निवृत्त प्रमुख, रेडिओ केमिस्ट्री विभाग, भाभा अणुसंशोधन केंद्र
December 15, 2010
शिवांगी, पद्मिनी आणि तेजस्विनी या पंढरीनाथ कोल्हापुरे यांच्या तीन मुली. त्यांपैकी पद्मिनी कोल्हापुरे आणि तेजस्विनी कोल्हापुरे यांनी अनेक हिंदी चित्रपटांतून भूमिका केल्या आहेत. शिवांगी कोल्हापुरे या गायिका असून हिंदी चित्रपट अभिनेते शक्ती कपूर हे त्यांचे पती. पंढरीनाथ कोल्हापुरे हे अभिनेत्री श्रद्धा कपूरचे आजोबा.
July 4, 2022
वैद्यक व्यवसायात न्यूरोसर्जन म्हणून ठाण्याचं नाव उभं करणारे न्यूरोसर्जन डॉ. विनायक दत्तात्रय जोशी हे ठाण्याचं भूषण! निव्वळ व्यावसायिक दृष्टीकोनातून आपल्या व्यवसायाकडे न पाहता समाजभावनेचे, सामाजिक भान ठेवून त्यांनी अनामत रक्कम न घेता पूर्ण, योग्य व आवश्यक ते आचार करायचे असे ध्येय ठेवून २००४ साली डॉ. जोशी यांनी “डिव्हाईन” हॉस्पिटलची स्थापना केली.
May 23, 2014
लता मंगेशकर
December 15, 2010
डॉ. श्रीकांत राजे हे ठाणे येथील सुप्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट – क्ष-किरण तज्ज्ञ (Radiologist) आहेत.
September 12, 2011
शिवसेना पक्षाच्या स्थापनेपासून अखेर पर्यंत एकनिष्ठ असलेले आणि बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय तसंच शिवसेनेचा मुस्लिम चेहरा अशी ओळखले असणारे नेते म्हणजे साबीर शेख ! साबीर शेख यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथे १५ मार्च १९४५ रोजी झाला होता. साबीर शेख यांचे शालेय शिक्षण नारायणगावातील शाळेत झाले. त्यानंतर ते अंबरनाथ येथील “ऑर्डनन्स फॅक्टरीत” नोकरी करू लागले, आणि तेथेच कामगार नेते म्हणून नावारूपाला आले. अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून येणारे साबीर शेख हे युती सरकारच्या काळात ते कामगार खात्याचे कॅबिनेट मंत्री होते. समाजातील प्रत्येक व्यक्तीला समावून घेतल्यामुळे त्यांचा जनसंपर्क ही दांडगा होता. ठाणे जिल्ह्यातील कामगारांच्या अडचणी सोडविण्यात त्यांचा मोठा वाटा होता. कल्याणच्या उपशहरप्रमुखापासून ते ठाणे जिल्हाप्रमुखापर्यंत विविध पदे त्यांनी भूषवली. ज्ञानेश्वरीचे भाष्यकार, शिवचरित्राचे अभ्यासक, कीर्तन-प्रवचनासोबतच हिंदू धर्म, संत वाङ्मय, साहित्य आणि दुर्गप्रेमी म्हणून ते प्रसिद्ध होते.
साबीर शेख आमदार असताना देखील कल्याणजवळच्या कोन गावातील एका चाळीत राहात होते यावरुन त्यांचा साधेपणाची जाणीव होते. शिवचरित्र मुखोद्गत असलेल्या साबीरभाईंनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, गो. नी. दांडेकर यांच्याबरोबर महाराष्ट्रातील अनेक गड-किल्ले पालथे घातले. बाळासाहेब ठाकरेंनी साबीरभाईंना “शिवभक्त” ही पदवी दिली होती.
साबीर शेख यांच्या अअयुष्यातील अखेरच्या काही महिन्यांपूर्वी प्रसारमाध्यमांनी साबीर शेख कसे विपन्नावस्थेत जीवन जगताहेत, याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर त्यांना अनेकांनी मदत केली होती. मात्र पुन्हा त्यांची दयनीय अवस्था झाल्यानं त्यांना कोन गावच्या घरातून “कल्पतरू युवाविकास मंच”ने पुढाकार घेऊन औरंगाबादच्या “मातोश्री वृद्धाश्रमा”त नेण्यात आलं होतं. १५ ऑक्टोबर २०१४ या दिवशी त्यांचे निधन झाले.
(लेखन व संशोधन - सागर मालाडकर)
January 3, 2015
वयाच्या ऎंशी वर्षापर्यंत तब्बल साठ चित्रपट दिग्दर्शन करणारे अनंत माने हे एकमेव दिग्दर्शक आहेत. दिग्दर्शक अनंत माने यांनीच निर्मित केलेल्या “सांगत्ये ऐका, या चित्रपटाने भारतीय आणि जागतिक चित्रपटसृष्टीतही इतिहास घडवला होता, नवीन विक्रम प्रस्थापित केले होते.
June 6, 2017
निबंधकार व अर्थशास्त्रविषयक नियतकालिकांचे संपादक अशी ओळख असलेल्या श्रीपाद वामन काळे यांचा जन्म ५ मार्च १९१० रोजी झाला. पुढे पाऊल, “तुमचे स्थान कोणते”, “कौटुंबिक हितगुज”, “दाणे आणि खडे”, “नवी घडी नवे जीवन”, “नव्या जीवनाची छानदार घडी”, यांसारख्या अनेक पुस्तकांचे लेखन श्रीपाद काळे यांनी अत्यंत स्वयंस्फुर्तीने केले. समाजाचे सूक्ष्म निरीक्षण, व्यापकरितीने विचार करणे, ओघवती भाषा आणि नाजूक मार्मिक विनोदांची पखरण त्यांच्या लिखाणात दिसून येते.
January 9, 2015
मुनगंटीवार, सुधीर
सुधीर मुनगंटीवार यांची भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी झालेली निवड म्हणजे भाजपच्या महाराष्ट्रातील महाजन-मुंडे यांच्या एकछत्री वर्चस्वाची अखेर, असाच स्पष्ट संकेत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी दिला आहे. नितीन गडकरी यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली त्याच दिवशी सुधीर मुनगंटीवार यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्याचे संकेत भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून स्पष्टपणे मिळालेले होते. त्यामुळे प्रसार माध्यमात जेव्हा प्रदेशाध्यक्षपदी ‘मुनगंटीवार की, देवेंद्र फडणवीस की, विनोद तावडे’, अशा बातम्या प्रकाशित होत होत्या तेव्हा या जाणत्यांची चांगलीच करमणूक होत होती.
आता सुधीर मुनगंटीवार आणि पुढील विधानसभा, तसेच लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होईल तेव्हा विनोद तावडे प्रदेशाध्यक्ष होतील, हे या जाणकारांना चांगले ठाऊक होते. स्वतंत्र विदर्भाच्या मागणीचे नुसतेच हाकारे काही रिकामटेकडे राजकारणी पिटत असताना महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी सुधीर मुनगंटीवार यांची निवड, हा काही केवळ राजकीय योगायोग नव्हता. या हाकाटीपासून मुनगंटीवार यांनी स्वत:ला कटाक्षाने दूर ठेवले आणि जेव्हा स्वतंत्र विदर्भाच्या संदर्भात मतप्रदर्शन करण्याची वेळ आली तेव्हा आक्रस्ताळेपणा दाखवला नाही की वचावचा वक्तव्येही केली नाहीत. हे जे राजकीय भान आणि सामंजस्य सुधीर मुनगंटीवार यांनी गेली साडेतीन-चार महिने सातत्याने दाखवले त्यामुळेच पुन्हा एखादा वैदर्भीयच प्रदेशाध्यक्षपदी आरूढ होण्याचा मार्गही आणखी सुकर झाला. केवळ याच एका कारणावरून देवेंद्र फडणवीस यांचे नाव मागे पडले आणि सुधीर मुनगंटीवार नावाच्या धडपडय़ा, कष्टाळू आणि वयाच्या पन्नाशीच्या उंबरठय़ावर असलेल्या, विलक्षण राजकीय आकलन असणाऱ्या अशा या नितीन गडकरींच्या विश्वासू कार्यकर्त्यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडली. व्यवस्थापनशास्त्रासह तीन पदव्या तसेच, तीन पदव्युत्तर पदव्या, अशी झळझळीत शैक्षणिक पाश्र्वभूमी असलेल्या आणि महाराष्ट्राच्या एका टोकावर असलेल्या चंद्रपूरसारख्या आदिवासी भागातला प्रसंगावधानी आणि राजकीय महत्त्वाकांक्षा असणारा कार्यकर्ता म्हणून सुधीर मुनगंटीवार यांची संपूर्ण विदर्भाला आणि बहुतांश महाराष्ट्राला ओळख आहे. विद्याथीदशेपासूनच चळवळीत असणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनी १९८१ मध्ये सक्रिय राजकारणात प्रवेश करून स्थानिक नेत्यांनी दिले ते काम अतिशय नेटाने सांभाळले. या निष्ठेने काम करण्याचे फळ म्हणून त्यांना १९८९ आणि ९१ अशा दोन लोकसभा निवडणुकींत उमेदवारीही मिळाली. काँग्रेसच्या ज्या शांताराम पोटदुखेंसारख्या तुल्यबळ उमेदवारांसमोर या दोन्ही निवडणुकींत मुनगंटीवार यांना पराभव स्वीकारावा लागला तेच शांताराम पोटदुखे आज सुधीर मुनगंटीवार यांच्या राजकीय कर्तृत्वाचे कौतुक मुक्तकंठाने करतात. हे जसे पोटदुखे यांचे मोठेपण आहे, तसेच राजकारणापुरते राजकारण आणि विकासाबाबत व्यापक दृष्टिकोन, वयाने आणि अनुभवाने ज्येष्ठांबद्दल आदर, या मुनगंटीवार यांच्या कामाच्या त्रिसूत्रीचे हे यश आहे. या गुणांसोबत व्यापक जनसंपर्क, त्याला प्रभावी वक्तृत्वाची जोड आणि विकासाची तळमळ, असे अनेक पदरही लाभलेले आहेत. मतदारसंघातली कामे करत असताना केवळ आर्थिकदृष्टय़ा बडय़ा किंवा मध्यमवर्गीय मतदारांवरच मुनगंटीवार यांनी लक्ष केंद्रित केले नाही. धडधाकटांसोबतच अंध, अपंग, दीनदुबळय़ांना सुधीर मुनगंटीवार हक्काचा आधार वाटतात. त्यामुळेच मुनगंटीवारांचे वाहन चंद्रपुरातून जात असले की, ‘सुधीरभाऊ’ अशी हाक गल्लीच्या कोणत्याही कोपऱ्यातून हक्काने येते आणि मुनगंटीवार रस्त्यात थांबून त्या माणसाला दिलासा देतात, असे मतदारांशी मुनगंटीवारांचे प्रामाणिक नाते आहे. १९९५ पासून सलग चार विधानसभा निवडणुकींत सुधीर मुनगंटीवार विजयी झाले. मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांशी जोडली गेलेली नाळ किती अतूट आहे, याचे उत्तम उदाहरण म्हणजे मुनगंटीवार यांचे हे सलग चार विजय आहेत. प्रदेशाध्यक्षपद म्हणजे आजवरच्या स्वच्छ आणि निष्ठापूर्वक केलेल्या कामाचे मुनगंटीवार यांना मिळालेले फळ आहे.
August 5, 2017
कॅनडातील मॅकगील विद्यापीठातून गणितात पीएचडी आणि त्यानंतर कॅनडातल्याच कॅलगरी विद्यापीठात गणिताचे अध्यापन करताना प्रा. जगन्नाथ वाणी यांनी आपले समाजसेवेचे सूत्र कधी सोडले नाही. कॅनडातून भारतातील उपक्रमांना भरघोस अर्थसाह्य मिळवून दिले व स्वत: ही संगीत, चित्रपटनिर्मिती अशा अनेक प्रांतात वेगळा ठसाही उमटविला. विविध क्षेत्रांतील त्यांच्या कार्याचा गौरव कॅनडा सरकारने सर्वोच्च सन्मान देऊन केला.
सूत्र जनसेवेचे
July 14, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti