आपल्या पहाडी आवाजाने महाराष्ट्राला दणाणून सोडणारे गोवा मुक्तीसंग्राम व संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील सेनानी शाहीर यशवंत चकोर.
१९४२ च्या स्वातंत्र्य-लढ्यात जयप्रकाश नारायण यांच्या सभेची सुरुवात करण्याची संधी शाहीर चकोर यांना मिळाली होती. १९४७ मध्ये क्रांतिवीर नाना पाटील यांच्या सभेत त्यांनी स्वातंत्र्यगीते गायली. पुढे शाहीर अमर शेख, अण्णाभाऊ साठे अशा ज्येष्ठ शाहिरांसोबत त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत भाग घेतला.
त्यावेळी मुंबई प्रांत सरकारविरोधात प्रचार केल्यामुळे त्यांना रेल्वेची नोकरी गमावावी लागली. आचार्य अत्रे यांना हे कळल्यानंतर त्यांनी 'दैनिक मराठा' नाशिक जिल्ह्याची एजन्सी त्यांना दिली. पुढे चकोर १० वर्षे मनमाड नगरपालिकेत नगरसेवक होते. लोककलेतून जनजागृती करणार्या या कलाकारावर आचार्य अत्रे प्रचंड खुश होते. सभेपूर्वी ते 'जय देव जय देव जय मंगलमूर्ती' हे गीत शाहीर चकोर यांना म्हणायला सांगत.
स्वातंत्र्यापासून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत कार्यरत राहणार्या आणि अनेक वर्षे पुरोगामी पक्षाबरोबर जनजागृतीचे काम करणार्या या शाहिराच्या वाट्याला अखेरपर्यंत उपेक्षाच आली. निळू फुले, राम नगरकर यांच्यासोबतीने पुण्यात कलापथकात काम करणारे शाहीर केवळ आईच्या आग्रहास्तव पुन्हा मनमाडला आले. त्यानंतर त्यांनी मनमाड सोडले नाही.
पुण्याच्या बालगंधर्व नाट्यगृहाच्या उदघाटनाप्रसंगी पहिले गाणे शाहीर चकोरांनी सादर केले. त्या गाण्याला चाल व संगीत पु. ल. देशपांडे यांनी दिले. अशा कितीतरी आठवणींवर शाहीर शेवटपर्यंत चिरतरुण होते. त्यामुळेच उपेक्षित जगण्याची त्यांनी कधीही खंत व्यक्त केली नाही.
गोवामुक्ती संग्राम स्वातंत्र्यसैनिकाचा दर्जा मिळावा, यासाठी त्यांनी केलेले सर्व प्रयत्न अयशस्वी झाल्याने त्यांचा अखेरच्या टप्प्यातील प्रवास खडतर झाला होता. जागा मराठा, आम जमाना बदलेगा, उठा है जो तुफान, वह आखिर बंबई लेके दम लेगा अशी महाराष्ट्र गीते, पोवाडे आणि शौर्यगीते गाऊन एकेकाळी महाराष्ट्राला वेड लावणारे शाहीर चकोर अखेरच्या क्षणी स्वातंत्र्यसैनिकाचा दर्जा मिळविण्यासाठी दारोदार भटकत होते. उदरनिर्वाहासाठी अल्पबचत एजंट म्हणून घरोघरी पैसे गोळा करण्याचे काम करणार्या शाहिरांनी अखेरपर्यंत काम केले.
त्यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले. अखेरपर्यंत चकोर हे शाहीर म्हणून मिळणारे तुटपुंजे मानधन व पतसंस्थेचे कमिशन यावर गुजराण करत होते.
(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)
अद्वैत दादरकर हा मुंबईमधील रहिवासी असून मराठी प्रायोगिक रंगभुमीच्या प्रसारासाठी व प्रचारासाठी त्याने लिहीलेली अनेक दर्जेदार नाटके व बसविलेले एकपात्री अभिनयाचे खेळ आज महाराष्ट्राच्या संवेदनशील प्रेक्षकाच्या मनाला चांगलेच भिडले आहेत.
प्रेमभावने बरोबरच स्वातंत्र्य आणि समता या मूल्यांचे प्रतिबिंब ज्यांच्या कवितेत दिसते त्या पद्मावती विष्णू गोळे या प्रसिद्ध कवयित्री होत्या. १० जुलै १९१३ मध्ये त्यांचा पटवर्धन घराण्यात जन्म झाला. एम. ए. पर्यन्त शिक्षण झाल्यावर त्या पुण्यालाच वास्तव्यास होत्या. ‘प्रीति प्रथावर’ हा १९४७ मध्ये त्यांचा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला.
कुठल्याही प्रकारांतलं गाणं असो, शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, भक्तिसंगीत, भावगीत, गजल, कव्वाली किंवा एखादं पाश्चिमात्य गाणे प्रत्येक प्रकार संपूर्ण ताकदीने, तो ऊर्जेने परिपूर्ण असतो.
पंडिती काव्याचे एक श्रेष्ठ प्रतिनिधी, गंभीर, बोधपर आणि प्रौढ कविता करणारे कवी म्हणून चंद्रशेखर प्रसिद्ध होते.
एखाद्या मोठ्या साम्राज्याची स्नुषा होणं आणि त्या स्थानाचा अधिकार पेलणं ही गोष्ट सोपी नाही. त्यात महाराणी ताराबाई या साक्षात शिवछत्रपतींच्या स्नुषा. तेव्हा ही जबाबदारी पेलणं म्हणजे तलवारीच्या धारेवर चालण्यासारखं.
गोष्ट छोटी डोंगराएवढी’, ‘गुलमोहर’, ‘मानिनी’, आणि ‘अडगुळे मडगुळे’ या चित्रपटांत तिने काम केले आहे.
वाघ, यतीन
गोदावरीला महापूर आल्यानंतर जिवाची पर्वा न करता पाण्यात उतरून नागरिकांना मदत करण्याची हिंमत दाखविण्यासाठी वाघाचे काळीज असावे लागते.. असा प्रसंग २००८ सालच्या पुरात खरोखरच आला होता आणि यतीन वाघ ही परीक्षा उत्तीर्ण झाले होते. नाशिक नगरीचे मनसेचे पहिलेच महापौर म्हणून जबाबदारी आलेले अॅड. यतीन वाघ यांनी यांसारख्या अनेक प्रसंगातून आपल्यातील या समाजसेवी गुणांचे दर्शन घडविले आहे.
समाजकारण आणि राजकारण यांची गुंफण जर व्यवस्थितरीत्या घातली तर जनता अशा कुटुंबावर कसे प्रेम करते, याचे उदाहरण म्हणून मनसेचे नाशिक येथील महापौर अॅड. यतीन वाघ यांच्या कुटुंबाकडे पाहावे लागेल. राज्यातील मनसेचे प्रथम महापौर हा मान अॅड. यतीन यांनी मिळविण्याआधी या कुटुंबाकडे आलेल्या पदांचा विचार केला तर त्यांच्या लोकप्रियतेचे रहस्य कळू शकेल. त्यांचे आजोबा यादवराव वाघ तत्कालीन नाशिक नगरपालिकेचे नगराध्यक्ष, वडील अॅड. रघुनाथ वाघ उपनगराध्यक्ष, आत्या सुमनताई बागले नाशिकच्या पहिल्या उपमहापौर, अशी अनेक पदे या कुटुंबाकडे मिळालेली आहेत. संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत बाजी मारल्यानंतर आता अॅड. यतीन यांना महापालिकेचा गाडा हाकताना कुटुंबाच्या या वारशाचा नक्कीच फायदा होऊ शकेल. वयाची पंचेचाळिशी गाठलेले यतीन यांच्या कुटुंबात आई गंगाबाई यांचा अपवाद वगळता वडील, पत्नी, भाऊ, दोन्ही बहिणी, इतकेच काय वहिनी असे सर्वच कायद्याचे पदवीधर. गंगापूर हे वाघ यांचे मूळ गाव. पेठे विद्यालयातून माध्यमिक, भि. य. क्ष. महाविद्यालयातून उच्च माध्यमिक आणि न. ब. ठाकूर विधी महाविद्यालयातून बी.एस.एल., एलएल.बी. पूर्ण करणाऱ्या अॅड. वाघ यांना महापालिकेच्या मागील पंचवार्षिक निवडणुकीत मतदारांचा कौल मिळाला. मागील पंचवार्षिकात महापालिकेच्या खर्चातून नगरसेवकांना मोबाइल देण्याच्या ठरावाला कडाडून विरोध करणारा नगरसेवक अशी त्यांची ओळख झाली. पक्षकार्यात त्यांनी आपल्या वकिली कौशल्याचाही परिचय वेळोवेळी दिला आहे. मितभाषी असलेल्या अॅड. यतीन यांच्यातील हे सर्व गुणच त्यांना महापौरपदापर्यंत घेऊन गेले.
निवृत्त संशोधक-भाभा अणु संशोधन केंद्र, निवृत्त संचालक, विज्ञान लेखक
बबनराव नावडीकर हे बालगंधर्वांचे भक्त असल्याने त्यांनी बालगंधर्वांची गायकी तरुण पिढीपुढे नेण्यासाठी अतोनात परिश्रम केले.
Copyright © 2025 | Marathisrushti