‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’, ‘फू बाई फू’ अशा कार्यक्रमांतून छोटा पडदा गाजविणारा, तसेच अनेक चित्रपट, मालिका व नाटकांतून विविध प्रकारच्या भूमिका साकारणारा अभिनेता अंशुमन विचारे दूरदर्शन वरील “चालता बोलता” आणि जी मराठी वरील “फु बाई फु” या कार्यक्रमातून तो घरा घरात पोहचला. “फु बाई फु” च्या एका पर्वाचे तो विजेते ठरला होता.
अमेय वाघ एक अभिनेता म्हणून सध्या चर्चेत असलेलं नाव आहे . अमेयने कुणाच्याही अभिनय शैलीची नक्कल न करता स्वतःची एक वेगळी अभिनय शैली विकसित केली. त्या कसदार आणि सहज अभिनय करण्याच्या शैलीमुळे तो हल्ली बऱ्याच चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला नेहमी येत असतो.
रायगड जिल्ह्यातील चौल येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या गजानन पिळणकर यांना लहानपाणापासून शिक्षणाची आवड असल्यामुळे ते मुंबईत दाखल झाले व स्वकष्टाने स्वत:चं पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आणि मुंबई महापालिकेत नोकरी मिळवली.
ठाण्याचं निसर्गसौंदर्य, तलावांचा सुंदर परिसर यामुळे ठाण्याचं वातावरण खरोखरचं अल्हाददायक वाटतं. मग अशा वातावरणात खेळाडू निर्माण न होतील तरच नवल. अशा खेळाडूंना स्फूरण देणारं आणि अॅथलेटिक्स या क्रीडाप्रकारातलं ज्येष्ठ नाव म्हणजे रमेश गणेश खारकर हे होय
एम.कॉम. एल.एल.बी. असलेले श्री पटवर्धन हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. चित्रकला, तबला वादन, क्रिकेट, टेबल टेनिस शास्त्रीय संगीत ऐकण्याची त्यांना आवड आहे. त्यांनी अनेकविध विषयांवर आजपर्यंत लेखन केले आहे.
आपल्या कर्तृत्वाने देशपातळीवर स्थिरावलेले महाराष्ट्रातील प्रतिभाशाली नेतृत्व. सत्ता हे समाज परिवर्तनाचे साधन आहे, असे मानून सदैव क्रियाशील राहणारा नेता.
कवी, कादंबरीकार, नाटककार अनंत कदम यांचा जन्म १५ जुलै १९३५ रोजी झाला.
“बासरी” हा काव्यसंग्रह, तसेच “किडे, पाखरू, दिवसातल्या अंधारात, कॅन्सर मिळून १४ कादंबर्या त्यांनी लिहिल्या. या कादंबर्यांतून त्यांनी वास्तवतेचे भीषण चित्रण केले. “धम्मपद” हा त्यांनी पालीतून मराठीत केलेला अनुवाद प्रसिद्ध आहे.
## Anant Kadam
देशातील नामवंत इंजिनीअर्स व मॅनेजर्स घडविणार्या देहरादून च्या ग्राफिक एरा युनिव्हर्सिटीच्या इंटरनॅशनल अफेअर्सच्या अधिष्ठातापदाची जबाबदारी अवघ्या ४० व्या वर्षी डॉ. दुर्गाप्रसाद गांगोडकर यांच्याकडे आली आहे. बेळगावात जन्मलेले डॉ. गांगोडकर यांनी बीई. एमटेकचे शिक्षण घेतल्यानंतर आयआयटी-रुरकितून पीएचडी मिळवली, संशोधनावर हुकुमत असुनही उद्योगात फार काळ न रमता पुढे मात्र त्यांनी अध्यापनासाठी आपल्याला वाहून घेतले.
डॉ. दुर्गाप्रसाद गांगोडकर यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला देहरादूनची आंतरराष्ट्रीय धुरा हा लेख पुढील पानावर वाचा.
डॉ. दुर्गाप्रसाद गांगोडकर यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला देहरादूनची आंतरराष्ट्रीय धुरा हा लेख वाचा.
“अधिकारयोग” हे पुस्तक तसेच पाच नाटके, समुद्र ही काव्यरचना व १७२६ श्लोकांचे “यशवंतराय” हे महाकाव्य, असा त्यांचा ग्रंथसंभार होता. त्यांनी दोन नाटके लिहिली व “यशवंतराय” या खंडकाव्यासह काही पद्यरचनाही केल्या.
सदाशिव पांडुरंग केळकर हे निबंधकार, पत्रकार होते. ज्ञानदीप या मासिकाचे ते संस्थापक होते.
मूर्तीपूजा आवश्यक आहे काय? आणि ग्रंथप्रामाण्य हे त्यांचे ग्रंथ प्रसिध्द आहेत.
२० डिसेंबर १९०६ रोजी त्यांचे निधन झाले.
## Sadashiv Pandurang Kelkar
Copyright © 2025 | Marathisrushti