(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • अजित वाडेकर

    कसोटी क्रिकेट संपले की क्रिकेटपटू काय करतात? कुणी आपल्या कार्यालयाचे काम इमानेइतबारे करायला लागतो. किमान पूर्वीच्या काळातील क्रिकेटपटू तरी हे करायचे. काही क्रिकेटपटू क्रिकेट प्रशिक्षकाच्या पेशाकडे वळतात. काहींनी समालोचकाचा माईक हातात धरला. काहींनी क्रिकेट अ‍ॅकॅडमीज् सुरू केल्या. काहींनी क्रिकेट प्रशासन व्यवस्थेकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. अजित वाडेकरांनी काय केलं?

    अजित वाडेकरांनी सर्वप्रथम आपल्या कार्यालयाला न्याय दिला. फावल्या वेळात त्यांनी अपंग क्रिकेटपटूंसाठी संघटन कार्य करायला सुरुवात केली. १९८८ मध्ये अपंग क्रिकेटपटूंची संघटना स्थापन झाली. तेव्हापासून आजतागायत या क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आहेत. आज या संघटनेने २३ राज्यांच्या संघटनांना आपल्या कृपाछत्राखाली घेतले आहे. रणजी करंडक, दुलीप करंडक, इराणी करंडक क्रिकेट स्पर्धाच्या धर्तीवर ही संघटना अपंगांसाठी क्रिकेट स्पर्धाचे आयोजन करते. ३ वर्षांपूर्वी या संघटनेने इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय क्रिकेट मालिकेचे आयोजन केले होते.

    भारताने ही मालिका जिंकली होती. अपंगांसाठीच्या मिनी वर्ल्ड कप स्पर्धेच्या आयोजनाचा विचार ही संघटना करीत आहे.अपंग क्रिकेटपटूंच्या या भरारीला पंख देण्याचे काम अजित वाडेकरांनी केले. त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. आयपीएलसारख्या लिगवर करोडो रुपये उधळणाऱ्या भारतीय क्रिकेट संघटनेला मात्र अद्याप अपंगांना मदतीचा हात द्यावासा वाटत नाही हे क्रिकेटचे दुर्दैव. सुदैवाने अपंग क्रिकेटपटंना अजित वाडेकरांसारखा मसिहा भेटला. ज्याने आपल्या प्रसिद्धीच्या वलयाचा अपंगांच्या क्रिकेटसाठी वापर केला. आपल्या नोकरीतील पदाचा लाभ अपंगांच्या क्रिकेटसाठी केला.

    वाडेकरांच्या या कार्याची दखल सातासमुद्रापलिकडच्या अमेरिकन क्रिकेट संघटनेने घेतली. त्यांना ‘हॉल ऑफ फेम’मध्ये त्यांनी स्थान दिले. सर गारफिल्ड सोबर्स, विवियन रिचर्डस, मायकेल होल्डिंग, सुनील गावसकर यांच्यासारख्या महान क्रिकेटपटूंच्या ‘हॉल ऑफ फेम’मध्ये त्यांनी अजित वाडेकरांना बसविले. १९७१ ला वेस्ट इंडिजला कॅरिबियन द्विपसमूहात मालिकेत पराभूत करता येते हे स्वप्न वाडेकरांनी प्रत्यक्षात उतरविले होते. ब्रिटिशांना त्यांच्याच भूमीवर मालिकेत लोळविण्याचा पराक्रम वाडेकरांच्या भारतीय संघाने केला होता.

    १९७१ नंतर भारतीय क्रिकेट संघाकडे पाहण्याचा जगाचा दृष्टीकोन वाडेकरांनी बदलायला लावला. अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला, वाडेकरांनी प्रशिक्षक बनून तब्बल साडेतीन वर्षे विजयी संघ बनविले. वाडेकरांच्या यशाचा तो परिसस्पर्श सुदैवाने अपंग क्रिकेटपटूंनाही लाभला. वाडेकरांच्या या अतुलनीय कार्याची दखल घेऊन त्यांना यंदाचा मदर टेरेसा ‘लाईफ टाईम अचिव्हमेंट अ‍ॅवार्ड’ हा पुरस्कार देण्यात आला.

    सातासमुद्रापलिकडच्या लोकांना वाडेकरांमध्ये दिसले ते आपल्या इथल्या लोकांना दिसले नाही हे मोठे दुर्दैव आहे. मोदी यांची प्रकरणे आणि भ्रष्टाचाराच्या अन्य गोष्टींनी कलंकित झालेल्या भारतीय क्रिकेटला गरज आहे ती जुन्या, बुजूर्ग क्रिकेटपटूंना मानसन्मान देण्याची. विनू मांकड, विजय हजारे, र्मचट, अमरनाथ, यांच्यासारख्या क्रिकेटपटूंच्या स्मृती जतन करून ठेवण्याची; त्यांची स्मारके उभी करण्याची. अजित वाडेकरांच्या कार्याचा, क्रीडाकौशल्याचा गुणगौरव अमेरिकेत होऊ शकतो, मात्र त्यांच्या कर्मभूमीत मुंबईत का नाही? मुंबईच्या क्रिकेटने देशाला महान क्रिकेटपटू दिले. त्या महान क्रिकेटपटूंची ओळख भावी पिढीला कायमस्वरुपी राहावी याकरिता मुंबई क्रिकेट असोसिएशनने ‘हॉल ऑफ फेम’च्या धर्तीवर काहीतरी उभे करण्याचीगरज आहे.

    पदाधिकाऱ्यांच्या फोटोच्या गर्दीत हरविलेल्या क्रिकेटपटूंना पुढे आणण्याची गरज आहे. अजित वाडेकरांना मुंबई क्रिकेट संघटना विसरली. पण क्रिकेटची फारशी ओळख नसलेल्या ठिकाणी त्यांच्या नावाची पूजा बांधली जाते. हा विजय कुणाचा? अजित वाडेकरांच्या कर्तृत्वाचा तो निश्चितच गौरव आहे. त्यांना पुरस्कार देणाऱ्या संस्थेच्या विशाल दृष्टीकोनाचा तो एक पुरावा आहे. भारतीय क्रिकेट बोर्ड आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन यासारख्या संघटनांमधील दूरदर्शीपणाच्या अभावाचे ते एक द्योतक आहे.

    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

      August 5, 2017


  • अशोक मनोहर समेळ

    लहानपणापासून कलेची आवड असणार्‍या अशोक समेळ यांनी घरच्या गरीबीवर जिद्दीने मात करुन अपार मेहनतीने आतापर्यंतचा पल्ला गाठला आहे. विविध क्षेत्रात काम करणार्‍या समेळांची कामगिरीही तितकीच विविधांगी आहे.

      May 23, 2014


  • भाऊराव दातार

    भाऊराव दातार आपल्या अभिनेता करीयर नंतर मेकअप आर्टीस्ट म्हणून काम केले. नंतर ते दादा दातार नावाने ओळखले. त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये मेकअप मास्टर म्हणून सेवा केली.

      July 12, 2022


  • दया पवार

    दया पवार यांनी लिहिलेलं बलुतं नावाच आत्मचरित्र, हा आजही अजरामर मराठी साहित्य कलाकृतींच्या दालनामधील एक मैलाचा दगड मानला जातो.

      December 15, 2010


  • चंद्रशेखर परांजपे

    श्री. चंद्रशेखर पी. परांजपे हे ठाणे येथील ठाणे भारत सहकारी बॅंकेचे संचालक आहेत.

      March 5, 2015


  • वसंत पळशीकर

    कार्यकर्ता आणि ज्येष्ठ विचारवंत यांचा अपवादात्मक असा संगम वसंत पळशीकर यांच्या व्यक्तिमत्त्वात झाला आहे.

    त्यांचा जन्म हैदराबादमधला. महात्मा गांधींच्या चळवळीतील वडिलांच्या संस्कारात ते वाढले. इंटरनंतर शिक्षण सोडून ते सामाजिक कार्याकडे वळले. गांधींजींच्या विचारांचा चिकित्सक स्वीकार त्यांनी केला. आचार्य विनोबा भावे, अण्णासाहेब सहसबुद्धे, साने गुरुजी, रावसाहेब आणि अच्युतराव पटवर्धन, बाबा आमटे यांच्या कार्यात वेळोवेळी सहभागी होत त्यांनी स्वत:ला अधिक समृद्ध केले. भूदान आंदोलन, आनंदवन, ओरिसातील कोरापूर येथे सर्वसेवासंघाच्या कामात त्यांचा सक्रिय वाटा होता.

    सन १९५९ मध्ये ते महाराष्ट्रात परतले आणि प्रबोधनाच्या कामाला त्यांनी वाहून घेतले. मात्र हे काम ते प्राध्यापकीय अलिप्तपणे नव्हे, तर व्रत म्हणून पार पाडत आले आहेत. समाज प्रबोधन पत्रिका, नवभारत यांच्यासारख्या वैचारिक नियतकालिकांचे संपादन त्यांनी दीर्घकाळ केले, तसेच कार्यकर्त्यांची शिबिरे, वैचारिक परिषदा-संमेलने यांतही तेवढ्याच कळकळीने मार्गदर्शन केले. देशभरातील परिवर्तनवादी गट, प्रयोगशील संस्था यांना त्यांच्या मांडणीचा लाभ होत आला आहे.

    संथ, अनाक्रमक शैली, पण ठाम युक्तिवाद हे त्यांचे वैशिष्ट्य. एकांगीपणा, साचेबद्ध गृहितांवर आधारित भोवतालच्या घटितांचा अर्थ लावण्याची खटपट, सखोल चिकित्सेपेक्षा दुसर्‍याला निरुत्तर करण्यातील आनंद यापासून त्यांचे लेखन आणि संवाद कायम दूर राहिला. त्यामुळेच त्यांची मांडणी अंतिमत: पटो वा न पटो, त्यातून विचाराला चालना देणारी, आपल्या समजांचा पुनर्विचार करण्यास भाग पाडणारी निरीक्षणे मिळत नाहीत असे कधी होत नाही. राजकारण, समाजकारण, शिक्षण, साहित्य-कला, विज्ञान, संस्कृती, स्त्री-पुरुष संबंध, चिरंजीवी विकास यासारख्या क्षेत्रांत त्यांनी मूलगामी लेखन केले आहे. समग्रतेचे भान हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य. विचारांशी सुसंगत अशीच त्यांची जीवनशैलीही आहे. त्यामुळे त्यांच्या विचारांना सच्चेपणा लाभला आहे.

    समाजाच्या धारणेच्या, उन्नयनाच्या दृष्टीने किती मोलाचा विचार दिला, ही एखाद्याला 'विचारवंत' संबोधायचे की नाही याची एक कसोटी आहे, असे त्यांनी लिहून ठेवले आहे. या कसोटीला खुद्द पळशीकर उतरतात, असाच निवाडा त्यांचे वाचक करतील. गेली काही वर्षे प्रकृतिअस्वास्थ्यामुळे त्यांच्या लेखनात खंड पडला असला, तरी चिंतनात नाही.

    महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाने मराठी भाषा दिनी वसंत पळशीकर यांचा 'जीवन गौरव' पुरस्काराने केलेला सन्मान हा विचारी मराठीजनांसाठी कृतज्ञता सोहळाच होता.

    (संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)


      August 9, 2017


  • लीला भोसले

    भोसले, लीला

    लढवय्या साम्यवादी चळवळीतील आपल्या साथीदाराचा संसार नेटाने चालवताना डाव्या चळवळीमध्येही योगदान देणाऱ्या त्या तिघीजणी. एकाच पक्षाशी म्हणजे लाल निशाण पक्षाशी बांधिलकी असलेल्या या तीन रणरागिण्यांचे अवघ्या काही दिवसांच्या अंतराने निधन झाले आणि एक पर्व संपले.
    लीला भोसले म्हणजे पूर्वाश्रमीच्या लीला चव्हाण. लाल निशाण पक्षाचे नेते यशवंत चव्हाण यांच्या त्या भगिनी. रुबाबदार व्यक्तिमत्त्वाच्या लीलाताईंचा वावर सुरू झाला की आपोआपच स्वयंशिस्तीची आणि स्वावलंबीपाणाची झुळूक फिरायला लागायची.

    भावाच्या आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या राजकीय मार्गदर्शनामध्येच त्या चळवळीमध्ये आल्या. त्यासाठी त्यांनी दहावीनंतर शाळा सोडून दिली. शाळा-महाविद्यालयांमध्ये जाऊन पिकेटिंग करणे, प्रभातफेऱ्या काढणे यामध्ये त्यांचा सहभाग होता. त्यांना कधी तुरुंगवास झाला नसला तरी तुरुंगामधील राजबंद्यांना बाहेरचे निरोप पोहोचवण्याचे काम त्या करीत असत. कोल्हापूर हे संस्थान असल्याने चळवळीतील स्त्रियांच्या भागीदारीवर थोडय़ा मर्यादा होत्या. तरीही सुशीला कुलकर्णी, विमल चव्हाण, सुमन कात्रे, लीला फडके (पाटील), सरल राशिंगकर (नाईक), प्रभा राशिंगकर, शशिकला सबनीस यांच्यासमवेत लीलाताई विविध राजकीय कामे करण्यात पुढे असत. स्त्री शिक्षण, जातिभेदविरोधी कार्यामध्ये त्यांचा सहभाग होता. लीलाताईंचे वडील (व्ही. जी. चव्हाण) कोल्हापूर उच्च न्यायालयामध्ये निस्पृह न्यायाधीश म्हणून ओळखले जात. त्यांनी कधी आपल्या मुलांना चळवळीमध्ये जाण्यापासून रोखले नाही. लीलाताईंच्या राजकीय कार्यामध्ये त्यांच्या सासर आणि माहेरचा मोठा वाटा होता. लीलाताईंचे सासरे कै. डी. बी. भोसले हे साखर कारखान्याचे इस्टेट मॅनेजर असल्याने त्यांचा कामगार चळवळीशी संबंध होता. चळवळीत वॉरंट असलेल्या कार्यकर्त्यांला आपल्या घरात आश्रय देणे हे जोखमीचे काम लीलाताईंनी आपले आईवडील, सासूसासरे, मोठी बहीण शकुंतला, तिचे पती एस. जी. पाटील यांच्या मदतीने केले. १९४७ मध्ये कॉ. आप्पासाहेबांबरोबर विवाह झाल्यावर त्या पुण्याला आल्या. पुणे महानगरपालिका युनियनच्या कामकाजात सहभागी झाल्या. लाल निशाण पक्षाच्या ‘लाल निशाण’ या पाक्षिकाच्या व्यवस्थापन आणि प्रकाशनाची जबाबदारी त्या सांभाळत होत्या. माणसाचे गुण हेरून त्याला पोषक असे वातावरण तयार करणे हा त्यांचा गुण होता. १९८० मध्ये त्यांनी मोलकरणींची संघटना स्थापन केली. त्यासाठी त्यांनी पुण्यातल्या सगळ्या झोपडपट्टय़ा पालथ्या घातल्या आणि त्यांचे प्रश्न समजावून घेतले. संघटित आणि सामुदायिक नेत्तृत्व तयार करणे यावर त्यांचा अधिक भर होता. वार्धक्य आणि आयुष्यभर चळवळीत खालेल्या खस्ता यामुळे शरीर थकले तरी मन थकले नव्हते. कष्टकऱ्यांच्या प्रश्नांना त्यांनी जीवन वाहिले होते.

      August 5, 2017


  • बापूसाहेब जोशी

    जोशी, बापूसाहेब

    ‘प्रसाद’ प्रकाशनाचे संस्थापक, साहित्यिक य. गो. जोशी ऊर्फ भाऊ यांच्या अखेरच्या काळातील ही गोष्ट. भाऊंनी त्यांच्या चिरंजीवाला सांगितले, ‘बघ, या व्यवसायात पडणार असशील, तर मी बरीच प्रकाशने करून ठेवली आहेत. ती विकत राहिलास तरी तुझा चरितार्थ चालेल.’ त्यावर चिरंजीव म्हणाले, ‘काय भाऊ, य. गो. जोशींच्या मुलाला तुम्ही स्टॉक विकायला सांगताय. मी तुमच्याही पुढे जाईन.’ भाऊंचे चिरंजीव म्हणजे मनोहर ऊर्फ बापूसाहेब जोशी.

    ऐन विशी-बाविशीतच बापूसाहेब वडिलोपार्जित प्रकाशन व्यवसायात उतरले, प्रसाद मासिकाचे संपादक झाले आणि व्यवयासात यश मिळवत, कर्तृत्वाचा ठसा उमटवत त्यांनी वडिलांना दिलेला शब्द खरा करून दाखवला. बापूसाहेब म्हणजे सदाप्रसन्नता, उत्साह आणि उमदेपणा. बापूसाहेबांचे गेल्या शुक्रवारी पुण्यात निधन झाले. सदाशिव पेठेतील प्रसाद प्रकाशनाच्या कार्यालयात आता बापूसाहेबांचा दरबार पुन्हा कधीच भरणार नाही, ही कल्पनाही खूप वेदना दायक आहे. मराठी ग्रंथांसाठी ठेव म्हणून रक्कम ठेवा, ठेवीच्या व्याजातून ग्रंथ मिळवा आणि मुदतीनंतर ठेव परत न्या, अशी अभिनव योजना बापूसाहेबांनीच १९८० मध्ये प्रथम आणली आणि पुढे अशा सहा योजना त्यांनी यशस्वी करून दाखवल्या. या योजनांमधील ९९ ग्रंथांपैकी ८४ ग्रंथ आजवर प्रसिद्ध झाले आहेत आणि उर्वरित प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. ‘आपले वेद, आपली उपनिषदे, आपली पुराणे,’ ‘सुबोध शांकर ग्रंथावली,’ ‘देवभाषेचे देणे: मराठीचे लेणे’ या ग्रंथ ठेव योजना मोठय़ा प्रतिसादाने पूर्ण झाल्या आणि ‘समर्थ वाग्वैजयंती,’ ‘अभिनव प्रसन्न दर्शन’ ‘पंचमहाकाव्ये’ या योजनातील ग्रंथ प्रसिद्धीचे काम सुरू आहे. भारतीय संस्कृतीची सर्वार्थाने नव्याने ओळख करून देणारे बापूसाहेबांचे हे ग्रंथप्रकल्प यशस्वी झाले ते त्यांच्या परिश्रमांमुळे, बिनचूक नियोजनामुळे, अफाट लोकसंग्रहामुळे आणि पारदर्शी व्यवहारांमुळे. गेली ५० वर्षे ‘प्रसाद’ मासिक प्रसिद्ध करताना त्यांनी दरवर्षी एक दैवत विशेषांक प्रसिद्ध करण्याची योजना सलग २८ वर्षे चालवली. त्यानंतर नद्यांवरील विशेषांक प्रसिद्ध केले. प्रत्येक दिवाळी अंकात ते एक विस्तृत संतचरित्र प्रसिद्ध करीत असत. त्यांचे हे सारे विशेषांक आजही संदर्भग्रंथासारखेच वापरले जातात. प्रकाशनाचा व्याप सांभाळतानाच प्रसिद्ध श्री देवदेवेश्वर संस्थानचे विश्वस्त म्हणूनही बापूसाहेबांनी अतिशय उत्साहाने सुमारे २५ वर्षे काम पाहिले. बापूसाहेबांवर मराठी वाचकांनी मोठा विश्वास दाखवला. ‘आमची ठेवीची रक्कम परत नको. आमचे पैसे तुमच्या चांगल्या कामासाठीच वापरा,’ असे सांगून अनेक ठेवीदार मुदत संपल्यानंतर त्यांची ठेव बापूसाहेबांनाच परत देत असत. असे प्रेम करणारे वाचक बापूसाहेबांना लाभले आणि तीच त्यांची प्रकाशन व्यवसायातील ‘मोठी ठेव’ ठरली. बापूसाहेबांच्या बरोबरीने त्यांची कन्या उमा बोडस याही गेली दोन दशके प्रकाशनाचे काम पाहत आहेत. बापूसाहेबांनी हाती घेतलेल्या अनेक योजना पुढे नेण्याची जबाबदारी आता या पुढच्या पिढीकडे आली आहे.

      August 5, 2017


  • विनया गुप्ते

    लग्नाच्या आधी आईने प्रेमाने निव्वळ छंद म्हणून शिकवलेल्या कला व कौशल्ये, लग्नानंतर एक कौटुंबिक गरज म्हणून अर्थार्जनासाठी कशा उपयोगी पडू शकतात याचे आदर्श उदाहरण म्हणजे विनया गुप्ते यांचा व्यवसाय आहे. १९९१ साली कल्याण मध्ये घरगुती स्वरुपात सुरू झालेला ब्युटी पार्लरच्या व्यवसायाचा विस्तार आजमितीस अतिप्रशस्त “शगुन इन्स्टिटयूट ऑफ ब्यूटी कल्चर आणि फॅशन डिझायनिंग”मध्ये रुपांतर करण्याची किमया उद्योजिका विनया गुप्ते यांनी केली आहे. स्वतःच घर प्रचंड आत्मविश्वासाने व जिद्दीने उभे करत असतानाच हजारो निराधार महिलांना रोजगार व स्वयंसिध्दतेच्या मार्गांनी आपापल्या आयुष्यांना रेखीव आकार देण्यास शिकविणार्‍या विनया गुप्ते आज महिला सक्षमीकरणाच्या कॉर्पोरेट चेहरा बनल्या आहेत. त्यांच्या या व्यवसायाचं विस्तारीकरण करताना त्यांनी महिला सक्षमीकरणाचं नवं पर्व कल्याणमध्ये उभं केलं आहे.

    शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाच्या अंतर्गत येणार्‍या सुवर्ण जयंती शहरी योजनांसाठी कल्याण, मिरा-भाईंदर, बदलापूर, अंबरनाथ, माथेरान, खोपोली या भागांतील नगरपालिका व पालिकांमध्ये महिलांसाठी प्रशिक्षण शिबीरे व चर्चासत्रे आयोजित करुन ब्युटी पार्लर, शिवणकाम, ज्वेलरी मेकिंग, डॉल मेकिंग, स्नॅक्स, चॉकलेट मेकिंग, बॅग मेकिंग, एम्ब्रॉडरी, स्टाफ टॉईज मेकिंग अशा अनेक लहान-मोठ्या उद्योगांसाठी महिलांना प्रशिक्षण त्यांनी आजतागायत दिले आहे.

    दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित

      January 3, 2015


  • डॉ. प्रकाश राजाराम सांगुर्डेकर

    भाभा अणू विज्ञान संस्थेत वैज्ञानिक अधिकारी म्हणून कार्यरत असणारे व निवृत्ती नंतरही स्वत:ला वैज्ञानिक क्षेत्रात झोकून देऊन ठाणे शहराचे नाव वैज्ञानिक क्षेत्रात उज्वल करणारे डॉ. प्रकाश रा

      May 23, 2014