(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

  • आमच्या गावान

    वयाच्या आठव्या वर्षापर्यंत माझे बालपण आमच्या गावातच गेले. त्यावेळेस चार आणे आणि आठ आण्यासह जस्ताचे दहा आणि वीस पैसे पण चालायचे. गावात असलेल्या दुकानात तेव्हा चार आण्यात काचेच्या बरणीत ठेवलेली गोळ्या बिस्कीट मिळायची.

  • भक्ती करावी अंतरंगी (सुमंत उवाच – ६६)

    सुमंत जयंत परचुरे. 

    मी किती देवाचं करतो, मला किती माहित्ये, मी केवढे श्लोक पाठ केले, माझं ज्ञान किती अगाध आहे हे दाखवण्या पेक्षा ते जर आचरणी आणले तर? चमत्कारच होईल.

  • बायका आणि चंद्रावरच्या खड्ड्यांचं रहस्य..

    बायका कुणाला, कधी, कुठे आणि काय विचारतील आणि कुठून कुठे पाठवतील याचा थांग ब्रम्हांड निर्मात्या ब्रम्हदेवालाही लागणार नाही, हे मात्र खरं. हे सर्व नाट्य दादर स्टेशनवरच्या प्लॅटफाॅर्म क्रमांक चारवर अवघ्या ४५ सेकंदात घडलं. ४५ सेकंद अवधी मुंबई बाहेरची जनता जमेसही धरत नसेल, मुंबईत मात्र या वेळेत चंद्र ते व्हाया पृथ्वी पुन्हा चंद्रावरचा आणखी एक खड्डा एवढा प्रवास सहजपणे होतो..

  • तू महाभारती थंड झुळुक वाऱ्याची

    गर्दीचा महासागर उसळला होता. लाटांवर लाटा येऊन आदळत होत्या. गर्दी बेभान होती. गर्दी दिशाहीन होत होती. गर्दी पुढं सरकण्याचा प्रयत्न करीत होती. पण कुणाचंही पाऊल पुढं पडत नव्हतं.

  • स्वप्न आणि सत्य

    स्वप्न आणि सत्य यांच्यात एकच 'श्रेष्ठ कोण?' यावरून भांडण सुरू झाले.

    'स्वप्न' म्हणाले, मीच श्रेष्ठ. कारण कोणताही माणूस आधी स्वप्ने पाहातो आणि नंतर ते सत्यात उतरविण्यासाठी प्रयत्न करतो. त्यामुळे मीच तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे.

    त्यावर ' सत्य' म्हणाले, अनेकवेळा सत्य हे कल्पनेपेक्षाही ( म्हणजेच स्वनापेक्षाही) अतिशय वास्तववादी असते. त्यामुळे मीच तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे.

    दोघांचे भांडण विकोपाला गेले. मात्र निर्णय काहीच होईना. म्हणून दोघेही जगन्नियंता असलेल्या परमेश्वराकडे गेले. परमेश्वराने दोघांचीही बाजू ऐकून घेतली व तो म्हणाला की, मला तुमच्या दोघांचीही परीक्षा घ्यायची आहे. जमिनीवर उभे राहून ज्या कोणाचे हात आभाळाला टेकतील तोच श्रेष्ठ ठरेल.

    त्यामुळे दोघेही परीक्षेला तयार झाले.

    प्रारंभी सत्याने प्रयत्न केला. त्याने जमिनीवर उभे राहून आभाळाला हात लावायचा प्रयत्न केला. मात्र कितीही प्रयत्न केले तरी त्याचे हात आभाळाला काही केल्या टेकेनात.

    आता स्वप्नाची पाळी आली. त्याचे हात एकाच मिनिटात आभाळाला टेकले. मात्र त्याचे खालचे पाय मात्र जमिनीवर नव्हते. स्वप्न तसेच अधांतरी लोंबकळत राहिले.

    थोडक्यात या परीक्षेत दोघेही नापास झाले. त्यावर परमेश्वर त्यांना म्हणाला, तुमच्यात श्रेष्ठ कोण व कनिष्ठ कोण, याचे उत्तर देणे अवघड आहे. कारण तुम्ही दोघेही परस्परांना पूरक आहात त्यामुळे 'श्रेष्ठ कोण' असा वाद न घालता एकमेकांच्या संगतीने तुम्ही प्रवास केलात तर त्यात दोघांचेही हित आहे.

    स्वप्न आणि सत्य या दोघांनाही हे उत्तर पटले व त्यांनी पुन्हा कधी वाद निर्माण केला नाही.

  • केले नाही एकही पाप आता होतो पश्चाताप

    प्रदीप निफाडकरांची गझल

  • ऑपरेशन थियेटरमधला पहिला दिवस

    ऑपरेशन थियेटरमधला १ ला दिवस मेडिकल कॉलेजच्या आगदी सुरवातीचे दिवस आठवतात. १९६० सालचे. त्यावेळी M.B.B.S. पांच वर्षाचा कोर्स होता. पहिले दोन वर्षे …..

  • कैलास दर्शन – भाग 3

    रात्रीच्या गप्पांमध्ये खडसे साहेबांनी सांगितले होते की या विश्रामगृहाच्या मागच्या बाजूने एक छोटीशी दीड दोन फूट रुंदीची कॉक्रीटची पाय वाट आहे ती थेट वेरुळाच्या कैलास मंदिराच्या माथ्याच्या उंचीपर्यंत जाते आणि तिथून जगातील एकमेव असे ते डोंगरातून खोदून काढलेले परंतु एक स्वतंत्र इमारत आहे असे वाटणारे मंदीर फार छान दिसते.

  • दासी मंथरेमधला विकल्प

    रामायण अप्रतीम कथानक आहे. आजतागायत ते अजरामर होऊन राहीले. काव्य असो वा इतिहास. प्रसंगाची गोडी केवळ अविट आहे. घडणाऱ्या घटनामध्यें दैवी चमत्कार ह्या बाबींचा शिरकाव करुन मनोरंजनाची सिमा खूप ऊंचावली गेली.

  • साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग १२)

    यातूनच साहित्य , कला संस्कृती यांची जवळीकता , अभिरूची जन्माला आली .. त्यात आणखी जी भर पडली ती माझ्या मुद्रणाच्याव्यवसायामुळे कारण प्रत्यक्षात अनेक साहित्यिक भेटण्याची त्यांच्या सह्या घेण्याची संधी मिळाली .. तेंव्हा पासुनच ही साहित्याभिरूचीची मशागत ही माझ्या पौगण्डावस्थेपासुुनच सुरु झाली हे स्व. कवयित्री शांताबाईं शेळके यांचे वाक्य आज सार्थ वाटते .!… जीवनाला सर्वार्थानं पोषक असा मार्गदर्शक सहवास योगायोगाने लाभला …हेच परमभाग्य ! घरातील वातावरण देखील याला कारणीभूत होते ..!!!!