नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा
आयुष्य हे कधीच न संपणारे कोडे आहे आणि मला तर ते कधीच सोडवता येणार नाही म्हणून हताश होऊन बाकावर बसलो होतो, तर अचानक दिलीप दिसला, ताईचा मुलगा,माझा भाचा. खूप हुशार मुलगा, गेल्यावर्षी सातवीच्या परीक्षेत पहिला आला तेंव्हा त्याला प्लेटो चं पेन बक्षीस देणार होतो, पण कसचं काय, प्लेटोच्या पेन पेक्षा पोटाची खळगी आणि ती भरण्याची पेन प्रचंड मोठी होती.

मरीन लाइन्सजवळ ऑफिस आहे. त्यामुळे परत जातानाही खिडकीची जागा मिळवतो. घरी जातो. गेली पंचवीस वर्षे त्याचा हा उपक्रम चालू आहे. हातात सदोदित कोणतंतरी पुस्तक असणार. पूर्वी पु.ल. देशपांडे, वि.स. खांडेकर, गाडगीळ, सानीया अशी पुस्तक असायची. नंतर एकदम इंग्रजीवर उडी मारली.

खूप विचार केल्यानंतर विजयने पुन्हां पत्रकारितेत आणि साहित्य क्षेत्रात नशिब आजमावण्याचा निर्णय घेतला. विजयने पूर्वी एका साप्ताहिक वृत्तपत्रात पत्रकारिता केली होती. बातमी मिळविण्यापासून बातमी कशी लिहायची हे ही तो तेथे शिकला होता. पण पत्रकारितेत तो फार रमला नव्हता कारण तेंव्हा पत्रकारिता हे काही त्याचे उत्पन्नाचे साधन होऊ शकले नाही.
हे बाबूजींचं गाणं ऐकत स्मिता खिडकीत विचार करत उभी होती. तिची पण अशाच प्रकारची अवस्था झाली होती. सौ. स्मिता अमोल तावडे एका खासगी शाळेत गणित विषयाची शिक्षिका होती. तिची साधारणतः २०-२२ वर्ष नोकरी झाली होती. घरी तिचा नवरा तिला खूप सपोर्ट करणारा आणि अगदी प्रेमळ होता.
मजबूत शरीरयष्टी, पिळदार मिशा आणि बऱ्यापैकी उंच असलेले रुबाबदार दूध काका त्यांची अगदी स्वच्छ, चकचकीत आणि नजरेत भरेल अशी खास पितळ्याची किटली सायकलला अडकवून दररोज पहाटे घरोघरी दूध घेऊन जायचे. अगदी नित्यनेमाने. इतर कुठल्याही दुधाचा दर्जा या दूध काकांकडच्या दुधाच्या जवळपास सुद्धा नव्हता. भरपूर साय यायची, तूप उत्तम व्हायचं. अगदी मन लावून दुधाचा व्यवसाय करायचे काका. पण इतक्या सगळ्या जमेच्या बाजू असताना त्यांच्या ग्राहकांची कायम एक तक्रार मात्र होती. ती अशी की दूध काका आपल्या या व्ययसायाइतकंच महत्व त्यांच्या परिवाराला द्यायचे. म्हणजे लोकांना त्यांच्या घरच्यांशी काही देणं घेणं नव्हतं; पण आपल्या कुटुंबाला वेळ देता यावा म्हणून काका “दर रविवारी चक्क सुट्टी घ्यायचे” ही खरी अडचण होती. काही दुकानांत ती पाटी असते ना… “रविवार बंद”. अगदी तस्स !!

पाच सहा दिवसांनी सुरेश मेहता मला शोधत आला. गोमु माझ्याबरोबरच होता. सुरेशला कसा चुकवतां येईल ह्याचा मी विचार करत होतो. त्याला न सांगता त्याच्या पाहुण्याशी व्यवहार केला होता, त्यामुळे किंचित अपराधीपण वाटत होतं. पण सुरेश सरळ आमच्याकडेच आला.
मी घरी आलो तेंव्हा खूप उशीर झाला होता. आईला काळजी वाटत होती. आप्पांना (माझ्या व़़डलांना)ही काळजी वाटत असावी. मी आईला सांगून गेलो होतो असं म्हणट्ल्यावर त्यांचं समाधान झालं.
विदर्भातील एका शहरात सहज भरकटत होतो. सकाळची वेळ असून ही उन्हं चांगलचं चटकत होतं. रसत्यावर गर्दी होती. खरं तर आम्ही चहाच्या शोधात होतोत. फुटपाथवर अनेक टप-या थाटलेल्या होत्या. त्यात चहाच्या टप-या ही होत्या.पण त्यात स्वच्छ तर एक ही नव्हती, पॉश पण नव्हती. अस्वच्छ होत्या. किळसवाण्या होत्या. त्यावर ही लोकांची झुंबड उडालेली होती.आम्हाला पाॉश हॉटेल हवं होत.बरीच पायपीट झाल्यानंतर ही तिथं चहा जाऊन प्यावं असं हॉटेल सापडलं नाही. एका टपरीजवळ थांबलो.
अंशू हा एक विचित्र मुलगा होता. नको ते करण्यात पटाईत होता. एकदा मात्र त्याचा डाव त्याच्याच अंगलट आला. आपण फेकलेल्या जाळ्यात तो स्वत:च फसला.
Copyright © 2025 | Marathisrushti