नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा

ते आवाज आता वजनदार आणि जास्त जोरात येवू लागले…. पालापाचोळ्यावरील त्या आवाजांचा वेग तिला जाणवू लागला…. सगळं बळ एकवटून, मनाचा हिय्या करून ती येणार्या प्रसंगाला तोंड देण्यासाठी, येणार्या आवाजांचा कानोसा घेत सावधपणे त्या दिशेने पाहू लागली आणि …..
लेडीज जिमपाशी रेणू पोहोचली तेव्हा सकाळचे ७.३० वाजले होते. पार्किंगमध्ये नॅनो पार्क करून ती लगबगीने जिममध्ये शिरली. समोरच सुधा दिसली. “हाय रेणू ! गुडमॉर्निंग, लुकिंग व्हेरी फ्रेश !” सुधाने तिचे स्वागत केले. ‘व्हेरी गुड मॉर्निंग सुधा. आय अॅम ऑल्वेज फ्रेश.’ रेणूचा हसत प्रतिसाद.
संत एकनाथ महाराज हे खऱ्या अर्थाने धर्मात्मा होते. एकदा आषाढीच्या वारीसाठी पैठणहून दिंडी निघाली. त्या दिंडीत एकनाथ महाराज ही होते. वाटेत एका गावी दिडींचा रात्रीचा मुक्काम होता. त्या गावातील एका गावकर्याला संत एकनाथ महाराजांचे दर्शन घेण्याची फार इच्छा होती. मात्र दिंडीत एवढे असंख्य लोक होते, की आपल्याला त्यांचे दर्शन कसे मिळणार व आपण त्यांना ओळखणार कसे? हाच प्रश्र्न त्याच्यापुढे पडला. शेवटी त्याने एक युक्ती केली. गावात असेलल्या आंब्याच्या झाडाची दोन-तीन पाने तोडली व तो दिंडीच्या ठिकाणी गेला. तेथे लोकांची प्रचंड गर्दी होती. त्या गर्दीत त्याने काही लोकांना ती आंब्याची पाने दाखविली व म्हणाला, '' पाहा, आमच्या गावातील चिंचेच्या झाडाची ही पाने किती मोठी आहेत.' ' त्यावर लोकांनी त्यालाही चिंचेची पाने नसून आंब्याची पाने आहेत असे सांगून त्याला वेड्यात काढले. मात्र तो गावकरी ज्याला त्याला ही चिंचेचीच पाने आहेत असे ठामपणे सांगू लागला. त्यामुळे त्याच्याभोवती प्रचंड गर्दी जमली व लोक त्याच्याशी हुज्जत घालू लागले. संत एकनाथ महाराजांनाही ही गोष्ट कळली व ते स्वतःच तेथे आले व त्या गावकर्याशी वाद घालणार्या लोकांना म्हणाले, ' 'ईश्वराने वृक्षवीची निर्मिती करताना काही त्यांना नावे दिली नव्हती. आपल्या सोयीसाठी आपण झाडांना तशी नावे दिली आहेत. त्याच्या गावात जर चिंचेला आंबा म्हणत असतील, तर म्हणून द्या. तुम्ही त्याच्याशी निरर्थक वाद घालून तुमचा वेळ निष्कारण वाया घालवू नका. तोच वेळ तुम्ही नामस्मरणात किंवा संतांचे चांगले विचार ऐकण्यात घालवा. '' त्या गावकर्याला त्याचक्षणी संत एकनाथ महाराजांची ओळख पटली व हाच खरा धर्मात्मा हे ओळखून त्याने त्यांच्या पायावर लोटांगण घातले.
द्वैतवादाचा पुरस्कार करणारे रामानुजाचार्य दक्षिण भारतातील एक मोठे संत म्हणून प्रसिद्ध आहेत. लहानपणापासूनच त्यांना धर्मतत्त्वज्ञानाची फार आवड होती. या संदर्भात धर्मविषयक तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी ते एका गुरुकडे जाऊ लागले. त्या वेळेला ते फक्त रामानुज होते. रामानुज अतिशय चिकित्सक असल्यामुळे गुरुकडे होणाऱ्या अध्ययनाच्या वेळी ते नानाविध प्रकारच्या शंका उपस्थित करीत व त्यांचे गुरूही न कंटाळता त्यांच्या सर्व शंकांचे निरसन करीत. अध्ययन संपल्यानंतर गुरूंनी रामानुजाला मुक्तीचा मंत्र सांगितला. मात्र त्याचबरोबर त्यांना हेही सांगितले की, हा मंत्र योग्य त्या व्यक्तीलाच व धार्मिक विधी करूनच तू देऊ शकतोस. हा मंत्र तू कोणालाही देऊ लागलास तर माझ्यासारख्या गुरूची आज्ञा भंग केल्याबद्दल तुला नरकवासाची शिक्षा मिळेल.
गुरूंचा आशीर्वाद घेऊन रामानुज त्यांच्या आश्रमातून बाहेर पडले. विविध ग्रंथांचा सखोल अभ्यास केल्यानंतर रामानुज 'रामानुजाचार्य' झाले. अनेक लोक भक्तिभावाने त्यांच्याकडे येऊ लागले. त्यामध्ये खालच्या स्तरातील लोकही होते आणि रामानुजाचार्यांनी जात-पात वर्ण न पाहता इच्छुकांना मुक्तीचा मंत्र देण्यास सुरुवात केली. काही दिवसांनी ही गोष्ट त्यांच्या गुरूला समजली. त्यामुळे आपल्या आज्ञेचा भंग केल्याबद्दल त्यांना रामानुजाचार्यांचा राग आला. त्यांनी त्यांना बोलावून घेतले व या गोष्टीचा जाब विचारला. त्यावर रामानुजाचार्य म्हणाले की, कोणत्याही जातीत जन्म घेतलेले लोक ही सारी ईश्वराचीच लेकरे आहेत. त्याना मी धर्मबांधव समजतो. त्यामुळे त्यांच्यात जात-वर्णानुसार उच्च-नीच असा भेदभाव करणे मला तरी अयोग्य वाटते. त्यामुळे मी ज्याची प्रामाणिक इच्छा असेल त्यांनाच हा मुक्तीचा मंत्र दिला. त्याच्यासाठी तुम्ही सांगितल्याप्रमाणे मला, भले नरकवास पत्करावा लागला तरी चालेल. तो मी आनंदाने भोगायला तयार आहे.
रामानुजाचार्यांचे ते बाणेदार उत्तर ऐकूण गुरुही प्रभावित झाले व तूच माझा खरा शिष्य असे सांगून त्यांनी त्यांचा गौरव केला.
समाज नेहमीच संस्कारांची टोपी फक्त स्रीयांच्याच डोक्यावर ठेवत आला आणि पुरुषांना मोकाट सोडत आला आता ती टोपी पुरुषांच्याही डोक्यावर ठेवायला हवी ! तरच समाजातील बलात्कार आणि स्त्रियांवरील अत्याचार कमी होतील आपणही संस्काराची टोपी आपल्या डोक्यावर स्वत: ठेवून घेऊया !
नेहमीच्या सवयीनं डोअरबेल वाजवण्यासाठी , नंदिनीनं हात वर केला , पण बेल न वाजवता ती तशीच उभी राहिली . बेल वाजवावी की पुन्हा लिफ्टनं खाली जावं ? तिनं गोंधळलेल्या मनालाच प्रश्न विचारला .
आणि तसंही आता खाली जाऊन काय उपयोग ? तो रिक्षावाला एव्हाना गेटमधून दूर गेलासुद्धा असेल. आपण उगीच बोललो त्याला. तो काय म्हणत होता हे ऐकून घ्यायची आपल्या मनाची तयारीसुद्धा नव्हती. अक्षरशः हाकलून दिल्यासारखं केलं आपण . असला कसला आपला संताप ? समोरच्याचं ऐकून न घेण्याइतका संताप ? छे ! चुकलंच आपलं . नंदिनी अस्वस्थ झाली .
“मी तुमची मदत करतो. हवालदार सावंत, दोन कप चहा मागवा.” यशवंतने सावंतला इशारा केला. सावंतने आणलेला चहा शिर्के दांपत्याने घेतला.
काही केल्या झोप येत नव्हती जीवाची घालमेल चालू होती. कधी ह्या कुशीला वळ कधी त्या कुशीला. सहज उठून घड्याळ पाहिले. बारा वाजून चाळीस मिनिटे झाली होती. बाहेर सगळी सामसूम होती. रात किड्यांची किरकिर ऐकू येत होती. एकदा उठून खिडकीतून बाहेर पाहिले
मुंबईत डावऱ्यादादा नांवाचा एक गुंड कांही वर्षांपूर्वी खूप गाजला होता. शेवटी पोलिसांनी त्याला एनकाऊंटरमध्ये मारला होता.
बाभनाची राधा काकी मंजे गावातील एक गुढ व्यक्तीमत्वाची बाई ! गावाच्या मंधोमंध बुरुजाखाली तिचा जुन्या काळातला ढवळ्या मातीनं बांधलेला टोलेजंग वाडा व्हता !!!
Copyright © 2025 | Marathisrushti