kolumbasacha vruttant
आपल्या मराठी भाषेवर प्रेम असणे आणि तिच्या समृद्ध असण्याचा अभिमान असणे अगदी साहजिक आहे. सद्ध्या इंग्रजी भाषेच्या वाढत्या प्रभावावरून बरीच उलटसुलट चर्चा ऐकू येते, त्यावर माझे काही विचार ! कोणाच्याही भावना दुखविण्याची जराही इच्छा नाही.
पहाटेच्या दवात भिजलेली एक वाट,
क्षितिजापर्यंत पसरलेली नामाची प्रभात.
खांद्यावर भगवी पताका, ओठी विठ्ठलनाम,
पाऊलोपाऊली उमलत जाते जीवनाचे गूढ धाम.
ही वाट केवळ पंढरीकडे वळत नाही,
ती माणसाला माणसाशी जोडत राहते.
हातात हात, नजरेत विश्वास,
मनामनांतील अंतर हळू हळू कमी होतं जाते.
टाळांच्या नादात केवळ लय नसते,
ती काळजाच्या ठोक्यांची भाषा असते.
मृदंगाच्या प्रत्येक स्पंदनातून
संतविचारांचा नवा सूर जन्म घेतो.
इथे पुस्तकांची पाने उघडत नाहीत,
उघडतात अंतःकरणाची कवाडे.
इथे अक्षरांपेक्षा माणसे वाचावी लागतात,
आणि शब्दांपेक्षा अश्रू समजून घ्यावे लागतात.
पायांवरील फोड सांगतात कष्टाचे सौंदर्य,
घामाचे थेंब शिकवतात संयमाचे ऐश्वर्य.
दुःखाच्या वाटेवर चालतानाच
सुखाचा अर्थ उलगडत जातो.
दिंडीत चालताना जातपात नाहीशी होते,
अहंकार धुळीत मिसळतो.
उरते फक्त एकच ओळख
"मी वारकरी... विठ्ठल माझा."
चंद्रभागेच्या वाळूत
काळही क्षणभर नतमस्तक होतो.
विटेवरच्या सावळ्या मूर्तीकडे पाहताना
डोळे भरून येतात,
आणि अंतर्मनात प्रकाश उगवतो.
वारी म्हणजे चालतं-बोलतं विद्यापीठ
अनुभव हा गुरु,
जीवन हे पाठ्यपुस्तक,
भक्ती ही परीक्षा,
आणि पदवी मिळते माणूस झाल्याची.
जो ही वाट एकदा मनापासून चालतो,
तो पंढरीहून कधीच पूर्वीसारखा परतत नाही.
त्याच्या पावलांनी अंतर जिंकलेले नसते,
त्याच्या अंतःकरणाने विश्व कवटाळलेले असते.
विठ्ठल भेटतो विटेवर नव्हे,
तर माणसाच्या माणूसपणात.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
kishor pdf
आपलं नातं आता कॉफीपुरतं राहिलं आहे,
दोन घोटांमध्ये संपणारं, इतकंच उरलं आहे.
पूर्वी शब्दांना रात्र कमी पडायची,
आता "कशी आहेस?" इतकीच चौकशी उरली आहे.
त्या कपातून अजूनही वाफ उठते,
पण आपल्या नात्याची ऊब मात्र हरवली आहे.
साखर तशीच, चव तशीच,
फक्त सोबतची गोडी कुठेतरी विरघळली आहे.
भेटतो आपण अजूनही कधीतरी,
पण नजरेतला तो थांबलेला क्षण हरवला आहे.
आपलं नातं आता कॉफीपुरतं राहिलं आहे,
कप रिकामा झाला आणि संवादही संपला आहे.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
पाऊलोपाऊल चालत जाते,
मनामधली एक वारी,
ना टाळ, ना मृदुंग हाती,
तरी भक्तीची गोड तयारी.
रस्ता नाही धुळीचा येथे,
ना दिंडींची गर्दी भारी,
अंतर्मनाच्या शांत वाटेवर,
अखंड सुरू ईश्वराची वारी.
सुख-दुःखांचे डोंगर ओलांडत,
आशा-निराशेच्या पलीकडे सारी,
प्रत्येक श्वासात नाम गुंजते,
हीच खरी जीवनवारी.
अहंकाराचे ओझे टाकून,
प्रेमाची घेऊन शिदोरी,
करुणा, श्रद्धा, सत्य सोबती,
नेते आत्म्याला प्रभूच्या दारी.
कधी अश्रूंनी पाऊल भिजते,
कधी आनंदाची फुले फुलती,
तरी न थांबे हा अंतःप्रवास,
ओढ लागलेली पंढरीची न्यारी.
शेवट नसतो या प्रवासाला,
ना थांबे कधी ही स्वारी,
ईश्वर भेटतो अंतःकरणी,
जेव्हा पूर्ण होते मनाची वारी.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
Iran Video
Norway
e Sahitya 1
पालखीचा सोहळा । नामाचा गजर ।
पुणे झाले घर । पांडुरंगा ॥
टाळांचा तो नाद । मृदुंगाची साथ ।
हरिनामे वाट । उजळली ॥
दिंडीचा तो मेळा । प्रेमाचा सोहळा ।
भेदाभेद गेला । नामघोषे ॥
सेवा करी जन । मानिती नारायण ।
वारीचे कारण । प्रेम एक ॥
इंद्रायणी भाव । चंद्रभागा ठाव ।
विठ्ठलाचा गाव । अंतरी ॥
दोन दिवसांचा । लाभला हा योग ।
भक्तीचा संयोग । सर्वांसी ॥
धन्य पुण्यभूमी । वारकऱ्यांची माऊली ।
चरणधूळी झाली । भाग्यवंत ॥
विठ्ठल विठ्ठल म्हणे । ओलावली वाचा ।
पुण्यनगरी साचा । पंढरीचा ॥
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
Copyright © 2025 | Marathisrushti