(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • व्यवहार

    आईला काय भुगा केलाय ह्या दारुड्यानी डोक्याचा !! राघवच्या मनात आले , त्या म्हाद्याला यथेच्छ बुकलून काढावे असे त्याला वाटू लागले . मनातल्या मनात राघवने खूप दात ओठ खाल्ले पण प्रत्यक्षात तो मूग गिळून गप बसला होता . खरं तर व्यवहाराचे सगळे पैसे देऊन झाले होते , पण म्हाद्या काही ऐकायला तयार नव्हता .

      January 15, 2024


  • नितळ

    त्यांच्या एकुलत्या एक कन्येला, शिल्पाला पहायला पाहुणे येणार होते. त्यांनी सकाळी अकराची वेळ दिली होती.

      September 1, 2021


  • चित्रकाराचे चातुर्य

    एक चित्रकार होता. फारच सुंदर अशी चित्रे काढायचा तो. त्याची चित्रे पाहून लोक अत्यंत प्रभावीत होत असत. दूरवर त्याची ख्याती पसरली होती. त्यानं काढलेलं चित्र प्राप्त करण्यासाठी लोकांची नेहमी धडपड चालत असे. या प्रतिभावान कलावंताचे चित्र मिळविण्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजण्याची तयारी लोक दाखवीत. प्रचंड अशी लोकप्रियता, प्रसिद्धी अन् पैसा मिळाला तरी हा चित्रकार अहंकारापासून दूर होता. त्याचा स्वभाव अगदी सरळ होता. त्याला पैशाचा मोह मुळीच नव्हता. एखादा रसिक त्याच्या चित्रासाठी मोठी रक्कम द्यायला असमर्थ असला तर तो त्याची अडवणूक करीत नसे. तो देईल त्या रकमेत आपलं चित्र त्याला देऊन टाकी. कमविलेल्या संपत्तीचा बराचसा भाग तो रंजल्या-गांजलेल्यांना मदत करण्यात खर्च करीत असे.

      August 20, 2024


  • चांदी – लघुकथा

    आमचं गाव या आडबाजूच्या रेल्वे स्टेशन पासून चांगलं सात आठ कोस लांब आहे . पक्कीच काय कच्चा रास्ता पण नाही . कुठं पाय वाट तर कुठं गाडी वाट इतकंच . सगळा मामला डोंगर -दऱ्याचा अन माळ रानाचा . वाटेत दिवसा अंधार वाटावा अशे निबिड जंगल ! या स्टेशन वर रात्री अकराला आणि पहाट तीन ला एक एक गाडी शिट्टी मारून जाते . बाकी शुकशुकाटच असतो .

      May 22, 2018


  • आनंदें भीमदर्शनें !

    पुण्यात मारुतीची मंदिरं शंभराहून अधिकच असतील. त्यातील काही तर पेशवेकालीनही आहेत. पुणे तसं गणपतीच्या व मारुतीच्या असंख्य मंदिरामुळे बुद्धिमान व बलशाली आहे. पेठापेठांतून तालमी दिसतात, तालीम आली की, पहेलवानांचं दैवत मारुती मंदिर हे ओघानं येतच. थोडक्यात आढावा घ्यायचाच झाला तर पहा… जिलब्या मारुती, पत्र्या मारुती, पावन मारुती, पोटसुळ्या मारुती, पंचमुखी मारुती, पिंपळेश्वर मारुती, सोन्या मारुती, उंटाडे मारुती, शकुनी मारुती, भिकारदास मारुती, दास मारुती, जुळ्या मारुती, दक्षिणमुखी मारुती, इत्यादी. अनेक ठिकाणी शनी-मारुती मंदिरंही आहेत.

      June 9, 2021


  • श्रीमंत सासर

    गरीब घरातून आलेल्या मुलीला तिच्‍या श्रीमंत सासरकडचे तिच्या माहेरच्‍या गरिबीची पदोपदी जाणीव करुन देत असतात, ही गोष्‍ट प्रकर्षाने जाणवत राहते.

      January 24, 2024


  • नर्मदामैय्याची लेकरं

    डॉ. सुलभा (पागे ) केंकरे यांनी केलेले हे ललित लेखन आहे. कथा, व्यक्तिचित्रे आणि तिसरा विभाग ललित लेखांचा आहे. त्यांतून लेखिकेने अनेक विषय हाताळले आहेत.

      February 18, 2024


  • पुनर्प्राप्त सभ्यता (संक्षिप्त रूपांतरीत कथा २८)

    जिवा कापरे तुरूंगाच्या बुट बनवण्याच्या भागांत काम करण्यांत गुंग होता.
    एवढ्यांत तुरूंगाचा एक अधिकारी त्याच्याकडे आला व त्याने त्याला एक महत्त्वाचा कागद दिला.
    जिवाची तुरूंगातून सुटका झाल्याचा हुकुम होता तो.
    जिवाने तो कागद फार उत्सुकता किंवा आनंद न दाखवतां घेतला.
    त्याला चार वर्षांची सजा झाली होती.
    तो आतापर्यंत दहा महिने राहीला होता.
    आपण तीन महिन्यातच सुटू अशी त्याची अपेक्षा होती.
    त्याचे बाहेर अनेक मित्र होते.
    इतके मित्र असणारा तुरूंगात जास्त काळ रहात नाही.
    मुख्य तुरूंगाधिकारी जिवाला म्हणाला, “जिवा, तू उद्या बाहेर जाशील.
    ही तुला सुधारण्याची संधी आहे.
    तू तसा मनाने वाईट माणूस नाहीस.
    सांभाळ स्वत:ला !
    तिजोऱ्या फोडणे थांबव.”
    जिवा आश्चर्य दाखवत म्हणाला,
    “मी ? मी आयुष्यात कधी तिजोरीला हात नाही लावलेला.”
    मुख्य तुरूंगाधिकारी हंसला आणि म्हणाला, “कधीच नाही !
    आपण पाहूया तुला इथे कां पाठवलं ते !
    तू नाशिकला तिजोरी फोडल्याबद्दल तुला इथे पाठवण्यात आलंय !
    तो तू नव्हतास कां ?
    की तू त्यावेळी खरोखरी कुठे होतास हे पोलिसांना सांगायचं नव्हतं तुला ?
    कदाचित त्यावेळी तू एखाद्या स्त्रीबरोबर होतास आणि तिचं नाव सांगायचं नव्हतं तुला ?
    की न्यायमूर्तींना तू आवडला नाहीस ?
    तुझ्याकडे खरं कारण असेलच !
    तू कांही तिजोरी फोडण्याच्या गुन्ह्यामुळे इथे आलेला नाहीस ना !”
    “मी ?” जिवा पुन्हा आश्चर्य व्यक्त करत म्हणाला,
    “मी नाशिकला कधी गेलेलोच नाही.”
    मुख्य तुरूंगाधिकारी वैतागत म्हणाला, “ह्याला घेऊन जा रे !
    त्याला बाहेर गेल्यावर घालायचे कपडे द्या आणि सकाळी परत आणा.
    जिवा कापरे, मी सांगितलं त्यावर विचार कर.
    सकाळी सव्वासातला पुन्हा त्याला तिथे आणला, तेव्हां त्याने नवे कपडे घातले होते.
    ते त्याला खूप आंखूड होते आणि पायांत घालायला दिलेल्या चपला चावत होत्या.
    नंतर त्याला जवळच्या स्टेशनपर्यंत जायचा खर्च आणि शंभर रूपये वर देण्यात आले.
    शंभर रूपये ही त्याला सुधारायला मदत होती.
    मुख्य तुरूंगाधिकाऱ्यांनी त्याला हात जोडून निरोप दिला.
    अशा प्रकारे जिवा कापरे कैदी क्रमांक ७६२चे अस्तित्व संपले.
    तो स्वच्छ सूर्यप्रकाशात फिरायला मोकळा झाला.
    तो पक्ष्यांची गाणी ऐकत बसला नाही की झाडे, फुले पहात बसला नाही.
    तो सरळ एका हॉटेलात गेला.
    तिथे त्याने स्वातंत्र्याचा आनंद प्रथम उपभोगला.
    मस्त जेवण केलं.
    मग तो स्टेशनवर गेला.
    तिथे भीक मागणाऱ्या आंधळ्याला दहाची एक नोट दिली.
    मग तो एका पॅसेंजर ट्रेनमधे बसला.
    तीन तासांनी तो एका लहान गांवात उतरला.
    तिथल्या शंकरच्या हॉटेलात गेला.
    शंकर तिथे एकटाच होता.
    त्याने जिवाचं स्वागत केलं.
    तो म्हणाला, “जिवा, माफ कर.
    आम्ही तुला लौकर सोडवू शकलो नाही.
    पण त्या नाशिकच्या तिजोरीचा प्रश्न होताच.
    काम सोपं नव्हतं.
    तू ठीक आहेस ना ?”
    जिवा म्हणाला, “मी ठीक आहे.
    माझी खोली तयार असेल ना !”
    हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर मागे असलेल्या खोलीच दार जिवाने उघडलं.
    सर्व जसंच्या तसं होतं.
    तुरूंगात जाण्याआधी ह्याच खोलीत त्याला अटक झाली होती.
    दरवाजाला पोलिसाच्या गणवेशाचा तुकडा अजूनही अडकलेला होता.
    जिवाने पळायचा प्रयत्न केला, तेव्हा झालेल्या झटापटीत पोलिसाच्या बाहीचा तुकडा निघाला होता.
    भिंतीशी एक पलंग होता.
    जिवाने तो अलिकडे सरकवला.
    ती भिंत सर्वसाधारण भिंतीसारखीच दिसत होती.
    पण जिवाने हाताने चाचपून त्या भिंतीतला एक छोटा दरवाजा उघडला.
    त्यांतून त्याने धुळीने भरलेली एक बॅग काढली.
    त्याने बॅग उघडली व मायेने आतील तिजोरी फोडण्याच्या हत्त्यारांवरून नजर फिरवली.
    ह्यापेक्षा नीटस साधने तयार करणेच शक्य नव्हतं.
    त्यात सर्व काही होतं.
    जगातली कुठलीही तिजोरी तो त्यांच्या सहाय्याने फोडू शकत होता.
    त्याने स्वतः ती वेगवेगळ्या आकाराची साधने डिझाईन केली होती.
    त्याला त्याचा अभिमान होता.
    त्याने तिजोरी फोडण्याची साधने जिथे बनवली जात त्याच्याकडून ती खास बनवून घेतली होती.
    अर्ध्या तासाने छानसे कपडे घातलेला जिवा बॅग हातात घेऊन खाली आला.
    शंकरने विचारलं, “तू कांही बेत केलायसं काय?”
    जिवा आश्चर्य व्यक्त करत म्हणाला, “मी ? मला कळत नाही.
    मी तर मुंबईच्या ब्रेड आणि केक बनवणाऱ्या कंपनीचा प्रतिनिधी आहे."
    शंकरला हा विनोद फारच आवडला व त्याने एक वाईन ग्लास घेऊन तो साजरा केला.
    जिवा मद्य पीत नसे.
    त्याने अर्धा ग्लास दूध घेतले.
    जिवा ७६२ तुरूंगातून सुटल्यावर दहिसर येथे एक तिजोरी फोडली गेली.
    ८०,००० रूपयांची चोरी झाली.
    कोणी हे काम केलं त्याचा ठाव लागला नाही.
    त्यानंतर दोन आठवड्यांनी ठाण्याला एक तिजोरी उघडली गेली.
    ती नवीन बनवलेली तिजोरी होती आणि ती तयार करणाऱ्या कंपनीने दावा केला होता की ही तिजोरी कोणीही उघडू शकणार नाही.
    पण ती कुणीतरी उघडली होती आणि एक लाख पन्नास हजार रूपये चोरून नेले होते.
    त्यानंतर तर पुण्यांत एक तिजोरी फोडण्यात आली व त्यातून पांच लाख रूपये नेले गेले.
    हे नुकसान फारच मोठं होतं.
    क्राईम ब्रँचचे इन्सपेक्टर बर्वे अशी महत्त्वाची कामे बघत.
    उंच, धिप्पाड, वयस्क बर्वे नेहमी साध्या पोशाखात असत.
    अनुभवी म्हणून हे कामही त्यांच्याकडे आलं.
    इन्सपेक्टर बर्वेनी दहिसर, ठाणे आणि पुणे इथे फोडलेल्या तिन्ही तिजोऱ्या पाहिल्या.
    अतिशय नीटनेटकं काम होतं.
    कुठे कांही पडलेले नव्हतं.
    तिजोऱ्यांवर जबरदस्ती झालीय असंही वाटत नव्हतं.
    त्या सहजतेने उघडलेल्या दिसत होत्या.
    ते बरोबरच्या माणसाला म्हणाले, “हे असं काम फक्त आणि फक्त जिवा कापरे करू शकतो.
    तिजोरी सहज उघडतां येणारी साधने इतरांकडे नाहीत.
    बहुदा तुरूंगातून सुटल्यावर तो परत कामाला लागलाय.
    मला जिवा कापरे हवाय.
    आता परत तो तुरूंगात जाईल तो आजन्म कारावासासाठीच.”
    इन्सपेक्टर बर्वेंना जिवाची काम करण्याची पध्दत माहिती होती.
    तो एके ठिकाणी तिजोरी फोडली की दुसरी लांबच्या गावी जाऊन फोडत असे.
    तिथेच थांबत नसे.
    तो नेहमी एकटाच काम करत असे.
    तो काम झाले की तिथे व त्या शहरातही थांबत नसे.
    तो जाईल तिथे चांगल्या लोकांत मिसळून जाई.
    ह्या त्याच्या संवयीमुळे त्याला पकडणे कठीण होते.
    ज्या श्रीमंतांकडे पैशांनी भरलेल्या तिजोऱ्या होत्या, त्यांना ही केस इन्सपेक्टर बर्वेंकडे देण्यात आली, हे ऐकून आनंद झाला.
    एका दुपारी जिवा कापरे आपली बॅग घेऊन मोरबेवाडी नावाच्या एका लहान गावात आला.
    एखाद्या महाविद्यालयीन तरूणासारखा वाटणारा जिवा मोठ्या रस्त्यावरून थेट तिथल्या हाॅटेलात गेला.
    तो जात असतांना एक तरूणी त्याच्या समोर रस्ता ओलांडून एका छोट्या इमारतीतील समोरच्या दरवाजांतून आत गेली.
    जिवाने त्या दरवाजावरील पाटी वाचली ‘मोरबेवाडी बँक’.
    ती समोर असतांना जिवाने तिच्या नजरेला नजर भिडवली आणि त्याक्षणी तो दुसराच माणूस झाला.
    त्या तरूणीने चटकन् नजर फिरवली पण तिचा चेहरा लज्जेने लाल झाला.
    जिवासारखे तरूण त्या गांवात क्वचितच दिसत.
    जिवाला बँकेच्या दाराजवळ एक मुलगा दिसला.
    तो त्या मुलाला गांवाबद्दल माहिती विचारू लागला.
    थोड्या वेळाने ती तरूणी बँकेतून बाहेर आली आणि आपल्या वाटेने निघून गेली.
    जाताना तिने बहुदा जिवाला पाहिले नाही.
    जिवाने मुलाला विचारले, “ही मुलगी सुमन कारेकर कां ?”
    मुलगा म्हणाला, “नाही, ती मुलगी अवनी मयेकर.
    तिचे वडिल ह्या बँकेचे मालक आहेत.”
    जिवा एका हॉटेलात आला व तिथे अविनाश काटकर हे नाव नोंदवून त्याने खोली घेतली.
    त्याने हॉटेल मॅनेजरला सांगितले की त्याला त्या गांवात कांही व्यवसाय करायची इच्छा आहे.
    त्याने हेही विचारले की इथे बुटांचा धंदा चालेल कां ?
    बुटाची आधीच किती दुकानं आहेत ?
    हॉटेल मॅनेजरने जिवाचे कपडे पाहिले, त्याची बोलण्या-वागण्याची रीत पाहिली व त्याची खात्री पटली की हा माणूस सज्जन आणि लायक आहे.
    तो त्याच्याशी मनमोकळेपणाने बोलू लागला.
    तो म्हणाला, “खरंच ! ह्या गांवाला बुटांच्या चांगल्या दुकानाची गरज आहे.
    फक्त बूटांचं असं दुकान तिथे नाही.
    मोठ्या दुकानांतच थोडेसे बूट ठेवलेले असतात.”
    त्याने इच्छा व्यक्त केली की अविनाश काटकर (जिवा) याने त्या गांवात राहावं.
    हे गांव छान होतं आणि लोकही मिळून मिसळून रहाणारे होते.
    अविनाश म्हणाला की तो कांही दिवस गांवात राहून गांवाविषयी थोडी अधिक माहिती करून घेणार आहे.
    तो म्हणाला, “माझी बॅग मीच नेईन खोलींत.
    मुलगा पाठवायची जरूरी नाही.
    बॅग खूप जड आहे.”
    अविनाश काटकर उर्फ जिवा मोरबेवाडीतच राहिला.
    त्याने बुटांच दुकान सुरू केलं.
    त्याचा धंदा चांगला चालला होता.
    त्याने खूप मित्रही केले.
    आणि त्याच्या मनांतली इच्छाही पूर्ण झाली.
    अवनीची व त्याची ओळख झाली आणि ती वाढत गेली.
    दिवसागणिक ती त्याला अधिक आवडू लागली.
    एक वर्ष झालं तेव्हां मोरबेवाडीमधील प्रत्येक व्यक्ती अविनाशला ओळखत होती.
    त्याचा बुटांचा व्यवसाय जोरात चालत होता.
    त्याचा आणि अवनीचा विवाह केवळ दोन आठवड्यांवर आला होता.
    गांवातील बँकेचे अध्यक्ष मयेकर यांना अविनाश खूप प्रिय होता.
    अवनीला त्याचा अभिमान वाटत होता.
    तो जणू मयेकर कुटुंबातलाच झाला होता.
    एक दिवस आपल्या खोलीत बसून अविनाश उर्फ जिवाने आपल्या एका जुन्या मित्राला पत्र लिहिले.
    मजकूर असा होता :
    प्रिय मित्रा,
    पुढच्या दहा तारखेला संध्याकाळी मला सुळेंच्या दुकानावर भेट.
    मला माझी ? वापरातली साधने तुला द्यायची आहेत.
    मला ठाऊक आहे की तू आनंदाने ती घेशील.
    तुला अशी साधने कुठेही विकत मिळणार नाहीत.
    तू जरी दहा हजार रूपये दिलेस तरी मिळणार नाहीत.
    मी माझा पूर्वीचा धंदा गेल्या वर्षापासून बंद केला आहे.
    माझं एक छान दुकान आहे.
    माझं आयुष्यही पूर्वीपेक्षा चांगलं आहे.
    दोन आठवड्यानी मी जगातल्या सर्वात चांगल्या मुलीबरोबर लग्न करणार आहे.
    हेच खरं जीवन आहे.
    मी पुन्हां कधी दुसऱ्याच्या पैशांना हातही लावणार नाही.
    माझा विवाह झाला की मी आणखी आणखी पूर्वेकडे जाणार आहे, जिथे माझ्या पूर्वायुष्यांत मला ओळखणारा कुणीही भेटणार नाही.
    खरं सांगू ती फार फार चांगली मुलगी आहे.
    तिचा माझ्यावर विश्वास आहे.
    तुझा जुना मित्र,
    जिवा कापरे
    अविनाश उर्फ जिवाने हे पत्र पाठवल्यानंतरच्या सोमवारी साध्या वेशांतले इन्स्पेक्टर बर्वे मोरबेवाडीत येऊन दाखल झाले.
    त्यांच्या पध्दतीप्रमाणे ते शांतपणे गांवात फिरले आणि त्यांना हवी ती माहिती त्यांनी गोळा केली.
    एका दुकानाबाहेर उभं राहून इन्सपेक्टर बर्वे रस्त्यावरून जाणाऱ्या अविनाशकडे पहात होते.
    ते मनाशी म्हणाले, “तू बँकेच्या अध्यक्षांच्या मुलीशी लग्न करणार आहेस !
    तू नक्कीच जिवा कापरे आहेस.
    तुझ्या लग्नाची मला खात्री नाही वाटत.”
    दुसऱ्या दिवशी सकाळी अविनाश अध्यक्षांच्या घरी गेला होता.
    तो वर्षानंतर प्रथमच मोरबेवाडीच्या बाहेर जाणार होता.
    त्याला जवळच्या शहरांतून लग्नासाठी नवे कपडे खरेदी करायचे होते.
    तो अवनीसाठी भेटवस्तूही खरेदी करणार होता.
    त्याने एखादी तिजोरी फोडल्याला एक वर्षाहून अधिक वेळ गेला होता.
    अध्यक्ष मयेकरांचे सर्व कुटुंबच त्या दिवशी बँकेत जायला निघाले.
    अध्यक्ष, अवनी, तिची लग्न झालेली मोठी बहीण व बहिणीच्या पांच व नऊ वर्षांच्या दोन मुली आणि अविनाश.
    बँकेतूनच पुढे अविनाश शहरांत जाणार होता, म्हणून वाटेत तो आपल्या खोलीवर गेला व ती बॅग घेऊन आला.
    मग ते सर्व बँकेकडे निघाले.
    सगळेच बँकेत आत गेले, अविनाशसुध्दा.
    तो आता कुटुंबाचाच भाग होता ना !
    बँकेच्या स्टाफला अविनाशला पाहून आनंद झाला.
    अध्यक्ष मयेकरांना किती छान जांवई मिळालाय, असं त्यांच आपसांत बोलणंही झालं.
    अविनाशने आत आल्यावर आपली बॅग खाली ठेवली.
    अवनीने ती बॅग उचलली पण परत खाली ठेवली.
    ती म्हणाली, “अवि, किती जड बॅग आहे ही. आंत सोनं भरलंय की काय ?” असं म्हणत ती हंसली.
    अविनाश म्हणाला, “दुकानांतल्या आता मला न लागणाऱ्या कांही वस्तू आहेत त्यांत.
    मी त्या शहरांत नेऊन ज्याच्याकडून आणल्या त्याला परत देणार आहे.
    स्वतःच घेऊन जाऊन पैसे वाचवतोय.
    त्या पाठवायचा खर्च मी वाचवतोय.
    आता माझा विवाह होणार आहे ना !
    मी बचत केलीच पाहिजे.”
    बँकेने नुकतीच नवी तिजोरी आणली होती.
    अध्यक्षांना त्याबद्दल फार अभिमान होता.
    त्यांना ती सर्वांना दाखवायची होती.
    एखाद्या छोट्या खोलीसारखी ती मोठी होती.
    तिला एक खास वेगळ्या प्रकारे बनवलेला दरवाजा होता.
    त्या दारावर बसवलेल्या घड्याळाने तिजोरीच्या दाराचे नियंत्रण करता येत असे.
    तिजोरी पुन्हां किती वाजता उघडायची हे त्या घड्याळाने आधी ठरवता येत असे.
    मधल्या काळांत ती कोणालाही उघडतां येत नसे.
    अगदी स्वतः अध्यक्ष सुध्दा मधेच उघडू शकत नसत.
    त्यांनी हे सगळं अविनाशला समजावून सांगितलं.
    अविनाशने त्यांच बोलणं लक्ष देऊन ऐकलं पण त्याला त्यांतल कांही समजत होतं, असं दिसलं नाही.
    बहिणीची मुलं मात्र ती तिजोरी, ते दार, घड्याळ, इ. पाहून हरखून गेली होती.
    ते असे गुंतलेले असतांना इन्सपेक्टर बर्वे बँकेमधे आले व त्यांनी सभोवार पाहिले.
    त्यांच्या नजरेतून कांही सुटत नसे.
    बँकेतल्या तरूण क्लार्कला ते म्हणाले, “मी कामासाठी नाही आलो.
    इथे एक तरूण येणार आहे त्याला भेटायला आलोय.”
    एवढ्यांत आतून अचानक बाईच्या किंचाळण्याचा आवाज आला.
    मुलांकडे कोणाचच लक्ष नव्हतं.
    पाच वर्षांची लहान मुलगी बेबी तिजोरीत शिरली होती आणि नऊ वर्षांच्या ताईने तिजोरीचे दार बाहेरून बंद केले होते.
    अध्यक्षांनी दार ओढून पाहिलं पण ते घट्ट बंद झालं होतं.
    थोडा वेळ दार ओढून पाहिल्यावर ते म्हणाले, “दार उघडत नाही.
    मी तर दार उघडण्याची वेळही घड्याळावर लावलेली नाही.”
    मुलींच्या आईने पुन्हा हंबरडा फोडला.
    अध्यक्ष म्हणाले, “जरा शांत हो. मग त्यांनी आत अडकलेल्या बेबीला मोठ्या आवाजात हाक मारली.
    “बेबी, मी सांगतो ते ऐक. घाबरू नकोस.”
    बेबीचा अगदी पुसटसा आवाज उत्तरादाखल ऐकू आला.
    अगदी अस्पष्ट.
    आंतल्या काळोखात ती मुलगी घाबरली नसती तरच नवल.
    बेबीची आई म्हणाली, “माझी बेबी भीतीनेच मरून जाईल.
    कांही तरी करा.
    तें दार फोडा.
    तुम्ही पुरूष कांहीच करू शकत नाही ?”
    अध्यक्ष म्हणाले, “ही तिजोरी उघडू शकेल असा माणूस जवळच्या शहरांतही नाही.
    अरे देवा !
    अविनाश, आंत पुरेशी हवा नाही.
    बेबी हवे अभावी आणि भीतीनेच मरून जाईल.”
    बेबीची आई, अवनीची मोठी बहीण, आता आपले हात दारावर आपटून रडू लागली.
    अवनीने अविनाशकडे पाहिलं.
    तिचे मोठे मोठे डोळे पाण्याने भरून आले होते.
    त्या डोळ्यांत दुःख तर होतंच पण आपला प्रियकर कांहीतरी करेल अशी आशाही होती.
    प्रेम करणाऱ्या मुलीला आपला प्रियकर खूप सामर्थ्यवान वाटत असतो.
    ती म्हणाली, “अवि, तू कांही प्रयत्न करून बघ ना !”
    अविनाशने तिच्याकडे कोमल नजरेने पाहिलं आणि त्याच्या डोळ्यात एक वेगळचं हास्य तरळलं.
    तो अवनीला म्हणाला, “अवनी, तू माळलेलं गुलाबाचं फूल मला दे.”
    अवनीला कळेना की खरंच त्याने अशी मागणी केली कीं नाही ?
    परंतु तिने फूल काढून त्याच्या हातांत दिले.
    अविनाशने ते आपल्याजवळ जपून ठेवले.
    मग त्याने आपला कोट काढून ठेवला.
    त्याच क्षणी तो परत जिवा कापरे झाला होता.
    अविनाश संपला होता.
    “सर्वांनी दारापासून दूर रहा.”
    तो म्हणाला.
    त्याने आपली बॅग उचलली आणि टेबलावर ठेवली.
    ती उघडली व त्यांतली कांही साधने बाहेर काढली.
    आपल्या अवतीभवती कोणी आहेत, हे तो विसरून गेला.
    ती साधने त्याने टेबलावर ठेवली.
    सर्व लोक दीङमूढ होऊन लांब उभे राहून त्याच्या हालचाली पहात होते.
    जिवाने तिजोरीचा दरवाजा फोडण्याच्या कामाला सुरूवात केली.
    दहाच मिनिटात, नेहमीपेक्षा कितीतरी कमी वेळांत त्याने तिजोरीचा दरवाजा उघडला.
    आंतून बाहेर आलेल्या बेबीने आपल्या आईच्या कवेत झेप घेतली.
    जिवाने आपला कोट चढवला.
    फूल नीट कोटाला लावलं आणि तो तिथून निघाला.
    त्याला मागून अवनीची हांक ऐकू आली, “अवि, अवि,”.
    तिकडे दुर्लक्ष करून तो मुख्य दाराशी थांबलेल्या आणि त्याने आधीच पाहिलेल्या इन्सपेक्टर बर्वेंकडे आला व म्हणाला, “चला, इन्सपेक्टर बर्वेसाहेब, तुम्ही शेवटी इथे पोहोचलात, नाही कां ?
    चला, आतां कशानेच फरक पडत नाही.
    मला आता त्याची पर्वा नाही”
    दाराशी उभं राहून ही सर्व घटना पहाणाऱ्या उंच धिप्पाड, वयस्क इन्सपेक्टर बर्वेंची प्रतिक्रिया मात्र अगदी विचित्रच होती.
    त्यांनी जिवा कापरेला ओळखल्याचे चेहऱ्यावर दिसू दिले नाही.
    क्लार्ककडे बोट दाखवत ते म्हणाले, “हे म्हणाले, तू अविनाश काटकर. होय ना !
    काटकर, सभ्य गृहस्था, आपली पूर्वीची ओळख नाही.
    तुझी नक्कीच कांहीतरी गल्लत होत आहे.”
    असं म्हणून ते त्यांच्या नेहेमीच्या पध्दतीने सावकाश वळले.
    त्यांचा हात कोटाच्या खिशांत जिवाने त्याच्या मित्राला लिहिलेल्या पत्रावर होता.
    तो तसाच ठेवून ते हळूहळू चालत तिथून निघून गेले.
    -- अरविंद खानोलकर.
    मूळ कथा - रिट्रीव्हड् रिफॉर्मेशन
    मूळ लेखक - ओ. हेन्री

      June 26, 2022


  • कोणीतरी आयुष्यात डोकावते तेव्हा…

    आज शाळेचा उद्घाटन सोहळा सुरू आहे. कारणसुद्धा तसेच आहे. शाळेसाठी तब्बल ८० लाख रुपये खर्च करून सर्व सोयीसुविधांसह एक एकर क्षेत्रात शाळेची इमारत दिमाखात उभी आहे. आज शाळासुद्धा सर्वांसोबत त्या व्यक्तींची वाट बघत आहे जी व्यक्ती शाळेचे उद्घाटन करणार आहे.

      May 5, 2022


  • जिनके घर शिशेके होते है…

    काही काही माणसं स्वत:वर इतकं अफाट प्रेम करतात की त्यातुन त्यानां बाहेर येणं जमतच नाही. त्यात त्यांचे स्वत:चे असे काही अंगभूत गूण वैशिष्ठ्यही असतात त्यामुळे अशी माणसं दीर्घकाळ लक्षात राहतात. त्यात ती जर कलावंताच्या कुळीतील असतील तर मग बोलायलाच नको !!!! अनेकदा त्यांच्या विक्षिप्त वागण्याने ते सर्वांचं लक्ष वेधून घेतात. गमंत म्हणजे त्यांच्यावर मना पासून प्रेम करणारा एक मोठा वर्गही असतो. शास्त्रज्ञ, साहित्य, खेळाडू, कलावंत या क्षेत्रातील अनेक नामवंत त्यांच्या विशिष्ट अशा स्वभावामुळे कायम चर्चेत राहतात.

    बलुचिस्थान येथे एका काश्मिरी पंडीताच्या घरात एक देखणे मूल जन्मले. इतर मुलां सारखेच शालेय व कॉलेज शिक्षण घेत मोठे झाले. १९४० च्या दरम्यान या तरूण मुलाला मुंबईतल्या माहिम पोलिस स्टेशनात पोलिस इन्स्पेक्टरची नोकरी लागली. या चौकीतला हा एकदम रूबाबदार व देखणा इन्स्पेक्टर अनेकानां भूरळ घालत असे. मग एक दिवस कुणी तरी त्याला म्हटले -‘तुम तो एकदम हिरो दिखते हो. फिल्मोमे काम क्यूँ नही करते.’ मग काय ? त्याच्याही डोक्यात किडा गेला की मी का प्रयत्न करू नये. पोलिस स्टेशनला अनेकदा चित्रपटसृष्टीतली अनेक माणसे येत असत. यापैकी एक होते चित्रपट निर्माते बलदेव दुबे. या तरूण इन्स्पेक्टरची एक खासियत होती ती म्हणजे त्यांची बोलण्याची विशेष ढब. दुबेला ती जाम आवडली. त्यांनी या तरूणाला चित्रपटात भूमिका देण्याची ऑफर दिली. ज्या क्षणाची हा तरूण वाट बघत होता ताक चालून त्याच्याकडे आला होता. क्षणाचाही विलंब न करता तो हो म्हणाला. दूबे यांनी आपल्या “शाही बाजार” या चित्रपटासाठी मूख्य नायकाची भूमिका त्याला देऊ केली.

    या तरूणाचे नाव होते कुलभूषण पंडित. मागचा पूढचा फारसा विचार न करता मग त्याने चित्रपटासाठी धाडकन् नोकरीचा राजीनामा दिला. ही घटना १९५२ ची. विशेष म्हणजे पूढच्या पाच वर्षात या तरूणाला रंगीली, अनमोल, सहारा, अवसर, घमंड, निलमणी,कृष्ण सुदामा असे चित्रपट मिळाले खरे पण सूर काही सापडेना. कलावंत असो की शाही माणूस पोट नावाचा अवयव त्याला नेहमीच आपल्या ताब्यात ठेवत असतो. नोकरी गेल्यामुळे आथिर्क परिस्थिती पण बिघडली. मग १९५७ मघ्ये मेहबूब खानचा महत्वकांक्षी चित्रपट ‘मदर इंडिया’ आला. हा संपूर्ण चित्रपट नर्गिसच्या राधा या मूख्य पात्रा भोवती केंद्रीत केलेला होता. त्यात तिच्या नवऱ्याची एक छोटीशी भूमिका कुलभूषणला मिळाली आणि त्या छोट्या भूमिकेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या चित्रपटा पासून कुलभूषणचा खऱ्या अर्थाने नवीन जन्म झाला व मग सुरू झाला ‘राजकूमार’ या काहीशा विक्षिप्त अभिनेत्याचा चित्रपट प्रवास.

    एस.एस. वासन या दक्षिणेतील प्रसिद्ध निर्माता दिग्दर्शकाचा १९५९ मध्ये “पैगाम” हा चित्रपट आला जो सूपरहिट झाला. या चित्रपटात राजकुमार (रामलाल) दिलीपकूमारचा मोठा भाऊ होता. खरे तर राजकुमार ज्या सामाजिक घटकात व परिस्थितीत वाढलेला होता त्याला बरीचशी छेद देणारी भूमिका पैगाम मधील रामलाल या पात्राची होती. रामलाल हा एक सामान्या मील कामगार पण आपल्या भावावर अत्यांतिक प्रेम असणारा व यासाठी अफाट कष्ट करून त्याला शहरात शिकायला पाठवणारा. ही भूमिका त्याने खरोखच मना पासून केली. दिलीप राज या दोन्ही कुमारांनी आपापल्या अभिनयात जान ओतली. त्यांची जुगलबंदी बघावयास मिळाली. पण नंतर मात्र हे दोघे एकत्र कधीच दिसले नाही. दिसले ते थेट ३२ वर्षानंतर सुभाष घईच्या ‘सौदागर’ मध्ये. मी कुठे तरी वाचल्याचे आठवते की पैगाम चित्रपटातल्या एका प्रसंगात राजकुमारला दिलीपकुमारला थप्पड मारायची होती आणि ती त्याने खरोखरीच सणकावून लगावली आणि मग दोघांचा बेबनाव झाला व कधी एकत्र आलेच नाही. असो. अभिनेत्यातील अहंकारी माणूस किंवा माणसातील अहंकारी कलाकार असे अनेकदा आमने सामने येतात तेव्हा असा बेबनाव होणे चित्रपटसृष्टीसाठी काही नवे नाही. त्यानंतर लगेचच आलेल्या दिल अपना प्रित पराई, घराना, गोदान, दिल एक मंदिर, दूज का चांद या चित्रपटांतील सहजसुंदर व नैसर्गिक अभिनयाने राजकुमार यांना अभिनय सम्राटाच्या पदावर पोहचवले. मदर इंडियातील छोट्याशा भूमिकेने सुरु झालेला हा यशस्वी प्रवास अव्याहतपणे सुरु राहिला.

    मग त्यांच्या आयुष्यात १९६५ मध्ये आणखी एक कलाटणी देणारा चित्रपट आला. बी.आर. चोप्राचा भारतातील पहिला मल्टीस्टार चित्रपट ‘वक्त’. बलराज सहानी, राजकूमार, सुनील दत्त, शशी कपूर, साधना, शर्मिल टागोर, रेहमान, मदन पूरी असे सर्वच नामवंत अभिनेते यात होते. चित्रपटात भव्यते सोबत संगीताची मेजवानीही होती. विविध सुंदर लोकेशन्स वरील चित्रीकरण, श्रीमंती थाट व गरीबीचा खास भावूक ड्रामा सर्व काही यात होते. या चित्रपटातील राजकुमारची भूमिका आगोदरच्या सर्व चित्रपटापेक्ष वेगळी होती. कृष्णधवल चित्रपटातील गरीब, कामगार, मध्यमवर्गीय अश्सा चेहरा असणारा राजकूमार या चित्रपटात एकदम लॅव्हीश व्हाईट कॉलर गुन्हेगार म्हणून पडद्यावर आला. जिच्यावर आपण प्रेम करतो ती आणखी कुणावर प्रेम करते आणि योगायोगाने तो आपलाच भाऊ आहे हे समजल्यावर होणारे भावनिक ताणतणाव यात राजकुमार यांनी अप्रतिम साकार केले. या चित्रपटातील त्यांचे सर्व डायलॉग “हम” या शब्दाने सुरू होत किंवा संपत.मात्र या चित्रपटा नंतर ही “हम”ची बाधा त्यानां कायम जडली किंवा बिंबवून घेतली. राजकूमार स्वत:ला ‘हम’ या संबोधना पासून बोलायला लागले ते अखेरचा श्वास घेई पर्यंत. या चित्रपटातील त्यांच्या तोंडचे संवाद हे तुफान लोकप्रिय झाले. संवाद बोलण्याच्या त्यांच्या अंदाजावर प्रेक्षक इतके फिदा होते की ज्या चित्रपटात राजकुमार असत तो चित्रपट कसा का असेना प्रेक्षक डॉयलागबाजी ऐकायला चित्रपटाला तुफान गर्दी करायचे. याच वर्षातला त्यांचे “काजल” हा मिना कुमारी सोबतचा “रिश्तेनाते” आणि “उंचे लोग” हे चित्रपट चांगलेच गाजले.

    भारतीय ग्रामीण नायकाचा चेहरा म्हणून ते अनेक चित्रपटात शोभले. भारतीय संस्कृतीत वडीला नतंर मोठा भाऊ हा वडीलाच्या ठायी असतो. हा भाऊ बहूतेक वेळा कुटूबांसाठी आपल्या अनेक इच्छा व भावनानां दडपून टाकतो. राजकुमार यांचा अशा भूमिकेतील अभिनय खरोखरच अप्रतिम असे. मनाचा होणारा कोंडमारा ते आपल्या अभिनयातुन उत्कृष्ट सादर करत. सोबत त्यांच्या आवाजाचा एक विशिष्ठ पोत आणि संवादफैकीमुळे अभिनय सहज व नैसर्गिक होत असे. खरे तर प्रत्यक्षात ते अत्यंत उजळ कांतीचे अभिनेते होते. कृष्णधवल चित्रपटामुळे त्यांचा रंग फारसा आडवा आला नाही. पण म्हणून कदाचित रंगीत चित्रपटात नंतर त्यांना तशा भूमिका मिळाल्या नसाव्यात.

    चेतन आनंद या निर्माता दिग्दर्शक शिवाय अख्ख्या चित्रपटसृष्टीत या अभिनेत्याचे कुणाशी वैयक्तिक असे सूर कधी जुळले नाही चेतन आनंदच्या सर्व चित्रपटात राजकुमार आणि प्रिया राजवंश हे हमखास असत. चेतन आनंद यांचा ‘हिर रांझा’ (१९७०) हा चित्रपट एक वेगळा प्रयोग होता. या चित्रपटातील काव्यमय संवाद हा त्या चित्रपटाचा आत्माच होता. राजकुमार आणि प्रिया राजवंश या दोघांनही यातील सर्व काव्यमय संवाद अप्रतिमच म्हटले आहेत. हमराज, नई रोशनी (१९६७), मेरे हुजूर, नील कमल, वासना (१९६८), लाल पत्थर, मर्यादा (१९७१), पाकिजा, दिल का राजा(१९७२), हिंदुस्तान की कसम(१९७३), ३६ घंटे(१९७४), एक से बढकर एक (१९७६), बुलंदी व चंबल की कसम (१९८०), कुदरत (१९८१), या सर्व चित्रपटापैकी काही वगळता ते मूख्य नायक जरी नसले तरी त्यांची समातंर भूमिका लक्षणीय असे. १९९१ मधील सुभाष घई निर्मित दिग्दर्शीत “सौदागर” मध्ये ते दिलिपकुमार सोबत पुन्हा दिसले. ९० च्या दशकात चित्रपटाच्या तंत्रात लक्षणीय बदल झाले होते. या दोघांचे समोरा समोरचे प्रसंग शूट करतानां हे तंत्र कामी आले. या चित्रपटात एकाच फ्रेममध्ये हे दोघे क्वचितच दिसतात. चित्रपटात जरी दोघे एकत्र दिसत असले तरी प्रत्यक्षात या दोन्ही अभिनेत्याच्या मनातील अतंर कमी झाले होते का? माहित नाही. पण व्यावसायिक तडजोडी करतानां खाजगी आयुष्य शक्यतो मिसळू देता कामा नये हे अनुभवाने अनेकानां समजते तसे ते या दोघानाही कदाचित समजले असावे. १९९३ मधील काहीसा भडक असणारा “तिरंगा” हा मराठमोळा नाना आणि राजकुमार यांच्यामुळे चांगलाच गाजला. याती दोघांनीही आपापल्या स्टाईलने संवादाची चांगलीच फटकेबाजी केली.

    ८० च्या दशका नंतरच्या बहूतेक चित्रपटात त्यांच्या डायलॉगबाजीने त्यांच्यातल्या सहज सुंदर अभिनयावर मात केली. संवाद फेकीच्या नादात अभिनय लुप्त होत गेला. आयुष्यभरात ६०-६५ चित्रपटात काम करणारा हा अवलिया नट सर्वांच्या लक्षात राहिला तो संवाद फेकीमुळे आणि स्वत:च्या खाजगी आयुष्यात कुणालाच कधीच शिरकाव करू न देण्या बाबत. “दिल एक मंदीर” आणि “वक्त” या दोन चित्रपटाने त्यांना सह कलाकाराचा फिल्मफैअर पुरस्कार मिळवून दिला पण पुरस्कारात त्याना अजिबातच रस नव्हता आपल्या चित्रपट कारकिर्दीत त्यांनी कधीच आपल्या कुटूबांला कुठल्याही सिने पार्टीत् वा शुटींग वा प्रिमियरमध्ये येऊ दिले नाही. आयुष्यभर हा अभिनेता कायम चर्चेत राहिला. अत्यंत लॅव्हिश जगला. चित्रपट सुष्टीत त्यांच्या केसां बद्दल एक चर्चा नेहमी होत असे. त्याना खूप लवकर टक्कल पडले व त्यांनी विग वापरायला सुरूवात केली. हा विग त्यांनी आपल्या केसांच्या मूळ वळणा सारखा हुबेहुब बनवुन घेतला आणि वाढत्या वया सोबत विगचे केसही पांढुरके करून घेतले. स्वत:च्या प्रेमा पडलेला माणूस ही पण त्यांची एक ओळख होती त्यामुळे ही खरीखोटी चर्चा होत असावी. जेनीफर या अंग्लो-इंडियन एअर होस्टेसशी त्यांनी लग्न केले. नंतर जेनिफरने हिंदू धर्म स्विकारला व गायत्री हे नाव घेतले. पूरू, पाणिणी हे दोन मुलगे आणि वास्तविकता ही मुलगी..पूरू ने काही चित्रपटात काम केले पण तो टिकू शकला नाही. राजकुमारने आपल्या मुलाला शेवटची इच्छा सांगितली ती अशी- ‘मौत और जिंदगी इंसान का निजी मामला होता है। मेरी मौत के बारे में मेरे मित्र चेतन आनंद के अलावा और किसी को नही बताना। मेरा अंतिम संस्कार करने के बाद ही फिल्मउद्योग को सूचित करना।’ ‘जानी’ ही दोन अक्षरे राजकुमारची ओळख होती असे म्हटले तर वावगे होणार नाही. तर अशा या झक्की अभिनेत्याचे काही खास संवाद-
    # चिनायसेठ, जिनके घर शीशे के होते है…..,(वक्ता)आपके पांव देखे, बहुत हसीन हैं, इन्हेंग जमीन पर मत उतारिएगा मैले हो जाएंगे……. (पाकीजा)
    # हम तुम्हें मारेंगे और जरूर मारेंगे। लेकिन वह वक्त भी हमारा होगा। बंदूक भी हमारी होगी और गोली भी हमारी होगी…..। (सौदागर)
    # काश कि तुमने हमे आवाज दी होती तो हम मौत की नींद से भी उठकर चले आते….। ('सौदागर')
    # हम आंखो से सुरमा नहीं चुराते। हम आंखें ही चुरा लेते हैं……। (तिरंगा)
    # हम तुम्हें वह मौत देंगे जो न तो किसी कानून की किताब में लिखी होगी और न ही किसी मुजरिम ने सोची होगी…¬¬। (मरते दम तक)
    # हमारी जुबान भी हमारी गोली की तरह है। दुश्मन से सीधी बात करती है………..। ('तिरंगा')
    # दादा तो इस दुनिया में दो ही हैं। एक ऊपर वाला और दूसरा मैं………….।

    …….आज त्यांचा जन्म दिवस. मन:पूर्वक अभिवादन..

    -दासू भगत

    ( ८ ऑक्टोबर २०१८ )

      October 17, 2018