नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा
कोणे एके काळी पृथ्वीवर डोंगरांच्या घळ्यांमध्ये तारा राजाचे राज्य होते. सर्व बाजूंनी उंचच उंच डोंगर आणि चहुबाजूंनी पसरलेलं घनदाट जंगल यामुळे इथे अंधाराचेच राज्य असायचे. राजाने आपल्या प्रजेला किमान गरजेपुरता का होईना प्रकाश देण्यासाठी म्हणून खास योजना आखली होती.
दैनिक ‘रोजची पहाट’ चे संपादक आणि विशेषांक सम्राट सूर्याजीराव रविसांडे, काका सरधोपटांची वाट पहात होते. सूर्याजीरावांचे मूळनाव ताकसांडे. ताकसांड्यांचे रविसांडे कसे झाले ह्याबद्दल, ताकसांडे ते रविसांडे या ताकसांडे घराण्याच्या इतिहास ग्रंथात सविस्तर माहिती दिली आहे. जिज्ञासूंनी तो ग्रंथ पहावा. (प्रकाशक रोजची पहाट प्रेस) तर सांगायचा मुद्दा आजच्या कथेचा आणि या इतिहासाचा काही संबंध नाही. परंतु वाचक जिज्ञासू असतात असे म्हणतात, म्हणून उल्लेख केला एवढेच. (टीप. या ग्रंथाच्या फारच थोड्या प्रती उपलब्ध आहेत त्यामुळे जिज्ञासूंनी आपली मागणी विनाविलंब नोंदवावी). आता मूळ कथेकडे वळूया.
तशी ती सॉलिड आहे ,
सगळ्यांना माहित आहे हे ,
तसे तिलाही माहीत आहे.
पण मला ती फार उशीरा खरी कळली .
एक होता मेधी राजा. मोठा भरभक्कम ताजा तवाना. रंगानं काळा. पण मोठा ऐटबाज. मनात आलं की, आभाळात उंच उंच भरारी मारायचा. धावल्या ढगांना पकडायचा. त्यांची मानगूट धरायचा. धक्काबुक्की करायचा. त्यामुळं पाऊस अवचितच पडायचा. माणसं मग, आच्यारी का विच्यारी व्हायची. ते बघून हा असा हसायचा की, दोन पर्वतांची टक्करच जणू झालीय असा दणका उडायचा! त्याच्याजवळ एक छानदार लहान पिशवी असायची. देवानं ती त्याला दिलेली होती. म्हणून ती तो आपल्या केसात लपवून ठेवायचा. पण हा खुशीत आला की, ती एकदम चकाकायची.
अशा बैलगाड्या पाहिल्या की पूर्वीची आठवण येते पूर्वी वाहने फार कमी होती. बैलगाडी किंवा सायकल असे प्रवासाचे साधन असायचे. पूर्वीची बैलगाडी व गाडीला झुंपलेली दोन बौले त्यांच्या अंगावर टाकलेले रेशमी वस्त्राचे. रंगीबेरंगी आरशाने नटलेले बैलाच्या अंगावरील झूल अतिशय सुंदर दिसायचे. गाडीत बसलेला शेतकरी त्याच्या डोक्याला बांधलेला टावेल. दोन हातात बैलांची कासरी चाबूक पाठीमागे बैलगाडी मध्ये बसलेली. लहान मुले आणि गाडीच्या पाठीमागून धावत येणारा कुत्रा ही सारी आठवण येते. लोककवी वामनदादा कर्डक यांनी आपल्या गीतातून समाजात वावरणाऱ्या अनेक लोकांचे वर्णन चांगल्या पद्धतीने लिहिले आहे. पूर्वी लोक संगीतामध्ये अनेक जुनी गाणी संगीतात कंपोज करून समाजाला ऐकवली आहेत. पूर्वी कर्मणुकीची साधने अतिशय कमी प्रमाणात होती ग्रामीण भागामध्ये भजन सोंगी भजन ठराविक गावांमध्ये नाट्य संस्था. तमाशा आणि तमाशामध्ये सादर होणारे पौराणिक किंवा सामाजिक वग नाट्य. त्याकाळी भेदिक सुद्धा होते परंतु पूर्वी लोकसंगीत लिहिणारे लोककवी यांनी अनेक चांगली गाणी समाजाला ऐकवली आहेत. ती लिहिलेली गाणी पुन्हा पुन्हा कानावरून गेली म्हणजे एक प्रकारचं नवल वाटते. त्या गाण्यांमध्ये निसर्ग वर्णन बैलगाडी व बैलाचे वर्णन नात्यातील माणसांची गाणी ही राहून राहून आठवतात उदाहरणार्थ सखुबाई सखुबाईगं, तुझा नवरा बोलाव तुयागं, तंबाखू बिंबाखू खात असलं, डब्बी त्याला घावत नसंल, जा जा येत नाही म्हणून सांग. किंवा नाही खेळणार मुंबई मटका, वामनदादा कर्डक यांनी विविध विषयावर लेखन केले आहे हे प्रामुख्यात जाणवते. भिमाई रमाई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश पडणारी कितीतरी गाणी ऐकावयास मिळतात….।

सकाळी मालकीण त्याला घेऊन बाहेर यायची. कुत्रे भुंकायचे, तोही भुंकायचा. मालकीण सपासप त्याच्या पाठीवर वेताचे सपकारे ओढायची. तो फक्त कुंईऽकुंई करुन विव्हळायचा. त्याचं ओरडणं बंदच झालं ते बहुधा कायमचं. मनातल्या मनात दु:खाचे कढ पचवणाऱ्या माणसासारखा फिरताना तो मधून मधून विव्हळताना दिसतो.
“सकाळी मला जाग आली ती दारावर कुणीतरी जोरजोरात धक्के मारत होते त्या आवाजाने. मी जागी झाले आणि मनात पहिला विचार आला तो ह्यांचा. आम्हा दोघांना एकत्र पाहिले तर आमची धडगत नाही या विचाराने माझा थरकाप झाला. मी चटकन शेजारी सूर्यकांत राजेंना उठवावे म्हणून पाहते तर तिथे कुणीच नाही! या सगळ्या विचारात एखादा क्षण गेला असेल नसेल तो पर्यंत दरवाजा आता मोडतोय की काय असे प्रचंड धक्के बसू लागले. मी घाईघाईने उठून दरवाजा उघडला तो समोर राणीसाहेब, म्हणजे माझ्या सासूबाई! त्यांनी एकदम हंबरडा फोडला आणि माझ्या अंगावर खेकसून ओरडल्या, “ही! ही! चांडाळीण, पांढऱ्या पायाची अवदसा! हिने खाल्ले माझ्या पोराला. चल चालती हो माझ्या घरातून!” असे म्हणून त्यांनी माझा हात धरला आणि मला ओढू लागल्या. लोकांनी त्यांना आवरले. खाली दिवाणखान्यातून प्रचंड रडारडीचा आवाज येत होता. मी अगदी भांबावून गेले. मला कळेना हा काय प्रकार आहे? जिन्यावरून धावत धावत खाली आले तर हॉलमध्ये पांढऱ्या चादरीत सूर्यकांत राजेंना झाकून ठेवलेले! आसपास शिकारीला गेलेली सगळी मंडळी माना खाली घालून उभी!
गावाच्या खालतुन गायरानातल्या जंगलात दोन-चार पारद्यायचे पालं पडले व्हते.पालं ठोकले की शिरस्त्यापरमाणं त्या पारद्यायनं पाटलाच्या घरी जाऊन आपली नावं नोंदवली.त्या काळात बाहेरचं कोणी गावात राह्यालं आलं की त्याची नोंद पाटलाकडं करायचे..
(इंडोनेशियन लोककथा)
इंडोनेशियन लोक म्हणतात की, फार वर्षांपूर्वी, आता जसे माणसांत व जनावरांत आपापसांत वैर आहे, तसे नव्हते. सगळेजण एकमेकांशी गुण्यागोविंदाने राहात. हे सगळे वैर एका कळीच्या नारदाने – ‘माकडाने निर्माण केले. ते कसे केले याबद्दल एक गंमतीदार गोष्ट सांगतात; ती अशी..
मला आता ‘ स्पेस ‘ ची गरज आहे. घंटा…स्पेस मी तिला म्हणालो. अरे स्पेस म्हणजे काय खरा अर्थ कळतो काय ?
Copyright © 2025 | Marathisrushti