(User Level: User is not logged in.)

कथा

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा

Sort By:

  • गोजिरा माळिते गजरा

    व्यावसायिक रंगभूमीवर त्यांना मिळालेली पहिली नवी कोरी भूमिका होती 1974 साली रंगभूमीवर आलेल्या श्याम फडके लिखित आणि राम मुंगी दिग्दर्शित ‘बायको उडाली भुर्रर्र…’ या नाटकातील. धोपेश्वरकर ही विनोदी व्यक्तिरेखा शशी जोशींनी आपल्या ढंगात अशी फर्मास सादर केली की, त्यांना प्रेक्षक आणि समीक्षकांची भरभरून दाद मिळाली. या नाटकात त्यांना ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांच्याबरोबर एकच प्रसंग होता, पण त्यात ते धम्माल उडवायचे. मग व्यावसायिक रंगभूमीवर एकामागून एक नाटके मिळत गेली

  • आइस्क्रीम मात्र वितळतच होते….

    तिने मला दोन-तीनदा लूक दिले, तिसऱ्यावेळी तिने केसावरुन हात फिरवला .. अर्थात तिच्या … ती कोण हे मला अजून उमजत नव्हते

  • पासबुक! – ‘माझ्या नेटक्या गोष्टी’ तुन – ११

    जगात सर्वात सुंदर गोष्ट कोणती असेल तर, ती ‘कुटुंब’ हे व्यवस्था आहे. तिला वाचावा! जमले तर एखाद पासबुक तुम्हीही उघडून घ्या!

  • भिंतीच्या पलिकडे (संक्षिप्त रूपांतरीत कथा ४)

    मी अनेक वर्षांनी पुन्हा डेहराडूनला जाणार होतो. पाश्चात्य देशांत जाऊन मी नशीब काढलं होतं आणि मी डेहराडूनमधील मित्रांना विशेषतः माझा शाळासोबती मोहन इनामदारला भेटायला उत्सुक होतो. मी डेहराडून सोडल्यावरही अनेक वर्षे त्याचा आणि माझा पत्रव्यवहार चालू होता. सर्व पत्रव्यवहारांमध्ये होतं तेच आमच्या बाबतीत झालं. पत्रव्यवहार प्रथम कमी कमी झाला आणि मग तो कधी बंद पडला ते माझ्या लक्षांतच आलं नाही.

  • इन्ग्रिड बर्गमन

    माझ्या स्वाक्षरीच्या घरात शांत बसतो नेहमीप्रमाणे, भिंतीकडे तोड करून

  • हरवलेल्यांची पंढरी (कथा)

    सिनेमात काम करायचं -मुंबई. नोकरी मिळत नाही- मुंबई. घरी त्रास आहे- मुंबई परिक्षेत नापास झाला-मुंबई :  मुंबई : अशा अनेकविध कारणांमुळे घरी न सांगता मुंबईकडे धाव घेणारे अनेक आहेत. स्वत:हून दडून बसलेल्या अशा माणसांना शोधून काढणं पोलीसच काय कुणालाच शक्य नाही.

  • फिस्ट ऑफ गॉड

    काम संपल्यावर कँन्टीमध्येच पुस्तक वाचत तो रात्र रात्र जागतो, असे त्याचे इतर सहकारी सांगत. बघता बघता रात्रीची शाळा करुन त्याने दहावी पूर्ण केली. रात्रीच कॉलेज सुरु केल. ऑफिस संपल्यावर बसल्याबसल्या टायपिस्टकडून टायपिंग शिकला. अडीअडचणीला टायपिंगची मदत करु लागला. टायपिंगची परीक्षा पास झाला.

  • एक परीस स्पर्श ( भाग – ३२ )

    खूप विचार केल्यानंतर विजयने पुन्हां पत्रकारितेत आणि साहित्य क्षेत्रात नशिब आजमावण्याचा निर्णय घेतला. विजयने पूर्वी एका साप्ताहिक वृत्तपत्रात पत्रकारिता केली होती. बातमी मिळविण्यापासून बातमी कशी लिहायची हे ही तो तेथे शिकला होता. पण पत्रकारितेत तो फार रमला नव्हता कारण तेंव्हा पत्रकारिता हे काही त्याचे उत्पन्नाचे साधन होऊ शकले नाही.

  • गाईचे सैन्य

    एके दिवशी ‘तांबू’ गाय रानात गेली. रानात चरता चरता दिवस कसा संपला ते कळलंच नाही. जरासं अंधारून आलं होतं. हळूहळू ती परतीच्या वाटेवर आली. परंतु बरोबरीच्या ‘पांढरी’, ‘ढवळी’, ‘राणू’ कुणीच दिसत नाही, हे लक्षात येताच तांबू गायीने आपला चालण्याचा वेग वाढवला. जवळजवळ रानातली वाट संपतच आली होती. दूरवर दिवे दिसत होती. इतक्यात वाघोबाराजे दत्त म्हणून समोरी आले! क्षणभर तांबू गायीला काही सुचेनासे झाले. भीती वाटली.

  • बंडूचे चातुर्य

    वडगावात एक मोठा वाडा होता. वाड्यातील बिऱ्हाडात चार मुलगे होते. राजू, संजू, अजू, बंडू ही त्यांची नावे. रामराव त्या वाड्याचे मालक. त्यांना मूलबाळ नव्हते. ते फार मायाळू होते. मुलांना ते कधी खाऊ देत, कधी पैसे देत. एकदा ते गावाला जायला निघाले. ते तीन महिन्यांनंतर परत येणार होते.