बापूसाहेब जोशी

जोशी, बापूसाहेब

‘प्रसाद’ प्रकाशनाचे संस्थापक, साहित्यिक य. गो. जोशी ऊर्फ भाऊ यांच्या अखेरच्या काळातील ही गोष्ट. भाऊंनी त्यांच्या चिरंजीवाला सांगितले, ‘बघ, या व्यवसायात पडणार असशील, तर मी बरीच प्रकाशने करून ठेवली आहेत. ती विकत राहिलास तरी तुझा चरितार्थ चालेल.’ त्यावर चिरंजीव म्हणाले, ‘काय भाऊ, य. गो. जोशींच्या मुलाला तुम्ही स्टॉक विकायला सांगताय. मी तुमच्याही पुढे जाईन.’ भाऊंचे चिरंजीव म्हणजे मनोहर ऊर्फ बापूसाहेब जोशी.

ऐन विशी-बाविशीतच बापूसाहेब वडिलोपार्जित प्रकाशन व्यवसायात उतरले, प्रसाद मासिकाचे संपादक झाले आणि व्यवयासात यश मिळवत, कर्तृत्वाचा ठसा उमटवत त्यांनी वडिलांना दिलेला शब्द खरा करून दाखवला. बापूसाहेब म्हणजे सदाप्रसन्नता, उत्साह आणि उमदेपणा. बापूसाहेबांचे गेल्या शुक्रवारी पुण्यात निधन झाले. सदाशिव पेठेतील प्रसाद प्रकाशनाच्या कार्यालयात आता बापूसाहेबांचा दरबार पुन्हा कधीच भरणार नाही, ही कल्पनाही खूप वेदना दायक आहे. मराठी ग्रंथांसाठी ठेव म्हणून रक्कम ठेवा, ठेवीच्या व्याजातून ग्रंथ मिळवा आणि मुदतीनंतर ठेव परत न्या, अशी अभिनव योजना बापूसाहेबांनीच १९८० मध्ये प्रथम आणली आणि पुढे अशा सहा योजना त्यांनी यशस्वी करून दाखवल्या. या योजनांमधील ९९ ग्रंथांपैकी ८४ ग्रंथ आजवर प्रसिद्ध झाले आहेत आणि उर्वरित प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. ‘आपले वेद, आपली उपनिषदे, आपली पुराणे,’ ‘सुबोध शांकर ग्रंथावली,’ ‘देवभाषेचे देणे: मराठीचे लेणे’ या ग्रंथ ठेव योजना मोठय़ा प्रतिसादाने पूर्ण झाल्या आणि ‘समर्थ वाग्वैजयंती,’ ‘अभिनव प्रसन्न दर्शन’ ‘पंचमहाकाव्ये’ या योजनातील ग्रंथ प्रसिद्धीचे काम सुरू आहे. भारतीय संस्कृतीची सर्वार्थाने नव्याने ओळख करून देणारे बापूसाहेबांचे हे ग्रंथप्रकल्प यशस्वी झाले ते त्यांच्या परिश्रमांमुळे, बिनचूक नियोजनामुळे, अफाट लोकसंग्रहामुळे आणि पारदर्शी व्यवहारांमुळे. गेली ५० वर्षे ‘प्रसाद’ मासिक प्रसिद्ध करताना त्यांनी दरवर्षी एक दैवत विशेषांक प्रसिद्ध करण्याची योजना सलग २८ वर्षे चालवली. त्यानंतर नद्यांवरील विशेषांक प्रसिद्ध केले. प्रत्येक दिवाळी अंकात ते एक विस्तृत संतचरित्र प्रसिद्ध करीत असत. त्यांचे हे सारे विशेषांक आजही संदर्भग्रंथासारखेच वापरले जातात. प्रकाशनाचा व्याप सांभाळतानाच प्रसिद्ध श्री देवदेवेश्वर संस्थानचे विश्वस्त म्हणूनही बापूसाहेबांनी अतिशय उत्साहाने सुमारे २५ वर्षे काम पाहिले. बापूसाहेबांवर मराठी वाचकांनी मोठा विश्वास दाखवला. ‘आमची ठेवीची रक्कम परत नको. आमचे पैसे तुमच्या चांगल्या कामासाठीच वापरा,’ असे सांगून अनेक ठेवीदार मुदत संपल्यानंतर त्यांची ठेव बापूसाहेबांनाच परत देत असत. असे प्रेम करणारे वाचक बापूसाहेबांना लाभले आणि तीच त्यांची प्रकाशन व्यवसायातील ‘मोठी ठेव’ ठरली. बापूसाहेबांच्या बरोबरीने त्यांची कन्या उमा बोडस याही गेली दोन दशके प्रकाशनाचे काम पाहत आहेत. बापूसाहेबांनी हाती घेतलेल्या अनेक योजना पुढे नेण्याची जबाबदारी आता या पुढच्या पिढीकडे आली आहे.



जोशी, बापूसाहेब

‘प्रसाद’ प्रकाशनाचे संस्थापक, साहित्यिक य. गो. जोशी ऊर्फ भाऊ यांच्या अखेरच्या काळातील ही गोष्ट. भाऊंनी त्यांच्या चिरंजीवाला सांगितले, ‘बघ, या व्यवसायात पडणार असशील, तर मी बरीच प्रकाशने करून ठेवली आहेत. ती विकत राहिलास तरी तुझा चरितार्थ चालेल.’ त्यावर चिरंजीव म्हणाले, ‘काय भाऊ, य. गो. जोशींच्या मुलाला तुम्ही स्टॉक विकायला सांगताय. मी तुमच्याही पुढे जाईन.’ भाऊंचे चिरंजीव म्हणजे मनोहर ऊर्फ बापूसाहेब जोशी.

ऐन विशी-बाविशीतच बापूसाहेब वडिलोपार्जित प्रकाशन व्यवसायात उतरले, प्रसाद मासिकाचे संपादक झाले आणि व्यवयासात यश मिळवत, कर्तृत्वाचा ठसा उमटवत त्यांनी वडिलांना दिलेला शब्द खरा करून दाखवला. बापूसाहेब म्हणजे सदाप्रसन्नता, उत्साह आणि उमदेपणा. बापूसाहेबांचे गेल्या शुक्रवारी पुण्यात निधन झाले. सदाशिव पेठेतील प्रसाद प्रकाशनाच्या कार्यालयात आता बापूसाहेबांचा दरबार पुन्हा कधीच भरणार नाही, ही कल्पनाही खूप वेदना दायक आहे. मराठी ग्रंथांसाठी ठेव म्हणून रक्कम ठेवा, ठेवीच्या व्याजातून ग्रंथ मिळवा आणि मुदतीनंतर ठेव परत न्या, अशी अभिनव योजना बापूसाहेबांनीच १९८० मध्ये प्रथम आणली आणि पुढे अशा सहा योजना त्यांनी यशस्वी करून दाखवल्या. या योजनांमधील ९९ ग्रंथांपैकी ८४ ग्रंथ आजवर प्रसिद्ध झाले आहेत आणि उर्वरित प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. ‘आपले वेद, आपली उपनिषदे, आपली पुराणे,’ ‘सुबोध शांकर ग्रंथावली,’ ‘देवभाषेचे देणे: मराठीचे लेणे’ या ग्रंथ ठेव योजना मोठय़ा प्रतिसादाने पूर्ण झाल्या आणि ‘समर्थ वाग्वैजयंती,’ ‘अभिनव प्रसन्न दर्शन’ ‘पंचमहाकाव्ये’ या योजनातील ग्रंथ प्रसिद्धीचे काम सुरू आहे. भारतीय संस्कृतीची सर्वार्थाने नव्याने ओळख करून देणारे बापूसाहेबांचे हे ग्रंथप्रकल्प यशस्वी झाले ते त्यांच्या परिश्रमांमुळे, बिनचूक नियोजनामुळे, अफाट लोकसंग्रहामुळे आणि पारदर्शी व्यवहारांमुळे. गेली ५० वर्षे ‘प्रसाद’ मासिक प्रसिद्ध करताना त्यांनी दरवर्षी एक दैवत विशेषांक प्रसिद्ध करण्याची योजना सलग २८ वर्षे चालवली. त्यानंतर नद्यांवरील विशेषांक प्रसिद्ध केले. प्रत्येक दिवाळी अंकात ते एक विस्तृत संतचरित्र प्रसिद्ध करीत असत. त्यांचे हे सारे विशेषांक आजही संदर्भग्रंथासारखेच वापरले जातात. प्रकाशनाचा व्याप सांभाळतानाच प्रसिद्ध श्री देवदेवेश्वर संस्थानचे विश्वस्त म्हणूनही बापूसाहेबांनी अतिशय उत्साहाने सुमारे २५ वर्षे काम पाहिले. बापूसाहेबांवर मराठी वाचकांनी मोठा विश्वास दाखवला. ‘आमची ठेवीची रक्कम परत नको. आमचे पैसे तुमच्या चांगल्या कामासाठीच वापरा,’ असे सांगून अनेक ठेवीदार मुदत संपल्यानंतर त्यांची ठेव बापूसाहेबांनाच परत देत असत. असे प्रेम करणारे वाचक बापूसाहेबांना लाभले आणि तीच त्यांची प्रकाशन व्यवसायातील ‘मोठी ठेव’ ठरली. बापूसाहेबांच्या बरोबरीने त्यांची कन्या उमा बोडस याही गेली दोन दशके प्रकाशनाचे काम पाहत आहेत. बापूसाहेबांनी हाती घेतलेल्या अनेक योजना पुढे नेण्याची जबाबदारी आता या पुढच्या पिढीकडे आली आहे.

Author