रघुनाथ वामन दिघे यांच्या पुष्कळशा कादंबऱ्या ग्रामीण पार्श्वभूमीचे चित्रण करणाऱ्या आहेत. त्यांच्या लिखाणातील नायक हा बहुधा वारकरी आणि शेतकरी असायचा.
भारतीय रसायनशास्त्रज्ञ. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात रसायनशास्त्राचे अध्यापन केले. नंतर ते त्या महाविद्यालयाचे प्राचार्य झाले. विज्ञान प्रसारासाठी मराठीतून भाषणे दिली, मराठी वृत्तपत्रे आणि मासिकातून लेख लिहिले.
सृष्टीज्ञान या विज्ञान मासिकाच्या संपादक मंडळावर काम केले. आकाशवाणीवरून भाषणे दिली.
जन्म १८९९
मृत्यू १९८०
माहितीस्त्रोत - (म.वि.प.चा.) विज्ञानतंत्रज्ञान कोष
अत्यंत कष्टातून पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर हिंदुस्थान एरोनॉटिक्ससारख्या कंपनीत मिळालेली नोकरी त्यागणे, हे खरेतर चैत्राम पवार यांच्यासाठी कठीणच होते. पण जेथे मोठे झालो, त्या बारीपाड्याचा विकास करण्याच्या ध्येयाने त्यांनी नोकरीची वाट सोडली आणि शेती, पाण्याचे स्त्रोत, रानभाज्या, आदिवासींना स्वत:ची ओळख असे अनेक उपक्रम राबवत त्यांनी बारीपाड्याचा चेहरामोहराच पालटून टाकला आहे.
बारीपाड्याचा परिवर्तनमंत्र
मराठी नाट्यसृष्टीतील एक अत्यंत वलयांकित व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रभाकर पणशीकर. नाट्य वर्तुळात प्रभाकर पणशीकरांना “पंत या नावाने ओळखले जात असे. त्यांनी `नाट्यसंपदा’ या त्यांच्या नाट्यनिर्मितीसंस्थेच्या माध्यमातून उत्तमोत्तम नाटकांची मेजवानी मराठी रसिकांना दिली.
आदित्य ओक यांचे वडिल डॉ. विद्याधर ओक गोविंदरावांकडे शिकायचे. त्यांना शिकवायला दर शुक्रवारी ते घरी यायचे. वयाच्या दहाव्या वर्षांपासून पुढे आठ वर्षं आदित्य ओक यांना गोविंदरावांकडे प्रत्यक्ष शिकण्याची संधी मिळाली.
७०-८० च्या दशकात मराठी रंगभूमीवर व नंतर मराठी, हिंदी चित्रपटांत त्यांनी विविध भूमिका केल्या.
डॉ. पां. रा. किनरे हे ठाणे-मुंबई भागातील कामगार चळवळीत गेली ५० वर्षे चमकणारे नाव. कामगारक्षेत्रात अनेकजण काम करतात; पण किनरे म्हणजे तत्त्वनिष्ठ कार्याचा आदर्श वस्तुपाठ होता. रा. स्व. संघात त्यांची जडणघडण झाली. कामगार चळवळीच्या रचनात्मक व संघर्षात्मक कामात झोकून देताना त्यांचे हे वैचारिक अधिष्ठान आयुष्यभर पक्के राहिले. गिरणगावातील कामगार चळवळ तसेच सामाजिक व राजकीय कार्याशी त्यांचा जिताजागता संबंध अजूनही आहे. मुंबईच्या भारतीय मजदूर संघाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्षे कामगिरी बजावली.
कामगार चळवळीत काम करताना त्यांनी गरीब, झोपडपट्टीधारक, असंघटित मजूर आणि कोकणवासीयांच्या प्रश्नांना न्याय मिळवून दिला. माझगाव डॉक, ग्लॅक्सो, पिरामल, अलकेम, मुकंद, डंकन, महाजन सिल्क मिल, इंडियन एक्सप्रेस अशा अनेक ठिकाणी त्यांनी कामगारांचे यशस्वी नेतृत्व केले.
कामगार चळवळीत कामगार गरीबच राहतो ; नेता गब्बर बनतो असा अनेक ठिकाणचा अनुभव अनेक कामगारांच्या पाठीशी होता. या पार्श्वभूमीवर किनरे यांचे ' एक रुपयाचे व्हाऊचर कुठे दिसणार नाही ' उठून दिसणारे आहे. त्यांनी कोणतेही पद, समिती सदस्यत्व वा अधिकार स्वीकारले नाहीत. सरकारी योजना, सवलतींचा फायदा उठवला नाही. शिवसेना-भाजप युतीच्या राज्यात या निष्ठावान, कर्तृत्ववान, अभ्यासू व निःस्वार्थी कार्यकर्त्याला कोणते तरी पद मिळेल अशी अनेक सहकार्यांना आशा होती पण भाजपने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले, याची सल अनेकांच्या मनात आहे. बगाराम तुळपुळे, यशवंत चव्हाण, प्रकाश आंबेडकर, मनोहर कोतवाल अशा विविध विचारसरणीच्या नेत्यांबरोबर त्यांनी काम केले. कामगार भागात २५ वर्षे त्यांनी गरिबांची सेवा केली.
१९६९ ते १९९५ या काळात लहान मुलांसाठी दर दिवशी दीडरुपयात, तर ज्येष्ठ नागरिकांना दोन रुपयांत औषधोपचार केले. २५ टक्के रुग्णांना मोफत औषधोपचाराचा वसा त्यांनी कायम ठेवला. ' महाराष्ट्र टाइम्स ' सह अनेक प्रमुख वर्तमानपत्रांतून त्यांनी आपल्या आवडत्या विषयावर विपुल लेखन करून वाचकाला सजग केले. ' आर्थिक मंदी ' व ' दरिद्री नारायणाचे अर्थकारण ' ही पुस्तके त्यांच्या नावावर जमा आहेत.
(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)
कवी, लेखक आणि समीक्षक असलेल्या रमेश अच्युत तेंडुलकर यांचा जन्म १८ डिसेंबर १९३० साली झाला. एम. ए. झाल्यानंतर त्यांनी काही वर्षे सी. आय. डी. विभागात काम केले. परंतु मुळात समीक्षकाची वृत्ती असल्यामुळे ते मुंबईच्या सिद्धार्थ महाविद्यालयात रजू झाले.
बा.सी. मर्ढेकर हे मराठी कवी, लेखक होते
भाषांतरकार विष्णू वामन बापट यांनी विविध भाषांतील ग्रंथांची भाषांतरे केली. त्यांच्या नावावर ७० भाषांतरित ग्रंथ आहेत.
२० डिसेंबर १९३३ रोजी त्यांचे निधन झाले.
## Vishnu Waman Bapat
Copyright © 2025 | Marathisrushti