गेला, तेव्हा त्याचे आयुष्य सर्वार्थाने बदलले.

    तरीही पाय जमिनीवरच ठेवण्यात त्यांना यश मिळाले. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे विद्यार्थी असलेले डॉ. गाडे संयमशील व शांत स्वभावाचे म्हणून प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्र अकॅडमी ऑफ सायन्सेसचे फेलो, लुपिन पारितोषिकाचे मानकरी, केंद्रीय विज्ञान संस्थेतील मान्यताप्राप्त वैज्ञानिक म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळावर काम करत असतानाही बायोटेक्नॉलॉजीमधील नव्या आणि समाजाभिमुख संशोधनाकडे ते आवर्जून लक्ष देतात. विज्ञानातील मूलभूत संशोधनाच्या परंपरेत त्यांनी आजवरकेलेले संशोधन मान्य झाले असले, तरी ते सुरू ठेवणे त्यांच्यासाठी अधिक महत्त्वाचे असते. परीक्षा आयोजित करणारी यंत्रणा असे जे विद्यापीठांचे स्वरूप झाले आहे, त्याला छेद देऊन नवे अधिक दमदार वातावरण निर्माण करण्यासाठी डॉ. गाडे यांचा अनुभव उपयोगी पडू शकतो. सर्वाना बरोबर घेऊन विद्यापीठाला उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात अधिक भरीव कामगिरी करण्यास ते उद्युक्त करतील अशा विश्वासानेच त्यांचे अभिनंदन करायला हवे.
    ---------------------------------------------------------------------------------------------------

    डॉ. वासुदेव गाडे

    डॉ. वासुदेव गाडे यांच्या रूपाने पुणे विद्यापीठाला अखेर कुलगुरू मिळाला. अभ्यासाची आणि संशोधनाची वृत्ती जोपासणाऱ्या कुलगुरूंची मोठी परंपरा या विद्यापीठाला आहे. डॉ. गाडे यांच्या नियुक्तीने ही परंपरा कायम राहिली आहे. ते उत्तम शिक्षक आणि संशोधकही आहेत. विद्यापीठाच्या प्रशासनाचाही त्यांना अनुभव आहे. पुणे विद्यापीठाच्याच 'महाविद्यालय आणि विद्यापीठ विकास मंडळा'चे (बीसीयूडी) संचालकपद त्यांनी यशस्वीपणे सांभाळले आहे. विद्या-पीठाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या व विद्यापीठाला थेट विद्यार्थ्यांशी जोडणाऱ्या या विभागात काम केल्याने त्यांना विद्यापीठाचा विस्तार आणि आवाका यांची कल्पना आहे. विद्यार्थ्यांसाठी विशेष संशोधन शिष्यवृत्ती लागू करण्या-पासून अनेक महत्त्वाचे निर्णय त्यांनी या पदावर असताना घेतले. 'लाइफ सायन्स' विषयात डॉक्टरेट असलेल्या डॉ. गाडे यांनी नागपूर विद्यापीठातून जीवशास्त्रातून बी.एस्सी. केल्यावर पदव्यु-त्तर शिक्षणासह पुढील संशोधन त्यांनी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात केले. एम.एस्सी., एम.फिल. व पीएच.डी. त्यांनी तेथेच संपादन केली. 'पोस्ट डॉक्टरल फेलो' म्हणून फ्रान्स आणि स्वीडनमध्ये दोन वषेर् संशोधनाचा अनुभव त्यांच्या नावावर जमा आहे. दिल्ली येथील केंदाच्या 'सीएसआयआर'च्या 'इन्स्टिट्यूट ऑफ जिनॉमिक्स अँड इंटिगेटिव्ह बायोलॉजी' प्रयोगशाळेत २० वषेर् शास्त्रज्ञ म्हणून सेवा बजावल्यावर २००३मध्ये पुणे विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान विभागात ते रुजू झाले. प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळतानाच डॉ. गाडे यांनी आपल्या संशोधन-कार्यात खंड पडू दिला नाही. बायो-नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये केलेल्या सर्जनशील संशोधनाबद्दल त्यांच्या नावावर काही पेटंट जमा आहेत. 'सेंटर फॉर मटेरिअल्स फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी' (सी-मेट) संस्थेतील शास्त्रज्ञांच्या सहकार्याने केलेल्या संशोधनात एका नवीन नॅनॉ मटेरिअलचा शोध लावण्यात त्यांना यश मिळाले. कुलगुरूंच्या शैक्षणिक-व्यावसायिक अनुभवाचा परिणाम विद्यापीठाच्या ध्येय-धोरणांवर होणे स्वाभाविक असते. डॉ. गाडे यांचे कार्यक्षेत्र हे मूलभूत विज्ञानाचे असल्याने, मूलभूत विज्ञानातील उपेक्षित विषयांना नवसंजीवनी देण्यासाठी आता ते विशेष प्रयत्न करणार आहेत. गेल्या काही वर्षांत पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंनी इतरत्र मिळालेल्या संधींमुळे कार्यकाल पूर्ण केलेला नाही. आपण कोठेही न जाता हा कार्यकाल पूर्ण करू, असे डॉ. गाडे यांनी स्पष्ट केले आहे. नवी दिशा देण्याचा प्रयत्न करीत विद्यापीठाचा गाडा यशस्वीपणे हाकावा, यासाठी त्यांना शुभेच्छा.
    ------------------------------------------------------------------------------------------------------
    गाडे, (डॉ.) वासुदेव

    'लाइफ सायन्स' विषयात डॉक्टरेट असलेल्या डॉ. वासुदेव गाडे यांनी नागपूर विद्यापीठातून जीवशास्त्रातून बी.एस्सी. केल्यावर पदव्युत्तर शिक्षणासह पुढील संशोधन त्यांनी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात केले. एम.एस्सी., एम.फिल. व पीएच.डी. ही पदवी त्यांनी तेथेच संपादन केली. 'पोस्ट डॉक्टरल फेलो' म्हणून फ्रान्स आणि स्वीडनमध्ये दोन वर्षे संशोधनाचा अनुभव त्यांच्या नावावर जमा आहे.

    दिल्ली येथील केंदाच्या 'सीएसआयआर'च्या 'इन्स्टिट्यूट ऑफ जिनॉमिक्स अँड इंटिगेटिव्ह बायोलॉजी' प्रयोगशाळेत २० वर्षे शास्त्रज्ञ म्हणून सेवा बजावल्यावर २००३ मध्ये पुणे विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान विभागात ते रुजू झाले. प्रशासकीय जबाबदार्‍या सांभाळतानाच डॉ. गाडे यांनी आपल्या संशोधन-कार्यात खंड पडू दिला नाही. बायो-नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये केलेल्या सर्जनशील संशोधनाबद्दल त्यांच्या नावावर काही पेटंट जमा आहेत. 'सेंटर फॉर मटेरिअल्स फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी' (सी-मेट) संस्थेतील शास्त्रज्ञांच्या सहकार्याने केलेल्या संशोधनात एका नवीन नॅनो मटेरिअलचा शोध लावण्यात त्यांना यश मिळाले.

    डॉ. वासुदेव गाडे हे उत्तम शिक्षक आणि संशोधकही आहेत. विद्यापीठाच्या प्रशासनाचाही त्यांना अनुभव आहे. पुणे विद्यापीठाच्याच 'महाविद्यालय आणि विद्यापीठ विकास मंडळा'चे (बीसीयूडी) संचालकपद त्यांनी यशस्वीपणे सांभाळले आहे. विद्यापीठाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या व विद्यापीठाला थेट विद्यार्थ्यांशी जोडणार्‍या या विभागात काम केल्याने त्यांना विद्यापीठाचा विस्तार आणि आवाका यांची कल्पना आहे. विद्यार्थ्यांसाठी विशेष संशोधन शिष्यवृत्ती लागू करण्यापासून अनेक महत्त्वाचे निर्णय त्यांनी या पदावर असतानाच घेतले.

    पुणे विद्यापीठाचे कुलगुरुपद त्यांच्याकडे चालून आले. कुलगुरूंच्या शैक्षणिक-व्यावसायिक अनुभवाचा परिणाम विद्यापीठाच्या ध्येय-धोरणांवर होणे स्वाभाविक असते. डॉ. गाडे यांचे कार्यक्षेत्र हे मूलभूत विज्ञानाचे असल्याने, मूलभूत विज्ञानातील उपेक्षित विषयांना नवसंजीवनी देण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.

    (संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)

      August 5, 2017


  • गजानन नीळकंठ गुप्ते

    पनवेल मधील स्वातंत्र्यलढ्यामध्ये भाग घेतलेले श्री. गजानन नीळकंठ गुप्ते हे त्या वेळच्या प्रसिद्ध व नावाजलेल्या कै. नीळकंठ गुप्ते यांचे चिरंजीव.

      June 1, 2010


  • कृष्णा दामोदर अभ्यंकर

    अभ्यंकर कृष्णा दामोदर आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त खगोलभौतिकीतज्ञ, हैद्राबाद येथील उस्मानिया विद्यापीठामध्ये खगोलशास्त्र विभागप्रमुख.

      December 15, 2010


  • कमलाकर सारंग

    विजय तेंडुलकर लिखित ‘सखाराम बाइंडर हे नाटक प्रचंड वादग्रस्त व वादळी ठरले. या नाटकाविरुद्ध दिग्दर्शक कमलाकर सारंग यांना लढा द्यावा लागला. नाटकाविरुद्ध खटला भरला गेला. हे नाटक म्हणजे ‘विवाह संस्था’ संकटात सापडण्याचे भय आहे, असा आक्षेप घेण्यात आला होता. सहा महिने लढल्यावर नाटक एकही कट न करता हायकोर्टातून सुटलं आणि पुन्हा दिमाखानं प्रयोग सुरू झाले.

      June 12, 2022