(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

  • प्रसाद वनारसे

    चित्रपट क्षेत्रातील ग्लॅमर सोडून सर्जशील नाट्यकलावंत घडवण्याचा वसा रंगकर्मी प्रसाद वनारसे यांनी घेतला आहे. देशविदेशातील नाट्यप्रशिक्षणांमुळे नाट्यगुरू अशी त्यांची ओळखही निर्माण झाली आहे.

    प्रसाद वनारसे यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला हाडाचा नाट्यशिक्षक हा लेख पुढील पानावर वाचा.

    प्रसाद वनारसे यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला हाडाचा नाट्यशिक्षक हा लेख वाचा.

    vanarase-prasad-modified

  • ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)

    निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. ते राष्ट्रीय सुरक्षा या विषयावरील तज्ज्ञ आहेत.

  • विष्णू बापूजी आंबेकर

    कादंबर्‍या, नाटके, कथा आदी लिहून पुढे समीक्षेत लौकिक मिळवणारे  संपादक व समीक्षक विष्णू बापूजी आंबेकर

  • सुभाष आंदे

    पाणी शुद्ध करण्यासाठी ‘नीरी-झर’ ही गावातल्या माणसालाही पुराचे गढूळ पाणी शुद्ध करता येईल अशी ही सोपी पद्धत त्यांनी विकसित केली.

  • कमलाबाई गोखले

    भारतीय सिनेसृष्टीची मुहुर्तमेढ रोवली गेली ती २० व्या शतकाच्या आरंभी. त्याकाळी आपल्या समाजात समाज प्रबोधन आणि मनोरंजनाचं महत्वपूर्ण साधन म्हणजेच संगीत नाटक. वैविध्यपूर्ण विषय, सजीव अभिनय, सामान्य माणसाच्या काळजाला भिडणार्‍या कथानकांमुळे, नाटकं मराठी माणसाच्या गळ्यातील ताईत बनली होती.

  • प्रा. अशोक केळकर

    व्याकरणाची आवड आणि भाषिक प्रश्नांबद्दलच्या कुतूहलामुळे ते भाषाविज्ञानाच्या अभ्यासाकडे वळले. अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठातून अशोक केळकरांनी लिंग्विस्टिक्स विथ अॅन्थ्रॉपॉलॉजी या विषयात पीएच.डी.केली.

  • अशोक समर्थ

    अशोक समर्थ ! हिंदी , भोजपुरी तसेच मराठी सिनेसृष्टीतील एक कमी वेळात नावाजलेलं नाव. अशोक समर्थ ह्याचा जन्म बारामती सारख्या लहान पण तितक्याच महत्वाच्या गावात झाला. अशोक समर्थचे लहानपणापासूनच एक यशस्वी कलाकार , अभिनेता बनण्याचे स्वप्न होतं. ते त्याने मेहनत घेत पूर्णही केलं.

  • गंगाधर महांबरे

    बालसाहित्यकार, कवी, गीतकार आणि नाटककार गंगाधर मनमोहन महांबरे यांचा जन्म कोकणातील मालवण येथे ३१ जानेवारी १९३१ रोजी झाला.

  • भारती गोखले-रुस्तम

    सत्तरीच्या दशकातील उत्तरार्धात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरुन घराघरात पोहोचलेला एक सुमधुर आणि लक्षणीय आवाज म्हणजे भारती गोखले-रुस्तम यांचा.

  • लक्ष्मणराव किर्लोस्कर

    लक्ष्मणराव किर्लोस्कर हे महाराष्ट्रातील प्रसिध्द उद्योगपती व कारखानदार, किर्लोस्कर उद्योगसमुहाचे मुख्य प्रवर्तक. त्यांचा जन्म २६ जून १८६९ रोजी झाला. महाराष्ट्राचे हेन्रीफोर्ड या नावाने गौरवण्यात आले आहे.

    आज जगाचा वेग वाढवण्यास कारणीभूत ठरलेल्या विमानाच्या शोधाचे जनक राईट बंधू आणि महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाची मुहूर्तमेढ रोवणारे लक्ष्मणराव किर्लोस्कर या दोघांचाही जन्म एकाच काळातील आणि दोघांनीही प्रारंभी सायकलचेच दुकान चालवले. गेल्या शंभर वर्षांत हवेत उडण्याच्या माणसाच्या स्वप्नाचा एक प्रचंड मोठा उद्योग झाला आणि किर्लोस्करांनी लावलेल्या छोटय़ाशा रोपटय़ाचे वटवृक्षात रूपांतर झाले.

    १० मार्च १९१० रोजी सांगली जिल्ह्यातील कुंडल रोड या खेडेगावात किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड या उद्योगाला सुरुवात झाली. याच गावाचे नामकरण नंतर किर्लोस्करवाडी असे झाले. पण त्या जागेत सुरू झालेल्या एका उद्योगाला तेथील सगळय़ांच्या घामाने आणि लक्ष्मणरावांच्या कल्पकतेने झळाळी आली.

    स्वातंत्र्यचळवळीचा एक भाग म्हणून स्वदेशीचा पुरस्कार करणाऱ्यांनी आपापल्या परीने चळवळीत योगदान दिले होते. लक्ष्मणरावांनी इंग्लंडमध्ये स्थापन होत असलेल्या औद्यौगिक वसाहतींबद्दल वाचले होते. तसा प्रयत्न देशात करण्याचा त्यांचा मानस, औंध संस्थानचे राजे श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी रेल्वेस्थानकाजवळ असलेली जागा देणगी म्हणून दिल्याने आकाराला आला. सुनियोजित पद्धतीने किर्लोस्करांनी कारखान्याची उभारणी केली. त्या काळात सगळय़ांना वेगळे वाटेल, असे अनेक उपक्रम त्यांनी सुरू केले. त्यांनी या भागात निवासाची उत्तम व्यवस्था निर्माण केली. कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी माध्यमिक शाळाही सुरू केली. खेळांची उत्तम व्यवस्था हेही या गावाचे एक वैशिष्टय़ ठरले. क्रिकेट क्लब, गोल्फ क्लब, टेनिस कोर्ट, पोहण्याचा तलाव अशा अनेक सुविधा या भागात होत्या. किर्लोस्करांच्या कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांना तेथे राहणे सुखकर व्हावे, याकडे लक्ष्मणरावांचा कटाक्ष असे. स्वतंत्र पोस्ट कार्यालय हेही या गावाचे वेगळेपण ठरले होते.

    त्या काळातील क्रमांक दोनचा औद्योगिक परिसर (पहिला क्रमांक जमशेदपूरचा.) म्हणून किर्लोस्करवाडीला मिळालेला मान हा या सगळ्या कल्पनांचाच गौरव आहे. कारखाना सुरू करण्याची मराठी माणसाची तयारी नसते, मराठी माणूस नोकरी करण्यात जास्त रस घेतो, हे समज खोटे ठरावेत, असे काम लक्ष्मणराव किर्लोस्करांनी करून दाखवले. कोणत्याही स्थितीत कारखान्यातील उत्पादनाचा दर्जा घसरता कामा नये, यासाठी लक्ष्मणरावांची धडपड असे.

    लक्ष्मणरावांनी बेळगावात सायकल दुरुस्तीचे दुकान सुरू केले, तरी त्यांची स्वप्ने फार मोठी होती. लहानपणापासून परिसरात दिसत असलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणी त्यांच्यासाठी फार महत्त्वाच्या होत्या. शेतकऱ्यांसाठी नवी उपकरणे तयार करणे हे त्यांचे ध्येय होते. किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडने शेतकऱ्यांसाठी जी उपकरणे बनवली, त्याला शेतकऱ्यांनी अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद दिला. किर्लोस्करांनी तयार केलेला लोखंडी नांगर प्रत्येक शेतकऱ्यासाठी मोलाचा ठरला आणि भारतातील शेतकऱ्यांच्या तोंडी किर्लोस्कर हे नाव तात्काळ रुळले. किर्लोस्कर पंप हे तर देशातील शेतांवर हमखास दिसणारे यंत्र असे. शेतकऱ्यांचे जगणे सुखकर व्हावे, हा लक्ष्मणरावांचा ध्यास होता.

    एखादा उद्योग सुरू झाला तरी तो पुढे सुरू राहणे आणि त्याचा विकास होणे यासाठी पुढची पिढी कर्तबगार असावी लागते. लक्ष्मणराव त्याबाबत नशीबवान ठरले. शंतनुरावांनी आपल्या कर्तृत्वाने हा उद्योग मोठा केला आणि देशातील कानाकोपऱ्यात त्याची उत्पादने पोहोचवली. केवळ उद्योगापुरते किर्लोस्कर हे नाव अग्रेसर राहिले नाही, तर ‘किर्लोस्कर’, ‘मनोहर’ आणि ‘स्त्री’ यांसारखी नियतकालिके हीही त्यांची एक वेगळी ओळख ठरली. मराठी पत्रकारितेमध्ये या नियतकालिकांचे योगदान फार मोलाचे आहे. साऱ्या देशात उद्योगांना प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या बिनीच्या उद्योगपतींमध्ये लक्ष्मणरावांचे आणि त्यांच्या किर्लोस्कर उद्योगसमूहाचे नाव अग्रेसर राहिले आहे.

    त्यांचा मृत्यु २६ सप्टेंबर १९५६ ला झाला.

    (संदर्भ : महाजालातील संदर्भस्थळे, लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स आणि पुढारी या वृत्तपत्रांतील विविध माहिती)

    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.