(User Level: User is not logged in.)

कथा

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • आनंदी व्हा

    समुद्रावरचे आल्हाददायक वारे अंगावर घेत तेनाली रामचा मित्र स्वत:शीच विचार करीत झोपाळ्यावर पहुडला होता. तेनालीरामने त्याला विचारले, “मित्रा कसला विचार करतोस?” तेव्हा तेनालीरामच्या मित्राबरोबर त्याचा संवाद सुरू झाला.

  • शंभरी काश्या

    इतिहासाने ज्यांना दीर्घकाळ उपेक्षीत ठेवलं ते स्वराज्याचे दुसरे छत्रपती, छावा संभाजी महाराजांना ‘तह’ कधीच मान्य नव्हता. ७०च्या दशकात त्या संभाजी महाराजांची भूमिका अत्यंत सुंदररित्या वठवून त्या अनभिषिक्त राजाला न्याय देण्याचा काम ज्यांनी आपल्या अभिनय कौशल्यातून केले ते म्हणजे मराठी रंगभूमीवरचे पहिले सुपरस्टार डॉ. काशिनाथ घाणेकर. घाणेकरांना सुद्धा तडजोड, लाचारी मान्य नव्हतीच. म्हणून ज्या नाटकाने त्यांना मराठी व्यावसायिक रंगभूमीवर एक वेगळी प्रतिष्ठा आणि ओळख निर्माण करून दिली ते प्रा. वसंत कानेटकर लिखित ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकाच्या अवघ्या १०० प्रयोगांच्या ‘घोडदौडी’नंतर घाणेकरांनी ते नाटक सोडून दिले. कारण त्यांना खाजगी सुपाऱ्या पटत नसे आणि त्यामुळे दि गोवा हिंदू असोसिएशन्सशी मतभेद झाल्यामुले डॉक्टरांनी ‘रायगड’ला राम राम ठोकले.असे कलंदर व्यक्तिमत्व आणि बेधडक स्वभाव असलेले नट क्वचितच पाहायला मिळतात.

  • एक परीस स्पर्श (भाग – २४)

    याबाबतीत मात्र विजय पूर्वीही बदनाम होता आणि आज ही कितीही सुंदर आणि गोड आवाज असणाऱ्या तरुणीने त्याला फोन केला तरी तो तिच्याशी अधिकचा एक शब्दही बोलत नाही.  पण एखादी समोरा – समोर भेटली आणि तिची बोलण्याची इच्छा असेल तर तो थांबतही नाही.

  • सुखस्वप्न

    सुखस्वप्न

    शांतनू सगळी तयारी दिलेल्या यादीप्रमाणे घेऊन आला. पुन्हा पुन्हा काही राहिलं नाही ना ते बघून तो बाईकवर बसला. तिथूनच त्याने शाल्मलीला फोन लावला. शाल्मलीने हसतच फोन उचलला. आणि त्याने काहीही बोलायच्या आत तीच बोलली, “ शालू, तू सांगितल्याप्रमाणे सगळं घेतलं आहे.

  • संधिप्रकाशातील सावल्या – ५ : या चिमण्यांनो परत फिरा रे …!

    संधिप्रकाशात उभी असणारी झाडे अचंबित होऊन खाली पहात होती. खाली पसरलेल्या सावल्यात , विविध वयोगटातील असंख्य मुलं , शांतपणानं बसली होती . कुणीच बोलत नव्हतं . एक प्रकारचा आत्मविश्वास आणि निर्धार त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता . त्यांच्या हातात घोषणा लिहिलेले बोर्ड दिसत होते . फारच वेगळ्या घोषणा होत्या .

  • दिसणे आणि पाहणे

    तेनालीराम आणि त्याची पत्नी घराला कोणता रंग द्यावा हे ठरवत होते. पत्नीला गुलाबी रंग पसंत होता. तेनाली म्हणत होता, आपण सफेद रंग देऊ या. दोघांमध्ये काही केल्या एकमत होत नव्हते. पत्नीने अखेर निकराने सांगून टाकलं की, “मी ठरवलं आहे, गुलाबीच रंग द्यायचा. आणि त्याचं कारण एकच आहे, फक्त गुलाबी रंगामुळेच मी आनंदी राहू शकते.

  • उगाच काहीतरी -२६

    12 जुलै 2022 ला नासाच्या JWST ( James Webb Space Telescope) ने पाठवलेल्या छायाचित्रांचा पहिला लॉट बेस स्टेशन ला प्राप्त झाला आणि सगळ्यांमध्ये उत्साह पसरला. आलेल्या छायाचित्रांची छाननी करताना एका छायाचित्राने सगळ्यांचे लक्ष वेधले आणि बेस स्टेशनवर एकच खळबळ माजली. त्या फोटोत करोड़ों प्रकाशवर्ष दुर आजवर कधीही नजरेत न आलेला एक अतिशय प्रखर चमकदार प्रकाश दिसत होता. सगळे आश्चर्यचकित झाले की आजवर हा प्रकाश कसा लक्षात नाही आला?
  • चिमणचा दाणा

    एक दिवस एका चिमणीला शेतात एक मटारचा दाणा सापडला. तिने तो चोचीत उचलला आणि खूप आनंदीत झाली. आता याने नक्कीच पोट भरेल.

    मग तिने विचार केला की देवाने माझ्यावर इतकी कृपा केली आहे तेव्हा खाण्याच्या आधी देवाची पूजा करावी. ती आंघोळीसाठी पवित्र नदीकडे जाऊ लागली. पण प्रश्न होता की हा मटारचा दाणा कुठे लपवावा. जर जमिनीवर ठेवला तर मुंग्या खाऊन टाकतील. किंवा पक्षी उचलून घेऊन जाईल. तिने तो दाणा एका पुलावर ठेवला तेथे एक सुतार काम करीत होता. ती त्याला म्हणाली, “भाऊ, जरायाच्याकडे लक्ष्य ठेव.”

  • पुरुषार्थ

    एका शहरात तीन मित्र रहात होते. एक राजपुत्र, एक मंत्रिपुत्र आणि एक वणिक पुत्र. एकदा तिघंही एकत्र आले आणि विचार करू लागले की कोण कशामुळे जिंकला आहे. राजपुत्र म्हणाला, “मी आपल्या पुण्यामुळे जिंकलो आहे.” मंत्रीपुत्र म्हणाला, “मी आपल्या बुद्धिबळावर जिंकलो आहे.” वणिक पुत्र म्हणाला, “मी आपल्या चतुराईने जिंकलो आहे.” तिघे मित्र परदेशात गेले आणि एका शहरातील बगीच्यात थांबले. वणिक पुत्रास जेवण्याची व्यवस्था करण्यास सांगण्यात आले. वणिक पुत्र एका वाण्याच्या दुकानावर गेला. त्या दिवशी कोणतातरी सण होता आणि दुकानात इतकी गर्दी होती की तो वाणी सर्व ग्राहकांना लवकर किराणा देवू शकत नव्हता.

  • दागिना

    त्या दिवशी रानबा सकाळच्या उन्हाला बाहेर शेळ्यांजवळ जाऊन बसला होता.आत त्याची सून झुंबर नवऱ्याला म्हणत होती “ ऐकलं का,बिरोबाच्या जत्राला गावात भांड्यांचं दुकान लागलं का जुन्या पाण्या भांड्यांची मोड करून एक पितळाचं भगुलं घ्याचं हाये आपल्याला, अन् आढ्याला तुमच्या आईनं किती दिसापासून फडक्यात सर्जा राजाच्या शेंब्या ठेवल्यात गुंडाळून त्या सुद्धा ध्यान करून काढा मोडायला!!