राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आणि आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटूंबियांना आधार देण्यासाठी पुढे आलेल्या अभिनेता नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांचे कार्य कौतूकास्पद ठरत आहे.
बाळ कोल्हटकर हे मराठीतील नाटककार, कवी , अभिनेते, दिग्दर्शक होते.
वैद्यकीय क्षेत्रात भरीव कामगिरी करुन अनेक वर्षे ठाणेकरांच्या स्वास्थ्याची काळजी घेणार्या डॉ. सौ सुवर्णा रेळेकर १९९२ पासून ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे सुरुवातीला वैद्यकीय अधिकारी व १९९७ पासून पूर्णवेळ सहयोगी प्राध्यापिका म्हणून त्या सेवेत रुजू आहेत.
ते मराठीतील एक संपादक, बाल वाड्गमयकार आणि कोशकामकार होते. त्यांचा जन्म 12 एप्रिल 1871 रोजी जळगाव जिल्हयातील धरणगाव येथे. शिक्षण धुळे, इंदूर आणि नागपूर येथे. कलकत्ता विद्यापीठातून ते बी.ए.झाले (1893). बंगाली भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. अध्यापन आणि वृत्तपत्रव्यवसाय हया क्षेत्रांत त्यांनी आयुष्याचा बराचसा काळ व्यतीत केला. त्याशिवाय मुंबईच्या जुन्या सचिवालयात `रिपोर्टर ऑफ द नेटिव्ह प्रेस` म्हणूनही काम केले.
ज्ञानप्रकाश (पुणे), मल्हारी मातैड (इंदूर) यांसारख्या पत्रांचे ते संपादक होते. त्यांनीच साप्ताहिक ज्ञानप्रकाशाचे दैनिकात रुपांतर केले. उत्तम बालसाहित्यास प्रोत्साहन देण्यासाठी आनंद हे लोकप्रिय मासिक काढले (1906). लहान मुलांसाठी त्यांनी अनेक छोटी छोटी पुस्तके लिहिली. त्यांचा मृत्यू 2 फेब्रुवारी 1930 रोजी झाला.
झोपेचा अभ्यास करणारे वेगळे शास्त्र असू शकते व त्यावरून आपल्या आरोग्याबद्दल महत्त्वाचे निष्कर्ष हाती येऊ शकतात, हे तसे आपल्याकडे अलीकडेच रुजले आहे. डॉ. प्राजक्ता देशपांडे यांनी आपल्या पतीसह अमेरिकेत स्लीप मेडिसीनविषयी संशोधन सुरु केले आणि याच क्षेत्रातील संशोधनाचा लाभ आपल्या समाजास देण्यासाठी हे दांपत्य भारतात परतले. भिन्नगती मुलांच्या झोपेचे गणित त्यांच्या मानसिक स्वास्थ्यात बदल घडवू शकते, असे महत्वपूर्ण संशोधन त्यांनी आता केले आहे.
निद्रादेवी नमो:स्तुते
त्सुनामी असो, भूकंप असो वा महाराष्ट्रातला दुष्काळ.. कोल्हापूरच्या अशोक रोकडे यांनी अशावेळी धावून जाणारी “व्हाइट आर्मी” उभी केली आहे. आपत्तीची वर्दी मिळताच दीड हजार जवानांचे बळ मदतीला धावते आणि शिस्तीत काम सुरु करते.
व्हाइट आर्मी चे कमांडर
जवळजवळ ४० वर्षे पोलिस दलासाठी कार्यरत असताना, मधुकर झेंडे यांनी त्यांच्या काळात खतरनाक गुन्हेगार चार्ल्स शोभराज, हाजी मस्तन आणि करीम लाला यांना जेल मध्ये टाकले.
निजाम-पेशवे संबंध, पानिपत : १७६१, श्रीशिवछत्रपती इ. त्यांचे ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहेत. इतिहासाप्रमाणेच समाजशास्त्र हाही त्यांच्या चिंतनाचा विषय होता.
चाळीस वर्षांवरील गायकांसाठीच्या झी सारेगमपच्या पर्वाच्या उपविजेत्या अनुजा वर्तक या ठाणे शहराला अभिमान वाटणार्या व्यक्तींमधील एक ! कल्याण गायन समाज येथे पं. वसंतराव गोसावी यांच्याकडे वर्तक यांनी शास्त्रीय संगीताचे प्राथमिक शिक्षण घेतले.
चीनमधील नानजिंगमध्ये नुकत्याच झालेल्या आशियाई युवा क्रिडा स्पर्धेत नाशिकच्या अंजना ठमके हिने ८०० मीटरच्या शर्यतीत सुवर्णपदक पटकावले. नाशिकच्या आदिवासीबहुल गणेशगावातून आलेल्या अंजनाची ही धाव सोन्यासारखी लकाकती ठरली आहे.
अंजनाचा सुवर्णवेध
Copyright © 2025 | Marathisrushti