(User Level: User is not logged in.)

कथा

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • कम्पॅनियन गोमु (गोमुच्या गोष्टी- भाग १)

    रविवारी गोमु बावाजीला खुर्चीवरून बागेंत म्हणजे सीबीडीच्या मॅंगो गार्डनमध्ये घेऊन गेला होता. तो अगदी काळजीपूर्वक खुर्ची ढकलत होता. अचानक बागेंत त्याला शकु दिसली. ती “अभ्यंकरांची शकु” अशी ओळख गोमुने मला दिली पण त्याआधीच मला ती आठवली होती. आधी आमच्या शाळेत आणि मग माझ्या कॉलेजमध्ये ब्यूटी क्वीन होती. मी आणि गोमु बालपणापासून तिला ओळखायचो. ती दिसल्यावर गोमुचं भान हरपणं साहाजिक होतं. तिच्याशी बोलतां बोलतां तो बावाजीलाच काय पण खुर्चीलाही विसरला.

  • विश्वास

    सुनीताच्या चेहऱ्यावर मनातली खुशी तरळून गेली. विश्वास आत आला. पाठीवरची सॅक हातात घेतली. कुठे बसावे हे न कळल्यामुळे तो तसाच उभा राहिला. सुनीता त्याचे निरीक्षण करीत होती. सहा फूट उंची, कुरळे केस, पिंपल्सनी भरलेला उभट चेहरा, गोरा वर्ण, सडपातळ बांधा, निळी पँट व इन केलेला पांढरा शर्ट. डोळे थोडे मोठे असते तर आपल्या अजयसारखा बराचसा दिसला असता. तिला परदेशात असलेल्या तिच्या मुलाची तीव्रतेने आठवण आली. ती म्हणाली, ‘अरे, बस ना खूर्चीवर, सामान आणलं नाहीस का तुझं? इथं राहायला आलास ना तू?’

  • माकडांची शाळा

    एक जंगल होते. त्याचे नाव होते चंपकवन. तेथे खूप झाडे, ओढे, डोंगर होते. जंगल म्हटल्यावर प्राणी होतेच. माकड, चित्ते, हरीण, वाघ, सिंह, हत्ती, लांडगे, कोल्हे इत्यादी. ते चंपकवनात अतिशय आनंदात राहत. माकडे तर खूपच धडपडी होती. नेहमीच काहीतरी करण्यात दंग असत. त्यातच सर्कशीतून पळून आलेल्या एका माकडाची भर पडली. त्याचे नाव होते ‘विचित्र ‘नावाप्रमाणेच त्याच्याअंगीसुद्धा तसेच गुण होते.

  • कठोर शिक्षा – भाग २

    “ही मी त्याला दिलेली कठोर शिक्षा” रजनीने कथा संपवली. रजनीने कथा संपवली खरी, पण कथा संपली नाहीं !

  • युगांतर – भाग ९

    सुमंत जयंत परचुरे. 

    रवींद्रची पाण्यातली हालचाल मंद होऊ लागली होती. त्याचा श्वास कमी कमी होत चालला होता. तो वाचवायला आला होता खरा त्या बाळाला, पण पाण्यात उडी मारल्या पासून तो जणू काही स्वप्नातून सत्यात उतरला होता. त्या बाळाला आणि त्या अण्णांच्या सारख्या दिसणाऱ्या व्यक्तीला त्या काळोखात शोधत होता. पण तो सोडून त्या पुष्करणी मधे बाकी कोणाचंही नामोनिशाण नव्हतं. तो आता स्वतःला वाचवायच्या स्थितीतही नव्हता, त्याचा श्वास खूपच मंद होत होता आणि तो जणू आता जलसमाधी मिळणार या स्थितीत त्या पुष्करणी च्या तळाशी त्या काळोख्या रात्री बुडत होता. तळाशी बऱ्याच वेली होत्या, गाळ बसून झालेला चिखल होता. त्याचे डोळे हळूहळू मिटत होते, हात आणि पाय आता सैल झाल्या सारखे स्तब्ध झाले होते.

  • प्रॉपर्टीचे कागद.. (तो आणि ती)

    गाडी त्या सुप्रसिद्ध हायफाय वृद्धाश्रमाजवळ थांबली.त्यातून साठ पासष्टीचा माणूस त्याची पत्नी त्याचा मुलगा सून उतरले.तिथले वातावरण पाहून त्याला खूप बरे वाटले.ऑफिसमध्ये गेला तो कोण आणि का आला ते संगितले.

  • मातृभक्त सैनिक

    एक आरमारप्रमुख होता. आपल्या आरमारातील सैनिकांनी साहसी असावे, आपली आज्ञा पाळताना कोणतेही संकटं आले तरी त्यांनी न डगमगता संकटावर मात करावी, असा त्याचा नेहमीच आग्रह असे. त्यामुळे कधी कधी तो आपल्या सैनिकांची परीक्षाही पाही. ही परीक्षा कधीकधी फार कठोरही वाटे.

    एकदा तो जहाजावरून फिरत असताना त्याला एक सैनिक दिसला. आरमारप्रमुखाने ताबडतोब त्याला समुद्रात उडी मारायला सांगितले. मात्र त्या सैनिकाला उडी मारायला थोडासा वेळ लागला. ते पाहून संतप्त झालेल्या त्या आरमारप्रमुखाने त्या सैनिकाला त्याचा कोट काढण्यास सागितले. सैनिकाने कोट काढताच आरमारप्रमुखाने तो कोट समुद्रात भिरकावून दिला.

    तेवढ्यात अचानक समुद्रात वादळ सुरू झाले मोठमोठ्या लाटा निर्माण झाल्या आणि आरमारप्रमुख नको नको म्हणत असतानाच त्या सैनिकाने त्या वादळातही समुद्रात उडी घेतली व लाटांवर तरंगत असलेला तो कोट घेऊन पुन्हा जहाजावर आला.

    आरमारप्रमुख नको नको म्हणत असतानाही त्या सैनिकाने उडी मारली होती म्हणजे एका परीने त्याने आरमारप्रमुखाचा आज्ञाभंग केला होता. हा आरमारप्रमुख कठोर शिस्तीचा भोक्ता होता. हा आज्ञाभंग तो सहन करणार नाही, असे साऱ्यांनाच वाटले. त्यामुळे इतर सैनिकांना आता आरमारप्रमुख काय करतात याबाबत कमालीची उत्सुकता वाटत होती.

    आरमारप्रमुखाला मात्र उडी मारणाऱ्या त्या सैनिकाचे आश्चर्य वाटले होते म्हणून त्याने त्याला विचारले, ' 'मी नाही म्हणत असतानाही तू वादळात उडी मारण्याचे एवढे मोठे धाडस का केलेस?''

    त्यावर तो सैनिक नम्रपणे म्हणाला, '' त्या कोटात माझ्या आईचा फोटो होता व मला जेव्हा जेव्हा आईची आठवण होते, तेव्हा तेव्हा मी तो फोटो पाहत असतो. ''

    त्या सैनिकाची मातृभक्ती पाहून तो आरमारप्रमुखही चकित झाला व त्याने त्याला आज्ञाभंगाच्या मुख्यातून मुक्त केले.

  • संत प्रीतमदास

    सतराव्या शतकात गुजरातमधील अहमदाबादजवळील बावला या गावी एका मुलाचा जन्म झाला. त्याचे नाव ठेवले गेले प्रीतम. तो मुलगा जन्मतःच अंध (सूरक्षस) होता. त्यातच त्याच्या लहानपणी आई-वडिलांचे छत्र हरपले त्यामुळे तो पोरका झाला आधीच अंध, त्यातून निराधार यामुळे प्रीतमचे लहानपणी खूप हाल झाले. भिक्षा मागून तो कसेबसे आपली उपजीविका करीत होता. एका कोणाबरोबर तरी प्रीतम भागवत पारायणाला गेला. भागवतकथा ऐकून तो इतका प्रभावित झाला की, ईश्वराबद्दल त्याच्या मनात खूपच आकर्षण निर्माण झाले. त्यातूनच त्याला काव्य स्फूरत गेले. त्याचे हे काव्य लोकांनाही आवडू लागले. आपले काव्य प्रीतम पुढे भजनाच्या रूपात सादर करू लागला. एकदा प्रीतम श्री डाकोरजींच्या दर्शनाला गेला.

    त्याला पाहताच पुजार्‍याला त्याची थट्टा करण्याची लहर आली. तो त्याला म्हणाला, तू तर नेत्रहीन आहेस मग कोणाचे दर्शन घ्यायला आला आहेस? त्यावर प्रीतमने भगवान डाकोरजींच्या प्रतिमेचे व्यात्मक वर्णन केले. डाकोरजींना कोणत्या रंगाचे वस्त्र नेसवले आहे, तसेच त्याला कोणत्या रंगाची फुले घातली आहेत, त्याचा मुकुट कसा आहे, बासरी कशी ठेवली आहे हेही प्रीतमने काव्याद्वारे सांगितले. त्याचे काव्य ऐकून पुजारी आश्चर्यचकित झाला व त्याने त्याच्या चरणी लोटांगण घातले. कारण ज्याच्या मनात ईश्वराची अपार भक्ती आहे ते डोळ्याशिवाय भगवंताचे दर्शन करू शकतात, याची प्रचिती त्याला आली होती. हाच प्रीतम पुढे संत प्रीतमदास बनला. एकदा रोमारोला या परदेशी संस्थेचे लोक भारतात आले होते. संत प्रीतमदास यांना भेटल्यानंतर त्यांच्या असे लक्षात आले की, प्रीतमदास नेत्रहीन आहेत. मात्र त्यांच्या भक्तिरचना इतक्या 'डोळस' आहेत की, कोणताही डोळस तसेच प्रज्ञावान मनुष्य अशा रचना करू शकणार नाही. संत प्रीतमदासच्या निवडक भक्तिरचना ते परदेशी घेऊन गेले.

  • बेवारशी

    प्रसिद्धीपत्रक केराच्या टोपलीत जातं. पंधरा दिवस वाट पाहिली जाते आणि ज्या व्यक्तीला त्याचे नातेवाईक, मित्रमंडळी विसरलेली असतात अशी व्यक्ती, शेवटी बेवारशी ठरते आणि त्यानंतर त्या प्रेताची बेवारशी म्हणूनच विल्हेवाट लावली जाते. काही इलाज नसतो.

  • घंटा (मी आणि ती कथा)

    ए बाई कुठे भटकतेस उन्हातून? तिने मागे पाहिले , आयला तू इथे काय करतोस, ह्या गावात . हे तर डोंबिवली गाव नाही पण शहरही नाही, ऍन्टी गोबल व्हिलेज म्हण