(User Level: User is not logged in.)

कथा

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा

Sort By:

  • हरवलेल्यांची पंढरी (कथा)

    सिनेमात काम करायचं -मुंबई. नोकरी मिळत नाही- मुंबई. घरी त्रास आहे- मुंबई परिक्षेत नापास झाला-मुंबई :  मुंबई : अशा अनेकविध कारणांमुळे घरी न सांगता मुंबईकडे धाव घेणारे अनेक आहेत. स्वत:हून दडून बसलेल्या अशा माणसांना शोधून काढणं पोलीसच काय कुणालाच शक्य नाही.

  • मुक्तीचा मंत्र

    द्वैतवादाचा पुरस्कार करणारे रामानुजाचार्य दक्षिण भारतातील एक मोठे संत म्हणून प्रसिद्ध आहेत. लहानपणापासूनच त्यांना धर्मतत्त्वज्ञानाची फार आवड होती. या संदर्भात धर्मविषयक तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी ते एका गुरुकडे जाऊ लागले. त्या वेळेला ते फक्त रामानुज होते. रामानुज अतिशय चिकित्सक असल्यामुळे गुरुकडे होणाऱ्या अध्ययनाच्या वेळी ते नानाविध प्रकारच्या शंका उपस्थित करीत व त्यांचे गुरूही न कंटाळता त्यांच्या सर्व शंकांचे निरसन करीत. अध्ययन संपल्यानंतर गुरूंनी रामानुजाला मुक्तीचा मंत्र सांगितला. मात्र त्याचबरोबर त्यांना हेही सांगितले की, हा मंत्र योग्य त्या व्यक्तीलाच व धार्मिक विधी करूनच तू देऊ शकतोस. हा मंत्र तू कोणालाही देऊ लागलास तर माझ्यासारख्या गुरूची आज्ञा भंग केल्याबद्दल तुला नरकवासाची शिक्षा मिळेल.

    गुरूंचा आशीर्वाद घेऊन रामानुज त्यांच्या आश्रमातून बाहेर पडले. विविध ग्रंथांचा सखोल अभ्यास केल्यानंतर रामानुज 'रामानुजाचार्य' झाले. अनेक लोक भक्तिभावाने त्यांच्याकडे येऊ लागले. त्यामध्ये खालच्या स्तरातील लोकही होते आणि रामानुजाचार्यांनी जात-पात वर्ण न पाहता इच्छुकांना मुक्तीचा मंत्र देण्यास सुरुवात केली. काही दिवसांनी ही गोष्ट त्यांच्या गुरूला समजली. त्यामुळे आपल्या आज्ञेचा भंग केल्याबद्दल त्यांना रामानुजाचार्यांचा राग आला. त्यांनी त्यांना बोलावून घेतले व या गोष्टीचा जाब विचारला. त्यावर रामानुजाचार्य म्हणाले की, कोणत्याही जातीत जन्म घेतलेले लोक ही सारी ईश्वराचीच लेकरे आहेत. त्याना मी धर्मबांधव समजतो. त्यामुळे त्यांच्यात जात-वर्णानुसार उच्च-नीच असा भेदभाव करणे मला तरी अयोग्य वाटते. त्यामुळे मी ज्याची प्रामाणिक इच्छा असेल त्यांनाच हा मुक्तीचा मंत्र दिला. त्याच्यासाठी तुम्ही सांगितल्याप्रमाणे मला, भले नरकवास पत्करावा लागला तरी चालेल. तो मी आनंदाने भोगायला तयार आहे.

    रामानुजाचार्यांचे ते बाणेदार उत्तर ऐकूण गुरुही प्रभावित झाले व तूच माझा खरा शिष्य असे सांगून त्यांनी त्यांचा गौरव केला.

  • सूर्यास्ताची दिवाळी

    बऱ्याच दिवसांनी अण्णा मनसोक्तं हसले. बाकीचे तिघे आत गेले. रात्रभर आतून हसण्याखिदळण्याचे आवाज, चिवडा, लाडू, शंकरपाळ्यांचे खमंग सुवास येत राहिले. बाहेर पहाट वयात येऊ लागली होती. सूर्य वर यायला लागला होता. पण दिवाळी मात्रं जवळपास सूर्यास्ताला आलेल्या चार हळव्या, कातर जिवांची चालू होती.

  • युगांतर – भाग ३

    सुमंत जयंत परचुरे. 

    दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून ताईने राहिलेल्या दुधाचा चहा करून घराची आवरा आवर आणि साफ सफाई करायला घेतली. डिसेंबर चा काळ असल्याने थंडी पडली होती. समुद्र जरी जवळ असला, उष्म वातावरण असले तरी थंडीत हवामान त्या उष्म्याला जुमानायचे नाही.

  • इम्युनिटी अनलिमिटेड

    ” हरकत नाही , पण आता एक काम करा , सगळ्यांनी निघा इथून . शौनक , तू आजोबांकडे जायचं आहेस त्यांच्यासाठी वर्तमानपत्र घेऊन , आणि त्यातल्या निगेटिव्ह बातम्या वाचून दाखवू नकोस .आभा तुला सिस्टरच्या घरी जायचंय , केक घेऊन . त्या नर्स आहेत , आज कदाचित त्यांची ड्युटी वाढण्याची शक्यता आहे . मालन , आजींसाठी काहीतरी घेऊन जा खायला , आजतरी त्या काही खातात का बघ . तुझं संभाषण कौशल्य पणाला लाव .

  • शेअर बाजारात उडी (गोमुच्या गोष्टी – भाग २)

    पाच सहा दिवसांनी सुरेश मेहता मला शोधत आला. गोमु माझ्याबरोबरच होता. सुरेशला कसा चुकवतां येईल ह्याचा मी विचार करत होतो. त्याला न सांगता त्याच्या पाहुण्याशी व्यवहार केला होता, त्यामुळे किंचित अपराधीपण वाटत होतं. पण सुरेश सरळ आमच्याकडेच आला.

  • बीव्हर आणि साळू

    खूप खूप वर्षांपूर्वी म्हणजे अगदी ट्लिंगट जमात अस्तित्वात येण्यापूर्वी साळू आणि बीव्हर हे चांगले मित्र होते. नेहमी एकमेकांच्या घरी जात येत होते. साळू घरी आली की ती परत जाताना तिचे खूप काटे पडत. बीव्हरला ते आवडत नव्हते. म्हणून बीव्हर ठरवतो की साळूच्या घरी जाऊन तिला कधीही आपल्या घरी येण्याचे आमंत्रण द्यायचे नाही. एके दिवशी साळूने त्याच्या घरी येण्याची इच्छा आहे, असे बीव्हारला सांगितले.

  • मनाच्या शांतीसाठी लेखन करणारी ग्रोजिया डेलेडा

    तिचे वडील इटालीतील एका छोट्या गावाचे महापौर होते. त्यामुळे गावातील अनेक लोक आपल्या छोट्या-मोठ्या समस्या घेऊन त्यांच्याकडे यायचे. या समस्यांमधून तिच्या बालमनाला लोकांच्या व्यथा कळायच्या व या व्यथा ऐकून तिचे बालमन कळवळायचे. याच व्यथा तिने शब्दबद्ध करायचे ठरविले व आपल्या साहित्य कृतीमधून त्या सादर केल्या. जीवनाचा वेध घेणाऱ्या या साहित्यकृती एवढ्या जबरदस्त होत्या की, मोठेपणी त्या मुलीला साहित्याचा नोबल पुरस्कार मिळाला.

    ग्रोजिया डेलेडा (Grazia Deledda) हे तिचे नाव.१९२६ मध्ये साहित्यविषयक नोबल मिळविणारी ग्रेजिया ही दुसरी महिला होती. ग्रेजियाला लहानपणापासूनच लेखनाचे अतिशय वेड होते. शाळेतील मासिकांमधून तिचे विविध विषयावरचे लेख प्रसिद्ध झाले होते. वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी ट्रिब्यून या मान्यताप्राप्त पत्रिकेत तिचा लेख प्रसिद्ध झाला व तिला त्याचे त्यावेळी चक्क ५० लीरा एवढे मानधन मिळाले. त्यामुळे लेखनातील तिचा उत्साह वाढला व ती लिहितच गेली. ती राहत असलेल्या सार्डिनिया या इटलीतील प्रांतातील लोकजीवनाचा अभ्यास करून तिने वयाच्या १७ व्या वर्षी 'फ्लॉवर ऑफ सार्डिनिया' हे पुस्तक लिहिले व लेखिका म्हणून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर तिने लिहिलेली 'ऑनेस्ट सोल' ही कादंबरी अतिशय गाजली. अल्पावधितच तिच्या लाखो प्रती खपल्या व ग्रेजिया एक लोकप्रिय लेखिका म्हणून ओळखली जाऊ लागली. १८९१ ते १९३१ या काळात ग्रेजियाची ४४ पुस्तके प्रसिद्ध झाली. त्यामध्ये आफ्टर द डायव्होर्स, 'द मदर', 'रीड्स इन द विन्ड', 'अॅशेस!, 'ट्रु मिरॅकल्स' आदी प्रमुख कादंबऱ्यांचा समावेश होता. अॅशेस कादंबरीवर निघालेला त्याच नावाचा चित्रपटही खूप गाजला होता. रशियन लेखक मॅक्झिम गॉर्की तसेच दोस्तोवस्की यांच्या साहित्याचा ग्रेजियावर फार प्रभाव होता. मी इतर कोणासाठी नव्हे तर माझ्या मनाच्या शांतीसाठी लेखन करते असे ती नेहमी सांगायची. १९२६ मध्ये साहित्याचे नोबल पुरस्कार मिळाल्यानंतर दहा वर्षांनी ( १६ ऑगस्ट १९३६) तिचे निधन झाले.

  • मानसकोंड – पडझड

    आयुष्यात पडझड केव्हा सुरू होते माहितेय ? ”
    माशाने अचानक विचारले .
    याची अनेक उत्तरे आहेत , पण तुला काय अभिप्रेत आहे , हे मला कसे कळणार ?
    असं त्याला विचारावं , असं वाटलं .
    पण काही बोललो नाही . एक म्हणजे उपयोग झाला नसता आणि दुसरे म्हणजे माझ्या मनातला विचार त्याला अगोदरच कळत होता .
    तसा तो मनकवडाच होता .

  • अजब न्याय नियतीचा – भाग ३

    तोपर्यंत आरूला अंदाज आला होता की हा आता आपल्याला काय विचारणार आहे. पण ती एकदम गंभीर चेहेरा करून नीलला म्हणाली, “नील तू एक चांगला मुलगा आहेस, माझा जवळचा मित्र आहेस. आपण आपल्या आयुष्यातील खूप आनंदाचे क्षण एकमेकांसोबत शेअर केले आहेत.