नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
गोष्ट अगदी खरीखुरी आहे. एका बाईला खूप प्रयत्नांनी बाळ होते. परंतु जन्मतःच त्याच्या हृदयामध्ये छिद्र असल्याचे डॉक्टरांना जाणवते. डॉक्टर त्या बाईला जेवढी मदत करता येईल तेवढी करतात. परंतु बाळाची तब्येत सुधारत नाही. डॉक्टर तिला मोठ्या हॉस्पिटलमध्ये बाळाला घेऊन जाण्याचा सल्ला देतात.
आई बाबांनी एकमेकांकडे बघत स्मित हास्य केलं … चेहऱ्यावर समाधान आणि दोघांच्याही डोळ्यात एकंच भाव … आपला चिंटू मोठा झाला …. “मार्कं आणि गुण” … या दोन्हीच्या परीक्षेत यशस्वी झाला …….
अनघा दिवाळी अंक २०१९ मध्ये संपादिका सौ. विद्या नाले यांनी लिहिलेला ‘रम्य ते बालपण’ या लेखमालिकेचा परिचय.
दोन शब्द...
अनघाने गेले ४० वर्षे दिवाळी अंक देताना मराठी रसिकांची आवड लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या ४० वर्षांत धार्मिक अंक, विविध विषयांवर बेतलेले अंक तर काही वर्षी एखादा विषय देऊन मान्यवरांचे लेख मागविले होते. हा ४१ वा अंक मराठी रसिकांना 'रम्य ते बालपण' हा विषय विविध क्षेत्रात आपला कर्तृत्वाचा ठसा उमटविलेल्या व्यक्तींकडून लेख मागितलेले आहेत. माझी खात्री आहे आपल्याला या प्रत्येकाचे अनुभव ऐकून बऱ्यापैकी करमणूक होईल.
आता ज्या २० व्यक्तींचे लेख या अंकात अंतर्भूत आहेत त्याविषयी थोडेसे. आपल्या स्वच्छ कारभाराचा ठसा परिवहन आयुक्त व अन्न व औषध आयुक्त म्हणून गाजविणारे श्री. महेश झगडे या सनदी अधिकाऱ्यांनी पूर्व आयुष्यातील जे अनुभव सांगितले आहेत त्यावरून त्यांची कडक शिस्तीचे अधिकारी याबरोबरच त्यांची संशोधनाची आवड देखील आपल्या लक्षात येईल. दुसरे सनदी अधिकारी श्री. चंद्रशेखर ओक यांनी मुंबई शहराचे जिल्हाधिकारी, तांत्रिक शिक्षण संचालनालयाचे संचालक ते महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्षपद भूषविले आहे. आपल्या मनमिळाऊ व शांत स्वभावाने शासकीय सेवेत जसा आपला ठसा उमटविला तसाच जनमानसातदेखील त्यांची प्रतिमा उंचावली. मोठमोठ्या पदांवर काम करताना त्यांनी डोक्यात हवा जाऊ दिली नाही. शिवाजी पार्कवर राहणाऱ्या मोहन वर्दे यांनी रिलायन्स कंपनीत सिनीअर व्हाईस प्रेसिडेंट म्हणून आपली जबाबदारी चोख बजावली आहे. त्यांनी आपल्या बालपणीच्या आठवणी सांगताना बालमोहन विद्यालय या ख्यातनाम शाळेचे नामकरण कसे झाले हे सांगितले आहे. डॉ. श्रीकांत तारे हे ख्यातनाम प्राध्यापक इंजिनीयरिंग महाविद्यालयात कार्यरत आहेत. त्यांचे बालपणीचे अनुभव आपल्या मनाला स्पर्शन जातात. डॉ. बाळासाहेब सूर्यवंशी यांचे नाशिकला भव्य हॉस्पिटल आहे. अत्यंत गरीबीच्या परिस्थितीतून आलेल्या बाळासाहेबांनी तरीदेखील एम.डी. ही पदवी आपल्या अंगभूत हुशारी व जिद्दीच्या जोरावर मिळविली. त्यांच्या लहानपणीच्या आठवणी या अतिशय हृद्य आहेत. जयवंत वाडकर हे हिंदी-मराठी नाट्य-सिनेपटलावर गाजलेले नट. यांच्या बालपणीच्या आठवणी रम्य वाटतात. तर प्रा. डॉ. यशवंतराव पाटील यांच्या भरजरी आयुष्याला बालपणीच्या त्यांच्या घरातील विरोधाची कशी झालर चिकटलेली होती व त्यातून त्यांनी आपले शिक्षण कसे पूर्ण केले ही कहाणी वाचनीय आहे. धनराज खरटमल या शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याने आपली लक्षात राहण्याजोगी कथा येथे मांडली आहे. डॉ. वसुधा सहस्रबुद्धे व स्वाती पाचपांडे या स्त्रीद्वयींनी आपला बालपणीचा ठेवा इथे उलगडून दाखविला आहे. डॉ. महेश केळुसकर या 'झिनझिनाट' कवीने आपले बालपण कसे मार खाण्यात गेले व ते कसे प्रगल्भतेकडे वळत गेले याची साद्यंत कहाणी येथे कथन केली आहे. चित्तरंजन भट हे गझलनवाज सुरेश भटांचे चिरंजीव. म्हणतात ना गवयाचे पोर सुरातच रडते. तद्वतच उभ्या महाराष्ट्राला मराठी गझलचे ज्यांनी वेड लावले, कित्येक होतकरू तरूणांना ज्यांनी गझलची बाराखडी शिकवून तयार केले त्यांच्या मुलाच्या रक्तात गझल नसती तरच नवल! आठवीत असताना चित्तरंजनने लिहिलेली पहिली गझल अनघाच्या दिवाळी अंकात झळकलेली आहे. त्यांचे अनुभव गझलेबद्दलचेच आहेत. नितीन निगडे हा तरूण चित्रकार, आपल्या अंगभूत गुणांनी त्यांच्या व्यवसायात मानाचे स्थान पटकावून वावरतो आहे. तर रवींद्र मांडे हे शासकीय अधिकारी आपल्या रसिंक मनोवृत्तीने चवीचे आयुष्य जगत आलेले आहेत. आपली रसिकता उत्कृष्ठ पुस्तकांचे वाचन व निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आनंद लुटणे यांनी त्यांचे जीवन समृद्ध केलेले आहे. सतीश भावसार या मुखपृष्ठ चित्रकाराने तर मराठी वाङ्मयातील रसिकांना वेडच लावले आहे. मराठी पुस्तकं प्रसिद्ध झाल्यावर मराठी वाचक पुस्तकाचे मुखपृष्ठ सतीश भावसार यांनी काढले आहे म्हटल्यावर खरेदी करतात ही त्यांच्या कलेची दाद मराठी वाचकांनी दिलेली आहे. त्यांचे बालपणाचे अनुभव सामान्यांहून वेगळेच आहेत. शिरीष जोशी हे मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेले असून बालपणी त्यांनी काय काय भोगले याची कहाणी मोठी उद्बोधक वाटते. किरण वालावलकर यांनी कष्टाची परिसीमा गाठून व्यवसायात अढळ स्थान प्राप्त केले आहे. त्यांच्या अनुभवाने रसिकांचे नक्कीच रंजन होईल. मुरलीधर नाले शासकीय अधिकारी होते परंतु खानदेशातील छोट्या गावात त्यांचे बालपण कसे गेले व प्राप्त परिस्थितीत त्यांनी अनुभवलेले ते मंतरलेले क्षण कसे मोरपिसासारखे त्यांनी मनाच्या खोल गाभाऱ्यात जपून ठेवले हे खुमासदारपणे त्यांनी चितारलेले आहे. यजुवेंद्र महाजन या दिलखुलास व्यक्तिमत्त्वाने प्राध्यापिकी न करता समाजातील उपेक्षित वर्गासाठी जे काम चालू केले आहे ते अमूल्य आहे. सुरेश पाटील यांनी आईवडिलांच्या संस्कारांमुळे त्यांच्यावर गुदरलेला भयंकर प्रसंग कसा झेलला व त्यातून ते कसे बाहेर आले याची कहाणी सांगितली आहे.
अशा या विविध क्षेत्रातील व्यक्तींचं बालपणीच्या एकत्रित कथा येथे आपल्याला देताना मला आनंद होत आहे. या सर्व लेखकांचे, अंकाची जुळवणी करणारे आमचे जुने भावेसर, अंकाची मांडणी व मुखपृष्ठ करणारे रघुनाथ गुराम तसेच प्रिंटर व बाईंडर यांचे आभार. तसेच आमचे जाहिरातदार व रसिकांचे आभार मानून आपल्या सर्वांची दिवाळी आनंदाची जावो, अशी इच्छा प्रकट करते.
- सौ. विद्या नाले, (संपादिका)
(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१९ मधून)
एक अत्यंत नितांत सुंदर भावना शब्दबद्ध करणं हे खूपच अवघड काम पण पाडगावकरांनी ते लीलया पार पाडले. खळेंसारख्या श्रेष्ठ संगीतकाराने आपल्या चालीने आणि संगीताने त्यात आणखी गहिरे रंग भरले. आणि लताने ती आर्तता, लीनता, अत्यंत संयमित, संतुलित आणि शांत स्निग्ध स्वरात परीपक्वपणे मांडली. या गाण्यातील शब्दाशब्दांचे विवेचन आमच्या मैत्रिणीने तितक्याच तोलामोलाने सिद्ध केले -अभिनिवेश न आणता !
‘मी शेजारच्याच गल्लीतला ताई हॉल साखरपुड्यासाठी बुक करून आलोय. शंभर माणसांची खानपान व्यवस्थाही करुन आलोय. संध्याकाळी पाच पासून हॉल आपल्याला मिळेल. आपण फक्त जावईबापूंना घेऊन तिथं जायचं, बाकीचं सगळं आमचे बाबूकाका आणि नवी विटी नवा दांडू पक्षाची महिला ब्रिगेड पाहून घेईल.’
‘काय सांगता बाळाभाऊ? अहो हा नसता उपद्व्याप सांगितला कोणी तुम्हाला? आम्ही घरगुतीच करणार आहोत सांगितले ना तुम्हाला?’
‘हे पहा आई, आता बोलण्यात वेळ नाही घालवायचा. तायडी ताईंचा साखरपुडा दणक्यात करा असं कुमारसाहेब म्हणाले ना? मग दणक्यातच होणार! तुम्ही फक्त त्या पन्नास साठ सीटची बस सांगून ठेवली आहे. सगळ्यांना तयार रहायला सांगा.’ ‘काय? पन्नास मतांची जबाबदारी सांभाळा. मी दुपारी चार वाजता एक पन्नास साठ सीटची बस? ती कशाला? अहो इथं पलीकडच्या गल्लीतच तर आहे मतदान केंद्र, त्याला बस काय करायची?’
भारतीय संगीत किती श्रेष्ठ आहे हे असे एखादे गाणे ऐकले कि जाणवते . आपण सध्या करत असलेले दुर्लक्ष , हे देवदुर्लभ गान /श्रावण वैभव गिळंकृत करेल कि काय याची भीती वाटतेय !(आणि तसे झालेतर आपण कर्म दरिद्री ठरू !) आणि त्याच बरोबर कसल्यातरी असंबद्ध ,अभद्र गाण्याना व्वा, व्वा म्हणून टाळ्या वाजवतो याची लाज पण वाटते !
“काका अंधश्रद्धा निमूर्लन विशेषांसाठी, अंधश्रद्धा निमूर्लनासंबंधी लवकरच सरकारच्या मान्यतेच्या प्रतीक्षेत असणाऱ्या कायद्याबाबत तुम्ही कायदेमंत्री चिंधड्यांची मुलाखत घेणार होता, त्याचे काय झाले?”
रोजची पहाट या प्रख्यात दैनिकाचे संपादक, विशेषांक सम्राट सूर्याजी रविसांडे यांनी त्यांचे मुख्य मुलाखतकार काका सरधोपट यांना कार्यालयात आल्या आल्या प्रश्न विचारला.
संध्याकाळची वेळ, बाहेर अंधारून आलेले. जोरात पाऊस पडेल अशी हवा. अशावेळी मला काम करायला खूप आवडते. उद्या कॉलेजमध्ये द्यायच्या लेक्चरची तयार करत होतो.
मराठी माणसाने अशा कितीही शहरांमधे झेंडे गाडले असले तरी मराठी माणसासाठी पुणे म्हणजे पुणेच. त्या एम एच बारा अशा पाट्या दिसल्या की मराठी माणसाचा उर कसा भरुन येतो. मराठी माणूस हा कधीतरी पुण्यात येउन गेलेला असतो किंवा त्याचे कुणीतरी पुण्यात येउन गेलेले असते. पुण्यात आला म्हणजे मित्रांमधे छापायला एखादा अनुभव हा आलाच.
नेहमीच्या कोपर्यावर मी मोटार थांबवली. माझे ऑफिसातले मित्र आंत चढले. मोटार ऑफिसच्या दिशेनं धावूं लागली. ‘‘आज साठे दिसत नाहीं’’, मी म्हणालो. ‘‘तुम्हाला माहीत नाहीं कां पराडकर ? साठेला मुलगी झाली.’’ पाटीलनं सांगितलं, ‘‘हो कां ? अरे वा !’’, मी. साठे हा आमच्या ऑफिसातला एक तरुण ऑफिसर. त्याच्या खेळकर स्वभावामुळे तो सर्वांनाच आवडत असे. दीडएक वर्षांपूर्वी त्याचं लग्न झालं होतं. आतां मुलगी झाली होती. बेटा अगदी खुशीत असणार ! साठे भेटला की त्याचं अभिनंदन करायचं मी ठरवलं.
दुसर्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे मित्र कारमध्ये चढले. आज साठेही होता. ‘‘साठे, अभिनंदन !’’, मी. ‘‘थॅंक्यू’’ , साठे. ‘‘बर्फी हवी बरं का साठे’’, मी. ‘‘छे छे, बर्फीनं भागणार नाही, पार्टीच हवी’’, काळेनं फर्माईश केली. ‘‘देऊं ना’’, साठे म्हणाला. पण त्याच्या बोलण्यात उत्साह दिसत नव्हता.
कार पुढे धावत होती. संभाषणाला खीळ पडली होती. नेहमीचा खेळकर साठे आज इतका गप्प गप्प कां? मी विचार करत होतो. अखेर न राहवून मी विचारले, ‘‘काय साठे, आज अगदी गप्प आहेस ? बाळ बाळंतीण ठीक आहेत ना ?’’. साठेच्या आधी पाटीलनंच उत्तर दिलं, ‘‘त्याचं काय आहे, मुलगी झाली म्हणून साठे नाराज झालाय्’’. ‘‘खरं का रे’’, मी. साठे गप्पच. त्याला समजवत मी म्हणालो, ‘‘अरे, नाराज कशाला व्हायचं? उलट खूषच व्हायला हवं. म्हणच आहे, पहिली बेटी धनाची पेटी’’. ‘‘हो धनाची पेटी ! मला आत्तांपासूनच धन जमवायच्या मागे लागायला हवं, म्हणजे मुलीच्या लग्नासाठी धनाची पेटी तयार करता येईल’’, साठे उद्गारला. ‘‘अरे साठे, मूल होणं ही किती आनंदाची गोष्ट आहे ! त्यातून तुझं तर पहिलं मूल ! मुलगा काय, मुलगी काय, सारखंच’’, काळे म्हणाला. त्याला लग्नानंतर पांच वर्षांनी मूल झालं होतं. पण साठेला काळेचं सांगणं पटलं नाही. ‘‘अरे बाबा, एवढं सोपं नाहीं तें. आज मुलीच्या लग्नाला चार-पांच लाख खर्च येतो. पंचवीस वर्षांनी पंधरा-वीस लाख तरी लागतील. आपण मध्यमवर्गीय माणसं, आपला पगार तो कितीसा, अन् त्यातून शिल्लक किती पडणार ? महागाई तर दिवसेदिवस वाढतेच आहे ! मुलीला वाढवायचं, शिकवायचं, ग्रॅज्युएट-पीजी करायचं. त्यातून तिने इंजिनियरिंग किंवा मेडिकलला जायचं म्हटलं तर झालंच ! एवढं सगळं करून इतके लाख शिल्लक टाकायचे कसे अन मुलीचं लग्न करायचं कसं ?’’, साठे व्यथित झाला होता. जणूं मुलीचं लग्न उद्यावर येऊन ठेपलं होतं !
मी वेगळा मुद्दा मांडत साठेची समजूत काढू लागलो, ‘‘पण मुलगा होणं किंवा मुलगी होणं आपल्या हातात थोडंच असतं ? मग मुलगाच व्हावा अशी अपेक्षा ठेवणं योग्य आहे कां ?’’. ‘‘पराडकर, तुमचं काय जातं असं म्हणायला?’’, साठे चिडून बोलला, ‘‘तुम्हाला दोन्ही मुलगेच आहेत. जावें त्याच्या वंशा तेव्हां कळे !’’.
खरं म्हणजे मला साठेशी खूप बोलायचं होतं. मुलगा किंवा मुलगी असा प्रेफरन्स मला नव्हता, हे त्याला सांगायचं होतं. हल्ली मुली मुलांच्या बरोबरीने चमकतात, स्त्रिया पुरुषांपेक्षा कुठल्याही बाबतीत कमी नाहीत, हेही सांगायचं होतं. ह्या विषयाचे वेगवेगळे पैलू आहेत, त्यांची चर्चा करायची होती. पण साठेचा मूड् बघून मी विषय वाढवला नाही. बाकीची मंडळीही उरलेला रस्ता गप्पच राहिली.
संध्याकाळी साठे ओव्हरटाईमला थांबल्यामुळे आमच्याबरोबर नव्हता. साहजिकपणें पुन्हां साठेचाच विषय सुरुं झाला. ‘‘साठेनं मुलगी झाल्याचं फारच मनाला लावून घेतलं आहे’’, मी म्हणालो , ‘‘खरं म्हणजे मुलगा किंवा मुलगी होणं किंवा न होणं हें आपल्या हातात नसतं’’. ‘‘खरं आहे, पण साठेसारखे लोक बरेच आहेत, पराडकर’’ , इति पाटील.
पाटील सांगूं लागला, म्हणाला, ‘‘माझा एक परिचित आहे, लिमये. त्याला दोन मुली आहेत. बायकोची प्रकृती यथातथाच आहे. तिसरं मूल नको असा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. पण ह्या सद्.गृहस्थाला मुलगा हवाच होता, म्हणायचा, ‘मुलगा नसला तर मला सद्गती मिळणार नाहीं’. जग एकविसाव्या शतकात पोंचलंय आणि याचे असे जुनाट विचार ! बायकोला तिसर्यांदा दिवस राहिले. ह्याला कांही चैन नाहीं, मुलगा होईल की मुलगी ? गर्भतपासणी करून घेतली”. ”अरे, पण तशी चाचणी तर बेकायदेशीर आहे”. ”हो, पण तरीही घेतली करून. मुलगी आहे असा निर्णय समजला. झालं. हा पठ्ठ्या बायकोच्या मागे लागला की गर्भपात करून घे. दोनचार दिवस तिनं तग धरला. पण हा कांही पाठ सोडेना. शेवटी ती बिचारी नाइलाजानें तयार झाली. अन् सांगायची गोष्ट म्हणजे गर्भपाताच्या वेळी ती बाई रक्तस्त्रावाने जवळजवळ मेलीच होती, केवळ सुदैव म्हणून वाचली ! त्या वेळी तिची मोठी मुलगी होती चार वर्षांची अन धाकटी दोन वर्षांची. आतां बोला ! ”. ”बिचारी बाई खरोखरच जर मेली असती तर त्या लहान जिवांचे काय हाल झाले असते !’’, काळे त्वेषानं उद्गारला. ‘‘खरी गंमत पुढेच आहे’’, पाटील म्हणाला, ‘‘थोड्या दिवसांनी बाईला पुन्हां दिवस राहिले, अन या वेळी मात्र तिला मुलगाच झाला’’. ‘‘त्या लिमयेला अगदी धन्य धन्य झालं असेल!’’ मी म्हणालो. ‘‘हो ना ! त्याला आता आभाळ ठेंगणं झालंय. आतां स्वर्गात जायची सोय झाली ना !’’ पाटीलची प्रतिक्रिया.
”पण साठे काय किंवा लिमये काय, यांच्या या अवस्थेला आपली समाजरचनाच जबाबदार आहे”, काळे म्हणाला, ”अगदी माझ्या घरातलंच उदाहरण सांगतो. परवाचीच गोष्ट. माझी बायको नलू सांगत होती – ‘दुपारी मी आणि शेजारची सुमा बोलत उभ्या होतो. पलिकडच्या मालतीकाकू त्यांच्या पुष्पाच्या बाळाला घेऊन जात होत्या. त्या आमच्याशी बोलायला थांबल्या. मी कौतुकानं म्हणाले, कित्ती छान जावळ आहे बाळाचं. तर म्हणतात कशा, ‘असं बोलूं नये हो. बाळाला दृष्ट लागेल’. मला अस्सा राग आला. नंतर मी सुमाला म्हटलं सुद्धा, आमची कशी दृष्ट लागेल ? आम्हाला मुलं नाहींत की काय ?’. नलूचं बोलणं ऐकून मी थक्कच झालो . म्हटलं , ‘मालतीकाकूंचं जाऊं दे ; अल्पशिक्षित म्हातारी ती. पण तूं ! तूं तर कॉलेजात फिजिक्सची लेक्चरर आहेस ! दृष्ट लागणं अन त्यातूनही निपुत्रिकेची दृष्ट लागणं असल्या अंधश्रद्धांवर तुझ्यासारखी बाई विश्वास ठेवते म्हणजे मात्र कमाल आहे !’ . ’माझा विश्वास आहे की नाहीं ते जाऊं द्या’, नलू म्हणाली, ‘जगाचा तर आहे ना ! आपला विश्वास असो वा नसो, समाज आपल्याला अशा गोष्टींमध्ये जखडून ठेवतो. इतकी वर्ष आपल्याला मूल नव्हतं. तेव्हां याच बायकांच्या बोचर्या नजरा मला घायाळ करत, त्यांची कुत्सित बोलणी ऐकवत नसत. आतां देवानं मला सोन्यासारखी मुलगी दिली आहे. आतां मी दुसर्यांची बोलणी कां म्हणून ऐकून घ्यावी ?’ या अजब तर्कानं मी सर्द झालो”, काळेंनं गोष्ट पूर्ण केली. मग काळेनं विचार मांडला, ”सांगायचा मुद्दा असा की, समाजाची रचना, समाजाच्या रूढी बदलायला हव्यात. तरच साठे आणि लिमयेसारखे लोक मुलगी झाली म्हणून दुःखी होणार नाहींत”.
*
पाटील अन् काळे नेहमीच्या कोपर्यावर उतरून गेले. कार घराकडे धावत होती. कारबरोबर माझे विचारही धावत होते. कधी बदलणार हा समाज ? दुष्ट रुढी कधी नाहींशा होतील ? कधी स्त्रियांना समाजात बरोबरीचं, मानाचं, स्थान मिळेल ? आपल्यासारखी माणसं त्यासाठी काय काम करूं शकतील? एक ना दोन, अनेक विचार.
विचारांच्या नादात घर केव्हां आलं ते मला कळलंच नाहीं, कार पार्क करतां करतां मी ठरवलं की गेल्या गेल्या लगेचच स्त्रीस्वातंत्र्य-पुरस्कर्त्या आपल्या बायकोला आजची सर्व चर्चा सांगायची.
घरात पाऊल टाकतांच दिसलं की माझी चुलतबहीण रजनी आलेली होती अन् ‘मुलगा व्हावा’ म्हणून कुठलसं व्रत धरल्याचं ती माझ्या बायकोला सांगत होती. मी ओठावरचे शब्द तात्पुरते गिळून टाकले.
+ + +
( Note – This story is based on a real-life experience. The Author has taken some literary liberties. Name of characters have been changed ).
_ _ _
[ पूर्वप्रसिद्धी : ‘कीर्तिस्तंभ’ पाक्षिक, वडोदरा ( बडोदा) , आवृत्ती दि. ०१.०९.१९९६.
कांहीं बदल : १४ फेब्रु. २०१८ ]
= = =
- सुभाष स. नाईक Subhash S. Naik
मुंबई.
M - 9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com , www.snehalaatnaik.com
Copyright © 2025 | Marathisrushti