(User Level: User is not logged in.)

कथा

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • घंटा (मी आणि ती कथा)

    ए बाई कुठे भटकतेस उन्हातून? तिने मागे पाहिले , आयला तू इथे काय करतोस, ह्या गावात . हे तर डोंबिवली गाव नाही पण शहरही नाही, ऍन्टी गोबल व्हिलेज म्हण

  • मित्र! – ‘माझ्या नेटक्या गोष्टी’ तुन – १२

    कोणी नाही तर, तू नक्की येशील याची मला खात्री आहे!’ असा मित्र असेल तर त्याला सांभाळा. कारण जेव्हा सगळे दूर जात असतात, तेव्हा फक्त मित्र जवळ येत असतो!

  • मसनातलं जिनं

    भर दुपारची येळ व्हती.वर आभाळातुन सुर्य आग वकत व्हता.उन्हाळ्याचे दिवस आसल्यानं सगळा परिसर भकास दिसत व्हता.रस्त्यानं चिट पाखरूबी नवतं.आश्यात शिवराम मसनजोगी,त्याची बायको शेवंती,पोरगी सारजी आन पोरगं पिर्‍या बाभळगावच्या दिशेनं निंघाले होते.

  • सैनिकाच्या मुलाची दिवाळी

    दिवाळी जवळ आली होती. शकुंतला हॅास्पिटलमधील नित्याची कामे पटापट करत होती. संवयीने बिनचूक करत होती पण आज तिच्या मनांत मुलाची काळजी होती. मुलगा राजस आता नऊ वर्षांचा झाला होता. घरी एकटाच होता. वर्षांपूर्वी आजी गेली आणि तो खरंच एकटा पडला. आजी गेली तेव्हां बाबा येऊन लगेच परत गेले. जास्त रजा नव्हती त्यांना. आता परत कधी येतील, कुणास ठाऊक? सैनिकाचा काय भरोसा? त्याचे सुखरूप येणे हेच महत्वाचे! यंदा दिवाळीला फक्त दोघंच असणार होती घरी, ती आणि राजस. दिवाळीची कांहीच तयारी तिला करतां आली नव्हती. बऱ्याच सहकारी नर्सेस रजेवर होत्या. तिला रजा तर मिळत नव्हतीच पण अधून मधून डबल ड्यूटी करावी लागत होती. दोन दिवसांवर दिवाळी आली होती. विशेष खरेदी तर सोडाच पण निदान फराळासाठी लागणारं सामान आणि राजस साठी थोडे कपडे घ्यायला हवे होते ना! ह्यांतल कांही तिला करतां येत नव्हतं. तिला मदत करायलाही कुणी नव्हतं. राजस घरी एकटाच असायचा. शेजारी चांगले होते पण ते सतत कसे पहाणार. कितीही चांगल्या ठीकाणी राजस रहायला तयार नव्हता. तो आता पाळणाघरांत रहायला काय लहान होता काय?

  • माय रेट्रो… व्हॅलेन्टाईन

    ही कथा सुरू होत आहे १९७२-७३ च्या काळात… तो काळ हिंदी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या राजेश खन्नाचा. तो त्या काळचा सुपरस्टार आणि जोडीला चटपटीत गोल चेहऱ्याची मुमताज ही जबरदस्त हीट जोडी! ‘कटी पतंग,’ ‘आराधना’, ‘अमर प्रेम’, ‘सफर’, ‘आनंद’, ‘अपना देश’, ‘दो रास्ते’ सारखे जबरदस्त हिट सिनेमे देणारा आमचा हिरो राजेश खन्ना. जणू आमचे दैवतच! अपऱ्या नाकाची, फुगीर गोबऱ्या गालांची मुमताज साथीला आल्यावर सिनेमात प्रेमसरिता खळाळून वाहू लागायची. मग आमचा अवतारही काही वेगळा नव्हता…

  • ड्यूटी ऑफीसर

    पोलिस ठाण्यातील ड्यूटी ऑफिसरची खुर्ची कधीही रिकामी नसते. चौकशी किंवा गुन्हे तपासाच्या निमित्ताने ड्यूटी ऑफिसरला पोलिस ठाण्यातून बाहेर जावे लागलेच तर त्याप्रमाणे ” स्टेशन डायरी ” मधे नोंद करूनच “रिलीफ ऑफिसर” म्हणजेच पर्यायी ठाणे अंमलदारकडे चार्ज देऊन तो बाहेर पडतो.

  • डॉक्टर संशोधिका गर्टी थेरेसा कोरी

    कोणत्याही परिस्थितीत आपण डॉक्टर व्हायचेच हे तिचे लहानपणापासूनचे स्वप्न होते. वैद्यकीय शिक्षण फार अवघड असते हे तिला घरातील लोकांनी व इतरांनी सांगून पाहिले. मात्र ध्येयापासून ती किंचितही ढळली नाही. कठोर परिश्रमाच्या आधारे सर्व अडथळे पार करून ती अखेर डॉक्टर झाली व नंतर रोगाबाबत तिने असे काही संशोधन केले की, अनेक मोठ्या रोगांवरती उपाय शोधणे सहज सोपे झाले. तिच्या संशोधनाबद्दल तिला १९४७ साली नोबेल पुरस्कारही मिळाला. गर्टी थेरेसा कोरी (Gerty Theresa Cori) हे तिचे नाव. हा नोबेल पुरस्कार तिचे पती कार्ल कोरी तसेच अर्जेंटिनाचे वैज्ञानिक बर्नार्डो ए हाऊसे यांच्यासह तिला विभागून देण्यात आला होता.

    गर्टी थेरेसाचा जन्म १५ ऑगस्ट १८९६ रोजी ऑस्ट्रियातील प्राग शहरात झाला. तिचे वडील एका चिनी कारखान्यात व्यवस्थापक होते. घरची आर्थिक स्थिती उत्तम होती. गर्टीचे प्रारंभिक शिक्षण घरीच झाले व वयाच्या दहाव्या वर्षी तिला पब्लिक स्कूलमध्ये दाखल करण्यात आले. तेथेच तिने डॉक्टर होण्याचे स्वप्न बाळगले व पूर्ण करून दाखविले. वैद्यकीय शिक्षण घेत असतानाच तिची व कार्ल कोरीची ओळख झाली व नंतर दोघेही एकमेकांचे जीवनसाथी बनले. पहिल्या महायुद्धाच्या काळात केवळ ऑस्ट्रियन असल्यामुळे कोरी दाम्पत्याला प्राग शहर सोडावे लागले व दोघेही व्हिएन्नामध्ये आले. एका बालरुग्णालयात दोघांनीही काम सुरू केले. मात्र वैद्यकीय संशोधनाची आवड त्यांना स्वस्थ बसू देईना. म्हणून दोघेही अमेरिकेत आले व त्यांनी विविध रोगांसंबंधी संशोधन सुरू केले. रक्तामधील साखरेबाबत त्यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण संशोधनामुळेच मधुमेहावरचे उपाय सुलभ झाले. या संशोधनाला 'कोरीचक्र' असे आजही संबोधले जाते. या संशोधनाबद्दलच त्यांना डॉ. बर्नार्डो हाऊसे यांच्यासमवेत नोबेल पुरस्कार लाभला. त्यानंतर कोरी दाम्पत्याने सेंट सुई येथे स्वतःची प्रयोगशाळा काढून संशोधनाचे कार्य पुढे चालू ठेवले. या प्रयोगशाळेचा अनेक संशोधकांनी लाभ घेतला. दुर्देवाने गर्टी कोरीला एका असाध्य रोगाने पछाडले. तब्बल दहा वर्षे तिने या रोगाशी झुंज दिली,परंतु २६ ऑक्टोबर १९५७ रोजी तिचे निधन झाले.

  • एका व्यस्त दलालाची प्रेम-कथा

    चेटकिणीचे पाव, निवडुंग, स्कायलाईट रूम, समृध्द प्रेमाची भेट आणि आता ही व्यस्त दलालाची प्रेमकथा, सर्वच प्रेमाबद्दलच्या कथा. सर्व कथांमधे वळणं आणि अनपेक्षित शेवट आहे परंतु प्रत्येक कथा दुसऱ्याहून वेगळी आहे. ओ हेन्री कथाकार म्हणून प्रसिध्द झाला, त्या कल्पनांवर अनेक, नाटके, चित्रपट, मालिका केल्या गेल्या ह्यांत नवल नाही. ह्या कथेत आनंदी शेवटही किती वेगळ्या प्रकारे सादर केलाय.

  • गावांची ओढ (कथा)

    माणूस भाऊच्या धक्क्यावर उतरो, व्हीटी स्टेशनला उतरो, बॉम्बे सेंट्रलला उतरो, नाही तर सांताक्रुझ विमानतळावर उतरो. त्याच्या पाठीवर त्याच बि-हाड असतं, डोळयात स्वप्नं असतात आणि मनात एक खूणगाठ बांधलेली असते. नाव आणि पैसा मिळवून गावी परत जायचं.

  • एक परीस स्पर्श ( भाग – ५२)

    भविष्य कोणालाही बदलता येत नाही. त्याने ते बदलण्यासाठी लाख भर रुपये खर्च केले तांत्रिक आणि मांत्रिकाकडे पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्यांच्या राहत्या जागेत दोष होता. त्यांनी ती जागा वेळीच सोडायला हवी होती. पण माणसाचा मोह त्याच्या भावभावना आडव्या येतात. त्यात त्याच्या कुटूंबात कोणीही देवाधर्माचे काहीही करत नव्हते. फक्त संकट आले म्हणून त्यांना देवाची आठवण येत होती. त्याच्याकडून कधीही कोणताही दानधर्म घडलेला नव्हता. त्यात त्याच्या कुटुंबात आलेल्या सुना त्याही नास्तिक होत्या.