(User Level: User is not logged in.)

कथा

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • अजब न्याय नियतीचा – भाग १५

    सगळीकडे संध्याकाळची किरणे पसरली होती. घाटावरून लोकांची परतण्याची लगबग चालली होती. जवळच्या देवळांतून सायंआरतीचे आवाज येत होते. एकंदर खूप सुंदर आणि प्रसन्न वातावरण निर्माण झालं होतं. आरू या वातावरणाशी तद्रूप झाली होती. एक शांत सुंदर भाव तिच्या चेहेर्‍यावर पसरला होता. नील तिच्या या लोभस रूपाकडे एकटक पहात बसला होता. जवळच्या देवळातील घंटानादाने आरूची तंद्री भंग पावली. तिचे नीलकडे लक्ष गेले. तो तिच्याकडेच पहात होता.

  • राजकारणांतील वैर

    राजकारण म्हणजे काय? देशावर अथवा देशाच्या एका भागावर सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचे उद्योग. ही अगदी ढोबळ व्याख्या झाली पण सत्ता मिळवण्याचे प्रयत्न नक्कीच राजकारणाचा केंद्रबिंदू असतो. लोकशाहींत ही सत्ता मिळवायची तर निवडणुका आल्या पक्ष आले. स्पर्धा आली. पक्षांतर्गत सत्ता, शासन करण्यासाठी सत्ता ह्यांत ते सर्व गुंततात. राजकारण करणाऱ्या माणसांत अनेक पातळ्यांवर स्पर्धा असते. कधी कधी ही इतकी तीव्र होते की दोन राजकारणी एकमेकांच्या जीवावर उठतात किंवा दोघांतील एक जण तरी दुसऱ्याचा इतका द्वेष करू लागतो की तो दुसऱ्याचा जीव घ्यायचा विचार करू लागतो. अर्थात उघडपणे तो हे दाखवेल तर तो कसला राजकारणी. बाहेर तो खूप मैत्री दाखवू शकतो पण त्याच वेळी वैऱ्याच्या खूनाचा बेत मनांत रचत असतो. कधीतरी तो आपला बेत पार पाडण्यात यशस्वी होतो. राजकारणी नेत्याला इतरही विरोधक असतात, जे राजकारणांत असतातच असं नाही. त्यांच्यापैकीही एखादा असाच बेत रचून त्याला मारू शकतो. असे अनेक पदर असलेला हा गुन्हा प्रत्यक्षात घडला होता. एकेकाळी स्थानिक नगरपालिकेचा अध्यक्ष असणाऱ्या एका राजकारणी व्यक्तींचा खून झाला होता आणि दीड महिना होऊन गेला तरी पोलिसांना कांही धागा मिळत नव्हता म्हणून हे प्रकरण घेऊन इनस्पेक्टर हिरवे यशवंताकडे आले होते.

  • कुस्करलेली कळी – उमललेले फुल – १७

    आपल्या दु:खी जीवनाकडे संगीता तटस्थ वृत्तीने पाहू लागली होती. आपल्या कामात तिने झोकून दिले होते, आपल्या एकाकी जीवनात कोणताही बदल होणार नाही हे तिच्या मनानी पचविले होते, आपल्या नशीबाचे भोग आपण एकट्यानेच भोगले पाहिजेत हा वैचारिक बदल घडत चालला होता.

  • त्यांच्या तत्त्वाच्या प्रकाशात

    प्रतिष्ठीत घरांतून रस्त्यावर आलेल्या दोन भिकाऱ्यांची कथा. भिकारी असले तरी त्यांचीही कांही तत्त्वं आहेत. कॅप्टनला मित्राचा विश्वासघात करणं, हे महापाप वाटतं तर मरेला असा विश्वासघात करण्यात कांहीच चूक वाटत नाही. मरेला पैशासाठी कुणाही स्त्रीचा स्वीकार करण्याची तडजोड गैर वाटते, त्या तत्वासाठी तो काकाच्या इस्टेटीवरचा हक्क सोडतो तर खायला मिळावं म्हणून कॅप्टन कुरुप फळवालीला पटवायला जातो.

  • एक होती वेडी चिऊ…

    एक होती चिऊ. अर्थात, एक चिमणोबाही होताच पण तेवढेच नाही काही बाकी पण बरेच होते. चिमणे होते, चिमण्या होत्या. काऊ होता आणि एक महत्त्वाचा म्हणजे राघूदादाही होता. ही काही नेहमीची काऊ चिऊची गोष्ट नाही. ही वेगळीच आहे. या चिऊचं घर मेणाचंही नव्हतं की शेणाचंही नव्हतं. अगदी साधं. नेहमीसारखं काड्याकाड्यांचं होतं; पण या चिऊताईचा स्वभाव मात्र जरा वेगळाच होता बरं का म्हणून तिची गोष्ट ही सरळ साधी नव्हती. जरा वळणावळणांचीच होती.

  • एक परीस स्पर्श ( भाग – ४४ )

    मे महिना संपला की सर्वाना वेद लागतात ते पावसाचे ! पाऊस हा कवींसाठी थोडा विशेषच असतो कारण प्रत्येक कवीने पावसावर एकतरी कविता लिहिलेली असतेच ! विजयने पावसावर आतापर्यत दहा- बारा कविता तरी लिहिल्या होत्या. त्यात त्याची सर्वात आवडती कविता होती तर पावसात भिजताना ! ज्या कवितेत प्रियकर आपल्या प्रेयसीसोबत पावसात भिजण्याची कल्पना करत असतो. विजयासाठी ही खरोखरच कल्पना एक होती कारण प्रत्यक्षात विजय असा कधी कोणासोबत एका छत्रीत भर पावसात शिरल्याचे सध्यातरी त्याला आठवत नव्हते. पण भरपावसात विजय भिजलाय मात्र बऱ्याच जणींसोबत ! छत्री जवळ असतानाही ! विजय लहान असताना त्याला पावसात भिजण्याची प्रचंड आवड होती. पावसाचे पाणी तळहातावर झेलत राहायला तर त्याला आजही आवडते.

  • कुस्करलेली कळी – उमललेले फुल – १२

    एके दिवशी सकाळी सकाळी बांद्रा पोलीस स्टेशनचे एसीपी अभिजित सावंत यांचा संगीताला फोन आला. केसमधील काही महत्वाचे धागेदोरे हाती लागलेले असून, त्या बाबत पुढे काय पावले टाकायची हे ठरविण्यासाठी तिला ताबडतोब पोलीस स्टेशनवर बोलावले होते.

  • घरटं छोटं

    पशुपक्ष्यांचे शिक्षण, लग्न वगैरे काही नाही तर ते एकमेकांना समजून सांभाळून घेतात. कदाचित भांडण करत असतील. मात्र घर सोडून एकमेकांना सोडून देत नाहीत. कारण त्यांचे घरटं छोट आहे पण मन मात्र खरंच खूप मोठे आहे. दोघेही उच्च शिक्षित. आर्थिक स्वावलंबन. जबाबदारी नाही. बंधन नाहीत सगळ्या सुखसोयी. अजून काय हवं असतं सुखी संसारासाठी ते सगळे काही आहे तरीही असे का व्हावे? हे समजत नाही. पण माणसा परीस… हेच खरं आहे….

  • स्पेस’ ची गरज – (मी आणि ती)

    मला आता ‘ स्पेस ‘ ची गरज आहे. घंटा…स्पेस मी तिला म्हणालो. अरे स्पेस म्हणजे काय खरा अर्थ कळतो काय ?

  • सोल्यूशन डॉट कॉम (कथा)

    मुंबईच्या दौऱ्यात एक दिवस रिकामा होता. खूप दिवस झालेत, दिवस काय वर्षं झालीत विठूला भेटलो नव्हतो. ठरवलं, जमलं तर भेटायचं. खूप ऐकलं होतं त्याच्या गरुड भरारीबद्दल. त्यामुळे खूप बोलायचं होतं. बरंच काही जाणून घ्यायचं होतं.