(User Level: User is not logged in.)

कथा

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • गोमुचे-प्रेम-सेवा-शरण (गोमुच्या गोष्टी – भाग ४)

    परदेशात माहित नाही परंतु भारतांत तरी मॉलमधे वस्तु विकत घेण्यापेक्षां त्या पहाणे आणि मग कांही न घेतांच खायला फूड कोर्टमध्ये जाणे, अशी ग्राहकांची प्रवृत्ती जास्त असते.

  • जीवनाचा मूलमंत्र

    गावाबाहेर नदीच्या काठावर एका झोपडीत एक सत्पुरुष राहात होते. ही झोपडी त्यांनी स्वतःच बांधली होती. नदीच्या काठावरच शंकराचे देऊळ होते. तेथे दर्शनासाठी बरेच लोक येत. सर्व लोक निघून गेल्यावर हे सत्पुरुष त्या मंदिरात जायचे व त्या मंदिराची स्वच्छता करायचे. त्यांचा हा दिनक्रमच होता. काही लोक त्यांच्या दर्शनाला यायचे मात्र ते सत्पुरुष कोणाकडे काही मागायचे नाहीत वा कोणी दिले तरी ते घ्यायचेही नाहीत. स्वतः कष्ट करून पोटासाठी लागेल तेवढीच ते कमाई करायचे. एकदा त्यांच्याकडे एक तरुण आला व त्यांना म्हणाला की, मी आतापर्यंत जे जे केले त्यात मला अपयश आले. त्यामुळे नैराश्य आले असून, मी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ जाताना तुमच्यासारख्या सत्पुरुषाला भेटावे म्हणून आलो आहे. त्या सत्पुरुषाने त्याची सर्व हकीकत ऐकून घेतली व त्याला आपल्या झोपडीत नेले. ते त्याला म्हणाले की, तुझा निर्णयच झाला असेल तर तू अवश्य आत्महत्या कर. फक्त आता मला भूक लागली आहे. मी जे काही करेन ते तूही खा व नंतर तू तुझ्या मनाप्रमाणे वागू शकतोस. असे म्हणून त्या सत्पुरुषाने घरात जे काही किरकोळ सामान होते, त्याचा उपयोग करून गव्हाची छान खीर केली. ती खीर शिजताना तिचा सुवास दरवळत होता. त्यामुळे तो तरुण सुखावला होता. खीर तयार झाल्यानंतर त्या सत्पुरुषाने खिरीचे भांडे त्या तरुणाच्या हातात देत म्हटले हे बाहेर घेऊन जा व तेथे बाहेर उकीरड्यावर फेकून दे. सत्पुरुषाचे हे बोलणे ऐकून त्या तरुणाला फारच आश्चर्य वाटले. तो म्हणाला एवढी चांगली सुंदर खीर तुम्ही बनवलेली व ती न खाता बाहेर उकीरड्यावर फेकून द्यायला सांगता. त्यावर सत्पुरुष त्याला म्हणाले की, तू जे काही करतोस तेच मीही करतो आहे. तुझे जीवन या खिरीसारखेच छान व सुंदर आहे. परंतु, तू आत्महत्या करून ते नष्ट करीत आहेस. त्या तरुणाला सत्पुरुषाच्या उपदेशातील मर्म कळले व आत्महत्येचा विचार सोडून तो त्यांचे आशीर्वाद घेऊन तेथून गेला.

  • प्रशंसेला दूरच ठेवा

    आपली प्रशंसा केलेली कोणाला आवडत नाही? उलट सर्वांनी सदासर्वकाळ आपली प्रशंसाच करावी असेच अनेकांना वाटत असते. परंतु अशा प्रशंसेमुळे गर्व निर्माण झाल्यास कधी कधी आपल्या कार्यात तो व्यत्यय आणू शकतो. म्हणून प्रशंसेला सहसा भुलून जाऊ नये. यासंदर्भात आचार्य विनोबा भावे यांचे एक उदाहरण खूपच बोलके आहे. महात्मा गांधी यांची विचारसरणी प्रमाण मानून आचार्य विनोबा भावे यांनी पवनारला आपला आश्रम सुरू केला. त्या वेळी तेथे जमनालाल बजाज यांचे चिरंजीव कमलनयन बजाज हे काही काळ शिकण्यासाठी म्हणून आले होते. एकदा विनोबाजी चरख्यावर सूत कातत बसले असता तेथे त्यांना कोणीतरी पोस्टाने आलेली काही पत्रे आणून दिली. त्यातील एक पत्र महात्मा गांधी यांचे होते. विनोबाजींनी ते पत्र वाचले व लगेच ते फाडून फेकून दिले. या वेळी कमलनयन बजाज तेथेच होते. त्यांना विनोबाजींच्या कृत्याचे आश्चर्य वाटले. विनोबाजींच्या माघारी त्यांनी त्या पत्राचे फाडलेले तुकडे गोळा केले व एकत्र करून वाचले. त्या पत्रात महात्माजींनी विनोबांना लिहिले होते, 'तुमच्याइतकी महान व्यक्ती अजून तरी माझ्या पाहण्यात नाही'. खरे तर महात्माजींचे हे प्रशंसापत्र विनोबाजींनी ज्याला त्याला दाखवायला पाहिजे होते. परंतु ते त्यांनी फाडून टाकले होते. म्हणून कमलनयन बजाज यांनी विनोबाजींना त्यासंबंधी विचारणा केली असता ते म्हणाले की, अशी पत्रे जपून ठेवणे हा मोह आहे. कारण त्यामुळे मला गर्व उत्पन्न होईल व गर्वाने फायदा होण्याऐवजी नुकसानच होते. त्यामुळे ते पत्र जवळ बाळगणे म्हणजे माझे एका परीने नुकसानच होते. अर्थात, त्या महात्मा गांधीजींनी मजविषयीच्या ज्या प्रेमाने ते पत्र लिहिले होते तो प्रेमाचा भाग मी आधीच काढून घेतलेला आहे. बाकींचे नष्ट करण्यातच माझा फायदा होता व म्हणून ते पत्र मी फाडून टाकले. विनोबाजींचे हे तर्कशुद्ध विवेचन ऐकून कमलनयन बजाज यांचे अर्थातच समाधान झाले.

  • घड्याळ (कथा)

    अनघा प्रकाशन आयोजित कथास्पर्धेत सौ प्राची गडकरी यांनी  लिहिलेली प्रथम क्रमांक प्राप्त कथा

  • कुरडूची भाजी…

    सन 1980 ची गोष्ट त्यावेळी माझी आई घरामध्ये जळण नाही म्हणून. रानातून कुर्डू च्या फुलांच्या झाडाचे जळण डोक्यावरून एक मोठा भारा रोज घेऊन येत असे. स्वयंपाकासाठी घरांमध्ये वेळ नव्हते मी रेल्वेमध्ये नुकताच रेल्वेमध्ये कामाला लागलो होतो. त्यावेळी पगार महिना दोनशे रुपये पर्यंत मिळत होता.

  • गॊष्ट एका राणीची.. (निवड)

    अकरावी प्रवेश सुरु झाले. त्यावेळी नवीनच ओनलाईन प्रवेश प्रक्रिया चालू होती म्हणून शाळेतून अर्ज भरून दिले जात होते. अर्ज भरायचा आहे, ठीक आहे पण कोणत्या शाखेत प्रवेश घ्यायचा हे काही राणीला कळत नव्हते. तिला काय बनायचं आहॆ याचा तिने कधी गहन विचार केलाच नव्हता.शाळेत जेव्हा शिक्षक विचारायचे, कोणाला पुढे जाऊन वैज्ञानिक बनायचे आहे तेव्हा राणीचा हात पहिला वर असायचा,कधी शिक्षकांनी विचारल पत्रकार बनायला कोणाला आवडेल पुढे जाऊन.. तरी पहिला हात राणीचाच वर. तात्पर्य काय तर राणीने विचार केलाच नव्हता तिला पुढे जाऊन काय करायच आहे त्याचा.

  • एक परीस स्पर्श (भाग – ५४)

    विजय त्याच्या कार्यालयात बसलेला होता त्याच्या कार्यालयाच्या बाहेर दोन म्हाताऱ्या गप्पा मारत बसलेल्या होत्या. लोकांच्यात चाललेला संवाद हे विजयच्या साहित्यिक भुकेसाठी नेहमीच खाद्य ठरत असते त्यामुळे तो त्या म्हाताऱ्या स्त्रियांमध्ये चाललेला संवाद कान लावून ऐकत होता. त्यातील एक म्हातारी फक्त दुसरी म्हातारी जे काही बोलत होती ते कान देऊन ऐकण्याचे काम करीत होती. ती बडबडी म्हातारी त्या दुसऱ्या म्हातारीला सांगत होती…” मला दोन मुलगे आणि एक मुलगी आहे मोट्या मुलाला दोन मुलगे आहेत आणि मुलीला एक मुलगा एक मुलगी आहे लहान मुलाला अजून काही नाही… त्याचे दोन वर्षांपूर्वीच लग्न झाले आहे..

  • प्रश्नोपनिषद : एक चिरंतन वेदना !

    प्रश्नोपनिषद : एक चिरंतन वेदना !

    एका घरट्यात दोन पिलं कासावीस झाली आहेत . त्यांचं निःशब्द आक्रंदन आपल्याला तर जाणवेलच पण पाषाण हृदयी माणसाच्या मनाला सुद्धा जाणवेल . आणि पिलांकडे न पाहता पिलांचे आईबाप ठरवून पाहिल्यासारखे दुसरीकडे नजर फिरवून फांदीवर अगदी अलिप्तपणाने बसले आहेत , हे सुद्धा जाणवेल .

  • एक परीस स्पर्श ( भाग – ७ )

    गोव्यावरून आल्यावरच विजयचे आयुष्य खऱ्या अर्थाने निरस बेचव आणि निरुत्साही होऊ लागले कारण त्यावेळी विजयच्या जन्मकुंडली प्रमाणे विजयच्या जन्मपत्रिकेत तेंव्हा शनीची महादशा सुरू होती आणि त्याच काळात विजयची शनीची अंतर्दशाही सुरू झाली.

  • एक अभागी – नक्षलवादी दहशतीची बळी (कथा ५)

    शाळेत मुळाक्षर,शिकणे, १०० पर्यंत आकडे मोजणे, प्रादेशिक कोया भाषेत हे सर्व लिहिता येणे, ही नक्षलवादी जनता सरकारची सर्व मुलामुलींना शिक्षण देण्याची पद्धत, इयत्ता वगैरेची गरज नाही, अबुजमाड भागात अशा शाळा आहेत. एवढे जुजबी शिक्षण घेतले की यातील काही मुले खेड्यातील आपली राहती चंद्रमोळी झोपडी सोडून जंगलातील नक्षलवादिंच्या तंबूत राहण्यास येतात व तेच त्यांचे कायमचे आयुष्य जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत, नाहीतर केंव्हाही मृत्यूच्या जाळ्यात अडकायचे, नक्षल प्रमुखाच्या गोळीने नाहीतर पोलिसांच्या गोळीबारात.