नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा

मी अनेक वर्षांनी पुन्हा डेहराडूनला जाणार होतो. पाश्चात्य देशांत जाऊन मी नशीब काढलं होतं आणि मी डेहराडूनमधील मित्रांना विशेषतः माझा शाळासोबती मोहन इनामदारला भेटायला उत्सुक होतो. मी डेहराडून सोडल्यावरही अनेक वर्षे त्याचा आणि माझा पत्रव्यवहार चालू होता. सर्व पत्रव्यवहारांमध्ये होतं तेच आमच्या बाबतीत झालं. पत्रव्यवहार प्रथम कमी कमी झाला आणि मग तो कधी बंद पडला ते माझ्या लक्षांतच आलं नाही.

सुरुवातीला पोहण्याच्या तलावासाठी तासाला दोन रुपये होते. ते कसेबसे भरुन उन्हाळ्यात का होईना पोरं पोहायला जात. वर्षभर शक्यच नव्हतं. कोट्यावधी रुपये खर्चून बांधलेला दृष्ट लागेल असा कॉम्प्लेक्स ओसच राहिला. नुकसान टाळण्यासाठी महापालिकेने तरण तलाव खाजगी कंत्राटदाराकडे दिला. त्याने तासाची फी १५ रुपये केली. पोरं बाहेरच राहिली.
ज्या गोष्टीला आपण आपली कमजोरी समजतो, तिलाच जो, आपली शक्ती बनवून जगायला शिकवतो, विजयी व्हायला शिकवतो, तोच खरा गुरु! आतून आपण कोठे ना कोठे ‘दिव्यांग’ असतो, कमजोर असतो. त्यावर मात करून जगण्याची कला शिकवणारा ‘गुरु’ हवा आहे, किमान मला तरी.
आहे का तुमच्या पहाण्यात असा कोणी?

दिव्या आणि विजयची भेट एका पतपेढीत झाली होती. आणि ती विजयच्या बाबांच्या ओळखीची होती. विजयच्या आयुष्यात आलेली ती सर्वात बिनधास्त मुलगी होती. म्हणजे कोणा मुलासोबत बोलताना आपल्याला कोणी पाहिलं तर वगैरेची तिला अजिबात चिंता नव्हती.
पहाटेच्या वेळी इन्स्पेक्टर मोहिते मिरज स्टेशन वर गाडीतून उतरले . पाटील व त्यांचा मुलगा केदार त्यांच्या गाडीची वाट पाहात प्लॅटफॉर्म वर उभेच होते . खरे तर इ . मोहित्यांना सरळ सरकारी विश्राम गृहात जाण्याची ईच्छा होती . परंतु पाटीलांच्या आग्रहाखातर सकाळच्या चहासाठी त्यांनी पाटीलांकडे जाणे कबूल केले होते .
वसुधाला, वसंतरावांच्यात झालेला हा अचानक बदल सुखावत होता.. त्यांनीही वसंतरावांना, मनापासून साथ देण्याचे ठरविले.

संधिप्रकाशात उभी असणारी झाडे अचंबित होऊन खाली पहात होती. खाली पसरलेल्या सावल्यात , विविध वयोगटातील असंख्य मुलं , शांतपणानं बसली होती . कुणीच बोलत नव्हतं . एक प्रकारचा आत्मविश्वास आणि निर्धार त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता . त्यांच्या हातात घोषणा लिहिलेले बोर्ड दिसत होते . फारच वेगळ्या घोषणा होत्या .
(बुशमन लोकांमधील एक पुरातन दंतकथा)
आदिवासींचं म्हणणं आहे, काळ जेव्हापासून चालू झाला तेव्हा सूर्याला आपली आभाळातली वाट नीट माहीत नव्हती. प्रत्येक गोष्टीकडे कुतूहलानं टक लावून बघणं ही सवय जिराफाला होती. सृष्टीनिर्मात्याला वाटलं की सूर्याकडे लक्ष देण्याची कामगिरी जिराफावर सोपवावी.
आम्ही त्याच्या घराच्या मागच्या बाजूला गेलो , मागे झाडी होती , एक फाटक होते ,जुनच , हवेत थंडावा होता, डोक्यावर चंद्र स्पष्ट दिसत होता , त्याचा प्रकाश समोर पडला होता.
माणसामधील चांगल्या गुणांचा शोध घेऊन त्याच्याकडून आपणास हवी ती कामे करून घेण्यासाठी गुणग्राहकता लागते. कारण अशी चांगली माणसेच, ती ज्या संस्थेत काम करतात त्या संस्थेची भरभराट करू शकतात. ही भरभराट केवळ त्या संस्थेची नसते तर पर्यायाने समाजाची व देशाचीही असू शकते.
अँड्र्यू कार्नेगी हा अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योगपती होता. केवळ चांगल्या माणसांच्या जोरावर त्याने आपल्या उद्योगाची मोठी भरभराट केली होती. त्याच्या गुणग्राहकतेची ख्याती सर्वत्र होती. एकदा त्याला कोणीतरी विचारले, की चांगली माणसे तुम्ही शोधता तरी कधी आणि केव्हा? त्यासाठी तुम्ही कोणाकडे प्रशिक्षण घेतले आहे काय?
त्यावर कार्नेगी यांनी त्याला फार समर्पक उत्तर दिले. ते म्हणाले, चांगली माणसे शोधणे म्हणजे मातीतून सोने मिळविण्यासारखे आहे.. जर तुम्हाला मातीतून एक किलो सोने मिळवायचे आहे, तर त्यासाठी हजारो टन माती उकरावी लागेल. अर्थात तुम्ही त्या वेळी केवळ माती उकरायला नाही तर त्यातील सोने शोधायला गेला असाल तरच तुम्हाला थोडे फार सोने मिळू शकेल. चांगली मासे याच पद्धतीने शोधायची असतात. कार्नेगी यांचे हे उत्तर ऐकून प्रश्नकर्त्यांचे साहजिकच समाधान झाले.
Copyright © 2025 | Marathisrushti