पं.तुळशीदास बोरकर उर्फ बोरकर गुरुजी संवादिनी (हार्मोनियम) वादन क्षेत्रातील ऋषितुल्य नाव. आज घडीला संवादिनी अर्थात पेटीवर प्रभुत्व असणारी जी काही मान्यवर मंडळी आहेत त्यातील हे अग्रगण्य नाव होते.
गाडे, (डॉ.) वासुदेव
प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. वासुदेव गाडे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आल्याने शिक्षणक्षेत्रातील अनेकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला असेल. उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात गेल्या काही दशकांत पुणे विद्यापीठाने स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले होते. त्यासाठी आजवरच्या कुलगुरूंनी केलेले योगदान महत्त्वाचे ठरले आहे. डॉ. गाडे यांना आता ही संधी मिळते आहे. केवळ बायोटेक्नॉलॉजी या विषयातील तज्ज्ञ म्हणून त्यांना दीर्घ अनुभव असला, तरी विद्यापीठाच्या प्रशासनाचाही अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. विद्यापीठ आणि महाविद्यालय विकास मंडळाचे संचालक म्हणून सध्या ते कार्यरत होते. त्यामुळे महाविद्यालयांची अवस्था आणि दशा, विद्यापीठातील विविध विभागांचे प्रश्न आणि त्याबाबतची कार्यवाही याची त्यांना चांगली जाण आहे. नागपूरजवळील एका खेडय़ात प्राथमिक शिक्षणाची सुरुवात करताना डोक्यावर पुस्तके घेऊन नदी पार करण्याचे कष्ट त्यांनी उपसले होते. ज्ञानार्जनासाठी कराव्या लागणाऱ्या कष्टांची जाणीव असलेला हा माणूस शिक्षणासाठी दिल्लीत गेला, तेव्हा त्याचे आयुष्य सर्वार्थाने बदलले.
तरीही पाय जमिनीवरच ठेवण्यात त्यांना यश मिळाले. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे विद्यार्थी असलेले डॉ. गाडे संयमशील व शांत स्वभावाचे म्हणून प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्र अकॅडमी ऑफ सायन्सेसचे फेलो, लुपिन पारितोषिकाचे मानकरी, केंद्रीय विज्ञान संस्थेतील मान्यताप्राप्त वैज्ञानिक म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळावर काम करत असतानाही बायोटेक्नॉलॉजीमधील नव्या आणि समाजाभिमुख संशोधनाकडे ते आवर्जून लक्ष देतात. विज्ञानातील मूलभूत संशोधनाच्या परंपरेत त्यांनी आजवरकेलेले संशोधन मान्य झाले असले, तरी ते सुरू ठेवणे त्यांच्यासाठी अधिक महत्त्वाचे असते. परीक्षा आयोजित करणारी यंत्रणा असे जे विद्यापीठांचे स्वरूप झाले आहे, त्याला छेद देऊन नवे अधिक दमदार वातावरण निर्माण करण्यासाठी डॉ. गाडे यांचा अनुभव उपयोगी पडू शकतो. सर्वाना बरोबर घेऊन विद्यापीठाला उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात अधिक भरीव कामगिरी करण्यास ते उद्युक्त करतील अशा विश्वासानेच त्यांचे अभिनंदन करायला हवे.
---------------------------------------------------------------------------------------------------
डॉ. वासुदेव गाडे
डॉ. वासुदेव गाडे यांच्या रूपाने पुणे विद्यापीठाला अखेर कुलगुरू मिळाला. अभ्यासाची आणि संशोधनाची वृत्ती जोपासणाऱ्या कुलगुरूंची मोठी परंपरा या विद्यापीठाला आहे. डॉ. गाडे यांच्या नियुक्तीने ही परंपरा कायम राहिली आहे. ते उत्तम शिक्षक आणि संशोधकही आहेत. विद्यापीठाच्या प्रशासनाचाही त्यांना अनुभव आहे. पुणे विद्यापीठाच्याच 'महाविद्यालय आणि विद्यापीठ विकास मंडळा'चे (बीसीयूडी) संचालकपद त्यांनी यशस्वीपणे सांभाळले आहे. विद्या-पीठाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या व विद्यापीठाला थेट विद्यार्थ्यांशी जोडणाऱ्या या विभागात काम केल्याने त्यांना विद्यापीठाचा विस्तार आणि आवाका यांची कल्पना आहे. विद्यार्थ्यांसाठी विशेष संशोधन शिष्यवृत्ती लागू करण्या-पासून अनेक महत्त्वाचे निर्णय त्यांनी या पदावर असताना घेतले. 'लाइफ सायन्स' विषयात डॉक्टरेट असलेल्या डॉ. गाडे यांनी नागपूर विद्यापीठातून जीवशास्त्रातून बी.एस्सी. केल्यावर पदव्यु-त्तर शिक्षणासह पुढील संशोधन त्यांनी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात केले. एम.एस्सी., एम.फिल. व पीएच.डी. त्यांनी तेथेच संपादन केली. 'पोस्ट डॉक्टरल फेलो' म्हणून फ्रान्स आणि स्वीडनमध्ये दोन वषेर् संशोधनाचा अनुभव त्यांच्या नावावर जमा आहे. दिल्ली येथील केंदाच्या 'सीएसआयआर'च्या 'इन्स्टिट्यूट ऑफ जिनॉमिक्स अँड इंटिगेटिव्ह बायोलॉजी' प्रयोगशाळेत २० वषेर् शास्त्रज्ञ म्हणून सेवा बजावल्यावर २००३मध्ये पुणे विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान विभागात ते रुजू झाले. प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळतानाच डॉ. गाडे यांनी आपल्या संशोधन-कार्यात खंड पडू दिला नाही. बायो-नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये केलेल्या सर्जनशील संशोधनाबद्दल त्यांच्या नावावर काही पेटंट जमा आहेत. 'सेंटर फॉर मटेरिअल्स फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी' (सी-मेट) संस्थेतील शास्त्रज्ञांच्या सहकार्याने केलेल्या संशोधनात एका नवीन नॅनॉ मटेरिअलचा शोध लावण्यात त्यांना यश मिळाले. कुलगुरूंच्या शैक्षणिक-व्यावसायिक अनुभवाचा परिणाम विद्यापीठाच्या ध्येय-धोरणांवर होणे स्वाभाविक असते. डॉ. गाडे यांचे कार्यक्षेत्र हे मूलभूत विज्ञानाचे असल्याने, मूलभूत विज्ञानातील उपेक्षित विषयांना नवसंजीवनी देण्यासाठी आता ते विशेष प्रयत्न करणार आहेत. गेल्या काही वर्षांत पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंनी इतरत्र मिळालेल्या संधींमुळे कार्यकाल पूर्ण केलेला नाही. आपण कोठेही न जाता हा कार्यकाल पूर्ण करू, असे डॉ. गाडे यांनी स्पष्ट केले आहे. नवी दिशा देण्याचा प्रयत्न करीत विद्यापीठाचा गाडा यशस्वीपणे हाकावा, यासाठी त्यांना शुभेच्छा.
------------------------------------------------------------------------------------------------------
गाडे, (डॉ.) वासुदेव
'लाइफ सायन्स' विषयात डॉक्टरेट असलेल्या डॉ. वासुदेव गाडे यांनी नागपूर विद्यापीठातून जीवशास्त्रातून बी.एस्सी. केल्यावर पदव्युत्तर शिक्षणासह पुढील संशोधन त्यांनी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात केले. एम.एस्सी., एम.फिल. व पीएच.डी. ही पदवी त्यांनी तेथेच संपादन केली. 'पोस्ट डॉक्टरल फेलो' म्हणून फ्रान्स आणि स्वीडनमध्ये दोन वर्षे संशोधनाचा अनुभव त्यांच्या नावावर जमा आहे.
दिल्ली येथील केंदाच्या 'सीएसआयआर'च्या 'इन्स्टिट्यूट ऑफ जिनॉमिक्स अँड इंटिगेटिव्ह बायोलॉजी' प्रयोगशाळेत २० वर्षे शास्त्रज्ञ म्हणून सेवा बजावल्यावर २००३ मध्ये पुणे विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान विभागात ते रुजू झाले. प्रशासकीय जबाबदार्या सांभाळतानाच डॉ. गाडे यांनी आपल्या संशोधन-कार्यात खंड पडू दिला नाही. बायो-नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये केलेल्या सर्जनशील संशोधनाबद्दल त्यांच्या नावावर काही पेटंट जमा आहेत. 'सेंटर फॉर मटेरिअल्स फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी' (सी-मेट) संस्थेतील शास्त्रज्ञांच्या सहकार्याने केलेल्या संशोधनात एका नवीन नॅनो मटेरिअलचा शोध लावण्यात त्यांना यश मिळाले.
डॉ. वासुदेव गाडे हे उत्तम शिक्षक आणि संशोधकही आहेत. विद्यापीठाच्या प्रशासनाचाही त्यांना अनुभव आहे. पुणे विद्यापीठाच्याच 'महाविद्यालय आणि विद्यापीठ विकास मंडळा'चे (बीसीयूडी) संचालकपद त्यांनी यशस्वीपणे सांभाळले आहे. विद्यापीठाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणार्या व विद्यापीठाला थेट विद्यार्थ्यांशी जोडणार्या या विभागात काम केल्याने त्यांना विद्यापीठाचा विस्तार आणि आवाका यांची कल्पना आहे. विद्यार्थ्यांसाठी विशेष संशोधन शिष्यवृत्ती लागू करण्यापासून अनेक महत्त्वाचे निर्णय त्यांनी या पदावर असतानाच घेतले.
पुणे विद्यापीठाचे कुलगुरुपद त्यांच्याकडे चालून आले. कुलगुरूंच्या शैक्षणिक-व्यावसायिक अनुभवाचा परिणाम विद्यापीठाच्या ध्येय-धोरणांवर होणे स्वाभाविक असते. डॉ. गाडे यांचे कार्यक्षेत्र हे मूलभूत विज्ञानाचे असल्याने, मूलभूत विज्ञानातील उपेक्षित विषयांना नवसंजीवनी देण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.
(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)
गणेश प्रभाकर प्रधान (ग प्र प्रधान) हे समाजवादी विचारवंत, राजकारणी व मराठी भाषेमधील लेखक होते.
ज्या काळात स्त्रीयांनी कलेच्या क्षेत्रात विशेषत: नाटक व चित्रपटांमध्ये म्हणजे अगदी बोलपटांमध्ये सुध्दा अर्थात १९३०च्या दशकात, पण अश्यावेळी काही महिला कलाकारांनी या क्षेत्रात कारकीर्द घडवण्याचे धाडस दाखवले त्यापैकीच एक महत्त्वाचे नाव म्हणजे अभिनेत्री लीला चिटणीस यांचे. लीला चिटणीस यांचा जन्म कर्नाटकातील धारवाड येथे ९ सप्टेंबर १९०९ झाला होता. त्यांचे मूळचे नाव लीला नगरकर. नागपूर विद्यापीठाची पदवी संपादन केल्यानंतर त्याच वर्षी “उसना नवरा” या नाट्यमन्वंतरच्या नाटकात मालतीच्या भूमिकेने त्यांनी रंगभूमीवर प्रवेश केला. त्यानंतर “आंधळ्याची शाळा” मध्येही त्यांनी बिंबाची भूमिका साकारली होती. लीला चिटणीस यांचे वडील हे पुरोगामी विचारांचे, उच्च विद्याविभूषित व ब्रम्हो समाजाचे पुरस्कर्ते होते. समाजाच्या विरोधाला व बंधनांना न जुमानता लिला नगरकर यांनी डॉ.चिटणीस या गृहस्थांसोबत प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतला आणि अश्या प्रकारे लिला नगरकर या लिला चिटणीस झाल्या.
लिला चिटणीस यांच्या कारकीर्दीच्या दृष्टीने ज्यामुळे इतिहास घडला तो टप्पा म्हणजे, “लक्स”या विख्यात साबणाच्या जाहिरातीत झळकून या ब्रॅंडसाठीच्या पहिल्या भारतीय मॉडेल ठरल्या.
रुपेरी पडद्यावर लीला चिटणीस यांनी रोमॅन्टिक तर कधी बुजर्या व बावळट भूमिका साकारल्या. त्यांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केले १९३५ च्या “सत्यनारायण” या चित्रपटातून ! त्यापाठोपाठ म्हणजे १९३० च्या उत्तरार्धात लिला चिटणीस यांच्या कलाक्षेत्राची कमान १९८०च्या उत्तरार्धा पर्यंत अगदी अखंडरित्या चढती राहिली.प्रभात चित्र, “रणजीत मुव्हीटोन”, “बॉम्बे टॉकीज” सारख्या अनेक नामांकीत फिल्म कंपनीच्या निर्मिती असलेल्या चित्रपटांसाठी लिला चिटणीस यांनी अभिनेत्री म्हणुन काम केले. या काळात लिला चिटणीस यांनी अनेक चित्रपटातून नायिका, सहनानिका तर कधी चरित्र व्यक्तीरेखा साकारल्या . “धुवाँधार”, “छाया”, “वहाँ ”, “ इंसाफ ”, “राजा गोपीचंद”, “जेलर”, “छोटे सरकार”, “संत तुलसीदास”, “कंगन”, “छोटीसी दुनीया”, “घर की रानी”, “रेखा”, “बंधन”, “आज़ाद”, “अर्धांगी”, “कांचन”, “घर घर की कहानी”, “सौदामिनी”, “हरिदर्शन”, “माँ ”, “नया दौर”, “पोस्टबॉक्स ९९९”, “मैं नशेमे हूँ ”, “काला बाज़ार”, “दुल्हन एक रात की”, “हम हिंदुस्तानी”, “गंगा जमुना”, “धर्मपुत्र”, “जीवन मृत्यू”, “भाई-भाई”, “बडी दीदी”, “औरत”, “वक्त”, “सत्यम् शिवम् सुंदरम्”, “दिल तुझको दिया” हे लिला चिटणीस यांच्या कारकीर्दीतील मुख्य चित्रपट; त्या काळात, लीला चिटणीस आपल्या चित्रपटातली गाणी स्वत:च गायच्या आणि त्या गाण्यावर त्या अशा काही धमाल नृत्य करायच्या की लोक त्यांचा तो नाच पाहून अक्षरश: घायाळ व्हायचे. “झूला” चित्रपटातल्या “हिंडोले कैसे झूलू...” व “झूलो के संग...” ही दोन गाणी म्हणजे मूर्तीमंत उदहारण होय.
अशोककुमार यांचा अभिनयातील आत्मविश्वास वाढविण्यात लीला चिटणीस यांचा फार मोठा हातभार आहे. नायिकेच्या भूमिकेत यशस्वी होत असतानाच त्यांनी “शहीद” मध्ये दिलीपकुमारच्या आईची भूमिका स्वीकारत आपल्या धाडसी वृत्तीची झलक दाखविली. दिलीप-राज-देव आनंद या रुपेरी पडद्यावर सर्वात यशस्वी त्रिकुटाची लीला चिटणीस पडद्यावरची यशस्वी आई ठरली. वात्सल्यसिंधू आईचे एक उदात्त, पण प्रसन्न व्यक्तिमत्त्व म्हणून लीला चिटणीस या रुपेरी पडद्यावरील एक अजरामर कलाकार म्हणून कायमच स्मरणात राहतील.
अनंत काणेकरांचे फार्स हे नाटक रंगभूमीवर आणण्याचे श्रेयही लिला चिटणीस यांना जाते. त्यांचे दुसरे पती ग्वालानी ह्यांच्या सहकार्याने एक चित्रपटसंस्था काढून “कंचन” आणि “किसीसे ना कहना” ह्या चित्रपटांच्या कथा, तसेच प्रमुख भूमिका, दिग्दर्शन आणि निर्मितीची बाजू देखील त्यांनी सांभाळली.
त्याचबरोबर “एक रात्र आणि अर्धा दिवस” या नाटकात देखील लिला चिटणीस यांनी भुमिका साकारली आहे
लीला चिटणीस यांनी “चंदेरी दुनियेत” हे आत्मचरित्र देखील लिहिले आहे.
लिला चिटणीस यांचा आयुष्यातील उत्तरार्ध अमेरिकेत त्यांचा मुलांकडे व्यतित झला होता. १४ जुलै २००३ या दिवशी वृध्दापकाळाने वयाच्या ९३व्या वर्षी त्यांचे निधन झाले
(लेखन व संशोधन - सागर मालडकर)
लिला चिटणीस यांच्यावरील मराठीसृष्टीवरील लेख.
मराठी अभिनेत्री लीला चिटणीस (17-Jul-2017)
जेष्ठ हिंदी-मराठी अभिनेत्री लीला चिटणीस (9-Sep-2017)
जेष्ठ हिंदी-मराठी अभिनेत्री लीला चिटणीस (9-Sep-2018)
डॉ. श्रीराम अभ्यंकर हे प्रख्यात गणितज्ञ होते. ते उत्तम शिक्षक, मराठी भाषाप्रेमी आणि भास्कराचार्य प्रतिष्ठानचे संस्थापक होते.
लोकमत समूहाचे अध्यक्ष आणि मुख्य संपादक. श्री दर्डा हे राज्यसभेचे खासदार आहेत.
आपण स्वच्छ राहतो. आपले घर स्वच्छ ठेवतो आणि कचरा घराबाहेर कुठेही टाकतो. सार्वजनिक स्वच्छतेबाबत आपली अनास्था ठळकपणे दिसते. ही अनास्था संत गाडगेबाबांनी ओळखली आणि स्वच्छतेसाठी हाती खराटा घेतला. त्यांचा औरंगाबादचे खंडुजी गायकवाड यांनी घेतला आहे. अनेक नाटकांचे लेखन, अभिनय यात लोकप्रियता मिळवूनही लोककलेच्या माध्यमातून संत गाडगेबाबा यांचे स्वच्छता अभियान महाराष्ट्रा बरोबरच राज्याबाहेरही पोहचविण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.
स्वच्छतेचा संदेशयात्री
वसंत वैद्य प्रकाशझोतात आले ते त्यांच्या खुमासदार लेखनशैलीमुळे. प्रयोगशील लेखकाप्रमाणे एक अत्यंत हळव्या मनाचे व सृजनशील कवी म्हणूनही ते रसिकांच्या आठवणींमध्ये मिसळून गेले.
प्रत्येक कलावंत हा तोंडाने नाही तर त्याच्या कलेतून बोलत असतो. त्याच्या तत्वांना, भावनांना, व आयुष्यभर जोपासलेल्या स्वप्नांना तो कलेच्या सौंदर्यामध्ये घोळवत असतो, मुर्तरूप देत असतो, त्यांना एका अर्थाने जीवंतच करत असतो. खळबळलेला समुद्र जसं आपल्या मनातलं वादळ व्यक्त करण्यासाठी लाटांचा आधार घेतो, त्याप्रमाणे कलावंत आपल्या कलेतून ही तळमळ रसिकांसमोर मांडत असतो. पायामधील पैंजण ज्याप्रमाणे हळुवार वाजुन पावलं कुठे चालली आहेत याची जाणीव करून देतात, त्याप्रमाणे कलाकाराच्या मनाचा थांगपत्ता हा त्याच्या कलेच्या अविष्कारामधून केवळ दर्दी रसिकांनाच लागु शकतो.
दिलीप वेंगसरकर यांचा जन्म ६ एप्रिल १९५६ रोजी महाराष्ट्र राज्यात राजापूर येथे झाला. भारतीय क्रिकेट खेळाडू आणि व्यवस्थापक म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांच्या काळात अतिशय वैशिष्ट्यपूर्ण शैली असलेले फलंदाज म्हणून ते प्रसिद्ध होते. अतिशय तडाखेदार आणि उत्तम फटके मारणारे फलंदाज म्हणून ते गौरविले गेले होते.
Copyright © 2025 | Marathisrushti