(User Level: User is not logged in.)

कथा

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • संन्याशी आणि उंदीर!

    सध्या मोदी सरकार ने काळ्या पैशाविरोधात जी नोटा बंदी ची मोहीम चालवलेली आहे त्यावरून अनेक नेते, तथाकथित पुरोगामी विचारवंत, जनतेच्या दु:खाचा कैवार घेऊन जो उर बडवत आहेत, घसा कोकलून बोंबलत आहेत ते पाहून का कोण जाणे हि गोष्ट आठवली.

  • बाई आली पणात

    सुगीचे दिवस आले होते अन् समधी माणसं कशी पटापटा आपल्या कामाला लागली व्हती. शाळूकाढायला आला व्हता. कारडी गहू, हरभऱ्यानी रानं कशी फुलून तरारली व्हती. चिंचोळलीमधी जिकडं तिकडं घाई गडबड चालू व्हती. समधं शेतकरी लई कामात व्हढाचढीनं मरमर मरोस्तवर काम उरकीत व्हती. गावात शिंद्याची आळी विठ्ठल रखमाई दोन्ही हात देवळात कमरेवर ठेवून जणू चिंचोलीची राबणारी कष्टकरी बाई बाप्पे पाहत होती.

  • शंकेचे निरसन

    एक राजा होता. तो फारच चिकित्सक होता. त्याला थोडी जरी शंका आली तरी तो ती शंका लगेच विचारी व शंकेचे निरसन झाल्याशिवाय तो स्वस्थ बसायचा नाही. त्यामुळे त्या राजाबरोबर गप्पा वा चर्चा करायला सहसा कोणीही तयार होत नसत. त्या राजाचे जे राजगुरू होते, त्यांना मात्र राजाची या स्वभावाची पूर्ण कल्पना होती. राजाच्या शंकेचे निरसन करण्यासाठी अनेकदा तेच पुढाकार घेत असत. एकदा राजा धर्मगुरूबरोबर चर्चा करीत असताना परमेश्वराचा विषय निघाला. ईश्वर कसा सर्वत्र असतो व तो संकटकाळी आपल्या भक्ताला कसा प्रत्यक्ष येऊन वाचवितो हे धर्मगुरूंनी अनेक उदाहरणांसह राजाला पटवून सांगितले. त्यावर राजाने संकटसमयी परमेश्वर आपल्या भक्ताला कसे वाचवितो? तो नेमके काय करतो? याबद्दल निरनिराळ्या शंका व्यक्त केल्या. त्याच्या सर्वच शंकांना धर्मगुरुंना उत्तर देता आले
    नाही म्हणून ते राजगुरुकडे गेले. राजाचे शंकानिरसन करण्यासाठी राजगुरूंनी प्रत्यक्ष कृतीच करायचा निर्णय घेतला. त्या राजाला एक नातू होता. तो फारच सुंदर व हुशार होता. त्यामुळे राजाचा फार आवडता होता. दुसऱ्या दिवशी राजगुरू राजाला घेऊन उपवनात फिरायला गेले. आजूबाजूला पहाऱ्याचे सैनिक होतेच. तेथे राजाला तलावाच्या ठिकाणी पाठमोरा बसलेला आपला नातू दिसला. म्हणून राजा घाईघाईने
    तलावाकडे निघाला. तेवढ्यात त्याला त्याचा नातू तलावात पडल्याचे दिसले. नातवाला पोहता येत नाही, हे राजाला माहीत होते, त्यामुळे त्याने स्वतः पळत जाऊन तलावात उडी टाकली व आपल्या नातवाला बाहेर काढले. वास्तविक तो नातवासारखा दिसणारा मेणाचा पुतळा होता. परंतु राजाने त्याला खरा नातू समजून त्याला वाचविण्यासाठी तलावात उडी घेतली होती. नंतर सर्व प्रकार समजल्यानंतर राजगुरू राजाला म्हणाले, परमेश्वर आपल्या भक्ताला म्हणजे आपल्या आवडत्या माणसाला संकटातून कसे वाचवितो याचे कोडे तुम्हाला पडले होते ना?

    त्याचे उत्तर देण्यासाठी आम्हाला हे सर्व नाटक करावे लागले. उपवनात आजूबाजूला एवढे शिपाई असताना तुम्ही एकाही शिपायाला आदेश न देता नातवाला वाचविण्यासाठी तलावात स्वत: उडी मारली. यावरून परमेश्वर आपल्या भक्ताचे कसे रक्षण करतो हे तुम्हाला कळलेच असेल. राजाचे समाधान झाले व पुढे त्याच्या शंकेखोर स्वभावाला आळाही बसला.

  • गाईचे सैन्य

    एके दिवशी ‘तांबू’ गाय रानात गेली. रानात चरता चरता दिवस कसा संपला ते कळलंच नाही. जरासं अंधारून आलं होतं. हळूहळू ती परतीच्या वाटेवर आली. परंतु बरोबरीच्या ‘पांढरी’, ‘ढवळी’, ‘राणू’ कुणीच दिसत नाही, हे लक्षात येताच तांबू गायीने आपला चालण्याचा वेग वाढवला. जवळजवळ रानातली वाट संपतच आली होती. दूरवर दिवे दिसत होती. इतक्यात वाघोबाराजे दत्त म्हणून समोरी आले! क्षणभर तांबू गायीला काही सुचेनासे झाले. भीती वाटली.

  • एक परीस स्पर्श ( भाग – १८ )

    मेनका त्याच्या आयुष्यात आलेली एकमेक मुलगी होती. जी त्याची सच्ची मैत्रीण आणि प्रेयसी होती. विजयला माहित होते की तिचे त्याच्यावर प्रेम आहे पण तिला माहित नव्हते की विजयचेही तिच्यावर प्रेम होते. मेनका जर स्वतःच्या तोंडाने म्हणाली असती की तिचे त्याच्यावर प्रेम आहे! तर विजयने नक्कीच तिच्याशी विवाह केला असता. पण ती व्यक्त झाली नाही आणि विजयला व्यक्त व्हायचं नव्हतं. प्रेमात मुली सहसा पहिल्यांदा व्यक्त होत नाहीत हे विजयला उशीर कळले म्हणून अनामिका समोर त्याने त्याचे हृदय मोकळे करण्याचा प्रयत्न केला पण ते जमले नाही की ते तिला कळले नाही.

  • संधिप्रकाशातील सावल्या – ५ : या चिमण्यांनो परत फिरा रे …!

    संधिप्रकाशात उभी असणारी झाडे अचंबित होऊन खाली पहात होती. खाली पसरलेल्या सावल्यात , विविध वयोगटातील असंख्य मुलं , शांतपणानं बसली होती . कुणीच बोलत नव्हतं . एक प्रकारचा आत्मविश्वास आणि निर्धार त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता . त्यांच्या हातात घोषणा लिहिलेले बोर्ड दिसत होते . फारच वेगळ्या घोषणा होत्या .

  • कुस्करलेली कळी – उमललेले फुल – १६

    परो मध्ये बीपींचे जीवन मृणालमय झाले होते. त्याच्या आयुष्यात मौशुचे स्थान नगण्य झाले होते. एके दिवशी मृणालला तो घरी घेऊन आला त्याने आपल्या मुलीची जुजबी ओळख करून दिली. प्रेम इतके आंधळे असते की त्यापुढे मागील जीवनात घडलेल्या सर्वच घटना तुच्छ असतात.

  • नवरात्र .. माळ सहावी

    जुलै महिना आला आणि डिप्लोमा इंजिनियरींगचं पाहिलं वर्ष सुरू झालं … पाहिल्याच वर्षी सामोऱ्या आलेल्या ड्रॉईंग , मॅथ्स , मेकॅनिक्स सारख्या अहीमहीशी लढण्यासाठी क्लासेसला जायची योजना आखणे भागच पडले कारण समजण्याच्या पलिकडे गेलेलं मॅट्रीक्स , इंटिग्रेशन , डेरिव्हेटीव्हज् करता करता पार आडवं व्हायची वेळ आली . त्यात भरीला प्रॅक्टीकल्स ,जरनल्स्, आणि सारख्या कसल्या ना कसल्या व्हायवा चालूच !नुसतं चरख्यातून पिळल्यासारखं वाटू लागलं . आपला रस्ताच चुकलाय …
    काय करणार …
    संध्याकाळी क्लासला जाऊन आल्यावर उरलं सुरलं त्राणही संपून जाई . परिक्षेच्या वेळी रात्री अभ्यासाच जागरण आणि पुन्हा सकाळच्या लेक्चर्सचा विचार करत टेन्शन पांघरूनच झोपेच्या आधीन व्हावं लागे . ..

  • एक पाऊल ओल्या वाळूंत – भाग ४

    “याच सुमाराला पप्पांच्या एका नातेवाईकाने डाव साधला. रमेश कामत असं त्याचं नांव. त्याचाही हॉटेल व्यवसाय होता. माझ्या आईशी लग्न व्हावे अशी त्याची इच्छा होती, म्हणजे त्याकाळी त्याला भरपूर हुंडा मिळाला असता, शिवाय आजोबांची इस्टेट. पण दामू आज्जांनी मम्मीकरतां पप्पांची निवड केली हे त्याला खटकलं होतं. त्यांने गोड बोलून पप्पांकडून पर्सनल सिक्यूरिटी पेपर्स वर सह्या घेतली व तो पैसे खाऊन परागंदा झाला. पप्पांकडून बॅंकेने पैसे वसूल करून घेतले. पप्पाना वाईट परिस्थितीला तोंड द्यावं लागलं. अशावेळी सिक्वेरा साहेबांनी मला मदत केली. त्यांचं सर्व कर्ज फेडलं.”

    ” त्याची उतराई करण्याकरता तूं सिक्वेरा साहेबांशी लग्न केलंस, होय नां ?” सुरेशचा प्रश्न.
    “सिक्वेरा साहेबांना एक मुलगा होता. विल्यम्स सिक्वेरा. तो कँंसरने आजारी होता. त्याच्या आईने- सिक्वेरा साहेबांच्या दिवंगत पत्नीने विल्यमचं लग्न करून देण्याची जबाबदारी सिक्वेरा साहेंबावर टाकली. शिवाय त्यांच्या वाटेची प्रॉपर्टी भावी सुनेच्या नांवाने करण्याची अट घातली. त्यांच्या निधनानंतर सिक्वेरा साहेबांना मला विचारल. मी होकार दिला. विल्यम्स शी माझं लग्न झालं. त्यानंतर दोनच महिन्यानंतर तो वारला. सिक्वेरा साहेब अलीकडेच वारले. त्यांची प्रॉपर्टीही माझ्या नांवाने झाली…..”

  • युगांतर – भाग १

    सुमंत जयंत परचुरे. 

    रवींद्र च्या मनात विचार आला की या सूर्याने कित्येक युगांतरे पाहिली असतील तरी याचा स्थितप्रज्ञ पणा अजूनही तसाच आहे. पण आज माझ्या आयुष्यात युगांतर होतंय आणि तरीही मी असा भेदरलेला, दबलेला का आहे, नाही मलाही या सुर्यासारखं स्थितप्रज्ञ, अभेद्य व्हायलाच हवं, व्हायलाच हवं.