नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
सतत तेच ते विचार…आपण क्षणभंगुर असल्याचे…आता आहे…मग नाही…खरे तर हे सत्य आहे …त्रिकालाबाधित…
आज एक आठवडा झाला. त्या लहान मुलाला मी रस्त्यावर नकळत शोधण्याचा प्रयत्न करते आहे. पण तो कुठेही नजरेस पडत नाही आहे. कुठे असेल तो?
मागच्याच मंगळवारी सकाळी दूध घेऊन येताना तो गाडीच्या समोर धावत धावत आडवा गेला होता.
अशातच ना.नी गबाळे मास्तर त्याच्या बदलीसाठी प्रयत्न करू लागला.ना.नी. गबाळे म्हणजे नारायण निवृत्ती गबाळे…! पण सगळेजण तेह्यलं नानी नावानचं वळखायचे.
मित्र हो , एकच एक गाव आणि एकच एक शाळा , अशी दीर्घ आणि घट्ट मैत्री “असे मी अनुभवले नाहीये .पण अनेक गावं ,अनेक शाळा , अनेक मित्र .आणि मैत्रीची विविध रूपे मी अनुभवली ,या अनुभावंनी मला घडवले .
फुलात न्हाली पहाट ओली, क्षितिजावरती चंद्र झुलेनभात भिजल्या केशरियाचे रंग फुलांवर ओघळले….
एक लहानशी घटना परंतु अध्यात्म जगांत एक महान तत्वज्ञान सांगून जाते.
श्री कृष्ण एकदा जेवण्यासाठी बसले होते. रुख्मिनी त्याना जेवन वाढीत होती. अचानक श्रीकृष्ण उठले व लगबगीने जावू लागले. ते घराच्या दारापर्यंत गेले. ते क्षणभर तेथेच थांबले. थोडावेळ थांबून परत आले. पुन्हा जेवण्याच्या पाटावर बसले. रुख्मिनीला हे सारे अघटीत वाटले. तीच्या लक्षांत श्रीकृष्णाच्या ह्या हालचालीचा अर्थ कळला नाही. तीने तसे विचारले.
श्रीकृष्ण हसून म्हणाले " दुर अंतरावर मी बघीतले की माझा एक भक्त माझ्या नावाने भजन करीत होता. ' कृष्ण कृष्ण जय जय कृष्ण ' म्हणत रस्त्याने गात नाचत चालत होता. त्याच वागण, मोठ्यने हातवारे करीत गाणे म्हणने, हे कांही जवळून जाणाऱ्याना वेगळेच वाटले. ते त्याला वेडा समजून मारु लागले. तो खालती पडला तरी देखील माझे नांव न सोडता तसाच गात होता. त्याचा आर्तस्वर माझ्या कानी पडला. माझे लक्ष्य त्याच्याकडे वेधले गेले. मी त्याला सहाय्य करण्यासाठी जाऊ लागलो. दारापर्यंत आलो. अचानक मी बघीतले की त्या भक्ताला कुणीतरील दगड मारला. तो त्याच्या भाळी लागला. एकदम रक्तस्त्राव सुरु झाला. त्यानी त्याच्यावर झालेल्या हल्याचा प्रतिकार करण्यासाठी स्वतःच एक दगड उचलला. तो त्यानी त्या लोकावर फेकला. तो आपले रक्षण स्वतः करण्यास उद्युक्त होऊन करीत आहे. त्याच क्षणी त्याने माझे नांव व भजन सोडून दिले. माझे नांव सोडल्यामुळे त्याची माझ्यावरची अवलंबुनता निघून गेली. आता तेथे जाण्यांत अर्थ नाही. "
जीवनांत देखील अनेकजण ईश्वर भक्ती करतात. त्यांच्यावर श्रद्धा ठेवतात.
मानवाची ईश्वरी संकल्पना दोन अंगाने दिसून येते.
१- ईश्वर सर्व शक्तीमान, सर्वव्यापी, व विश्व चालक ह्या प्रमुख भावनांतील भूमिकेमध्ये तो व्याप्त समजला जातो. ह्या उदात्त समजाला मन नेहमी अनुभवण्याचा प्रयत्न करीत असते. जे कळल ते जाणल पाहीजे ही भावना. त्याच्या भक्तीमार्गाचा, भजनाचा, नामस्मरणाचा स्रोत ह्याच मार्गाने व्यक्त होत असतो.
२ - तो कृपावंत, संकटविमोचन व सुखकर्ता समजला जातो.
त्याच वेळी त्याने हेही अनुभवल असत की ईश्वर खऱ्या अर्थाने व्यवहारी जीवनांत केंव्हाही कृपा करीत नसतो. संकटसमयी धावून कोणतीही मदत करीत नाही. तुमच्या मिळणाऱ्या सुखांत त्याचा प्रत्यक्ष सहभाग केंव्हाच नसतो. हे सारे सत्य असते.
ईश्वराची महानता वेगळी आणि त्याचा व्यक्तिच्या जीवनातील सहभाग समजणे हे सर्वस्वी भिन्न समज होत. निसर्गाचे निश्चित व ठरलेले नियम असतात. त्याचप्रमाणे जगरहाटी चालते. कांही मिळणे वा न मिळणे येथे मानवी इच्छेचा प्रश्न नसतो. ते सारे घडणाऱ्या परिस्थिती नुसारच होते. अनेक कथा वा प्रसंग मात्र आळवून सांगीतले जातात.
ईश्वर भक्ती फक्त मनोबल वाढवीत असते. संकटाची सोडवणूक ज्याची त्यालाच करावी लागते. हाच ह्या छोट्या कथेचा बोध नव्हे कां?
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
'पाऊले चालती ऽऽ'' हे दोन शब्द, माणसांच्या जीवनक्रमाचे सार आहे. हे शब्द, एक प्रवास चालू असल्याचे ध्वनित करतात. हा प्रवास अखंड आहे. कधीही न संपणारा आहे. पण त्याचे गंतव्य स्थान निश्चित आहे. चालणार्याला हे माहीत आहे. ते स्थान तो कधी गाठणार आहे हे मात्र अज्ञात आहे. ''अजूनी वाट चालतचि आहे'' असे प्रत्येकजण म्हणत म्हणतच एका लांबच्या यात्रेचा प्रवासी असतो.
प्रस्तुतचा 'पाऊले चालती' हा ग्रंथ म्हणजे असाच एक दीर्घ प्रवास आहे. अथक परिश्रमांची तयारी, गुणग्राहक व चैतन्यशील वृत्ती, चोख व्यवहार आणि शिस्तबद्ध कार्यशैलीच्या जोडीला समन्वयशील स्वभाव, कुशाग्र बुद्धिमत्ता अशा बहुविध व्यक्तिमत्त्वाचे म्हणजे ग्रंथलेखक श्री मायगोखले यांचे विविध पैलू उलगडून दाखविणारे हे जीवनानुभव म्हणजे एक प्रदीर्घ कादंबरीच आहे. त्याचा कालावधी लेखकाच्या सध्याच्या आयुष्याएवढ्या म्हणजे जवळजवळ चौर्याऐंशी वर्षांचा आहे. या अनुभवांचे गाठोडे विविध प्रसंगांनी, कौटुंबिक अनुबंधानी आणि अनेक व्यक्तींच्या संबंधांनी, सामाजिक,राजकीय, सांस्कृतिक घटनांनी भरलेले आहे.
या ग्रंथाचे लिखाण म्हणजे जसे आपण सहजपणे बोलतो, संवाद साधतो त्याप्रमाणे या ग्रंथाचा लिहिण्याचा अकृत्रिम ओघ आहे. कथनाच्या प्रवाही ओघातून येणारे घटनाप्रसंग, स्थळे, व्यक्तिमत्वे यासंबंघींची उत्सुकता वाढत राहते. म्हणून पूर्ण ग्रंथाचे सलग वाचन केल्याशिवाय त्यातली खुमारी कळणार नाही.
लेखकाने या ग्रंथात मनोगत सुरुवातीलाच कथन केले आहे. का, कसं, कशासाठी याची मीमांसा देण्याचा प्रयत्न मनोगतात आहे. ग्रंथामध्ये पुढे काय असेल याचा ऊहापोह आहे. आपण लिहिणार असलेल्या ग्रंथाचे स्वरुप कसे असेल याचे विवेचन हा या भूमिकेचाच एक भाग आहे. इतकेच नाही तर, त्यात व्यक्त केलेला प्रांजळपणा अधिक नितळ आहे. आपल्या लेखनाकडे आपण कसे पाहतो याची जाण लेखकाला आहे. त्यात वाचकाला थेट भिडण्याचा प्रयत्न आहे. लेखनात थोडासा नवखेपणा आहे असे प्रथमदर्शनी वाटले तरी जिव्हाळयाने संवाद साधलेला आहे. त्यामुळे आपोआप वाचक लेखकाच्या जवळ जातो. संवादात सहभागी होतो. पुढचे वाचन करीत असताना मनोगत हे वाटाड्यासारखे सोबत करीत राहते. प्रसंगांची कालानुक्रमे गुंफण लक्षात ठेवण्यात मदत करीत राहते. मग पटते कीं, मनोगतात जे आले ते योग्यच झाले. किंबहुना अशा तर्हेचीच मनोगते लिहावीत.
आतापर्यंत लेखकाने ललित, ललितेतर लेखन किती केले असा असा प्रश्न या ग्रंथाच्या निमित्ताने उपस्थित होतो. ते फार नाही असा साधारण उल्लेख लेखकाने केला आहे. लेखकाने आतापर्यंत अशा तर्हेचे लेखन फार केलेले नाही, असा विनय त्यातून दिसतो. परंतु प्रस्तुतचे लिखाण त्या विनयाला छेद देणारे आहे. अनिल अवचट ज्या सहजतेने लेखन करतात, वाचकाशी संवाद साधतात, तसा सहजपणा या लेखनात आहे. कुठेही ओढाताण करुन वाक्ये एकमेकांच्या भेटीला आलेली नाहीत, ना शब्दांनी कुठे असहकार पुकारलेला आहे, ना कुठे शब्दामध्ये विजोडपणा आहे. 'कसदार' म्हणून जे लेखक स्वत:च्या लेखनाची प्रौढी मिरवतात त्यांनी हा ग्रंथ एकदा नजरेखालून घालण्याची तसदी जरुर घ्यावी. लेखकाच्या सहजसुंदर लेखनाचा मोह त्यांनाही टाळता येणार नाही.
सुरुवातीच्या भागांमध्ये आपल्याशी संबंधित नातलगांचा, आप्तमित्रांचा घेतलेला आढावा हा केवळ चरित्राची पाने भरण्यासाठी आहे, असे वाटण्याची शक्यता आहे. परंतु नातलगांची, आप्तांची मंदियाळी ही चरित्रकाराची संपत्ती असते. इतिहासाचे लेखन करताना, या सगळयांचा संबंध जुळविताना, हे संदर्भ फार आवश्यक ठरतात. इतिहासात चरित्र लेखनात फार मोठी उणीव असेल, तर ती हीच आहे. कौटुंबिक नाते, आप्त त्यांच्या जीवनातील घटनांच्या तारखा मिळणे अवघड झाल्याने अनेक चरित्रे अपुरी ठरलेली आहेत. या ग्रंथाने ती उणीव दूर केली आहे. उद्या 'गोखले' कुटुंबाच्या विषयी संदर्भ शोधण्याची वेळ आली तर, या 'पाऊले चालती' चा संदर्भ उपयुक्त ठरू शकतो. त्यामुळे लेखकाने ज्या सगळ्यांना सामावून घेतले आहे, ते अनाठायी नसून उपयुक्त / आवश्यक आहे. वृक्षाचे चित्र काढताना खोडासोबत फांद्या, पाने, फुले असणारच. तशी ऋतूप्रमाणे त्याची रूपे बदलणारच. ती दाखविताना काहीजण जमिनीखाली असलेली मुळेही दाखवितात. त्यांना अनावश्यक कसे म्हणायचे? इतिहासाची ती अपरिहार्य वाटचाल आहे.
लेखकाचा सगळा प्रवास जसा झाला तसा तो चित्रित करताना संयमाची कसोटी लागते. आलेले सगळेच अनुभव आनंददायी असतात असे नाही. काही कटु आणि क्लेशकारक असतात. परंतु ती कटुताही फार संयतपणे व्यक्त झालेली आहे. आनंददायी प्रसंगातही हवेत असल्याचा कुठे आभास नाही. लेखकांच्या पत्नी, सिंधूंच्या प्रकरणातले हळवेपण हा मोठा डोह, तळ न सापडणारा. वाचताना पुढे जाण्याचे धैर्य होत नाही. तिथेच मन कुंठित होते. फूल कोमेजून निखळताना फांदीला काय वाटत असेल? पाणी ओसरल्यानंतर नदीला काय वाटत असेल ? हळुवारपणे आणि तितकेच भावनेने ओथंबलेले हे प्रकरण फार हृदयस्पर्शी झाले आहे.
एकूण वाचन करताना, प्रत्येकाशी लेखकाचे जसे संबंध आहेत, तसे वाचकांचेही प्रत्येकाशी जिव्हाळ्याचे जुळत जातात असे सतत वाटत राहते. लेखकाच्या कुटुंबातील नातलग आपलेही नातलग आहेत, इतके ते वाचकालाही जवळचे वाटतात. लेखकाचा ज्या ज्या संस्थांशी संबंध आलेला आहे, त्यातल्या काही संस्था अनेक वाचकांना परिचित असतील, तशा अनेक व्यक्तीदेखील. परंतु त्यांचे अंतरंग ज्या तऱ्हेने उलगडून दाखविले आहे, त्यामुळे त्यांचे अंतरंग अधिक स्पष्ट झाले आहे. त्यांची ही माहिती म्हणून संदर्भ म्हणून मोलाची आहे. त्यामुळे हे चरित्र केवळ माय गोखले यांच्यापुरते मर्यादित राहात नाही. त्याला संदर्भमूल्य प्राप्त झाले आहे. लेखकाने एक मोठे काम हातावेगळे केले आहे असेच म्हणावेसे वाटते. ठाण्याचा इतिहास लिहिताना याची ओळख टाळून पुढे जाता येणार नाही. 'प्राच्यविद्या' या संस्थेबद्दल लिहिताना या या आत्मकथन ग्रंथाला त्यात नक्कीच स्थान राहील असा विश्वास वाटतो.
नोकरीच्या निमित्ताने लेखक दहा-बारा गावांमध्ये राहिलेला आहे. फिरतीच्या कामामुळे पाच-पन्नास गावांत त्यान आठ-आठ दिवस मुक्काम केलेला आहे. त्यामुळे शेकडो नव्हे हजारो माणसांशी लेखकाचा अगदी निकटचा संबंध आलेला आहे. भारत सहकारी बँक, मराठी ग्रंथ संग्रहालय, विद्याप्रसारक मंडळ या संस्थांचे आणि त्या बरोबरच इतर अनेक संस्था आणि व्यक्ती आणि लेखकाच्या संपर्कात आलेल्या अनेक मित्रमंडळींचे वर्णन इतके आपुलकीचे आहे की वाचकाला ते सर्व आपलेच सुहृद आहेत असे वाटते.
लेखक अधेमध्ये गंभीर होतो आणि मनाला भिडणारा विचार लिहितो. विशेषत: दु:खाचे प्रसंग आले म्हणजे लेखक हळवा होतो. आणि जीवनातले तत्त्वज्ञान सहजपणे सांगून जातो. मी कोण आहे, मी या जगात कोठून कशाकरिता आलो. मी कोठे जाणार आहे, थोडक्यात म्हणजे 'कोऽहम्' या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न लेखकाने समारोपात केला आहे. त्यामुळे पुस्तक वाचून संपले तरी वाचक थोडा वेळ तरी विचारमग्न स्थितीतच राहतो.
२०१५ हे वर्ष मला बरेच काही द्यायचे असे ठरवून उजाडले. 'ठाणे नगर विकास मंच' ही संस्था दरवर्षी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या पाच मान्यवरांना 'ठाणे नगररत्न' पुरस्काराने सन्मानित करते. ठाणे शहराचे माजी उपमहापौर आणि ठाणे नगर विकास मंचचे अध्यक्ष माननीय श्री. सुभाष काळे यांनी फोन करून त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावून घेतले.
“अनिरुद्धजी, कलाक्षेत्रातील या वर्षीच्या ठाणे नगररत्न पुरस्कारासाठी आमच्या कमिटीने तुमचे नाव निश्चित केले आहे. गडकरी रंगायतनमध्ये एका मोठ्या समारंभात हे पुरस्कार दिले जातात. तेव्हा आपण या समारंभात हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी उपस्थित राहाल याचे संमतीपत्र सही करून द्या. सुभाषजी म्हणाले. मी त्यांच्याकडे पहातच राहिलो. “संमतीपत्र सही करून देता ना?" सुभाषजींच्या या प्रश्नाने मी भानावर आलो. आत्तापर्यंत अनेक पुरस्कार मला दिल्ली आणि मुंबईत मिळाले होते. माझ्या ठाणे शहरात मिळणारा हा मोठा पुरस्कार होता.
“माझ्या ठाणेकर रसिकांसमोर आपण मला पुरस्कार देणार आहात. आपले आभार कसे मानू? यासाठी कोणत्याही पत्रावर सही करून देण्याची माझी तयारी आहे." मी आनंदाने म्हणालो. "पण माझे खरे काम तर पुढेच आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी तुमचा गाण्याचा कार्यक्रम करावा आणि त्यात तुम्हाला पुरस्कार द्यावा अशी माझी इच्छा आहे." सुभाषजी म्हणाले. हा माणूस एका मागोमाग एक सुखद धक्के देत होता. तेही अगदी शांतपणे.
“तुम्ही खरे बोलत आहात की माझी गंमत करता आहात?" मी विचारले. “अहो गंमत कशी करेल? खरंच विचारतो आहे." ते शांतपणे म्हणाले.
“सुभाषजी, मला एक हजार जाहीर कार्यक्रम पूर्ण करायचे आहेत. ९८० पर्यंत मी पोहोचलो आहे. पुरस्काराइतकाच मला पुढील प्रत्येक कार्यक्रम महत्त्वाचा आहे." मी उत्तरलो.
“तर मग या तुमच्या वाटचालीतील पुढचा कार्यक्रम ठाणे नगर विकास मंचसाठी असेल. लवकरच वर्तमानपत्रात या पुरस्कारांची घोषणा होईल.' सुभाषजी म्हणाले. एका दिवसात या माणसाने मला बरेच काही दिले होते. कार्यक्रमांसाठी वर्षाच्या सुरुवातीलाच एक 'ट्रिगर' दिला होता. उत्साह वाढवला होता आणि पुरस्कार देऊन माझा आत्मविश्वास उंचावला होता. या काळात मला त्याची अत्यंत गरज होती. कधी कधी कलाकार एकदम हळवा होऊन जातो. कलाक्षेत्रात वाटचाल करताना एकदम त्याची शक्ती संपून जाते. या वेळी 'तू पुढे चल. आमचा तुला पाठिंबा आहे. आम्ही तुझ्या कलेवर मनापासून प्रेम करतो.' अशा शब्दांची त्याला फार आवश्यकता असते. माझे काहीचे असेच झाले होते. या वेळी सुभाष काळे आणि ठाणे नगर विकास मंचने माझ्यावर दाखवलेला विश्वास मी कधीच विसरू शकणार नाही.
लवकरच हे पुरस्कार वर्तमानपत्रात जाहीर झाले. मग काय, माझ्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला. २२ फेब्रुवारी २०१५ रोजी 'ठाणे नगररत्न पुरस्कार वितरण सोहळा' गडकरी रंगायतनमध्ये आयोजित करण्यात आला. डॉ. मुरलीधर गोडे, डॉ. मंजूषा गोखले. श्रीधर नेवाळकर आणि नीता देवळालकर हे इतर क्षेत्रातील पुरस्काराचे मानकरी होते. 'फर्माईश' या माझ्या हिंदी - मराठी गीत - गझलच्या कार्यक्रमाने पुरस्कार वितरण सोहळ्याला सुरुवात झाली. नंतर माझ्या गाण्याच्या कारकिर्दीचा आढावा घेणारी छोटी फिल्म दाखवण्यात आली. याचे संकलन नरेन्द्र बेडेकर यांनी केले होते. महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री माननीय सुधीर मुनगंटीवार कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. सुप्रसिद्ध गायक अजित कडकडे यांना या समारंभासाठी खास आमंत्रित करण्यात आले होते. त्यांच्या हस्ते कलाक्षेत्रासाठीचा २०१५ सालचा 'ठाणे नगररत्न पुरस्कार' मला देण्यात आला. त्यांच्यासारख्या महान गायकाच्या हस्ते हा पुरस्कार मिळाल्यामुळे त्याचे महत्त्व माझ्यासाठी अनेक पटींनी वाढले. यानंतर अजित कडकडे यांनी गाणे सादर केलेच, पण एक छोटे भाषण देखील केले. 'अनिरुद्ध, आता तू गाण्याचे विविध प्रकार उत्तम तऱ्हेने गाऊ शकतोस. तेव्हा एका गायन प्रकारात अडकून न राहता विविध स्टाईलची गाणी गा.' असा संदेश त्यांनी दिला. माझी गाण्याची कारकीर्द त्यांनी जवळून पाहिली होती. त्यांचा तो अधिकार होता. या समारंभाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून ठाणेकर रसिकांनी माझे कौतुक केले.
-अनिरुद्ध जोशी
बाल वयात जेव्हा पासून सभोवतालच्या जगाविषयी समज येवू लागली, त्या ईश्वराला जाणण्याची उत्सुकता मनामध्ये निर्माण झाली. सर्व अद्भूत जग निर्माण करणारा त्यावर नियंत्रण ठेवणारा, त्याला नियमानुसार चालविणारा कुणी तरी असेल हा विचार पक्का होऊ लागला. बुध्दीमध्ये स्थीर होवू लागला.
आज खरोखरच कोरोनाच्या संकटाला सामोरे जात असताना प्रत्येकाच्या डोळ्यासमोर अंधार दाटला आहे. आपले पुढे काय होईल आणि कधी व केव्हा सर्व पूर्ववत होईल अशाच अंधिकारमय विचारात सगळेच जण आहेत. दिवाळी अजून लांब आहे पण आता जर दिवाळी असती तरी या अवस्थेत आणि असेल त्या परिस्थितीत प्रत्येकाने घरासमोर दारासमोर किंवा देव्हाऱ्यात दिवा लावला नसता का??
Copyright © 2025 | Marathisrushti