(User Level: User is not logged in.)

कथा

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • ज्याचे अन्न त्याला द्या !

    संत गाडगेबाबा खानदेशात फिरत होते अंगावर फाटके-तुटके कपडे, दाढीचे खुंट वाढलेले, डोक्यावर मडके, एका कानात कवडी व हातात एक खापराची येळणी असा अवतार होता त्यांचा. सकाळीच ते एका गावात गेले. गावातील मुख्य मैदान त्यांनी झाडून स्वच्छ केले. तेवढ्यात गाडगेबाबा गावात आल्याची वार्ता हा हा म्हणता सर्व गावभर झाली. गावातील माणसे तिथे जमू लागली.

    गाडगेबाबांनी सर्व माणसांना बसवले आणि लगेच कीर्तनाला सुरुवात केली.

    गोपाला ऽऽऽ गोपाला ऽऽऽ देवकीनंदन गोपाला !

    “बाबाहो, दारू पिऊ नका. कर्ज काढू नका. बळी देऊ नका. बकरे, कोंबडे मारून नवस फेडू नका. तुमी अडाणी रायले, पोरायले अडाणी ठेवू नका. त्यांना पाटी पेन्सिल द्या. शाळेत घाला. उपाशी राहा; पण पोराले शिकवा!”

    कीर्तन संपले. आता दुपार झाली होती. कसलासा सण असावा. घरोघर तळणाचा वास दरवळत होता. बाबांनी भिक्षा मागायला सुरुवात केली. एका
    घरासमोर ते भिक्षा घेण्यासाठी उभे राहिले. समोर पाहातात तो त्या घरमालकीणीने पंचपक्वानांनी भरलेले ताट ओट्याजवळ उभ्या असलेल्या
    गाईसमोर धरले होते. ती गाईने ते अन्न खावे म्हणून प्रयत्न करीत होती; पण गाय मात्र सारखे तोंड इकडे-तिकडे वळवीत होती आणि गायीने ते सुग्रास अन्न खावे म्हणून बाई हट्टाला पेटली होती.

    गाडगेबाबा आणखी जवळ गेले आणि त्या बाईला म्हणाले, “बाई, तुम्ही देत असलेले अन्न जनावराचे नाही, ते माणसाचे अन्न आहे. माणसाचे अन्न तुम्ही जनावरांना का देता! तुमच्या गावात पुष्कळ माणसे उपाशी असतील त्यापैकी कोणाला तरी ते अन्न द्या. समाधानी होईल बिचारा!”

    गाडगेबाबांचे ते बोलणे ऐकून ती बाई खजिल झाली. ते ताट घेऊन ती पटकन घरात गेली अन् बाबांना भिक्षा घेऊन आली. ती भिक्षा स्वीकारून गाडगेबाबा दुसरीकडे वळले.

    तात्पर्य काय.. तर ज्याचे अन्न त्यालाच द्यावे.

  • २ जानेवारी

    ३१ डिसेंबर ही तारीख जवळ येऊ लागली की सर्वजण वर्षाची अखेरची रात्र आनंदात कशी घालवता येईल याचे बेत आखू लागतात. मित्रमंडळी, नातेवाईक, कुटुंबीय असे वेगवेगळे ग्रुप्स आपापल्या पसंतीनुसार कुठे जमायचं, काय खायचं आणि काय प्यायचं याचे मनसुबे आखू लागतात. या पाटर्यांसाठी कोणाला बोलवायचं आणि कोणाला फुटवायचं यावरही चर्चा सुरु होते. अमका कसा बोअर आहे आणि नववर्षाच्या सुरुवातीलाच तमकीचं दर्शन नको रे बाबा अशा कॉमेंटस्ची रंगत खुलू लागते. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी सर्वजण सिद्ध होतात. ३१ डिसेंबरची प्रतिक्षा सुरु होते.

    वर्षभर कामाच्या रगाडयात सापडलेल्या मनाला कधी ना कधी विरंगुळा हवाच असतो. हा विरंगुळा या ३१ डिसेंबरच्या पार्टीच्या निमित्ताने सर्वांना लाभतो. असे आनंदाचे क्षण आपल्या मित्रमंडळींसमवेत अथवा प्रियजनांसमवेत घालविणे हा माणसाचा स्थायीभाव. साहजिकच अशा मौजमजेच्या प्रसंगी आपल्या सोबत कोण असावं याचेही ठोकताळे ठरलेले असतात. समान आवडीनिवडी असलेली मंडळी एकत्र जमतात. हास्यविनोदाला उधाण येतं. मनात साचलेलं मळभ दूर करण्याची संधी चालून येते. ३१ डिसेंबरची रात्र या घडीला वेगळं महत्त्व प्राप्त होतं.

    ३१ डिसेंबर हा दिवस वर्षभरात घडलेल्या घटनांचीही उजळणी करुन जातो. वर्षभरात आपले कोणकोणते आडाखे चुकले, अपेक्षेप्रमाणे कायकाय घडलं नाही आणि कोणते प्रसंग जीवावर घाव घालून गेले याच्या आठवणी मनात पिंगा घालू लागतात. वर्षभरात घडलेल्या सुखद घटनांच्या स्मृती सोबत असतातच. मात्र काय गवसलं यापेक्षा काय हरवलं याची जंत्री मोठी असते. या निराशेवर मात करण्यासाठी उपाय एकच असतो. ३१ डिसेंबरच्या रात्री एकत्र जमून कटू आठवणींचं ओझं दूर सारायचं. मनाला उभारी देत नव्या वर्षाच्या स्वागताला सिद्ध व्हायचं. मरगळ झटकून पुन्हा ताजं तवानं व्हायचं.

    थोडक्यात आप्त जनांबरोबरची पार्टी हे एक निमित्त असतं. या निमित्ताचा आधार घेत स्वतःचं स्वतःला सावरायचं असतं. हे सावरताना समविचारांच्या मंडळींचा, त्यांच्या सोबत रंगणाऱ्या गप्पांचा आधार मोठा असतो. म्हणूनच कदाचित अशा पाटर्यांना साऱ्या जगभर मान्यता लाभली असावी. ३१ डिसेंबरच्या रात्रीला खऱ्या अर्थाने रंगत दिली जाते ती पंचतारांकित अथवा मोठ्या हॉटेलमध्ये. अशा हॉटेल्समध्ये ३१ डिसेंबरसाठी जय्यत तयारी करण्यात येते. सरत्या वर्षांचं प्रतीक म्हणून ओल्ड मॅनचा पुतळा उभा करण्यात येतो. फुलांच्या आणि दीपमाळांच्या सजावटीने सारा परिसर सुशोभित केला जातो. वाद्य संगीताचा शिडकावा मन प्रफुल्लीत करण्यास सिद्ध असतो. सारा माहौल आनंद आणि उत्साहामध्ये आकंठ बुडून जातो.

    मोठ्या हॉटेल्सचा भव्य थाटमाट दिमतीला नसला तरी घराघरातील छोटया पाटयांचा माहौल बहुतांशी तसाच असतो. इथेही खाण्यापिण्याची जय्यत तयारी सज्ज असते. डीव्हीडीतील संगीताचे सूर आसमंतात निनादत असतात. मन प्रफुल्लीत करणारं वातावरण इथेही थोडया फार फरकानं सिद्ध होतं. साधारण दहाच्या सुमारास अशा पाटर्यांना आकार येऊ लागतो. अकरा साडे अकरा पर्यंत रंगत वाढत जाते आणि ठीक बाराच्या ठोक्याला आनंदाचा परमोच्च बिंदू साधला जातो. 'हॅप्पी न्यू इअर'च्या शुभेच्छांनी वातावरण दुमदूमून जाते. मोबाईल्स, फोनच्या रिंगटोन्स निनादू लागतात. बाहेर कुठेतरी फटाक्यांची आतिषबाजी सुरु होते. प्रियजनांचे हात हस्तांदोलनासाठी जुळून येतात. नव्या वर्षाचं प्रफुल्लीत चेहऱ्यानं आणि उत्साहाची परिसिमा गाठलेल्या मनानं स्वागत केलं जातं.

    १ जानेवारीची सकाळ उजाडते ती शुभेच्छांच्या सोबतीने. कार्यालयातील सहकाऱ्यांना, नातेवाईकांना फोन जाऊ लागतात. काल रात्री आम्ही काय केलं आणि तुम्ही काय केलं याची देवाणघेवाण सुरु होते. थोडं उजाडल्यानंतर एस.एम.एस. पाठविण्याचे सोपस्कार सुरु होतात. मनापासून नाही तरी उपचार म्हणून नवीन वर्षाच्या शुभेच्छा काहींना पाठविणं अपरिहार्य असतं. अशा मंडळींची एस.एम.एस.वर बोळवण केली जाते. अर्थात आपल्याला आलेले एस.एम.एस.याच स्वरुपाचे असणार याचीही जाणीव मनाला चटका लावून जाते. अमक्याने आपल्याला साधा फोन न करता एस.एम.एस.वर भागवलं याची चुटपूट जीवाला लागूनच जाते. पण आज नव्या वर्षाचा पहिला दिवस असतो. अशा छोटयामोठया कुरबुरींसाठी आज अवसर नसतो. नव्या वर्षाच्या नव्या दिवशी आपण नव्या दमानं घराबाहेर पडतो.

    १ जानेवारीच्या रात्रीही क्वचित एखादी पार्टी अथवा आऊटिंग पार पडतं. त्यानंतर उगवतो तो २ जानेवारीचा दिवस. दोन दिवस आनंदात न्हाऊन निघालेलं मन आता रोजच्या वास्तवाला सामोरं जाण्यास सिद्ध होतं. सहजगत्या रोजचे व्यवहार सुरु होतात. दैनंदिन कामकाजात आपण बुडून जातो. कामांचे ताण, पैशांचे हिशेब, आपापसातले हेवेदावे, सर्व कसं पुन्हा सुरळीत सुरु होतं. अगदी दोन दिवसांपूर्वी आपण वेगळं काही अनुभवलं होतं याचा विसर पडतो. धकाधकीच्या आयुष्यात आपण सामावून जातो. काळाच्या ओघात आणखी एका नव्या वर्षांची संथ वाटचाल सुरु होते.

    - सुनील रेगे

  • प्रेम काय काय करायला लावते

    प्रेमकथा

  • मी आणि ती’ – ३

    आज मात्र माझी सटकली.. आमचे लग्न ठरत होते, सांगून आली होती.. म्हटले आधी भेटावे आमचीच जातवाली… आमच्या घरी जातवालीच हवी ना..

  • एक परीस स्पर्श… ( भाग – १९ )

    दिव्या आणि विजयची भेट एका पतपेढीत झाली होती. आणि ती विजयच्या बाबांच्या ओळखीची होती. विजयच्या आयुष्यात आलेली ती सर्वात बिनधास्त मुलगी होती. म्हणजे कोणा मुलासोबत बोलताना आपल्याला कोणी पाहिलं तर वगैरेची तिला अजिबात चिंता नव्हती.

  • पुलाखालची माणसं (कथा)

    ही पुलाखालची माणसं मुंबईच भयावह चित्रण आहेत. कुठेतरी वाळवी लागली आहे. बाकी सर्व प्रश्न सुटू शकतात पण एकदा लागलेली ही वाळवी शहर आतून-बाहेरून पोखरून काढणार. वर्षा-दोन वर्षापूर्वी पुलाखाली माणसं नव्हती. आता कुठल्याही पुलाखाली जाऊन पाहा. नशेत बुडालेल्या केविलवाण्या चेहऱ्यांची ही कळकट-मळकट मंडळी जनावराच्या नजरेन तुमच्याकडे पाहतील.

  • ध्येयवादी कार्यकर्ती एमिली ग्रीन बालय

    शांती आणि सद्‌भावना जगात सर्वत्र नांदावी असे तिला लहानपणापासूनच वाटायचे कारण तिच्यावर तिच्या वडिलांचा फार प्रभाव होता आणि वडील होते याच तत्त्वांचे कट्टर पुरस्कर्ते. वडिलांचे स्वप्न साकारण्यासाठी तिने मोठेपणी समाजकार्य सुरू केले व १९४६ मध्ये शांतीसाठी तिला नोबेल पुरस्कारही मिळाला. नोबेल पुरस्कार मिळविणाऱ्या या महिलेचे नाव होते एमिली ग्रीन बालय.

    वायएमसीए के लीडर जॉन आरमांट यांच्याबरोबर तिला संयुक्तपणे हा पुरस्कार मिळाला. मात्र या पुरस्काराची रक्कम एमिलीने आपल्याच संस्थेला देऊन आपण खरीखुरी सामाजिक कार्यकर्ती असल्याचे साऱ्या जगाला दाखवून दिले. अमेरिकेतील जमैका येथे ८ जानेवारी १८६७ साली एमिलीचा जन्म झाला. तिचे वडील वकील होते व शांतता व सद्‌भावनेचे ते कट्टर पुरस्कर्ते होते. त्यामुळे एमिलीला लहानपणापासून शांततेचे खास आकर्षण होते. खासगी शाळेत शिक्षण घेऊन एमिलीने समाजशास्त्र व अर्थशास्त्रात पदवी घेतली. पुढे अर्थशास्त्रात तिने संशोधनही केले. १८९१ मध्ये बोस्टन येथे 'चिल्ड्रन एड सोसायटी' ही संस्था स्थापन करून तिने समाजसेवेला प्रारंभ केला. कामगारांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठीही तिने आणखी दोन संस्था स्थापन केल्या. झोपडपट्टीत राहणाऱ्या तळागाळातील लोकांच्या समस्याही तिने समजून घेतल्या. अमेरिकेतील त्या वेळी अशा काही शिक्षण संस्था होत्या, की तेथे फक्त 'गोऱ्या' विद्यार्थ्यानाच प्रवेश मिळत असे. एमिलीने त्याविरुद्ध आवाज उठवून अशा शिक्षण संस्थांमध्ये 'काळ्या' विद्यार्थ्यांनाही प्रवेश देण्यास भाग पाडले. प्रसिद्ध सामाजिक - कार्यकर्ती जेन एडन्स हिने स्थापन केलेल्या 'वुमेन्स इंटरनॅशनल लीग फॉर पीस अँड फ्रीडम' या संस्थेची ती महासचिव झाली व जेन एकच्या मृत्यूनंतर ती संस्थेची अध्यक्षा झाली. या संस्थेच्या शांतीच्या कार्याबद्दलच तिला शांततेचा नोबेल पुरस्कार मिलला. आपल्या आयुष्याच्या अखेरीस एमिलीला दय्याच्या विकाराने ग्रासले होते.

    त्यातच तिचा ७ जून १९६१ रोजी अंत झाला. अखेरच्या क्षणी तिच्या मुखातून दोनच शब्द बाहेर पडले ते होते 'विश्वशांती.'

  • वेडा मगर आणि हुशार कोल्हा

    समुद्राच्या काठी एक गाव होतं. तिथं एक मगर आणि एक कोल्हा राहायचे. त्यांनी दोघांनी मिळून शेती करायचं ठरवलं. सुरवातीला बटाट्याची शेती केली. मगर म्हणाले, “आपण उत्पन्नाची वाटणी कशी करायची ते आधी ठरवून टाकू.” कोल्ह्याने त्याला मान्यता दिली. मगर म्हणाले, “मी झाडांचा वरचा भाग घेईन, खालचा तू घे.” कोल्हा म्हणाला, “चालेल, तू म्हणशील ते मला मान्य आहे.” पुढे बटाट्याचं पीक तयार झालं.

  • न संपणारा रस्ता (कथा)

    नागू दुपारची भाकरी खावी म्हणून औत सोडून बैलायला पाणी पाजवू लागला.डोबी पाण्यानं ठिल भरलेली होती.सूर्य नारायण आग ओकत व्हता.बैलायनं पूर sपूर करत खाली मुंडी घालून गटागटा पाणी  पेलं.

  • मूनलाइट सोनाटा

    बिथोवन हा एक जगातील सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक. त्याच्या संगीत रचनांनी असंख्य रसिकांना अक्षरश: वेड लावले.
    बिथोवन ने एकदा एका अंध मुलीला पाहिले. त्याने सहज तिची चौकशी केली, तेव्हा ती जन्मापासूनच अंधळी असल्याचे समजले. थोडक्यात तिच्या जीवनात पहिल्यापासून अंधार होता. कारण ती उगवत्या सूर्याचे दर्शन घेऊ शकत नाही वा सूर्यास्तही पाहू शकत नव्हती. पांढरेशुभ्र चांदणे म्हणजे काय असते हे त्या मुलीला माहीत नव्हते किंवा कोसळणाऱ्या धबधब्याचे सौंदर्य ती पाहू शकत नव्हती. बिथोवनला तिची ही अवस्था पाहून फारच वाईट वाटले परंतु एक संगीतकार म्हणून आपण तिच्यासाठी काहीतरी केले पाहिजे. असा विचार त्याच्या मनात घर करून राहिला. या विचाराच्या पूर्ततेसाठी त्याने निसर्गसौंदर्य ओसंडून जाणारे एक काव्य मधुर शब्दात गुंफले व ते अतिशय सुंदर संगीतात स्वरबद्ध केले. 'मूनलाइट सोनाटा' म्हणून हे गाणे सर्व जगभर गाजले व लाखो रसिकांनी ते गाणे ऐकून बिथोवनला अक्षरशः डोक्यावर घेतले. ज्या अंध मुलीसाठी बिथोवनने हे गाणे तयार केले होते. त्या अंध मुलीने ते गाणे ऐकताच तिलाही स्वर्गीय सुखाचा भास झाला. ते पाहून बिथोवन ला साहजिक आपले जीवन कृतार्थ झाल्याची भावना झाली असेल. संगीत आणि सुरांतील सामर्थ्य त्याने सिद्ध करून दाखविले होते.