महाराष्ट्राच्या विधानसभेत पाचव्यांदा निवडून जातानाच केज मतदारसंघातील आमदार विमल मुंदडा जगण्याशी लढाई देत होत्या. आजारपणामुळे केवळ उमेदवारी अर्ज भरण्यापुरतेच त्यांचे दर्शन झाले. त्यानंतर त्या जवळजवळ दुप्पट मतांनी निवडून आल्या, पण निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचे पत्र घेण्यासही त्या जाऊ शकल्या नाहीत.
सतत पाच वेळा विधानसभेवर निवडून गेलेल्या मुंदडा यांच्या निधनाने त्यांच्या मतदारसंघातीलच नव्हे, तर त्यांच्या मोठय़ा सामाजिक परिवारातील सर्वानाच दु:ख होणे स्वाभाविक आहे. मतदारसंघाशी नाळ जुळणे याचा अर्थ विमल मुंदडा यांना समजला होता. सत्ताविसाव्या वर्षी त्यांनी पहिली निवडणूक लढवली, तेव्हा त्या भाजपचे मुंडे यांच्या गटात होत्या. दोन वेळा भाजपकडून त्यांना विजय मिळाला, परंतु मंत्रिपद मिळाले नाही. त्यानंतर तीन वेळा त्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून विजयी झाल्या. या काळात १९९९ पासून २००९ पर्यंत त्या मंत्रिमंडळात राहिल्या.
मतदारसंघातील प्रश्न समजून घेऊन ते सोडवण्यासाठी त्या सतत प्रयत्नशील असत. परंतु त्याहीपलीकडे आपल्या मतदारांचा जो विश्वास त्यांनी कमावला होता, तो कोणत्याही राजकीय व्यक्तीला हेवा वाटण्यासारखा होता. वसुंधरा महिला सहकारी बँक आणि वसुंधरा सेवा प्रतिष्ठान या संस्थांची त्यांनी उभारणी केली. मंत्रिपदाच्या काळात राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले.
व्यक्तिगत जीवनातील अनेक धक्के सहन करता करता त्यांनी सामाजिक क्षेत्रातील कार्य मात्र जोमाने सुरू ठेवले होते. राजकीय जीवनात येणाऱ्या अनेक छोटय़ा मोठय़ा वादळांना तोंड देण्यासाठी आवश्यक असणारी खंबीरता त्यांच्यापाशी होती. सतत कार्यमग्न राहून मतदारांना आपलेसे करण्याची त्यांची हातोटी कौतुकास्पद होती. अनुसूचित जातीतून डॉक्टर झालेल्या त्या काळातील अगदी मोजक्या व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश होता. वैद्यकीय व्यवसाय करण्याऐवजी राजकीय क्षेत्रात काम करायचे ठरवले आणि त्यात काम करता आले, याबद्दल त्या नेहमीच समाधान व्यक्त करीत. त्यांच्या निधनाने एका उमद्या राजकीय व्यक्तीचा अंत झाला आहे.
दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणार्या कमलाबाई ओगले यांचा जन्म १६ सप्टेंबर १९१३ रोजी झाला.
कमलाबाई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा ‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले॰ हे पुस्तक किर्लोस्करांनी प्रकाशित केले॰ या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली॰
केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले॰ मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले॰
त्यांनी पृथ्वीची ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका अशी दोन्ही टोके गाठली॰ ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली.
कमलाबाई ओगलेंवरील संपूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
दोन लाख सुनांची आई - कमलाबाई ओगले
## Kamalabai Ogle
दोन वर्षांपूर्वी लक्ष्मीकांत देशमुख यांची कोल्हापूरचे जिल्हाधिकारी म्हणून ज्यावेळी नेमणूक झाली, त्यावेळी जिल्ह्यातल्या
स्त्रीभ्रूण हत्येचं प्रमाण कमालीचं वाढलं होतं. साहित्याची जाण असलेला, संवेदनशील प्रशासकीय अधिकारी जिल्ह्याला लाभल्याने सामाजिक विषयांमध्ये त्यांना रस असणार हे स्पष्ट होतं. कारभार हाती आल्यावर देशमुखांनी कामही जोरकसपणे सुरू केलं. त्यांनी निग्रह केला तो जिल्ह्यातली स्त्रीभ्रूण हत्या रोखण्याचा. त्यावेळी कोल्हापूरची स्त्री-पुरुष सरासरी होती हजारांला अवघी ८३९. त्यासाठी देशमुखांनी पहिलं कॅम्पेन जाहीर केलं ते ‘सेव्ह द बेबी गर्ल’ अर्थात ‘लेक लाडकी’. त्यासाठी त्यांनी खास वेबसाइट सुरू केली. पुढच्या दीड महिन्यांत जिल्ह्यातली सर्व सोनोग्राफी सेंटर्स ऑनलाइन जोडली गेली. पहिल्यांदा अनेक डॉक्टरांनी याला विरोध केला. परंतु अनेक बैठका घेतल्यानंतर हा विरोध मावळला. सर्व सेंटर्सना त्यांनी केलेल्या सोनोग्राफींची माहिती नोंदीच्या स्वरूपात साठवण बंधनकारक करण्यात आलं. त्यामुळे सोनोग्राफीचा संपूर्ण जिल्ह्यातला दोन हजारांचा आकडा वाढून ११ हजारांवर गेला. कोणतं सेंटर सोनोग्राफी करतं, का करतं हे थेट प्रशासनाला कळू लागलं.
मुळच्या पुण्यातील असलेल्या डॉ.रेवा नातू यांचे वडील पं. विनायक फाटक हे प्रसिद्ध तबलावादक असल्याने त्यांचे संगीत शिक्षण घरातूनच झाले. दत्तोपंत आगाशे, पं. शरद गोखले आणि डॉ. दिग्विजय वैद्य यांच्या कडून त्यांनी संगीताचे शिक्षण केले. त्यांनी काही काळ मा.वीणा सहस्त्रबुद्धे यांच्या कडे संगीताचे शिक्षण घेतले. त्यांनी एसएनडीटी महाविद्यालयातून संगीतात एम.ए व पी.एच.डी केली व प्रथम क्रमांक मिळविला. अखिल भारतीय गांधर्व विद्यालय, पुणे मार्फ़त त्यांनी संगीताचार्य ही पदवी मिळविली. यामध्ये सर्वाधिक गुण मिळवत टी. डी. जानोरकर पुरस्कार आणि ललकारी यांसारख्या नऊ पुरस्कारावर मोहोर उमटविली. रेडियोवर संगीत कलाकार म्हणून त्या कार्यरत आहेत. सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सव मध्येही डॉ. रेवा नातू कायम गायन करत असतात. कामगिरी उल्लेखनीय अशी आहे. हसले मनी चांदणे‘ या कार्यक्रमातून प्रसिद्ध गायिका माणिक वर्मा, ज्योत्सना भोळे, किशोरी आमोणकर या दिग्गज गायिकांच्या गायलेली दुर्मिळ गीते डॉ. रेवा नातू सादर करतात. तिन्ही गायिकांच्या आवाजातील नजाकत, रागदारीवरील हुकूमत, त्यांच्या गीतांतील सौंदर्याचे तंतोतंत दर्शन डॉ. रेवा नातू घडवितात. ऑल इंडिया रेडियो मध्ये शास्त्रीय संगीत स्पर्धेत पहिल्या क्रमांकावर येऊन राष्ट्रीय शिष्यवृत्ती त्यांनी संपादन केलेली आहे तसेच नेहरू सेंटर, मुम्बई आयोजित भारत डिस्कव्हरी स्पर्धेमध्ये त्या विजेत्या झालेल्या आहेत. विष्णु दिगंबर पलुस्कर पुरस्कार, पं.विनायकबुवा पटवर्धन पुरस्कार, २०१५ चा इंद्रधनु सुधीर फड़के युवोन्मेष पुरस्कार, ललकार पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. डॉ. रेवा नातू यांच्या कान्हा, तराना,गणेश सहस्त्रनाम अशा सी.डी पण प्रकाशित झाल्या आहेत.
डॉ. रेवा नातू यांचे गायन
https://www.youtube.com/watch?v=Ip4caZ3Kj7U
https://www.youtube.com/watch?v=f7hf5QnYDog
https://www.youtube.com/watch?v=DY1LO_a8l0I
https://www.youtube.com/watch?v=lMUvf-OzKKA
https://www.youtube.com/watch?v=mjvqDGf1Dp4
#Dr.RevaNatu
हिंदुस्तानी शास्त्रीय गायनातील ग्वाल्हेर घराण्याच्या ख्याल शैलीतील बंदिशींच्या माध्यमातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवणा-या एक प्रयोगशील गायिका नीला भागवत यांचा जन्म २९ नोव्हेंबर १९४२ रोजी पुणे येथे झाला.
कृष्णराव पंडीत व शरच्चंद्र आरोलकर हे त्यांचे गुरु. त्यांची मीराबाई व कबीराच्या भजन गाण्याबद्धल विशेष प्रसिद्ध आहेत. जयपूर आणि ग्वाल्हेर अशा दोन्ही घराण्यांमधली गायकी त्या शिकल्या, ती आत्मसात केली आणि अवलंबलीही, मात्र ग्वाल्हेर घराण्याच्या ख्याल (खयाल-कल्पना) गायकीमध्ये त्या मनापासून रमल्या. ग्वाल्हेर घराण्यात बोलाला सर्वाधिक महत्त्व आहे. बोलात सगळंच अंतर्भूत असतं, या कल्पनेनं झपाटलेल्या नीला यांनी ख्यालाचा मूळ पिंड कधीच सोडला नाही. त्या व्यवसायाने प्राध्यापक व भाषांतर कार आहेत. आजही पारंपरिक गायिकीसोबतच जीवनातील अनुभव बंदिशींमधून मांडत नवता, प्रयोगशीलताही त्या जपत आहेत. शास्त्रीय रागांसह ‘पियानो’सारख्या पाश्चिमात्य वाद्याबरोबरही त्या जितक्या एकरूप होतात, तितक्याच परदेशी मूकबधिर मुलांना गायन शिकवतानाही होतात.
संत कबीर, मीराबाई, चोखामेळा, संत तुकाराम, महात्मा फुले ते अगदी महात्मा गांधी यांसारख्या संत आणि महापुरुषांच्या विचारांवर, काव्यांवर बंदिशी बांधून त्यांचं सांगीतिक चित्र समाजापुढे मांडत आहेत. आज वयाच्या पंच्याहर्या वर्षीही नीला भागवत यांचा नवनिर्मितीचा, सृजनशीलतेचा उत्साह कायम आहे. त्यांना एसएनडीटी विद्यापीठ आणि वायएमसीए संस्था यांच्यातर्फे ‘कॉन्ट्रिब्युशन टू विमेन्स कल्चर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच
केंद्र सरकारतर्फे संगीतातील संशोधनासाठी मानद शिष्यवृत्ती त्यांना देण्यात आली आहे.
नीला भागवत यांचे साहित्य.
मोनोग्राफ ऑन कृष्णराव शंकर पंडित (१९९२)
तिहाई (कवितासंग्रह) (१९९२-९३)
कबीर गाता गाता (२००४)
शरच्चंद्र आरोलकर – लेणे प्रतिभेचे (२०१२)
https://www.youtube.com/watch?v=0WLgyPkL5dI
https://www.youtube.com/watch?v=Ukghy6LIqlA
#NeelaBhagwat
कवी, पत्रकार, संपादक आणि मराठी गझल साहित्याचे मानदंड समजले जाणारे गझलकार सुरेश श्रीधर भट. १५ एप्रिल १९३२ रोजी अमरावती येथे सुरेश भटांचा जन्म झाला. शिक्षण अमरावती येथे झाले. बी. ए. ची पदवी त्यांनी विदर्भ महाविद्यालय येथून प्राप्त केली. त्यानंतर अनेक वृत्तपत्रातून ते लिखाण करू लागले. तरुणभारत, लोकसत्ता इ. वृत्तपत्रातून वार्ताहर म्हणून त्यांनी काम पाहिलं. ‘बहुमत’ या साप्ताहिकाचे ते काही वर्ष संपादकही होते.
मोठ्या वृक्षाच्या सावलीत छोटी रोपं आपली वाढ हरवून बसतात, असं म्हणतात! पण केळीची जनरीतच वेगळी. तिच्या गाभ्यातूनच नवी केळ जन्मला येते, तिचंच रंगरूप घेऊन. अरुणा ढेरे यांचं अस्तित्व असं आहे. त्याही थेट आपल्या वडिलांचेच गुण घेऊन जन्माला आल्या आहेत.
अलीकडेच डॉ. रविन थत्ते यांचा प्लास्टिक सर्जन असोसिएशनने ‘जीवन गौरव’ पुरस्कार देऊन गोवा येथे सन्मान केला. डॉ. थत्ते हे एक अद्भूत रसायन आहे. काही माणसे सामाजिक बांधिलकीचा वसा घेऊन जन्माला आलेली असतात. अशा मंडळींमध्ये कामाची प्रचंड ऊर्जा असते. एखाद्या विषयात ते आयुष्यभर निस्वार्थ बुद्धीने व अथकपणे काम करत असतात.
वयाच्या ७२ व्या वर्षीही त्यांचा काम करण्याचा उत्साह कोणालाही थक्क करणारा आहे. प्लास्टिक सर्जन (सुघटन शल्य चिकित्सक) असलेल्या डॉ. थत्ते यांनी प्लास्टिक सर्जरीमध्ये मूलभूत संशोधन केले आहे, तसेच ज्ञानेश्वरीचाही प्रचंड अभ्यास केला आणि ज्ञानेश्वरीचे इंग्रजीत भाषांतरही केले. इंग्रजीत त्यांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीच्या तीन आवृत्त्या हातोहात खपल्या असून त्यातून मिळालेला पैसा हा त्यांनी सामाजिक कामासाठी दिला आहे. सध्या शेक्सपिअरच्या ‘हॅम्लेट’चे मराठीत भाषांतर करण्याचे त्यांचे काम सुरू आहे. डॉ. थत्ते यांचा साराच प्रवास अद्भूत म्हणावा लागेल.
वडील सरकारी नोकरीत असल्यामुळे भटकंती कायमचीच मागे लागली होती. परिणामी १६ शाळांमधून त्यांचे शिक्षण झाले. मराठी, गुजराथी आणि उर्दू शाळांमधून त्यांचे शिक्षण घेतले असून डॉक्टर बनण्याची ओढ प्रथमपासूनच होती. मुंबई महापालिकेच्या शीव रुग्णालयात तब्बल ४५ वर्षे ते प्लास्टिक सर्जरी विभागात काम करत होते. विभागप्रमुख म्हणून निवृत्त झाल्यानंतरही त्यांनी शस्त्रक्रिया व प्लास्टिक सर्जरीमधील संशोधन चालूच ठेवले आहे.
एडिंबराच्या ‘रॉयल कॉलेज ऑफ सर्जरी’ने त्यांची संशोधन चिकित्सक वृत्ती तसेच प्लास्टिक सर्जरीतील नवा दृष्टिकोन लक्षात घेऊन त्यांना एफआरसीएस पदवी दिली होती. अमेरिकेतील फुलब्राइट स्कॉलरशीप मिळवणारे ते पहिले भारतीय डॉक्टर आहेत. ब्रिटिश असोसिएशन ऑफ प्लास्टिक सर्जनच्या नियतकालिकाच्या पहिल्या पन्नास वर्षांच्या इतिहासात सर्वाधिक शोधनिबंध लिहिल्याबद्दल त्यांना असोसिएशनचे मानद सदस्यत्व बहाल करण्यात आले.
प्लास्टिक सर्जरीतील उल्लेखनीय संशोधनासाठी प्रसिद्ध होणाऱ्या सूचीमध्ये सलग पाच वर्षे डॉ. रविन थत्ते यांचे नाव प्रसिद्ध होत होते यावरून या क्षेत्रातील त्यांच्या संशोधनाची कल्पना करता येईल. त्यांच्या संशोधनाची दखल आज जगभारातील विद्यापीठांकडून घेण्यात येत असून हार्वड विद्यापीठासह जगातील आठ नामांकित विद्यापीठांमध्ये मूलभूत संशोधन या विषयावर व्याख्याता म्हणून त्यांना आमंत्रित करण्यात येते.
भारतासह विकसनशील राष्ट्रांसाठी उपयुक्त शस्त्रक्रिया पद्धती शोधल्याबद्दल त्यांना ‘मलेशियन प्लास्टिक सर्जरी असोसिएशन’नेही मानद सभासदत्व देऊ केले आहे. ४५ वर्षांत त्यांनी अनेक नामाकिंत प्लास्टिक सर्जन घडवले एवढेच नव्हे तर ग्रामीण भागातील जन्मजात व्यंग असलेल्या मुलांसाठी डेरवण येथे तब्बल एक तप काम केले. ‘टिळक रुग्णालय स्वच्छता न्यासा’ची स्थापना करून पालिकेच्या शीव रुग्णालयात स्वच्छता प्रकल्प राबविला.
दुर्देवाने प्रशासनातील उच्चपदस्थ तसेच कामगार संघटनांच्या विरोधामुळे हा प्रकल्प बंद पडला. मात्र रुग्णालय स्वच्छतेचा ध्यास असलेल्या डॉ. थत्ते यांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या मदतीतून तसेच स्वत:च्या पदराला खार लावून तब्बल ३० लाख रुपये जमा केले. यातून त्यांनी काही वर्षे रुग्णालय स्वच्छ ठेवले होते. अनेकदा स्वत: रुग्णालयातील गटारात उतरून त्यांनी सफाई केली आहे. ते राहात असलेल्या माहीम येथील समुद्र किनारा स्वच्छ राहावा, यासाठी पालिकेशी त्यांना अनेकदा दोन हात करावे लागले आहेत. सध्या प्लास्टिक सर्जरीच्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तक लिहिण्याचे काम सुरू असून जाणीव, मी हिंदू झालो, विज्ञानेश्वरी, माणूस नावाचे जगणे असे सहा ग्रंथ त्यांनी लिहिले आहेत.
अखंड उत्साहाचा धबधबा असलेल्या डॉ. रविन थत्ते यांनी माणूस म्हणून जगणे म्हणजे काय याचा एक आदर्शच घालून दिला आहे.
इंदुताई गुप्ते ह्या ठाणे शहर महिला मंडळाच्या सक्रीय सदस्या होत्या! या मंडळाच्या माध्यमातून त्यांनी शैक्षणिक, सामाजिक तसंच आर्थिक क्षेत्रांमध्ये ठाणे नगरीला प्रगतीपथावर घेवून जाणासाठी अनेक कल्याणकारी कामे केली. १९६० साली त्यांनी सिव्हील हॉस्पिटलच्या महिला डॉक्टर राजे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान केले होते. १९४९-१९५० सालापासून त्यांनी हरिजन वस्तीत जावून संक्रांतीचा हळदी कुंकू समारंभ साजरा करण्याचा, कल्पक व अभिनव प्रकल्प आखून आदिवासी महिलांच्या आयुष्यात स्वयंसिध्दतेची नवी पहाट आणण्याचा वसा त्याकाळी हाती घेतला होता.
अनेक गरजू महिलांना स्वतःच्या पायांवर उभे करण्याच्या दृष्टीने त्यांनी, त्यांच्या इतर महिला सहकार्यांसोबत इंग्रजीचे वर्ग सुरू केले. निधी गोळा करून शिवण मशिन्स विकत घेतल्या, मशिन ठेवायला जागा नसतानासुध्दा शक्य होईल तिथे मशिन ठेवून स्त्रियांना व मुलींना शिवण शिकवून शिवणाच्या परीक्षेला बसवलं, त्यामुळे अनेक महिलांना शिवणकामात पदविका प्राप्त करता आल्यामुळे व त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता आला .
दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित
Copyright © 2025 | Marathisrushti