(User Level: User is not logged in.)

कथा

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • खरा पराक्रम

    बाराव्या शतकात फ्रान्समध्ये फिलीप गस्ट नावाचा राजा होऊन गेला. तो स्वतः अत्यंत पराक्रमी होता मात्र इतर पराक्रमी सैनिकांना वा सरदारांनाही तो सतत प्रोत्साहन द्यायचा. मुख्य म्हणजे त्याला सत्तेची कसलीच हाव नव्हती. आपल्या पदावर आपल्यासारखाच पराक्रमी व धाडसी राजा - मग तो कोणीही का असेना - बसावा, हीच त्याची इच्छा होती. त्या काळी देशाचे साम्राज्य वाढविण्यासाठी बऱ्याच लढाया होत. अशाच एका शत्रूराष्ट्राने कान्सवर हक्क चढविला. शत्रू बलाढ्य होता. त्यामुळे लढाईला तोंड फुटण्यापूर्वी राजा फिलीपने आपला राजमुकुट व पवित्र सिंहासन एका मैदानात आणण्याची सैनिकांना आज्ञा केली. सिंहासनावर त्याने राजमुकुट ठेवला व त्याखाली 'सर्वोत्कृष्ट पराक्रम गाजविणाऱ्या वीर पुरुषास' असा मजकूर असलेला फलक लिहून ठेवला व तेथे जमलेल्या सरदार व सैनिकांसमोर भाषण करताना तो म्हणाला, '' या सिंहासनावरील माझा हक्क मी या क्षणी सोडला आहे. या युद्धातके खय पराध्य करून विजयश्री खेचून आणील त्यालाच हे सिंहासन मिळेलच कोच यापुढचा राजा असेल.'' त्याचे ते वीरश्रीयुक्त भाषण ऐकून सैनिकांना चेव चढला व अत्यंत शर्थीने ते लढले. अशा सैनिकांच्या सहकार्यानेच स्वत: राजा फिलीपनेही या युद्धात अतिशय मोठा पराक्रम केला व शत्रूराष्ट्रावर विजय मिळविला. सायंकाळी जेव्हा त्याच मैदानात सर्व एकत्र जमले, त्या वेळी सर्व सरदार व सैनिकांनी एकमुखाने त्याच्या पराक्रमाची प्रशंसा केली व राजा फिलीपचा जयजयकार करून त्यालाच ते सिंहासन पुन्हा बहाल केले.

  • अकल्पित 

    साधारण दहा अकराची वेळ असावी. रविवार सकाळ. वर निळेशार आकाश. मध्येच एखादा पांढऱ्या ढगाचा ठिपका. दोन घरी अगदी संथपणे लांब उंचावर घिरट्या घालत होत्या. एकूणच शांत वातावरण होते. वाऱ्याची एखादी मंद आल्हाददायक झुळूक मधूनच जाणवत होती. त्या झुळुकेवरून आतील कॅन्टीनमधून बनणाऱ्या आमलेटचा खमंग सुखद वास तेथील पोहोणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचत होता.

  • तोतयाचे कांड

    मुंबईत डावऱ्यादादा नांवाचा एक गुंड कांही वर्षांपूर्वी खूप गाजला होता. शेवटी पोलिसांनी त्याला एनकाऊंटरमध्ये मारला होता.

  • बेवारशी

    प्रसिद्धीपत्रक केराच्या टोपलीत जातं. पंधरा दिवस वाट पाहिली जाते आणि ज्या व्यक्तीला त्याचे नातेवाईक, मित्रमंडळी विसरलेली असतात अशी व्यक्ती, शेवटी बेवारशी ठरते आणि त्यानंतर त्या प्रेताची बेवारशी म्हणूनच विल्हेवाट लावली जाते. काही इलाज नसतो.

  • बाबा, होते म्हणून…

    लहानपणी आमच्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराज कळले ते, बाबा होते म्हणून.. भालजी पेंढारकरांचे 'छत्रपती शिवाजी', 'पावनखिंड', 'नेताजी पालकर', 'मोहित्यांची मंजुळा', 'मराठा तितुका मेळवावा' हे चित्रपट आम्ही पाहिले. ते पाहून शिवाजी महाराजांविषयी मनात अपार आदर निर्माण झाला. अशा संस्कारमय ऐतिहासिक चित्रपटांसाठी बाबांना मानाचा त्रिवार मुजरा!!
    १८९८ साली भालजींचा कोल्हापूर येथे जन्म झाला. शिक्षणात मन न रमलेल्या भालजींनी तरुण वयातच कोल्हापूर सोडले व पुणे गाठले. पुण्यातील 'केसरी'मध्ये त्यांनी काही काळ नोकरी केली. 'केसरी'चे जुने अंक व ग्रंथालयातील इतर अनेक पुस्तके, ग्रंथ वाचून त्यांच्यातल्या लेखकावर संस्कार झाले. या काळात त्यांच्यावर वि. दा. सावरकर व बाबाराव सावरकर यांच्या विचारसरणीचा प्रभाव पडला. लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर ते कोल्हापूरला परतले.

    त्यांनी देशप्रेमावर सहा नाटके लिहिली. नाटकात भूमिकाही केल्या. 'बकंभट' या व्यंगपटाचे लेखन दिग्दर्शन केल्यानंतर सरस्वती सिनेटोनच्या 'श्यामसुंदर' या पौराणिक बालचित्रपटाची दिग्दर्शन, पटकथा, संवाद, गीते ही आघाडी सांभाळली. या चित्रपटाने पहिला ऐतिहासिक रौप्यमहोत्सव होण्याचा मान मिळवला.
    यानंतर भालजींनी कोल्हापूर सिनेटोन, श्याम सिनेटोन, शालिनी सिनेटोन, सरस्वती सिनेटोन, अरूण पिक्चर्स अशा अनेक चित्रसंस्थांच्या चित्रपटांची दिग्दर्शन अथवा पटकथा संवादाची जबाबदारी सांभाळली. भालजींच्या प्रत्येक चित्रपटाच्या सुरुवातीलाच 'बहु असोत सुंदर ...' हे महाराष्ट्र गीत असायचेच. १९३४ च्या 'आकाशवाणी' पासून १९८६ च्या 'शाबास सूनबाई' पर्यंत भालजींनी ४० कृष्णधवल व २ रंगीत अशा ४२ चित्रपटांची निर्मिती-दिग्दर्शन केले.
    १९४५ साली कोल्हापूरच्या छत्रपतीं राजाराम महाराजांनी तेरा एकरचा जागा भारतींना दिली. तिथे स्टुडिओ उभारुन त्याचे 'जयप्रभा स्टुडिओ' असे नामकरण केले. १९४८ साली गांधी हत्येनंतरच्या जाळपोळीत स्टुडिओ जळाला. या आगीत 'मीठ भाकर' व 'मेरे लाल' या दोन चित्रपटांची राख झाली. भालजींनी सर्वांची देणी भागवून पुन्हा शून्यातून 'मीठ भाकर' चित्रपटाची निर्मिती केल्यावर या चित्रपटाने व्यवसायही चांगला केला.
    भालजींनी ऐतिहासिक बरोबर सामाजिक विषयही चित्रपटासाठी हाताळले. 'साधी माणसं' हा चित्रपट लोहार व त्याच्या रणरागिणी पत्नीच्या सरळसाध्या जीवनावर बेतलेला होता. या चित्रपटाला महाराष्ट्र राज्य सरकारची अकरा पारितोषिके मिळाली. सूर्यकांत, चंद्रकांत हे मांढरे वंदू, जयश्री गडकर, सुलोचना, राजशेखर, अनुपमा व दादा कोंडके अशा अनेक नामवंत मराठी कलाकारांना त्यांनी घडविले.
    दादा कोंडके 'विच्छा माझी पुरी करा'च्या प्रचंड यशानंतर एखाद्या व्यवसायात गुंतवणूक करणार होते, बाबांनी त्यांना 'सोंगाड्या'च्या निर्मितीस प्रोत्साहन दिले...आणि दादांनी स्वतःच्या अनेक सलग रौप्यमहोत्सवी चित्रपटांचे युग निर्माण केले.
    बाबा असेपर्यंत 'जयप्रभा स्टुडिओ'तून अनेक उत्तम चित्रपटांची निर्मिती होत होती. काही कारणाने बाबांनी घेतलेले कर्ज फेडू न शकल्यामुळे स्टुडिओची मालकी लता मंगेशकरकडे गेली. जिने बाबांच्या चित्रपटांतून मराठी सिनेसृष्टीत पाऊल टाकले, तिनेच बाबांना क्लेश दिले.
    भालजींना ९६ वर्षांच्या आयुष्यात चित्रपटसृष्टीला दिलेल्या योगदानाबद्दल १९९२ साली दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात आले. १९६६ च्या 'साधी माणसं' व १९७० च्या 'तांबडी माती' या दोन चित्रपटांना सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला.
    आज भालजींची १२५वी जयंती. शेकडो वर्षांतून एखादी अशी युगप्रवर्तक व्यक्ती जन्माला येते. जसे छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आपण राहिलो तसेच... बाबा, होते म्हणून आपल्याला चित्रपटांतून छत्रपती शिवाजी महाराज समजले...
    चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांना जयंतीनिमित्त मानाचा मुजरा!!
    - सुरेश नावडकर २-५-२३
    मोबाईल ९७३००३४२८४
    या रचनेचे सर्वाधिकार रचयिता © सुरेश नावडकर यांच्याकडेच आहेत.

  • समृध्द प्रेमाची भेट (संक्षिप्त रुपांतरीत कथा २६)

    ह्या कथेवर १८ चित्रपट झाले. शिवाय लहान पडद्यावर अनेक कथा, मालिकांत ही गोष्ट घेण्यांत आली. शाळा/महाविद्यालये यांच्या अभ्यासक्रमांत आली. कथा इतकी लोकप्रिय आहे की ती छोट्या रूपात लेखकाचे नाव न देता सामाजिक माध्यमांवरही फिरते. खूप लोकप्रिय हळवी कथा.

  • आठवणी… पैशांच्या

    मी रिझर्व्ह बँकेत रुजू झालो टायपिस्ट म्हणून व निवृत्त झालो अधिकारी म्हणून. पूर्ण कारकिर्दीत पगाराच्या पाकिटातून आलेल्या नोटा सोडल्या तर मला ऑफिसमध्ये कधीही नोटा हाताळाव्या लागलेल्या नाहीत; असं मी सांगितलं तर जसा इतरांचा विश्वास बसत नाही त्याप्रमाणे तुमचाही बसणार नाही. पण ही वस्तुस्थिती आहे, एवढं मात्र खरं.

  • कुंपणापलीकडचे आकाश

    तो होळीचा दिवस होता. ग्रंथसाहिब दर्शनासाठी ते दोघे मुद्दाम अंबाल्याहून अमृतसरला आले होते. त्यांच्या लग्नाला नुकतेच एक वर्ष झाले होते. पिढीजात कापड व्यवसायातून फुरसत काढून तो फिरण्यासाठी बाहेर पडला होता. होळीनिमित्त सुवर्णमंदिरात विशेष अर्चना केली जाते. होळी हा मोठा व महत्त्वाचा सण मानला जात असल्यामुळे पंकजच्या माँ, पिताजींनी त्यांना अमृतसरला जाण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार आदल्या रात्रीच ते दोघे तेथे पोहोचले होते. पंकज आधीही तिथे गेला होता.

  • एकदम आयटम…

    तिला काय अपेक्षित होते ते माहित नाही पण मी बोलून गेलो. मला माझीच मजा वाटली कारण हे उत्तर मी कसे दिले .

  • कुस्करलेली कळी – उमललेले फुल – ६

    त्या तिघांच्या जीवनातील रोजची सकाळ आजही नेहमी प्रमाणे उजाडली होती. मौशु नेहमी प्रमाणे शाळेत जाण्याची तयारी करत होती. बाबा बरोबर मजेत शाळेत गेली. संगीताने नेहमी प्रमाणे १० वाजता घर सोडले.