(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

  • मराठमोळ्या फार्सचे जनक: श्याम फडके

    ‘चुलबुल पांडा’, ‘गाढवाचा दवाखाना’, ‘जम्बो ससा’, ‘वाघोबाची दिवाळी’, ‘रोबो आणि राक्षस’ या बालनाट्यांनी मुलांना एक वेगळाच फिल दिला. उपहास, नक्कल, कोट्या, फार्स, प्रासंगिक, शाद्बिक विनोद, मेलोड्रामा, ब्लॅक कॉमेडी-हे सगळे काही त्यांना इन्स्टंट कळते आणि त्यांची दादही वेगवान असते. मुले नाटकात काम करताना स्वत खूप हसतात. स्लॅपस्टिक कॉमेडी त्यांना खूप आवडते. दुःख हसण्यावरी नेणे म्हणजे काय हे बालनाट्य करताना कळले.

  • खऱ्या माणसाची पारख (कथा)

    कथा – ‘पारख : खऱ्या माणसाची पारख’ ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. लेखक – धनंजय एस. शिंदे

  • गुणकर विठलन राणी 

    ” मी लग्न जमवले आहे म्हणून त्यावेळी तुम्हांला सगळ्यांना घरी पार्टी दिली होती . तेंव्हा आपण सगळे आपल्या येई वो विठ्ठले नाटका बद्दल बोलत होतो . त्यावेळी तुझ्या शेजारच्या खुर्चीत बसत असताना फक्त तुला ऐकू जाईल अशा पध्दतीने माझी आई तूला काय म्हणाली होती हे मीही विसरलेले नाही . आणि तूही बिलकूल विसरलेला नाहीस , अगदी तू कधीच , कोणाकडेही त्याची वाच्यता केलेली नसलीस तरी , हेही मला चांगले माहीत आहे . ”

    ” मी तर ते तुलाही कधीच सांगितले नाही . आपण त्यानंतर इतके वेळा , इतक्या विषयांवर बोलत असतो तरीसुद्धा . त्यामुळे तुला हे कसे माहीत ? ”

    ” मी आईच्या मागेच होते . आणि मी तशी उभी आहे हे पाहूनच आई तेंव्हा तसं म्हणाली . काळाच्या ओघात माझी निवड आई ने मनापासून स्वीकारली तरी तिची माझ्या साठीची निवड नेहमीच . . . . . ”

    ” आता त्या हयात नसताना आणि आपल्या आयुष्याच्या या टप्प्यावर त्यांच्या विषयी असं म्हणणं हे योग्य नाही “

  • रस्त्याचं दुखणं

    औरंगाबाद जळगांव रस्ता खराब आहे, हे समजायला मोठ्या हाॅस्पीटलमधे जाऊन पैसे खर्च करून घ्यावे लागतात, ही झालेली प्रगती काय कमी आहे ?

  • ओढ्याच्या पल्याड (संक्षिप्त रूपांतरीत कथा ५)

    ओढा जिथे चंद्रकोरीसारखा वळला होता, तिथूनच थोड्या अंतरावर खुळीचं खोपट होतं. खुळीचं खोपट आणि ओढा ह्यामध्ये मोठं मोकळं कुरण होतं. जेव्हां ओढा पाणी पुरवत असे तेव्हां कुरणात गुरं चरत. मागची झाडी आणि समोरचा ओढा ह्याभोवती खुळीने मनाने एक वर्तुळ आंखून घेतलं होतं. त्याबाहेर ती जात नसे.
    हाच तिचा खुळेपणा होता.

  • ती’ असता ईश्वर ‘ती’ नसता नश्वर

    म्हणूनच या तिन्ही जवळ असतील तर, ‘ईश्वर’च सोबत आहे.. आणि यांपैकी एक जरी नसेल तर जीवन ‘नश्वर’ आहे.

  • ऋषी कपूर …. 102 Not Out

    तत्कालीन प्रेक्षक वर्गाला एका चॉकलेट हिरोची “खोज” होतीच . “ये ईश्क नही आसान“ असं वाटणाऱ्या मंडळीना तर त्यांनी चक्क “प्रेम रोग” दिला आणि त्यांच्या चाहत्यांचा एक “नया दौर” सुरु झाला .

  • शाळेतला पावसाळा

    रैनाने पटापट आवरलं तरी आता तिला शाळेत जायला उशीर होतंच होता. सकाळी बरोब्बर आठ वाजून पाच मिनिटांनी तिची स्कूल बस येते. आठ वाजले तरी रैनाची आंघोळ व्हायची होती. त्यातच तुला “हे करायला नको, तुला ते करायला नको' अशी आईची आरती सुरू होतीच. आता ऊशीर झाल्याने शाळेत मार खावा लागेल त्यापेक्षा प्रेमळ भुताला बोलावलेलं बरं, असा रैनाने विचार केला.

    रैनाने डाव्या हाताची मूठ घट्ट बंद केली. उजव्या हाताच्या तळहातावर डाव्या हाताची मूठ ठेवली. उजव्या हाताच्या चार बोटांनी ही मूठ पकडली पण अंगठा मात्र सरळ ठेवला. मग डोळे बंद करुन मुठीमधे तीन वेळा फुंक मारत, दोन वेळा हळूच म्हणाली,“प्रेऽऽऽमळ भूऽऽत.. .. प्रेऽऽऽमळ भूऽऽत”
    त्याक्षणी रैनाच्या मानेवरुन एक बर्फाचा खडा घरंगळत गेला. आणि खिशिफिशी हसत प्रेमळ भूत म्हणालं, “बोल रैना काय मदत कर? तुझी शाळा नदीत नेऊन ठेवू? की तुझ्या शाळेत वाघ सिंह पाठवू?”
    “अरे तू पाहतो आहेस ना.. मला ऊशीर होतोय.. मला मदत कर.”

    “ओके..बोके..पक्के.. काम शंभर टक्के” प्रेमळ भूत खुसफूसलं.
    पाचच मिनीटात रैनाची स्कुल बस आली आणि तिथेच बंद पडली. ड्रायव्हरने खूप प्रयत्न केले पण गाडी सुरूच होईना.
    स्कुल बस पाहताच आई रैनाला ओरडू लागली,“चल आटप लवकर.”
    पण रैनाने अजिबात घाई गडबड केली नाही. तिने सावकाश आवरलं. आणि ती बस जवळ गेली. रैना बसमधे चढताच बस सुरू झाली. रैनाची सॅक आपोआप हवेत तरंगत वर गेली. रैनाला कळलं,सॅकमधे प्रेमळ भूत बसलं आहे.

    ती मनातल्या मनात भुताला म्हणालि,“तू शाळेत नको येऊस. तिथे वर्गातल्या सरांचं ऐकावं लागतं.”
    प्रेमळ भूत गयावया करत म्हणालं,“येतो ना गं प्लीज. मी सरांनी सांगितलेलं सगळं ऐकीन. आणि तुला मदत पण करीन.”
    बस बिघडली असल्याने शाळेत पोहोचायला ऊशीर होईल असं वाटलं होतं. पण बस अशा काही तुफान वेगाने गेली की ड्रायव्हर चक्कर येऊन पडला तरी बस वेळेवर पोहोचली. ज्या मुलांना भीती वाटली त्या मुलांना झोप आली व शाळा आल्यावर जाग आली.
    सगळे वर्गात गेले.
    शाळा सुरू झाली. जोशी सर वर्गात आले. सगळी मुले उठून उभी राहिली. पाठोपाठ रैनाची सॅकपण हवेत ऊंच गेली. सरांनी मानेनें खूण केली. सगळी मुले बसली पण सॅक मात्र हवेतच तरंगत राहिली.

    सरांनी काही प्रेमळ भुताला बसायला सांगितलं नाही म्हणून ते हवेतल्या हवेत उभंच होतं.
    हवेत तरंगणारी सॅक पाहून सर दचकले. पण पटकन रैनाने सॅक खालि ओढली.
    आज भूगोलाचा तास होता. हवामान व पाऊस असा विषय होता. इतक्यात मुलांनि काहीतरी गडबड करायला सुरुवात केली.
    सर वैतागून म्हणाले,“आधी मी सांगतो ते ऐका..”
    प्रेमळ भुताला वाटलं आता सर जे जे सांगतील ते ते ऐकलं पाहिजे.
    सर म्हणाले,“समुद्राच्या पाण्याची वाफ होते.”
    त्याक्षणी खिडकीतून गरमागरम वाफेचे लोटच्या लोट वर्गात येऊ लागले.
    मुले घाबरली. त्यांनि खिडक्या बंद करण्याचा प्रयत्न केला, पण छे!
    जरा घाबरुनच सर म्हणाले,“याच वाफेचे ढग बनतात.”
    आणि काय चमत्कार, वर्गात वाफेचे ढग तरंगू लागले. इकडे तिकडे फिरू लागले.मुले आरडा ओरडा करू लागलि. ढगांना हात लावू लागलि. बाकावर उभं राहून ढगात जाऊ लागली. हातांनी ढग इकडे तिकडे ढकलू लागली. वर्गात अंधारुन आलं.
    सरांना ही कळेना हा काय प्रकार सुरु आहे? त्यांनी घाबरत थरथरत विचारलं,“इथे काही भुताटकी तर नाही ना?”
    त्याक्षणी वर्गात ढगांचा गडगडाट होऊ लागला. एक ढग हसत-हसत गडगडला, “होऽऽऽ आहे भुताटकी.. पण प्रेमळ भुताटकी..”
    सरांचे पाय लटपटू लागले. त्यांच्य हाता-पायाला कंप सुटला. जीभ तोंडात लडबडू लागली.
    मुले म्हणाली,“सर शिकवा.. पुढे बोला..”
    सर कसंबसं म्हणाले,“या ढगांना गार हवा लागली की..”
    वर्गात गार हवा वाहू लागली. वाऱ्याचा वेग वाढला. गारवा अंगाला झोंबू लागला. ढग गरागरा फिरु लागले. मुले चेकाळली. धमाल आरडओरडा करू लागली.
    सरांना चक्कर येऊ लागली. असं कसं होतंय तेच त्यांना कळेना.
    मुले म्हणाली,“सर शिकवा.. पुढे बोला..”
    सर लडबडत म्हणाले,“ढगांना गार हवा लागली की मग पाऊस पडतो.. ..”
    वर्गात मुसळधार पाऊस पडू लागला.
    वर्गात मुलांच्या कंबरेपर्यंत पाणी तुंबलं. वर्गाचा दरवाजा उघडा असूनही पाणी काही बाहेर जाईना. मुले बाकावर उभं राहून पावसात नाचू लागली. पाण्यात डुंबू लागली. एकमेकांच्या अंगावर पाणी उडवू लागली. मुलांच्या वह्या, पुस्तकं आणि सॅक वर्गात तरंगू लागल्या.
    जोशी सरांना कापरं भरलं. त्यांची पँट भिजली. शर्ट भिजला. हातातले पुस्तक भिजले.
    पावसात भिजत आणि पाण्यावर तरंगत मुले म्हणाली,“सर शिकवा.. पुढे बोला..”

    वर्गातली टेबल खूर्चि आता पाण्यावर तरंगू लागली होती. मुलांची बाकं बाजूला तरंगत जाऊन मधल्या हौदात मुले धुमाकुळ घालत होती.
    सरांची भीतीने बोबडी वळली होती. तरी ते पुटपुटले,“पाऊस पडल्यावर गवत उगवतं..झाडं उगवतात..”
    त्याक्षणी वर्गात गवत उगवू लागलं. चिकूची, आंब्याची, सफरचंदाची, जांभळाची, डाळींबांची झाडं वर्गात उगवली.
    मुले आता झाडावर चढून पाण्यात उड्या मारू लागली.
    काही मुले छोटे चिकू, छोटे आंबे खाऊ लागले. एकमेकांना फळं फेकून मारू लागले.
    वर्गात धमाल कल्ला सुरु होता.
    इतक्यात लांबून मुख्याध्यापकांचा आवाज ऐकू आला, “काय दंगा चाललाय त्या वर्गात..?”
    जोशी सर भिजले होते तरी त्यांच्या तोंडचं पाणी पळालं!
    रैना भुताला म्हणाली,“अरे आम्हा मुलांना पहिल्यासारखं नीट कर. नाहीतर मुख्याध्यापक आमची धुलाई करतील.”
    “ओके..बोके..पक्के.. काम शंभर टक्के” प्रेमळ भूत खुसफूसलं.
    वर्गातली झाडं व गवत गायब झालं. पाणी उडून गेलं. टेबल, खुर्ची व बाकं जागेवर आली. मुले चक्कं कोरडी झाली. मुलांच्या वह्या, पुस्तकं व सॅक एकदम कोरड्या ठणठणीत.
    फक्त जोशी सर चिंब भिजलेले होते.
    इतक्यात रागीट मुख्याध्यापक वर्गात आले. त्यांनी पाहिलं तर, सगळी मुले शांत बसलेली पण सर मात्र भिजलेले.
    मुख्याध्यापक भडकले. रागाने लालेलाल झाले. ते सरांवर गुरकावत म्हणाले,“तुम्ही असे भिजलात कसे? वर्गात काय आंघोळ करता काय?”
    जोशी सर भीतभीत म्हणाले,“आधी वर्गात वाफ आली. मग त्या वाफेचे ढग झाले. त्या ढगांना गार हवा लागली. त्यातून पाउस पडला. त्याच पावसात मी भिजलो.”
    मुख्याध्यापक हळूच पुटपुटले,“मला काय मूर्ख समजता का?” मग ते सावकाश चालत जोशी सरांच्या जवळ गेले. त्यांच्या डोळ्यात काही वेडाची झांक दिसते का, ते पाहू लागले.
    त्यांच्या ओल्या पाठीवरुन हात फिरवत म्हणाले,“मग काय झालं पाऊस पडल्यावर..?”
    सर थरथरत म्हणाले,“वर्गात झाडं उगवली..”
    हे ऐकताच मुख्याध्यापक खो खो.. ठो ठो.. हसू लागले. मोठमोठ्याने हसू लागले.
    इतक्यात अचानक छतातून नळ सुटल्याप्रमाणे मुख्याध्यापकांच्याच अंगावर बदाबदा पाणी पडलं. तरिपण फक्त त्यांचि पँटच भिजली शर्ट मात्र सुका!!
    आणि कशी कुणास ठाऊक, पण शाळेची घंटा जोरजोरात वाजली.
    शाळा सुटली. मुले पळाली.
    घरी जाताना रैनाने भुताला विचारलं,“काय रे, तु आम्हा सर्वांना कोरडं केलंस, मग सरांन का नाही केलंस?”
    “अगं तू मला काय सांगितलं होतंस ते आठव ना..ठ प्रेमळ भुताने असं म्हणताच रैनाला आपली चूक कळली.
    “नंतर तू त्या मुख्याध्यापकांना का भिजवलंस रे?”
    खिशिफीशी हसत भूत म्हणालं,“अगं नाहितर आपल्या बिचाऱ्या जोशी सरांना.. .. ..”

    काऽऽय? प्रेमळ भुताचं हे वाक्यं तुम्ही पुरं करू शकाल? तसं भुताला कळवाल? त्याला इमेल कराल?
    आणि,
    तुम्हाला काय वाटतं, शाळेची घंटा कुणी वाजवली असेल?
    न भीता भुताला कळवा. त्याला इमेल करा. भूत तुम्हाला नक्की उत्तर पाठवेल.
    कारण,
    आपलं प्रेमळ भूत लहान मुलांना कधीच त्रास देत नाही. पण जी मोठी माणसं लहान मुलांना त्रास देतात त्यांना मात्र फटके देतं. किंवा आणखी काही गमती करतं.
    प्रेमळ भूत तुम्हा मुलांच्या पत्रांची किंवा इमेलची नेहमीच वाट पाहात असतं.

    - राजीव तांबे.

  • सांगता (माझी लंडनवारी – 30)

    एअरपोर्टवरचे सर्व सोपस्कार एखाद्या सरईतासारखे पार पाडले. माझं फ्लाईट दुपारी  २-२.१५ च होतं. हातात आता बऱ्यापैकी वेळ होता. मग मी शॉपिंग करावं ह्या हेतूने वेगवेगळी दुकाने फिरले. तिथल्या किमती ऐकून ‘दुरुन डोंगर साजरे. बसा आहे तिथेच’असं म्हणत मी लांबूनच राम राम केला.

  • शिल्पा

    त्या दिवशी सकाळी - सकाळी कोणीतरी गेल्याची बातमी कानावर आली. ती कुजबुज ऐकण्यासाठी मी झोपेतच माझे कान टवकारले असता दोन दिवसापुर्वी शिल्पा गेल्याची बातमी कळ्ली. शिल्पा कोणी लहान मुलगी नव्ह्ती पंच्चविशीतील एक विवाहित स्त्री होती. आमच्या चाळीतील लहान- थोर सारेच तिला प्रेमाने शिल्पा या एकेरी नावानेच हाक मारत. मी व्यक्तीशः तिला फारसा ओळखतही नव्ह्तो कारण खासकरून अनोळ्खी व्यक्तीशी मी फारसा स्वतःहून ओळ्ख काढून संवाद साधन्याचा प्रयत्न करीत नाही. तिची आमची ओळख झाली कारण सध्या आंम्ही राहण्यासाठी या चाळीतील जे घर भाडयाने घेतले आहे. त्या घरात ती जवळ- जवळ चार वर्षे भाड्याने राहात होती. पण तिच्या घरमालकाने हे घर दुरूस्त करून जास्त भाड्याच्या आशीने आंम्हाला भाड्याने दिले होते. त्यामुळे तिला नाईलाजाने बाजुच्या चाळीत दुसरे घर भाड्याने घ्यावे लागले होते. तरी मला व्यक्तीशः तिच्या बोलण्यावरून तिचा आम्ही सध्या राहात असलेल्या घरात जीव गुंतला असल्याचे मला बर्यावचदा जाणवले होते. माझ्या दृष्टीने ती एक भोळ्सट स्त्री होती. का कोणास जाणे लोकांप्रती अती सहानुभूती, प्रेम दाखविणार्याय आणि स्वतःपेक्षा ही इतरांची काळजी अधिक वाहणार्याए स्त्रियां माझ्या डोक्यात जातात. तश्या दोन स्त्रिया आमच्याच घरात होत्या म्ह्णून असेल कदाचित एक आमची आई आणि दुसरी आमची लाडकी बहिण. त्याबाबतीत मी थोडा कोडगा आणि कोरडा होतो. माझ्या ठायी मुर्खपणाला अजिबात थारा नव्हता. आमच्या मालकीच्या घराच्या जागी इमारत होत असल्यामुळे आमच्यावर कधी नव्हे ती भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आली होती. पुर्वी कधी ही भाड्याच्या घरात न राहिलेल्या मला व्यक्तीशः भड्याच्या घरात राहण ही एक प्रकारची शिक्षाच वाटत होती. आमचे जुने घर सोडतानाच मी मनाशी पक्क ठरवून टाकलं होतं दुसर्याा जागी राहायला गेल्यावर तेथे कोणत्याही प्रकारचे नवे बंध निर्माण करायचे नाहीत आणि मी ठरविल्याप्रमाणे ते केले ही ! म्ह्णूनच मी शिल्पाकडे तटस्थपणे पाहू शकलो, तिचं निरीक्षण करू शकलो. काही महिन्यापुर्वी मी जेंव्हा शिल्पाला पहिल्यांदा पाहिले तेंव्हा ती तिसर्यांलदा गरोदर होती. तिची दुसरी मुलगी जन्मा नंतर महिन्याभरातच वारली होती. शिल्पाच निरीक्षण करतेवेळी माझ्या एक गोष्ट लक्षात आली जगाच्या दृष्टीने ती भोळ्सट, स्वछंदी जीवन जगणारी एक अल्लड बाई असली तरी माझ्या दृष्टीने नाईलाजाने परिस्थितीपासून, समस्यांपासून पळणारी, जगण्यात फारसा रस नसलेली आणि स्वतःबाबत अत्यंत बेफीकीर झालली किंचित भोळसट झालेली स्त्री होती. जी जगाला आपण किती सुखी आहोत हे दाखविण्याचा जीवाच्या अकांताने प्रयत्न करू पाहत होती.

    शिल्पा गेल्याची बातमी झाली होती पण ही बातमी आमच्या चाळीपुरती मर्यादित होती. तिच्या जाण्याची दखल कोणी गंभीरपणे घेतल्याची शक्यता तशी कमीच होती कारण सर्वांना ती लक्षात होती कारण त्यांनी सांगितलेली कामे तिने जरा ही का ! कू ! न करता निमूटपणे केलेली होती म्ह्णून. शिल्पा सारख्या स्त्रिया आपल्या देशात रोज हजारोच्या संख्येने मरत असतात पण त्यांची दखल समाज कधीच घेत नसतो. शिल्पा अचानक कशी गेली ? काहींच्या मते तिच्या जाण्याला तिचा गाढवपणा आणि हेकेखोर स्वभाव कारणीभूत होता. काही दिवसापूर्वी तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला होता. दवाखान्यातून घरी आल्या आल्या ती थंडीच्या दिवसात थंड पाण्यात बादलीभर कपडे घेऊन धुवायला बसली होती घरात सासू असतानाही. सासूचा तिच्यावर फार जीव नसावा आणि नवर्याथलाही तिची फिकर नसावी. त्यानंतर तिला ताप भरला तो वाढतच गेला. त्यानंतर तिला दवाखान्यात भरती करताच तासाभरात तिचा जीव गेला होता. तिच्या दुसर्यात मुलीला तिच्या निष्काळजीपणामुळे जीव गमवावा लागला होता कारण ती मुलगीला एकटीला घरात रडत सोडून बाहेर भटकायला जात असे. हे लोकांचे निरीक्षण पण वरवरचे माझा जितका अभ्यास आहे त्यानुसार ती त्या मुलीच्या दुधाची व स्वतःच्या लहान मुलाच्या आणि स्वतःच्या पोटाची खळगी भरण्याची व्यवस्था नसल्यामुळे ती करण्यासाठी भटकत असावी. तिचा नवरा कामाला होता पण त्याला वेळच्या वेळी पगार मिळत नव्हता. जेंव्हा मिळायचा तेंव्हा तो घरभाडे आणि उसणवारी देण्यातच खर्च व्हायचा त्यामुळे त्यांना एका मुलाचेच हट्ट पुरविणे शक्य नसताना तीच्यावर आणखी दोन बाळंतपणं लादण्यात आली होती कदाचित तिच्या मनाविरूध्द ! तिला सारचं कळत होत कारण ती बर्या पैकी शिकलेली होती पण परिस्थितीची गुलाम झाल्यामुळे आणि आपल्या हातात करण्यासारखे काहीच नसल्यामुळे परिस्थितासमोर तिने अक्षरशः गुडगे टेकले होते. त्यानंतर आपण कसे दिसतो, कसे वागतो, कसे राहतो आणि आपल्या मागे लोक आपल्या बद्दल काय चर्चा करतात या बाबत ती बेफीकीर झाली होती. अत्यंत हुशार असतानाही आपण भोळसट आहोत हे जगाला पटवून देण्यात ती यशस्वी झाली होती. दररोज लोकांशी खोट बोलण्याचा हातात दमडी नसताना लाखाच्या बडाया मारण्याचा आणि पोटात अन्नाचा कण ही नसताना ढेकर देण्याचा तिला कंटाळा आला होता. कदाचित तिला या सर्वांतून मुक्ती हवी होती पण नैसर्गिक...

    शिल्पा गेली नव्ह्ती तर आपल्या समाज व्यवस्थेने तिचा बळी घेतला होता. आपल्या चांगल्या शिकलेल्या मुलीचा तिच्या पालकांनी स्वतःच मुंबईला घरदार नसणार्या् अल्पशिक्षीत मुलाशी फक्त हुंडा दयायला नको म्ह्णून विवाह करून दिला होता, ज्याने स्वतःच्याच उदरनिर्वाहाचा प्रश्न असताना एका मुलाला जन्म देण्याचा गाढवपणा केला होता. त्यात भर म्ह्णून त्याने बायकोला नोकरी करण्याची परवानगी ही दिली नव्हती. शिल्पाने ही स्वतः स्वतःच जीवनमान सुधारण्यासाठी संघर्ष करण्याऐवजी स्वतःला परिस्थितीच्या स्वाधीन केल होत कारण तिला नवर्याशच्या विरोधात जायच नव्हतं. शिल्पाने आमच्या चाळीत आपल्या गोड स्वभावाने लोकांना त्यांच्या छोट्या – मोठ्या कामात मदत करून त्यांची मने जिंकली होती. त्यामुळे प्रसंगी पोठाची खळगी भरण्यासाठी ती त्यांच्याकडे हक्कने हात पसरू शकत होती. तिचे ते हात पसरणे मला तिच्यासोबतच्या पहिल्या भेटीतच खटकले होते. तिच्या नवर्या चे गावी मालकीचे घर होते त्यामुळे स्वतःसोबत तिची फरफट करण्याची त्याला काही गरजच नव्ह्ती. पण तो हे करीत होता कारण काय तर त्याला दोन वेळच गरम – गरम जेवन मिळावं म्हणून पण त्याची व्यवस्था ही प्रसंगी लोकांपुढे हात पसरून तिलाच करावी लागत होती. पण तरीही शिल्पा प्रचंड आशावादी होती त्याचे मला कौतुक वाटे कारण हा आशावाद तिच्यात तिच्या शिक्षणामुळे आला होता. पण तरी ही तिला जगण्यात फारसा रस राहिला नव्हता हे सत्य होत. तिच्या जाण्याला तो साधा ताप कारणीभूत नक्कीच नव्हता. ती गरोदर असताना तिच्या तब्बेतीकडे केले गेलेले प्रचंड दुर्लक्ष त्याला कारणीभूत होते. आजही आपल्या समाजात पुरूषांकडून स्त्रियांच्या तब्बेती बाबत दाखविला जाणारा निष्काळजीपणा ही शिल्पाच्याच नव्हे तर शिल्पासारख्या हजारो स्त्रियांच्या अकाली जाण्याला कारणीभूत असतो. शिल्पासारख्या स्त्रियांची होणारी कुचंबना समाजाला दिसत असते, ती दूर करण्यास समाज सक्षम ही असतो पण डोळ्यावर गेंडयाच्या चामडीचे झापडं घेतलेला समाज घोड्यासारखा समोरच पाहत राहतो. सतत चार वर्षे अगदी निमुठपणे समाजाच ओझ वाहणार्याच शिल्पाच्या जाण्याची समाजाने काय दखल घेतली तर एका चाळीतील दहा खोळ्यात तिच्या जाण्यावर दहा मिनिटे चर्चा झाली आणि त्यानंतर दहा - पंदरा दिवस निवांत गप्पा मारताना तिच्या जाण्याच्या कारणांवर पोकळ चर्चा झाल्या त्या चर्चा ही काळांतराने त्या चाळीतील हवेत विरगळून गेल्या, आता तर शिल्पाच्या आठवणीही त्या चाळीतील हवेत विरगळून नष्ट झालेल्या आहेत आणि अनेक शिल्पा जशा या पुर्वी समाज मनाच्या विस्मृतीत गेल्या होत्या तशी आणखी एक शिल्पा विस्मृतीत गेली....

    लेखक – निलेश बामणे.