(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

  • किशोर गौरीनाथ तेलवणे

    ठाण्यातील तबलावादकांच्या परंपरेतील एक मातब्बर नाव म्हणजे किशोर तेलवणे होय. आकासवाणीचे “बी” ग्रेड म्हणून सन्मान मिळवणारे किशोरजी लहानपणापासून तबलावादनाचे धडे गिरवू लागले. पं. राम मराठे, पं. जितेंद्र अभिषेकी, पं. जयराज, पद्मश्री गोपीकृष्ण, श्रीमती प्रभा अत्रे यांसारख्या मान्यवरांना त्यांनी आजपर्यंत साथ संगत केली आहे.

  • विजय तनपुरे (शिवशाहीर)

    विजय तनपुरे हे नगर जिल्ह्यातील राहुरीत राहणारे अपंग कलावंत. आकाशवाणी व दूरदर्शनवरून त्यानी अनेक कार्यक्रम केले आहेत. अपंगत्वावर मात करीत ते जिद्दीने, चिकाटीने शाहीर झाले. त्यांच्या पोवाड्यांच्या अनेक कॅसेट आज बाजारात उपलब्ध आहेत.

    शाहीर म्हणून यश मिळवल्यावर एकदा त्यांना कीर्तन करण्याचा आग्रह झाला. पण ती आपली पात्रता नाही म्हणून त्यांनी तेव्हा नम्र नकार दिला. पण त्यानंतर स्वस्थ न बसता त्यांनी ही किर्तन करण्यासाठी कला अवगत करण्याचा ध्यास घेतला. यासाठी त्यांनी सांस्कृतिक कार्यसंचालनालय, मुंबई यांच्याकडे प्रशिक्षणासाठी अर्ज केला. डिकसळच्या प्रकाश महाराज बोधले यांच्याकडे त्यांना प्रवेश मिळाला. तिथे आपण शाहीर आहोत, नामवंत शाहीर आहोत हे न सांगता त्यांनी अगदी सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे राहून कष्टाने कीर्तनाची कला सादर केली. लवकरच त्यांना कीर्तन कलेत पारंगत असल्याचे प्रमाणपत्र मिळाले. कीर्तनाचे कार्यक्रम मिळू लागले.
    तनपुरे हे जिद्दिने, मेहनत करुन शाहीराचे कीर्तनकार झाले.

    विजय तनपुरे यांची www.shivgarjana.com ही वेबसाईट आहे.

    संपर्कासाठी पत्ता:

    शिवशाहिर विजय तनपुरे,
    खळवाडी न. २, स्टेशन रोड,
    ता. राहुरी, जि. अहमनगर,
    फोनः ०२४२६-२३३७७९
    मोबाईलः ९३२५१४१८८२

  • डॉ. विद्याधर गोपाळ ओक

    सुप्रसिद्ध हार्मोनियम वादक व संगीत संशोधक. संगीतातील २२ श्रुतींवर आधारित जागतिक दर्जाचे संशोधन.

  • बॅ. विठ्ठलराव गाडगीळ

    विठ्ठलराव गाडगीळ हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी होते. ते संसदीय काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी, १९७१ आणि १९७६ मध्ये राज्यसभा सदस्य होते.

  • हरिश्चंद्र बिराजदार

    बिराजदार, हरिश्चंद्र

    जीवनभर कुस्ती व खेळाडूंचा विकास हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवीत ‘रुस्तुम-ए-हिंदू’ हरिश्चंद्र बिराजदार यांनी कुस्ती कारकीर्द परिपूर्ण केली. खेळाडू, संघटक व मार्गदर्शक म्हणून त्यांनी सतत आपल्या तालमीचा नावलौकिक उंचावेल हेच ध्येय ठेवले होते. स्वत: त्यांनी अनेक मैदाने गाजविली, पण त्याचबरोबर आपले मल्ल आंतरराष्ट्रीय स्तरावर कशी चांगली कामगिरी करतील हा उद्देश साध्य करण्यासाठी ते अहोरात्र झगडले.

    त्यामुळेच त्यांच्या गोकुळ वस्ताद तालमीने महाराष्ट्रास अनेक आंतरराष्ट्रीय पदकविजेते मल्ल दिले. गोकुळ वस्ताद तालमीचे ज्येष्ठ प्रशिक्षक व ‘रुस्तुम-ए-हिंद’ हरिश्चंद्र माधवराव बिराजदार हे मूळचे निलंगा तालुक्यातील रामलिंगमुथ्थगड येथील रहिवासी. लहानपणापासूनच कुस्ती हाच ध्यास घेतलेल्या या कुस्तिगीराने वयाच्या १४व्या वर्षी १९६४ मध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पदार्पण केले. या स्पर्धेत त्यांनी १९६७ मध्ये सुवर्णपदक मिळविले. १९६८ मध्ये त्यांनी अखिल भारतीय स्तरावरील हिंदकेसरी स्पर्धेत रुपेरी यश मिळविले. पाठोपाठ पुढच्या वर्षी त्यांनी याच स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. १९७० मध्ये त्यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले व याच वर्षी त्यांनी जागतिक स्पर्धेतही भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी १९७२ मध्ये म्युनिच ऑलिम्पिक स्पर्धेतील ८२ किलो विभागात भारताचे प्रतिनिधित्व केले. याच वर्षी त्यांना ‘रुस्तुम-ए-हिंदू’ हा कुस्ती क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान देण्यात आला.बिराजदार यांनी सर्वाचे लक्ष वेधून घेतले ते १९७७ मध्ये महान भारत केसरी सतपाल याला अस्मान दाखवून. सतपाल यांच्यावर मात करणारा पहिला महाराष्ट्रीय कुस्तिगीर होण्याचा त्यांनी मान मिळविला. कुस्ती कारकीर्दीत त्यांनी अनेक राष्ट्रीय दर्जाच्या मल्लांवर मात केली.स्पर्धात्मक कुस्तीमधून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी १९८२ मध्ये पुण्यातील गोकुळ वस्ताद तालमीत उदयोन्मुख व नवोदित मल्लांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. राज्य क्रीडा संचालनालयाच्या कुस्ती प्रशिक्षण योजनेंतर्गत त्यांनी या तालमीत गेली १९ वर्षे ‘वस्ताद’ म्हणून काम केले. अर्जुन व शिवछत्रपती पुरस्कार विजेते काका पवार, शिवछत्रपती पुरस्कार विजेते गोविंद पवार, राहुल काळभोर, रवींद्र पाटील, दत्ता गायकवाड, रमेश माने, महाराष्ट्र केसरी रावसाहेब मगर, तानाजी बनकर, दत्ता गायकवाड, चंद्रहास निमगिरे, विकी बनकर, राष्ट्रकुल पदकविजेते रणजित नलावडे, राहुल आवारे यांच्यासह अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मल्ल बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाले. केवळ प्रशिक्षक म्हणून नव्हे तर मल्लांना वडिलकीच्या नात्यानेच त्यांनी मार्गदर्शन केले. बिराजदार यांना राज्य शासनाने १९७१ मध्ये शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने सन्मानित केले, तर १९९८-९९ मध्ये त्यांना दादोजी कोंडदेव पुरस्कार मिळाला. २००६ मध्ये केंद्रीय क्रीडा खात्याने त्यांच्या कार्याची दखल घेत ‘ध्यानचंद’ हा राष्ट्रीय पुरस्कार देत त्यांचा सन्मान केला. त्याखेरीजही त्यांना अनेक पुरस्कार मिळाले.

  • संजीव अभ्यंकर

    स्वराचे भान येणे ही जी गोष्ट आहे, ती गुरूच्या समोर बसल्याशिवाय कळणेच शक्य नसते. संजीव अभ्यंकर यांना त्यांच्या गुरूकडून मिळालेली तालीम ही अशी होती. संगीताच्या क्षेत्रात कोणताही शिष्य फक्त गुरूचेच गाणे गात राहिला, तर त्याला फारसे महत्त्व मिळत नाही.

  • सिद्धिविनायक सत्यसंध बर्वे

    वनस्पती जीवतंत्रज्ञान आणि सुगंधी आणि औषधी वनस्पतींवर संशोधन

  • केशव बाबूराव लेले

    शिल्पकार र.कृ. फडके यांनी सुरू केलेल्या व केशव लेले यांच्या अशा प्रदर्शनांनी महाराष्ट्रातील जनसामान्यांची यथार्थदर्शी वास्तववादी कलेप्रती असलेली अभिरुची वाढवली. त्यातूनच कलेच्या विविध शैलींतील प्रगल्भतेऐवजी आजही महाराष्ट्रात याच प्रकारच्या यथार्थदर्शी कलेचा प्रभाव आढळून येतो.

  • पांडुरंग नारायण कुलकर्णी

    प्राचीन मराठी वाङ्मयाचे संशोधक पांडुरंग नारायण कुलकर्णी यांचा जन्म २५ ऑक्टोबर १९२२ रोजी झाला.

    “संशोधन धारा” या ग्रंथातून त्यांनी प्राचीन कवींच्या कवितांवर तोपर्यंत झालेल्या संशोधनातील चुका दाखवून निर्णायक मत व्यक्त केले. याशिवाय “नागेशमाहात्म्य” चे संपादन त्यांनी केले.

    Pandurang Narayan Kulkarni

  • सुमित्रा महाजन

    सुमित्रा महाजन ह्या विद्यमान लोकसभा सभापती आहेत.