(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - profiles sub site

Sort By:

  • संत मीराबाई

    संत मीराबाई ह्या थोर कृष्णभक्त कवयित्री होती. मीराबाईंनी स्वतःच्या जीवनात खुप दुःखं भोगलं. त्यांचा जन्म राजघराण्यात झाला परतूं त्यांचा छळ झाल्यामुळे त्यांची विरक्तवृत्ती वाढत गेली आणि त्या कृष्णभक्तीकडे ओढल्या गेल्या. मीराबाईंच्या रचनांबद्दल निश्चित माहिती नाही. “पदावली“ ही मीराबाईंची एकमेव, प्रमाणभूत काव्यकृती आहे. त्यांची रचना अतिशय भावरसपूर्ण आहे. त्यांच्या दुःखाचं प्रतिबिंब काही पदामध्ये पडलेलं आहे.

  • हर्षवर्धन नवाथे

    ‘कौन बनेगा करोडपती’ अर्थात `केबीसी’चा पहिला विजेता कोण होता हे आज फार क्वचित लोकांना माहित असेल. १९ वर्षांपूर्वी केबीसीमध्ये भाग घेतलेले मराठमोळे हर्षवर्धन नवाथे हे त्यावेळी विद्यार्थी होते. या शोमध्ये करोडपती बनल्यानंतर रातोरात ते स्टार झाले.

  • सुरेश साळुंखे

    बैलगाडीला डिस्कब्रेक बसविणे किंवा बुलेटला डिझेलचे इंजिन असे कल्पक तांत्रिक प्रयत्न सांगली जिल्ह्यातील शेतकरी सुरेश साळुंखे करीत असतात. त्यांनी आता ऊसतोडणीसाठी ट्रॅक्टरच्या आकाराचे बहुपयोगी यंत्र बनविले आहे...

    सुरेश साळुंखे यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला ऊसतोडणीची यांत्रिक किमया हा लेख पुढील पानावर वाचा.

    सुरेश साळुंखे यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला ऊसतोडणीची यांत्रिक किमया हा लेख वाचा.

    salunkhe-suresh-modified

  • वसंतराव नाचणे

    समाजवादी पक्षाचे कट्टर कार्यकर्ते श्री. वसंतराव नाचणे यांनी कै. दत्ताजी ताम्हणे यांच्या बरोबर खेडोपाडी खूप काम केले.

  • डॉ. विनायक विश्वनाथ पेंडसे ऊर्फ अप्पा पेंडसे

    अप्पा पेंडसे हे लाला लजपत राय यांच्या स्काउट दलात होते, भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या मुक्तेश्वर दलात १९३० मधे ते सामील झाले. १९३२ मध्ये ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आले.

  • नीरजा

    ज्यांच्या समीक्षेचा दरारा संपूर्ण साहित्य विश्वाला वाटतो, त्या म. सु. पाटील यांची मुलगी असूनही नीरजा यांनी मात्र कवितेची निवडली. या वाटेवर त्यांनी केलेला प्रवास किती दमदार होता आणि आहे, हेच त्यांना नुकत्याच जाहीर झालेल्या केशवराव कोठावळे पुरस्काराने सिध्द झालं आहे.

  • मुग्धा दिनेश

    रिदमिक जिमनॅस्टिक या खेळात सहसा कुणी रस घेत नाहीत. परंतु ठाण्यातील मुग्धा केतकर हिने मात्र शालेय जीवनातच आपला मार्ग निश्चित केला आणि वयाच्या ९ व्या वर्षापासून राज्यस्तरीय जिमनॅस्टिक स्पर्धेत पदक मिळवायला सुरुवात केली.

  • डॉ. श्रीकांत कमलाकांत राजे

    डॉ. श्रीकांत राजे हे ठाणे येथील सुप्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट – क्ष-किरण तज्ज्ञ (Radiologist) आहेत.

  • वसंत बापट

    (25 जुलै 1922 ते 27 सप्टेंबर 2002)

    प्रा. वसंत बापट यांचा जन्म 1922 रोजी सातारा जिल्हयातील कह्राड येथे झाला. तर महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या स.प. महाविद्यालयात झाले. त्यानंतर `नॅशनल कॉलेज आणि `रामनारायण रूईया कॉलेज` हया महाविद्यायलयातुन मराठी व संस्कृत हया विषयाचे प्राध्यापक होते. 1974 पासून मुंबई विद्यापिठातील गुरूदेव रविंद्र टागोर अध्यासनाचे प्राध्यापक होते. साहित्य अकादमीचे सदस्य होते. प्रा. वसंत बापट हे स्वांतत्र्य चळवळीतही सहभागी झाले होते. 1942 च्या चलेजाव चळवळीत त्यांनी महत्त्वपूर्ण भुमिका बजावली होती. ऑगस्ट 1943 ते जानेवारी 1945 पर्यंत ते तुरूगांत होते. 1947 ते 1982 ते पर्यंत ते मुंबई विद्यापिठात ते प्राध्यापक होते. 1983 ते 1988 ते साधनाचे संपादक होते. राष्ट्रसेवा दलाशी ते सलंग्न होते. 1972 साली मुंबईत भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

    लहानपणापासून बापटांवर राष्ट्रसेवा दलाचे आणि सानेगुरूजींच्या सहवासाचे संस्कार झाले. `बिजली` हया पहिल्या काव्यसंग्रहावर हया संस्काराचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. `अकरावी दिशा` , `सकीना` आणि `मानसी` हे त्यांचे बिजली नंतरचे काव्यसंग्रह होते. त्यांनी लहान मुलांसाठीही कविता लिहील्या.

    प्रा. वसंत बापट यांच्यावरील मराठीसृष्टीवरील लेख.

    मराठी कवी वसंत बापट (29-Jul-2017)

    मराठीतील कवी वसंत बापट (17-Sep-2017)

    ज्येष्ठ कवी वसंत बापट (17-Sep-2021)

  • मालती पांडे बर्वे

    खेड्यामधले घर कौलारू”,”या कातर वेळी ”हि अनिल भारती यांनी लिहिलेली आणि मधुकर पाठक यांनी स्वरबद्ध केलेली मालतीबाईंची गाणी खूप गाजली.