नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा
विजय सोफ्यावर बसून पेपर वाचत असतो इतक्यात दारावरची बेल वाजते तो पेपर समोरच्या टेबलावर ठेऊन पुढे होत दरवाजा उघडतो तर दरवाजात रमेश उभा असतो त्याला आत घेताच…

वाघाला रक्ताची चटक लागली की जस होत, तस आमच्या परिसरातील लोकाना झाल होत. निम्म्या किमतीत वस्तू मिळतात म्हणजे काय? तीन महिने दुकान सुरु होऊन झाले होते. त्यामुळे निम्म्या किमतीत मिळालेल्या वस्तू लोकांच्या घरोघरी दिसू लागल्या होत्या.

साधू त्यांना एक जादुई घोडा, काटी आणि झोळी देतो आणि त्यांच्या कानात एक मंत्र सांगतो. हा घोडा तुम्हाला तुमच्या इच्छित स्थळी घेऊन जाईल..ही झोळी तुम्हाला हव्या त्या वस्तू देईल…आणि ही काटी तुमच्या शत्रूंचा नाश करेल…आणि ते साधू स्वर्गात प्रयाण करतात. ते दोघे बहीण भाऊ घोड्यावर बसतात आणि मंत्र म्हणून घोड्याला आदेश देतात आमचे आईवडील ज्या राज्यात असतील तेथे आम्हाला घेऊन चल…क्षणात ते घोड्यासह आटपाट नगरात पोहचतात…तेथे पोहचल्यावर ते झोळीतून मंत्राच्या साह्याने मोहरा निर्माण करतात आणि एक वाडा विकत घेतात…आपल्या राज्यात कोणी श्रीमंत बहीण भाऊ राहायला आल्याची बातमी राजदरबारात पोहचते… दृष्ट राणीला त्यांना भेटण्याची उत्सुकता निर्माण होते…
शेकडो वर्षांमागची गोष्ट. इराण देशातील एका पहाडाजवळ एका विस्तीर्ण तलावाच्या काठी एक लहान झोपडी होती. त्या झोपडीत एक गरीब धनगर, त्याची बायको, व इमाम नावाचा त्यांचा आठ-दहा वर्षांचा एक लहान मुलगा, ही रहात असत. या तिघांनाही पोटाकरता संबंध दिवस राबावे लागे. धनगर व त्याची बायको पहाडावर जाऊन सरपण गोळा करीत व त्याच्या मोळ्या बांधून त्या जवळच्या शहरात नेऊन विकीत.
मायकेल अँजेलो हा आंतराष्ट्रीय ख्यातीचा चित्रकार व शिल्पकार होता. त्याच्या चित्र आणि शिल्पाला फारच मागणी असे. एकदा एका श्रीमंत माणसाने त्याला आपल्या दिवाणखान्यात लावण्यासाठी चांगल्या चित्राची मागणी केली. त्यासाठी अँजेलोला वाट्टेल ती किंमत द्यायला तयार झाला. परंतु अँजेलोने त्याला नम्रपणे नकार दिला. कारण त्याला माहित होते की, दिवाणखान्यी शोभा वाढेल मात्र रोज तेच ते चित्र पाहून एकदिवस तो श्रीमंत माणूसही कंटाळेल. नव्याचे नऊ दिवस या न्यायाने त्या चित्राचे कौतुक होईल व नंतर कदाचित त्याकडे दुर्लक्षही होईल, म्हणून फार मोठी किंमत मिळत असूनही त्याने त्या श्रीमंत माणसाला चित्र देण्याचे नाकारले. त्यानंतर एकदा मायकेल अँजेलो हा असाच रस्त्यावरून भटकत असताना रस्त्यावर काही तरी विकत बसलेल्या एका मुलाने त्याला पाहिले. त्या मुलाला अँजेलोबद्दल चांगली माहिती होती. अँजेलोला पाहताच तो मुलगा एक कागद घेऊन त्याच्याकडे पळत आला व म्हणाला, 'अंकल, मला या कागदावर छानसे चित्र काढून द्याल?' त्या निरागस मुलाच्या मनातील भाव ओळखून अँजेलो तेथेच रस्ताच्या कडेला बसला व त्याने त्या कागदावर लगेच एक सुरेख चित्र काढून त्या मुलाला दिले. ते चित्र पाहून त्या मुलाला विलक्षण आनंद झाला. मात्र अँजेलोला द्यायला त्या मुलाजवळ काहीच नव्हते. त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर थोडीशी अपराधीपणाची भावना दिसली. त्यावर अँजेलो त्याला म्हणाला, या चित्राबद्दल मला तुझ्याकडून काहीही नको आहे. हे चित्र पाहून तुला जो आनंद झाला त्यातच माझ्या चित्राची किंमत वसूल झाली आहे. असे म्हणून त्या मुलाची पाठ थोपटून तो तेथून निघून गेला.
एक शेतकरी होता. त्याने दरवर्षीप्रमाणे आपल्या शेतात भाताचे पीक लावले होते, कारण त्या भागात चांगला पाऊस पडायचा. त्या वर्षीही चांगलाच पाऊस पडला व हळहळू भाताचे पीक चांगले आले. त्या भाताच्या पिकातील एक मोकळी जागा पाहून एका पक्षिणीने आपल्या पिलांसाठी घरटे केले. ती पक्षीण आणि तिची चार-पाच पिले तेथे मजेने रहात होती, कारण शेतकर्याला त्या घरट्याची कल्पनाच नव्हती. भाताचे पीक चांगलेच वर आल्यानंतर त्या शेतकर्याने कापणी करायचे ठरविले व एकेदिवशी आपल्या मुलाला त्याने सांगितले की, उद्या आपल्या सर्व नातेवाइकांना कापणीसाठी बोलव. त्याप्रमाणे त्या मुलाने सर्व नातेवाइकांना कापणीसाठी निरोप दिला. शेतकर्याने त्याच्या मुलाला काय सांगितले हे त्या पक्षिणीच्या पिल्लांनी ऐकले होते. त्यामुळे सायंकाळी पक्षीण येताच त्यांनी तिला शेतकर्याचे बोलणे सांगितले व आपल्याला आता आपले घरटे सोडावे लागणार याचे त्यांनी दुःख व्यक्त केले. त्यावर पक्षीण त्यांना म्हणाली, उद्या तरी कोणीही कापणी करायला येणार नाही त्यामुळे लगेच आपल्याला घरटे हलवावे लागणार नाही. दुसऱ्या दिवशी शेतकरी कापणीसाठी नातेवाइकांची वाट पाहत बसला मात्र कोणीही आले नाही. त्यामुळे शेतकरी पुन्हा मुलाला म्हणाला, ' 'नातेवाइकांचे काही खरे नाही, तू उद्या आपल्या आजुबाजूच्या शेतकर्यांना निशेप दे म्हणजे आपणच कापणी करू. ' ' मुलगा हो म्हणाला व निरोप द्यायला गेला. शेतकरी व मुलाचे हे संभाषणही पिलांनी ऐकले व सायंकाळी पक्षीण आली की तिला ते सांगितले. त्यावर पक्षीण त्यांना म्हणाली, उद्याही कोणी येणार नाही. त्यामुळे उद्याचा दिवस तरी घरटे आपले शाबूत राहील. दुसर्या दिवशीही कापणीसाठी कोणीच आले नाही त्यामुळे शेतकरी वैतागला व आपल्या मुलाला म्हणाला, आता आपणच उद्या घरातील सर्व जण भाताची कापणी करून टाकू. हेही पिल्लांनी ऐकले व आपल्या आईला ते सांगितले. तेव्हा मात्र पक्षीण त्यांना म्हणाली, आता मात्र आपल्याला दुसरीकडे घरटे करावेच लागेल. त्याप्रमाणे सायंकाळीच तिने आपल्या सर्व पिल्लांना दुसरीकडे तात्पुरत्या घरड्यात हलविले. इकडे दुसर्या दिवशी सकाळीच शेतकरी आपल्या कुटुंबासह आला व त्याने भाताची कापणी सुरू केली.
स्पृहाचं म्हणणं ऐकून घेईपर्यंत अनिकेतने कॉल कट केलासुद्धा. दुपारपासून स्पृहाचं डोकं धरलंय त्यात कालच गुडघा सुजलाय. हल्ली थोडी जरी चाल पडली तरी सुजतो. मग घ्या पेनकिलर. मग अॅसिडिटी, अपचन, डोकेदुखी. गेल्या दहा वर्षात या सगळ्या दुखण्याची सवय कशी झाली नाही शरीराला असा स्पृहा स्वत:ला प्रश्न विचारी.
मराठी भाषा,भाषेचे उच्चार, लहेजा, त्यामधून डोकावणारं आणि ऐकणाऱ्याला जाणवणारं वेगळेपण, भाषेचे वळसे, वेलांट्या, वळणं आणि त्यामधून बाहेर येणारं पोटातलं या सगळ्याची एक गंमत असते नाही ?
उत्तर कर्नाटकामधल्या एका लहानशा खेडेगावात आपल्या आजी आजोबांबरोवर रहाणारी ती दहा बारा वर्षाची छोटी परकरी पोर ….
तिचे आजोबा निवृत्त शाळा शिक्षक .. घरी पुस्तकंच पुस्तकं आणि आजोबां प्रचंड व्यासंगी !मग काय … रोज रात्री जेवण झाल्यावर अंगणात बसून आकाशातल्या लुकलुकणाऱ्या ताऱ्यांच्या साथीनं ती आजोबांकडून गोष्टी ऐकत असे . कधी रामायण ,महाभारत , इसापनिती कथासरितसागर , पंचतंत्र तर कधी अरेबियन नाईट्स … कधी परदेशात घडलेल्या काही प्रसंगांच आजोबा गोष्टीत रुपांतर करून तिला सांगत …
कधी तिला गावातल्या छोटया वाचनालयात घेऊन जात आणि मग ती काळ वेळेचं भान विसरून तिथे पुस्तकात रमून जाई …
बिरबलाला बादशहाच्या मर्जीतून उतरविण्यासाठी त्याचा द्वेष करणारे लोक नेहमीच काहीना काही डाव रचीत असत. परंतु बिरबलापुढे त्यांची डाळ मुळीच शिजत नसे. त्यांचे सर्व डाव त्यांच्याच अंगाशी येत व त्यांची चांगलीच फटफजिती होते.
Copyright © 2025 | Marathisrushti