‘कौन बनेगा करोडपती’ अर्थात `केबीसी’चा पहिला विजेता कोण होता हे आज फार क्वचित लोकांना माहित असेल. १९ वर्षांपूर्वी केबीसीमध्ये भाग घेतलेले मराठमोळे हर्षवर्धन नवाथे हे त्यावेळी विद्यार्थी होते. या शोमध्ये करोडपती बनल्यानंतर रातोरात ते स्टार झाले.
ख्यातनाम साहित्यिक डॉ. विद्याधर गंगाधर पुंडलिक यांचा जन्म १३ डिसेंबर १९२४ रोजी झाला.
टेकडीवरचे पीस, देवचाफा, माळ, फॅन्टॅसिया हे कथासंग्रह, चार्वाक, माता द्रौपदी, कुणीकडून कुणीकडे ही नाटके तसेच आवडलेली माणसे (व्यक्तिचित्रे) आणि शाश्वताचे रंग (समिक्षात्मक) ही त्यांची साहित्यसंपदा.
१९८९ मध्ये त्यांचे निधन झाले.
## Dr Vidyadhar Gangadhar Pundlik
पछाडलेला या चित्रपटा मध्ये “समीर” ची भूमिका अभिराम ने साकारलेली आहे.
डॉ. दीक्षित हे लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रोगप्रतिबंधक आणि सामाजिक शास्त्र विभागाचे विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.
भास्कर काशीनाथ चांदूरकर हे “काव्यशेखर” या टोपण नावाने कविता लिहित असत.
प्रा. सुभाष भेंडे यांनी आपल्या अमेरिकावारीनंतर ’गड्या आपुला गाव बरा’ या शीर्षकाचा एक लेख लिहिला होता. तो महाराष्ट्रातील बारावीच्या पाठ्यपुस्तकासाठी निवडला गेला.
विजयाराजे शिंदे आधी कॉंग्रेसमध्ये होत्या, पण इंदिरा गांधी यांनी राजघराणे नष्ट करण्यासाठी पाऊले उचलल्याने त्या नाराज झाल्या. १९६७ मध्ये कॉंग्रेसचा त्याग करून त्यांनी त्या वेळच्या जनसंघात प्रवेश केला. भारतीय जनता पक्षाच्या संस्थापकांपैकी त्या एक होत्या. मध्य प्रदेशच्या राजकारणात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
त्यागराज यांची आई श्रीमती मंजुश्री खाडीलकर या ख्यातनाम किर्तनकार, त्यांनी ’किर्तन मंदाकिनी’ ही पदवी मिळविली. त्यांचा जन्म ११ जून १९६७ रोजी झाला. त्यांची आजी श्रीमती इंदिराबाई खाडिलकर ह्या गंधर्व गायकीसाठी प्रसिद्ध. स्वातंत्र सैनिक, पत्रकार, नाटककार श्री. मा.कृष्णाजी प्रभाकर उर्फ काकासाहेब खाडिलकर हे त्यांचे पणजोबा.
बालपणी त्यांनी विख्यात गायक, नट कै. डॉ वसंतराव देशपांडे यांच्याबरोबर ’कट्यार काळजात घुसली’ या संगीत नाटकामध्ये काम केले. त्याचबरोबर मा. शरद तळवलकर यांच्याबरोबर बालकलाकार म्हणुन ’सखी शेजारणी’ या विनोदी नाटकामध्ये काम केले. तसेच अष्टपैलु व्यक्तिमहत्त्व असलेल्या मा. पु. ल. देशपांडे यांच्या ’वार्यावरची वरात’ या चंद्रलेखाचे मोहन वाघ द्वारा निर्मीत नाटकातही काम केले. त्याचबरोबर त्यांनी ’निवडुन’ या दैनंदिन मालिकेतही अभिनय केला.
त्यांनी सगीताचे आणि नाट्य गीताचे शिक्षण आपल्या आजी श्रीमती इंदिराबाई खाडिलकर आणि किराणा घराण्याचे गायक पंडित गंगाधरबुआ पिंपळखरे यांच्या कडून घेतले.त्यांना ’गानहिरा’ हा सन्मान अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेद्वारा आयोजित अंतर महाविद्यालयीन शास्त्रीय गायनाच्या स्पर्धेमध्ये मिळाला.
’बिच्छू बाइट’(विंचु चावला) हा युनिवर्सल द्वारा निर्मित त्यांनी आवाज दिलेला अल्बम खूप गाजला.
त्यांनी दत्ता डावजेकर, अनिल मोहिले, श्रीधर फडके, राम-लक्षम, अशोक पत्की,अवधुत गुप्ते या सारख्या सर्व विख्यात संगीतकारांबरोबर काम केले आहे. त्यांनी जवळ-जवळ ३५ मराठी चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले आहे. त्यांनी सुपरस्टार भरत जाधव यांना ’चालु नवरा भोळी बायको’ व मकरंद अनासपुरे यांना ’काय द्याच बोला’ या चित्रपटांसाठी आवाज दिला. त्यांनी संगीतकार आनंद मोडक यांच्या मार्गदर्शनाखाली ’दिशा’ व संगीतकार बप्पी लहरी यांच्या मार्गदर्शनाखाली सदाबहार हिरो देव आनंद दिग्दर्शित ’मि. प्राय मिनिस्टर’ या हिन्दी चित्रपटांसाठीही पाश्वगायन केले.त्यांनी ६० पेक्षा ही जास्त मालिकांची शिर्षक गीते गायिली आहेत.
#TyagrajKhadilkar
मराठी रंगभूमीवर १९६०-७०च्या दशकात नवमन्वंतर घडवणाऱ्या ‘रंगायन’ नाटय़ चळवळीचेही हे दोघे महत्त्वाचे आधारस्तंभ होते. विजयाबाईंनी मराठी रंगभूमीवर आपले स्वतंत्र ‘स्कूल’ निर्माण केले.
समीक्षक, कथालेखक आणि चोखंदळ अनुवादक श्रीधर देविदास इनामदार यांचा जन्म ३ सप्टेंबर १९४२ रोजी झाला. “अरण्यरुदन” व “रंगसावल्या” हे त्यांचे कथासंग्रह, तर “काचेचा पिंजरा”, “दिगंतराचे पक्षी” हे त्यांनी केलेले अनुवाद प्रकाशित झाले आहेत. “प्रक्तनाचे संदर्भ” हा त्यांच्या समीक्षापर लेखांचा संग्रह प्रसिद्ध आहे.
## Shridhar Devidas Inamdar
Copyright © 2025 | Marathisrushti