नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा
सुंदर कथा…पहिल्या रात्री पर्यंतच्या न केलेल्या प्रवासाची.
चातुर्यकथा एकदा काय झाले, त्याला लागली खूप भूक. त्याने खाल्लेही खूप खूप. पण पाणी नव्हते प्यायला. शोधून शोधून दमला. इतक्यांत त्याला दिसली घागर. गेला तिकडे भरभर. उडून बसला घागरीवर. पाणी होते तळाशी. त्याची चोच पोचावी कशी? पाणी चोचीत येईना, काय करावे कळेना.
संज्ञा आणि सुकृत बालसोबती. दोघांची घरे शेजारी शेजारी होती. त्यामुळे दोन्ही घरात छान एकोपा होता. एकाच्या घरात शिजले तर दुसऱ्याच्या घरी द्यावे एवढेच नाहीतर एकाला वेदना झाली तर त्याची सल दुसऱ्याला जाणवायची. अशा प्रेमळ आणि सुसंस्कारित वातावरणात संज्ञा आणि सुकृत वाढत होते.
“आपल्या खऱ्या वयापेक्षा कमी वयाचं दिसायचंय ?? कुठल्याही वयात असताना योग्य जोडीदार मिळवायचाय ?? .. नियमित “योग” करा , फीट रहा… “योग” केल्याचा असाही एक फायदा… “

आता विजयला पटले होते मेहनत तर गाढवही खूप करतो म्हणून त्याला मान मिळत नाही रस्त्यावर आयुष्यभर रक्त आठवून मेहनत करणारे कामगार कधीही श्रीमंत होत नाहीत. श्रीमंती ही नशीबातच असावी लागते.
एका गावात एक कुंभार राहात होता. तो अतिशय सुबक मूर्ती बनवायचा. त्यामुळे दूरच्या गावांहूनही त्याच्याकडे बरीच गिर्हाईके येत असत. गणेशोत्सव जवळ आला होता. त्यामुळे कुंभाराकडे गणपतीच्या मूर्तीसाठी बरीच मागणी होती. एकेक मूर्ती तयार करून तो गिर्हाईकांकडे घेऊन जात असे.
कुंभाराने गणेशाची एक अशीच मोठी सुबक मूर्ती बनविली व आपल्या गाढवावर लादून तो ज्याने ऑर्डर दिली त्याच्या गावाकडे जायला निघाला. रस्त्याने जाता-येता भेटणारे लोक गाढवावरील मूर्तीकडे पाहून हात जोडत होते.
गाढवाला वाटले सर्व लोक आपल्यालाच नमस्कार करीत आहेत. त्यामुळे गाढव सुखावले व आणखी ऐटीत चालू लागले. अनेकदा मान हलवून लोकांच्या नमस्काराचा स्वीकार करू लागले. त्या गावी पोहोचल्यानंतर कुंभाराने ती मूर्ती ज्याची होती त्याला दिली व त्याच्याकडून पैसे घेऊन तो पुन्हा आपल्या गावी निघाला.
रस्ता तोच होता. त्या रस्त्यावर पूर्वीचेच लोक होते, मात्र त्यापैकी कोणीही आता गाढवाची साधी दखलही घेत नव्हते. कारण गाढवाच्या पाठीवर आता मूर्ती नव्हती. लोकांनी आपल्याला नमस्कार करावा म्हणून गाढव हळूहळू चालू लागले, तसेच अधूनमधून ओरडू लागले. मात्र त्याचा लोकांवर कसलाच परिणाम होत नव्हता.
गाढवाची मंद चाल कुंभाराच्या लक्षात आल्यावर त्याने आपल्या जवळची काठी गाढवाच्या पाठीवर सपदिशी मारली आणि तो हसून म्हणाला, “लोकांना देखल्या देवाला दंडवत घालण्याची सवय असते हे तुला 'गाढवाला' कसे कळणार ?”
काठीचा मार पडताच गाढव निमूटपणे रस्त्यावरून वेगाने चालू लागले.
सुविख्यात वकील श्री. नारायण – (ऊर्फ नानू) प्रभु याला अशी सलगी मुळीच आवडली नाहीं. तो कामात गर्क होता. इतर वकीलांबरोबर कोर्टाच्या प्रतीक्षालयात (Common Room मध्ये) बसून आजच्या कामाचा आढावा घेत होता. त्याची पाठ दाराकडे होती म्हणून कोण हांक मारत होतं ते आधी समजलं नाहीं. त्याने पाठ वळवली आणि त्याला ओळख पटली. इतर वकीलही माना वळवून पाहूं लागले. ।।

आरुंधती परांजपे….. एक २५ वर्षे वयाची, दिसायला खूप सुरेख, हसऱ्या चेहेऱ्याची, आनंदी स्वभावाची, फॅशनची आवड असणारी मुलगी. शाळेत असल्यापासून तिला नाच, गाणं, नाटक याची आवड होती. तिचा आवाजही खूप गोड होता. शाळेत असताना प्रार्थना, समूहगीते, गायन स्पर्धा यामध्ये ती हिरिरीने भाग घेत असे. शिवाय ती अभ्यासातही हुशार होती, त्यामुळे ‘आरुंधती’ ऊर्फ ‘आरू’ सगळ्यांची लाडकी होती.
पृथ्वीवर सगळंच नवं नवं होतं, तेव्हा सगळी जनावरं एकसारखी होती. त्यांची शिंगं वेगळी आहेत, त्यांच्या अंगावरची कातडी चमकदार पिवळी तांबडी आहे आणि तिच्यावर काळे ठिपके आहेत असं काहीच नव्हतं. सृष्टिनिर्माता निर्माण करीत असलेल्या विशाल व्यवस्थेला पूर्ण स्वरूप देण्यात गढलेला होता. त्याने नाना प्रकारची शिंगं बनवली. आकार, लांबी, रुंदी ह्यात अफाट वेगवेगळेपणा ठेवला. नाना प्रकारची कातडी केली. केसाळ, रंगीबेरंगी, ठिपकेवाली, पट्टेवाली. काम झालं तेव्हा निर्मात्याने शिंगं, कातडी सरोवराच्या काठी असलेल्या एका गुहेत ठेवली.

फुलांचा पंचवीस हजारांचा ताटवा काळ्या लाकडी पेटीवजा कुंडीत ठेवलेला होता. खऱ्या फुलांची ही दफनपेटीच म्हणायला हवी. वर्ष वर्ष डांबराच्या गोळ्यांसारखी उग्र वास देणारी तैवानी फुलं हवीत की, क्षणभर फुलून दिवसांचा गजरा सकाळी मावळणारी फुल हवीत, हे प्रत्येकान आपल्याशी ठरवायला हवं.
Copyright © 2025 | Marathisrushti