सांगलीच्या वेलिंग्डन महाविद्यालयाचे गोविंद चिमाजी भाटे पहिले प्राचार्य होते.
गोविंद भाटे हे रायगड जिल्ह्यातील थोर महापुरुष होते. महात्मा फुले, आगरकर, महर्षी कर्वे या महान विभूतींच्या विचारांचे समर्थक होते. कर्मठ चालीरितींना त्याचा विरोध होता. त्यांनी एका विधवेशी विवाह केला होता.
१९४६ साली त्यांचा मृत्यू झाला.
## Govind Chimaji Bhate
आशुतोष गोवारीकर यांनी उमेदवारीच्या काळात सी.आय.डी.मालिकेतून शिवाजी साटम यांच्या साहाय्यकाचे काम केले. त्यांचा जन्म १५ फेब्रुवारी १९६४ रोजी झाला. अमोल पालेकरच्या 'कच्ची धूप' या मालिकेतून आशुतोष अभिनेता म्हणून लोकांना प्रथम दिसले.
पुढे त्यांनी 'होली', 'गूँज', 'कभी हां कभी ना', 'सलीम लंगडे पे मत रो' सारख्या सिनेमांत काम केले. पण त्यांना अभिनय-कारकिर्दीत घट्ट मुळे रोवता आली नाहीत. मग दिग्दर्शन क्षेत्रातले पदार्पण असलेला त्यांचा 'पहला नशा' हा त्याचा चित्रपट दणकून आपटला. त्याच्या, आमीर खान नायक असलेल्या 'बाजी'च्या दिग्दर्शनानेही बाजी मारली नाही. त्यामुळे 'लगान' हा त्याचा जीवन-मरणाचा प्रश्न बनला होता.
'लगान' ने त्यांना प्रतिष्ठा मिळवून दिली. ते दिग्दर्शक व अभिनेता म्हणून अनेक आव्हानांना खंबीरपणे सामोरा गेले. आशुतोष गोवारीकर यांनी २००१ मध्ये 'लगान' तयार केला.
आशुतोष गोवारीकर यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
http://www.marathisrushti.com/articles/ashutosh-govarikar/
# Govarikar, Aashutosh
कुंटे, सीताराम
सुबोधकुमारांनंतर मुंबई महापालिकेचे आयुक्त म्हणून नियोजन विभागाचे प्रधान सचिव सीताराम कुंटे यांची नियुक्ती झाली. सुबोधकुमार यांची कारकीर्द वादग्रस्त राहिली. सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीबरोबरच कामगार संघटना व इतरांशीही सुबोधकुमार कायम फटकून वागले. कुंटे हेही कडक शिस्तीचे असले तरी सौम्य प्रकृतीचे मनमिळाऊ अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.
राजकीय मंडळी आणि कामगार नेत्यांशी खेळीमेळीचे संबंध ठेवून गोड बोलून ते पालिकेत सौहार्दाचे वातावरण ठेवू शकतील. कुंटे हे १९८५ च्या आयएएस तुकडीतील अधिकारी. राज्य शासनाच्या सेवेत ते तब्बल २६ वर्षे असून त्यांनी सांभाळलेल्या विविध पदांपैकी ‘म्हाडा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी, गृहनिर्माण सचिव पदावरील त्यांची कामगिरी विशेष उल्लेखनीय ठरली. ग्रामीण आणि शहरी भागातील गरिबांसाठी गृहनिर्माणाच्या विविध योजना त्यांनी राबविल्या. झोपडपट्टी पुनर्विकास योजनेच्या अंमलबजावणीत गती आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. ‘महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट अॅक्ट’ मधील सुधारणांसह गृहनिर्माणविषयक कायदे व नियमांमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणांसाठी त्यांनी भरीव काम केले. बिल्डरांनी वाऱ्यावर सोडून दिलेल्या गृहरचना संस्थांना जमिनीचीही मालकी मिळावी, यासाठी ‘डीम्ड कन्व्हेयन्स’ ची तरतूद करण्यामध्ये कुंटे यांचे योगदान आहे. सनदी अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडत असताना कुंटे यांनी लाला लजपतराय विधी महाविद्यालयातून २००६ ते २००९ या काळात कायद्याची पदवी मिळविली. ‘सिरक्यूस विद्यापीठा’अंतर्गत असलेल्या मॅक्सवेल स्कूलमधून त्यांनी ‘सिटिझनशिप अॅण्ड पब्लिक अफेअर्स’ विषयात प्रमाणपत्र मिळविले, ब्रिटनच्या बर्मिगहॅम विद्यापीठामधील स्कूल ऑफ पब्लिक पॉलिसीमध्ये त्यांनी शिक्षण घेतले. अर्थशास्त्राबरोबरच प्रशासन, शासकीय धोरणे, विधी आदी बाबींचा त्यांचा गाढा अभ्यास आहे. महापालिकेत आर्थिक शिस्त आणण्यासाठी त्याचा बराच उपयोग होईल. मुंबई महापालिकेत त्यांनी याआधी अतिरिक्त आयुक्त म्हणून काम केले आहे. त्यामुळे पालिकेतील कामकाजाचा त्यांना चांगला अनुभव आहे. अर्थसंकल्पात पाणीपट्टीसह अन्य सेवांसाठी करवाढीचा बोजा टाकलेल्या मुंबईकर जनतेला ते कोणता दिलासा देतात, हे लवकरच दिसून येईल.
ते उत्तम चित्रकार ही आहेत. बेधुंद, ‘मी बाप’, ‘मेड इन चायना ‘ आणि ‘साने गुरुजी’ या चित्रपटात त्यांचा उत्कृष्ठ अभिनय बघायला मिळाला.
वैशाली बापट ह्या मुंबईत राहणार्या व स्वावलंबनाची वेगळी वाट निवडलेल्या महिला असून त्या ‘वर्धमान ग्राफिक्स’ या मालाडमधील गाजलेल्या प्रिंटींग च्या कारखान्यामध्ये आपल्या कर्तुत्वाचा व कल्पनाशक्तीचा अनोखा संगम साधीत आहेत. या कंपनीमध्ये विवीध प्रकारची बॅनर्स, कलर प्रिंट आऊट्स यांचे वैविध्यपुर्ण प्रकार बनविले जातात. या कंपनीचा आर्थिक पट उलगडायचा झाला तर 1 कोटींच्या घरात तिला या व्यवसायातून उत्पन्न मिळते, व ह्या बहारदार घौडदौडीमागे वैशाली यांच्या निरंतर कष्टांचा मोलाचा वाटा आहे.
मराठी माणसं या मासिकाचे सह-संपादक. १९७१ ची रोमांचक युद्धगाथा या पुस्तकाचे लेखक.
असे जे आपणापाशी असे , जे वित्त वा विद्या
सदा ते देतची जावे , जगाला प्रेम अर्पावे '
साने गुरुजी यांच्या ' खरा तो एकची धर्म ' या कवितेतील या ओळींचा आदर्श ठेवून दत्ता पुराणिक यांनी आपले आयुष्य वेचले . साने गुरुजींच्या विचारांचा प्रसार करण्याचे व्रत त्यांनी घेतले होते . ते त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत पाळले . गुरुजींच्या ' श्यामची आई ' या पुस्तकाच्या वीस हजारांहून अधिक प्रती घरोघरी पोहोचविण्याचा त्यांचा संकल्प गेल्या वर्षीच पूर्ण झाला होता . हा उपक्रम आणखी पाच वर्षे राबविण्याचा मानस त्यांनी त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात व्यक्त केला होता . ऐंशीव्या वर्षी असा संकल्प करुन तो तडीस नेण्यासाठी अविरत काम करणार्या पुराणिक यांच्यासारख्या व्यक्ती विरळ्याच ; पण हा संकल्प पूर्ण होण्याआधीच काळाने त्यांच्यावर घाला घातला . मात्र , तोपर्यंत त्यांनी साने गुरुजींसंबंधातील २५ हजारांपेक्षाही अधिक माहितीपत्रकांचे वाटप आणि सुमारे पाच हजार सीडींची विक्री केली होती .
पुराणिक मूळचे अमळनेरचे . १९५० मध्ये ते पुण्यात वास्तव्यास आले . साने गुरुजींचा सहवास त्यांना लाभला होता . शाळेसमोरून जाताना गुरुजी रोज विचारपूस करीत , अशी आठवण ते नेहमी सांगत . इंग्रजांच्या जाचामुळे गुरुजी काही काळ भूमिगत झाले होते . त्यावेळी त्यांची सेवा पुराणिक यांनी केली होती . त्यांचे सारे जीवनच साने गुरुजीमय झाले होते . ' श्यामची आई ' या पुस्तकाने कित्येक पिढ्या घडवल्या . आपल्या खडतर बालपणाची कहाणी सांगत आणि संवेदनशील भावविश्व उलगडत त्यावेळच्या समाजजीवनाचे चित्रण गुरुजींनी या पुस्तकात केले होते . या पुस्तकाची ओळख आणि त्याद्वारे गुरुजींच्या विचारांचा प्रसार व्हावा यासाठी हे पुस्तक पुराणिक यांनी घराघरात पोहोचविले . या पुस्तकावर ते कथाकथनही करीत असत . इंदूर येथे २००९ मध्ये झालेल्या मध्य प्रदेश मराठी साहित्य संमेलनात त्यांच्या कथाकथनाच्या कार्यक्रमाला रसिकांची दाद मिळाली होती . ' संगम रंगभूमी ' च्या माध्यमातून त्यांनी बालनाट्येही बसविली होती . पुणेकरांनी त्यांच्या या कार्याची कृतज्ञता त्यांचा सत्कार करून वेळोवेळी व्यक्त केली होती . ' हा माझा सत्कार नसून प्रत्येक आईचा सन्मान आहे ,' अशी विनम्र भावना त्यांनी एका कार्यक्रमात व्यक्त केली होती . व्यक्तिस्वातंत्र्याच्या अतिरेकाकडे जात असलेल्या आजच्या काळात प्रत्येकालाच गरज आहे , ती साने गुरुजींची आणि त्यांचे विचार घराघरांत पोहोचविणार्या पुराणिक यांचीही.
(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)
-----------------------------------------------------------------------------------
साने गुरूजींनी आपल्या संस्कारपुर्ण पुस्तकांमधून स्वातंत्र्यपुर्व भारताची पिढी घडविली होती, मातृप्रेमाने पावन झालेले अमृत, अक्षररूपांनी त्यांनी महाराष्ट्राच्या साहित्यगंगेमध्ये रूजविले होते. अशा महान साने गुरूजींचे अजरामर साहित्य दीर्घकाळाकरिता जीवंत व तजेलदार ठेविण्याची जबाबदारी अमळनेरच्या दत्ता पुराणिकांनी स्वीकारली. साने गुरूजींचा सहवास त्यांना लाभला होता. साने गुरूजींच्या विचारांनी, व त्यांच्या पुस्तकांमधून वेळोवेळी दिसून आलेल्या देशाबद्दलच्या तळमळीने तसेच काळजीने प्रेरित होवून पुराणिकांनी त्यांचे सर्व साहित्य, व ग्रंथसंपदा महाराष्ट्रात सर्व ठिकाणी अजून व्यापक स्वरूपात पोहोचावी याकरिता आपले जीवन समर्पित केले. गुरूजींच्या श्यामची आई ह्या मातेची थोरवी पटवून देणार्या, व हरवत चाललेल्या मातृप्रेमाला साद घालणार्या अप्रतिम पुस्तकाची आजच्या पिढीला नितांत गरज असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी या पुस्तकाच्या वीस हजारांहून अधिक प्रती घरोघरी पोहोचविण्याचा आगळावेगळा संकल्प त्यांनी हाती घेतला. हा संकल्प तडीस नेऊन दाखविताना त्यांनी तब्बल २० हजार पुस्तकांच्या प्रतींचे वाटप, साने गुरूजींसंबंधीच्या २५ हजार माहितीपत्रकांचे वाटप, आणि सुमारे ५ हजार सीडींची विक्री असा मोठा पल्ला पार करून दाखविला. या पुस्तकावर आधारित असलेल्या कथाकथनांची सत्रे आयोजित करणे, हेदेखील त्यांनी गुरूजींच्या विचारमंथनाकरिता निवडलेल विशेष प्रभावी माध्यम होते. उत्तम वक्तृत्वाच्या जोरावर त्यांनी अशी कित्येक सत्रे यशस्वी करून दाखविली. इंदूर येथे २००९ मध्ये झालेल्या मध्य प्रदेश मराठी साहित्य संमेलनात त्यांच्या कथाकथनाच्या कार्यक्रमाला रसिकांची उत्स्फुर्त दाद मिळाली होती. संगम रंगभूमीच्या माध्यमातून त्यांनी अनेक बालनाटये बसविली, व गुरूजींच्या विचारांना विविध कलारूपांत प्रेक्षकासमोर आणले. पुणेकरांनी त्यांच्या या कार्याचा अनेकदा सन्मानाद्वारे व सत्काराद्वारे यथोचित गौरव केला होता. 'हा माझा सत्कार नसून, प्रत्येक आईचा सन्मान आहे', या त्यांनी एका कार्यक्रमा दरम्यान केलेल्या विधानावरून त्यांची विनम्रता झिरपते. वयाच्या ऐंशीव्या वर्षापर्यंत त्यांनी गुरूजींच्या विचारांना, तत्वांना व स्वप्नांना सामान्या माणसाच्या स्पंदनांशी जोडण्याचे अतुलनीय कार्य केले. हा उपक्रम आणखी पाच वर्षे पुढे चालू ठेवण्याचा पुराणिकांचा मानस होता. परंतु ही पाच वर्षे उलटण्याअगोदरच ते पंचतत्वांत विलीन झाले.
लता मंगेशकर
आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात स्वातंत्र्यलढ्यापासून करणार्या वसंत दादांनी तब्बल चारवेळा मुख्यमंत्रीपद भूषविले.
बार्शीकर, नवनीतभाई
नवनीतभाई बार्शीकर यांच्या निधनाने नगर शहराच्या जडणघडणीचे वैभवशाली पर्वच काळाच्या पडद्याआड गेले. सार्वजनिक जीवनातून निवृत्त होऊन पंचवीस-तीस वर्षे झाल्यानंतरही शहराच्या दैनंदिन व्यवहारात पदोपदी होणारा नामोल्लेख हीच त्यांच्यातील अस्सल नगरकराची खरी ओळख होती. राजकारण, अर्थकारण आणि समाजकारण अशा सर्वच आघाडय़ांवर आपल्या कामाची पक्की मोहोर त्यांनी उमटवली. भाईंना नगर शहराची आणि नगर शहराला भाईंची ओळख चिकटली ती त्यामुळेच!
राज्याच्या राजकारणात वैशिष्टय़पूर्ण स्थान असलेल्या नगर जिल्हय़ाच्या लौकिकात मुळातच नगर शहराचे स्थान तसे दुय्यम आहे. सहकार, शेती, पाटपाण्याच्या अनुषंगाने ग्रामीण भागाचा जिल्हय़ात व राज्यातही वरचष्मा आहे. राज्याच्या पातळीवर त्याला धक्का देण्याचे काम नवनीतभाई बार्शीकर यांनी केले. नगर विकासाच्या जोरावर त्यांनी जिल्हा व राज्यातही नगर शहराची स्वतंत्र ओळख निर्माण केली. सधन घरात १३ जानेवारी १९२० ला नवनीतभाईंचा जन्म झाला. स्वातंत्र्यपूर्व काळात चळवळीत सहभागी झालेल्या भाईंनी त्या धकाधकीच्या काळातही शिक्षणाची आस सोडली नाही. पुण्यात फग्र्युसन कॉलेजमधून एम.ए. पूर्ण करून त्यांनी पुढे कायद्याचीही पदवी घेतली. भाईंना कुठल्याही स्वरूपाची राजकीय पाश्र्वभूमी नव्हती. वडिलांचा देशसेवेचा वारसा मात्र त्यांना लाभला. याच प्रेरणेतून सन ४२ च्या चलेजाव आंदोलनात ते सहभागी झाले, त्यात त्यांना सहा महिन्यांचा कारावासही भोगावा लागला. उण्यापुऱ्या ४०-५० वर्षांच्या प्रदीर्घ सार्वजनिक जीवनात त्यांना एकदाच आमदारकीची संधी मिळाली. त्याचेही त्यांनी सोने केले. १९७२ ते ७८ या काळात विविध कारणांनी विधानसभेत नगर शहराचे नाव कायम चर्चेत राहिले. विधिमंडळाच्या लोकलेखा समितीचे अध्यक्ष म्हणून काम करताना भाईंनी राज्यात ठसा उमटवला. नगर शहरात त्यांनी उभ्या केलेल्या मूलभूत सोयीसुविधांचे पुढे राज्यात अनुकरण झाले. अगदी स्मशानभूमीचे उदाहरण घेतले तरी नगरचे अमरधाम पाहून त्या धर्तीवर पुण्यात वैकुंठ स्मशानभूमीची उभारणी झाली! तब्बल ५० वर्षे शहराच्या सार्वजनिक जीवनात नवनीतभाई बार्शीकर सर्वार्थाने केंद्रस्थानी राहिले. ४० वर्षे नगरचे नगरसेवक व त्यातील १८ वर्षे नगराध्यक्ष, वीस वर्षे अर्बन बँकेचे अध्यक्ष ही त्यांची कारकीर्द. विशेष म्हणजे पक्षीय राजकारणाच्या नादी न लागता अपक्ष म्हणूनच भाईंनी प्रदीर्घ काळ नगर शहरावर शब्दश: राज्य केले. त्यांचे हे स्थान हीच नगर शहराची स्वातंत्र्योत्तर काळातील खऱ्या अर्थाने जडणघडण आहे. त्यातूनच त्यांनी स्वत:ची ‘अस्सल नगरकर’ अशी ओळख निर्माण केली आणि नगर शहरालाही आधुनिकतेची नवी ओळख दिली. त्याच्या खुणा आजही शहरात जागोजागी शाबूत आहेत. त्यांची पदोपदी आठवण काढली जाते ती याच कारणामुळे! लोकनियुक्त नगराध्यक्ष, त्या काळात एकमेव अर्थसत्ता असलेल्या नगर अर्बन बँकेचे अध्यक्ष आणि आमदार अशा तीनही संस्थांचा कारभार एकाच वेळी ताब्यात ठेवूनही भाई ‘लार्जर दॅन लाईफ’ झाले नाही. महत्त्वाच्या तिन्ही संस्थांचे सर्वेसर्वा होते तरी त्यांच्या दृष्टीने संस्था मोठय़ा होत्या. सार्वजनिक जीवनातील त्यांच्या निवृत्तीने नगर शहराच्या विकासाची परंपरा खंडित झाली, निधनाने या पर्वाचाच अस्त झाला!
Copyright © 2025 | Marathisrushti