(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • श्रीपाद वामन काळे

    निबंधकार व अर्थशास्त्रविषयक नियतकालिकांचे संपादक अशी ओळख असलेल्या श्रीपाद वामन काळे यांचा जन्म ५ मार्च १९१० रोजी झाला. पुढे पाऊल, “तुमचे स्थान कोणते”, “कौटुंबिक हितगुज”, “दाणे आणि खडे”, “नवी घडी नवे जीवन”, “नव्या जीवनाची छानदार घडी”, यांसारख्या अनेक पुस्तकांचे लेखन श्रीपाद काळे यांनी अत्यंत स्वयंस्फुर्तीने केले. समाजाचे सूक्ष्म निरीक्षण, व्यापकरितीने विचार करणे, ओघवती भाषा आणि नाजूक मार्मिक विनोदांची पखरण त्यांच्या लिखाणात दिसून येते.

      January 9, 2015


  • अभयसिंह चव्हाण

    चित्रपट वितरण, साखर कारखाना, अर्थमूव्हिंग अशा व्यावसायिक क्षेत्रात जम बसत असतानाही कोल्हापूरच्या हिम्मतबहादूरांचा वारसा लाभलेले अभयसिंह चव्हाण अभ्यासाची शिडी चढू लागले आणि प्रशासकीय क्षेत्रात शिरण्याचा निर्धार त्यांनी केला. पण तेथे यशाने हुलकावणी देताच त्यांनी थेट चहाच्या मळ्यातच मजल मारली आणि आता अफ्रिकेत चहाच्या कारखान्यांची धुरा ते वाहत आहेत.

    अभयसिंह चव्हाण यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला अफ्रिकेत फुलवला चहाचा मळा हा लेख पुढील पानावर वाचा.

    अभयसिंह चव्हाण यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला अफ्रिकेत फुलवला चहाचा मळा हा लेख वाचा.

    chavan-abhaysinha-modified

      September 7, 2015


  • पांडुरंगशास्त्री आठवले

    वयाच्या बाविसाव्या वर्षी दादांनी आपल्या वडिलांनी सुरू केलेल्या पाठशाळेत भगवद्गीतेवर प्रवचनं द्यायला सुरुवात केली.१९५४ मध्ये जपान येथे झालेल्या दुसर्‍या धार्मिक परिषदेत त्यांनी वेद आणि भगवद्गीतेवरील तत्त्वज्ञानावर भाषण केले.

      July 5, 2022


  • शैलेश बालाजी माळोदे

      December 15, 2010


  • श्रीधर व्यंकटेश केतकर

    (1884 - 1937)

    महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचं अवजड -अवघड कार्य केतकरांनी पूर्ण केलं, हे त्यांचं ठळक योगदान म्हणायला हवं. पण याशिवाय केतकर समाजशास्त्रज्ञ, इतिहाससंशोधक आणि कादंबरीकार होते.

    इ.स. 1911 साली अमेरिकेच्या कॉर्नेल विद्यापीठांची पदवी त्यांनी मिळवली. `द हिस्टरी ऑफ कास्ट इन इंडिया` ही त्याची पदवी त्यांनी मिळवली. `द हिस्टरी ऑफ कास्ट इन इंडिया हा त्यांचा विषय होता. यात या विषयावरचे अनेक मूलभूत विचार त्यांनी मांडले आहेत. भारतीय सर्थशास्त्र आणि कायदा याचाही त्यांचा अभ्यास होता.

    1915 साली तेवीस भागांच्या ज्ञानकोशाचं काम त्यांनी हाती घेतलं विशेष आर्थिक पाठबळ नसताना, आणि इतर संशोधकलेखकांची मदत नसतानाही हे मोठं कार्य त्यांनी चौदा वर्षात पूर्ण केलं. या कोशाच्या लिखाणापासून ते छापून घेण्यापर्यंत अनेक अडथळे आले. अखेरीस स्वतचाच छापखाना काढून त्यांनी ज्ञानकोश छापून घेतला. छापखान्यासाठी `लिमिटेड कंपनी`चा अभिनव प्रयोग केतकरांनी केला. या सार्‍या खटाटोपांचं वर्णन `माझे बारा वर्षाचे काम ऊर्फ ज्ञानकोश मंडळांचा इतिहास` यात त्यांनी केलं आहे.

    `गोंडवनातील प्रियंवदा`, `ब्राम्हणकन्या` या त्यांच्या काही कादंबर्‍या आहेत. `महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण` यात वाड्गमयीन तर निशस्त्रांचे राजकारण`, `व्हिक्टोरिअस इंडिया` या दोन गंथांत राजकीय मतं प्रगट केली आहेत.

    साहित्यातून त्यांनी सुधारणावादी विचार मांडला. त्यांचं वैयक्तिक जीवनही इतर चारचौघांपेक्षा निरांळ होतं. एका जर्मन ज्यू स्त्रीला विधिवत हिंदू धर्मात आणून तिच्याशी केतकरांनी विवाह केला होता. अपत्य नसल्यामुळे दोन अनाथ मुलांनाही सांभाळलं.

    कोणतीही अत्याधुनिक साधनं. मदत हाताशी नसताना फक्त चौदा वर्षात ज्ञानकोश पूर्ण करणारे केतकर `ज्ञानकोशकार` म्हणूनच प्रामुख्याने प्रसिध्द आहेत.

    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

      March 11, 2015


  • गायिका नीला भागवत

    हिंदुस्तानी शास्त्रीय गायनातील ग्वाल्हेर घराण्याच्या ख्याल शैलीतील बंदिशींच्या माध्यमातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवणा-या एक प्रयोगशील गायिका नीला भागवत यांचा जन्म २९ नोव्हेंबर १९४२ रोजी पुणे येथे झाला.

    कृष्णराव पंडीत व शरच्चंद्र आरोलकर हे त्यांचे गुरु. त्यांची मीराबाई व कबीराच्या भजन गाण्याबद्धल विशेष प्रसिद्ध आहेत. जयपूर आणि ग्वाल्हेर अशा दोन्ही घराण्यांमधली गायकी त्या शिकल्या, ती आत्मसात केली आणि अवलंबलीही, मात्र ग्वाल्हेर घराण्याच्या ख्याल (खयाल-कल्पना) गायकीमध्ये त्या मनापासून रमल्या. ग्वाल्हेर घराण्यात बोलाला सर्वाधिक महत्त्व आहे. बोलात सगळंच अंतर्भूत असतं, या कल्पनेनं झपाटलेल्या नीला यांनी ख्यालाचा मूळ पिंड कधीच सोडला नाही. त्या व्यवसायाने प्राध्यापक व भाषांतर कार आहेत. आजही पारंपरिक गायिकीसोबतच जीवनातील अनुभव बंदिशींमधून मांडत नवता, प्रयोगशीलताही त्या जपत आहेत. शास्त्रीय रागांसह ‘पियानो’सारख्या पाश्चिमात्य वाद्याबरोबरही त्या जितक्या एकरूप होतात, तितक्याच परदेशी मूकबधिर मुलांना गायन शिकवतानाही होतात.

    संत कबीर, मीराबाई, चोखामेळा, संत तुकाराम, महात्मा फुले ते अगदी महात्मा गांधी यांसारख्या संत आणि महापुरुषांच्या विचारांवर, काव्यांवर बंदिशी बांधून त्यांचं सांगीतिक चित्र समाजापुढे मांडत आहेत. आज वयाच्या पंच्याहर्या वर्षीही नीला भागवत यांचा नवनिर्मितीचा, सृजनशीलतेचा उत्साह कायम आहे. त्यांना एसएनडीटी विद्यापीठ आणि वायएमसीए संस्था यांच्यातर्फे ‘कॉन्ट्रिब्युशन टू विमेन्स कल्चर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच
    केंद्र सरकारतर्फे संगीतातील संशोधनासाठी मानद शिष्यवृत्ती त्यांना देण्यात आली आहे.

    नीला भागवत यांचे साहित्य.
    मोनोग्राफ ऑन कृष्णराव शंकर पंडित (१९९२)
    तिहाई (कवितासंग्रह) (१९९२-९३)
    कबीर गाता गाता (२००४)
    शरच्चंद्र आरोलकर – लेणे प्रतिभेचे (२०१२)

    https://www.youtube.com/watch?v=0WLgyPkL5dI

    https://www.youtube.com/watch?v=Ukghy6LIqlA

    अधिक माहितीसाठी हा लेख वाचा.

    #NeelaBhagwat

      May 5, 2022


  • संत कान्होपात्रा

    मंगळवेढे येथील शामा नायकिणीचे पोटी हिचा जन्म झाला, सौंदर्य व गोड गळा यामुळे आपला व्यवसाय मुलगी आणखी पुढे नेईल असे तिच्या आईला वाटे. पण कान्होपात्राचा ओढा ईश्वरभक्तीकडे होता. विठ्ठल भजनात ती रंगून जात असे. तिने रचलेले अभंग प्रसिद्ध आहेत. कान्होपात्राच्या सौंदर्यामुळे तिच्यावर संकटे आली पण दरवेळी विठ्ठलकृपेने ती बचावली.

    शेवटी बिदरच्या बादशहाकडून बोलावणे आल्यावर पांडुरंगाच्या चरणी देह ठेवून आपली इहलोकीची यात्रा संपवली.
    ## Sant Kanhopatra

      May 25, 2010


  • अनिकेत केळकर

    अनिकेत केळकर हा मराठी चित्रपट , नाट्य आणि मालिका सृष्टीत कार्यरत असलेला एक अभिनेता. त्याने हिंदी सृष्टीतही काही प्रोजेक्ट्स केलेली आहेत.

      August 8, 2020


  • राजा मंगळवेढेकर

    “असावा सुंदर चॉकलेटचा बंगला”, “कोणास ठाऊक कसा”… या बालगीतांचे व ६० हून अधिक पुस्तकांचे कर्ते. साने गुरुजींचे चरित्रकार म्हणून त्यांची ओळख

      August 22, 2017


  • भाऊ पाध्ये

    पाध्येंनी मुंबईचे उघडे नागडे विश्व जसे आहे तसे मांडले. कुठलाही निष्कर्ष काढण्याच्या भानगडीत ते पडले नाही. त्यांनी आपल्या उभ्या आयुष्यात मुंबईत व एकंदरीत शहराच्या आरशात पाहिलेले, अनुभवलेले, मनावर कोरले गेलेले प्रसंग, घटना कादंबरीत अभिव्यक्त केल्या आहेत.

      July 12, 2022