नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
साधे -सुधे पोस्त कार्ड , आंतरदेशीय-पत्र आणि पाकिटे ” यातून एकमेकांना ख्याली-खुशाली “कळवली जात असे. घरातील वडीलधार्या व्यक्तींनी पत्रातील मजकूर वाचून सगळं खुशाल आहे बरं का ! असे भरल्या आवाजात सांगितले की ..भरलेले डोळे पदराने कोरडे करून मोठ्या समाधानाने ..घरातली बाई-माणसं पुन्हा कामाला लागत .
शाळेजवळच्या एका कोपर्यावर विक्रेत्यांची गर्दी असे. त्यात लहान मुलांना मधल्या सुटीत खाता येतील, अशा गोष्टी विकणारे बरेच असत. त्यात एकविक्रेता रोज चणे-फुटाणे व इतर काही पदार्थ घेऊन बसत असे. मधल्या सुटीत शाळेतील मुले आली की त्यांना तो पैसे घेऊन चणे-फुटाणे देत असे. मात्र हा विक्रेता लबाड होता. मुलांच्या निरागसतेचा फायदा घेऊन तो त्याच्याजवळच्या छोट्या मापाने चणे-फुटाणे देताना नेहमीच फसवणूक करीत असे. छोटे माप पूर्ण भरल्यासारखे तो दाखवायचा, मात्र देताना त्या मापातील बरेचसे चणे-फुटाणे आपल्या टोपलीत पुन्हा सांडायचा. त्यामुळे पैसे देऊनही कमीत कमी चणे-फुटाणे मुलांच्या वाट्याला यायचे. कोण्या मुलाने तक्रार केली की तो त्याला म्हणायचा,'अरे, तुझा हात लहान आहे. मग त्या हातात मावतील एवढेच चणे-फुटाणे घेतलेले बरे. नाही तर खाली रस्त्यावर सांडून ते वाया जाणार नाहीत का?'
त्याच्या या युक्तिवादावर मुले फारशी बोलत नसत. छोट्या गोपाळला त्या विक्रेत्याची ही लबाडी लक्षात आली होती. त्याने एकदा त्याची खोड जिरवायची ठरविले. एक त्याने दहा-दहा पैशाची सुटी नाणी कोठून तरी गोळा केली व मधल्या सुटीत त्या विक्रेत्याकडे जाऊन दोन रुपयाचे चणे-
फुटाणे मागितले. विक्रेत्याने नेहमीप्रमाणे त्याला कमीत कमी चणे-फुटाणे दिले. गोपाळने दोन रुपयाचे एवढेच चणे-फुटाणे कसे? असे विचारल्यावर त्याने नेहमीप्रमाणेच, ' तुझ्या छोट्या हातात जास्त मावणार नाहीत ', असे उत्तर दिले. त्यानंतर त्याला पैसे देताना गोपाळने दोन रुपयाऐवजी एका रुपयाचीच दहा पैशाची सर्व सुटी नाणी त्याच्या हातावर ठेवली. विक्रेता ते मोजेपर्यंत गोपाळ शाळेकडे निघाला होता.
ती दहा पैशाची सुटी नाणी म्हणजे एकच रुपया आहे असे विक्रेत्याच्या लक्षात आल्यावर तो गोपाळकडे पाहून ओरडला, ' अरे तू मला पैसे कमी दिले आहेस. ' त्यावर गोपाळ ओरडूनच त्याला म्हणाला ' अरे, तुला पैसे मोजायला अधिक त्रास नको म्हणूनच तुला मी कमी पैसे दिले.
गोपाळचे हे 'जशास तसे' उत्तर ऐकून विक्रेता गप्प बसला. त्याची खोड जिरली होती.
कोरोनानी अनेक जवळचे. नातेवाईक. मित्र मैत्रिणी. सहकारी गमावले आहेत. आता त्यांचे नाव व फोन नंबर ठेवण्यात काही अर्थ नाही म्हणून अगदी जड अंतःकरणाने ते डिलीट केले आहेत मोबाईलवरचे डिलीट करता येईल पण मनातले कसे डिलीट करणार? तुम्हाला काय वाटतं.
एका ब्राम्हणाने पत्नीला विचारले...
" पाणी छान आणि थंड आहे..
आपल्या घरात फ्रिज नाही, कुठुन आणलेस..?"
पत्नी म्हणाली - "शेजारच्या कुंभारा कडुन.!"
ब्राम्हण - काय..? त्या शुद्राचे पाणी मला पाजलेस,
तुला लाज वाटत नाही...? आपण ब्राम्हण आहोत...
आपल्याला शुद्राचे काही चालत नाही..?"
पत्नी म्हणाली - ( घाबरली व म्हणाली )" मला माफ करा, या पुढे अशी चुक होणार नाही....
दुस-या दिवशी...
ब्राम्हण म्हणाला ; "अग... जेवायला वाढ..!"
पत्नी म्हणाली - काही नाही..!"
ब्राम्हण म्हणाला - "काय...? पोळी केली नाही..?"
पत्नी म्हणाली - " नाही....! कारण...
तवा व चुल शुद्र लोहाराने व चुल कुंभाराने बनवलेली असल्याने मी त्या वस्तू फेकून दिल्या..!"
ब्राम्हण म्हणाला- "वेडी आहेस काय..? बरं दुध आण..!"
पत्नी म्हणाली - "मी दुध फेकुन दिले कारण....
ते शुद्र गवळ्याने दिले.
ब्राम्हण म्हणाला- मी म्हटले 'उद्या पासुन दुध आणू नकाे'
आम्हांला शुद्रांचे काही चालत नाही..!"
ब्राम्हण म्हणाला- (किंचाळला..) " काय...?"
ब्राम्हण म्हणाला- "बरं..बर" .. झोपायला खाट लाव..!"
पत्नी म्हणाली - "मी खाट तोडून टाकली व लाकडे जाळुन टाकली. मेलं शुद्राचं काहीच नको आपल्याला..!!"
ब्राम्हणाने डोक्याला हात लावला..
ब्राम्हण म्हणाला :- "अरे... ईथली धान्याची पोती कुठ आहेत..?''
पत्नी म्हणाली -"मी धान्य लोकांना वाटून टाकले कारण...ते आपण कुणबी शुद्रां कडुन घेतले होते. नकोच ते आपल्याला ..!"
ब्राम्हणाला भाेवळ आली व म्हणाला, " माझे आई... घरात काहीच दिसत नाही. वस्तू कुठं गेल्या..?"
ब्राम्हणाची पत्नी म्हणाली - "नाथ... घरातली प्रत्येक वस्तू कुण्यातरी शुद्रांनेच बनवली आहे.त्यामुळे मी त्या तोडून- मोडून जाळून टाकल्या..!" ब्राम्हण मोठयाने ओरडला म्हणाला," अरे आपण पार भिकारी झालो...एवढे घरंच काय ते उरले आता...!"
पत्नी म्हणाली," नाथ... चिंता करू नका, मी आपल्या आज्ञे पुढे नाही, मी हे घर दान करून टाकले आहे.
कारण... हे घर त्या शुद्र गवंडी वडार व शुद्र मजुरांनी बांधले होते, नकोच बाई आपल्याला शुद्राचे."
"नाथ.... चला आपण जंगलात जावू
कारण...इथे सर्व शुद्र आहेत, भिक्षा काय शुद्राला मागायची..? नको नको..!"
ब्राम्हण चक्कर येवुन खाली पडला, "हे देवा...
मी तर पार शुद्रापेक्षा अतिशुद्र आहे. माझ्याकडे कांहीच नाही, मीच खरा शुद्र आहे, माझे पानही शुद्रा शिवाय हालत नाही...
देवा...!! खरे उच्च शेतकरी...
सर्व अठरा पगडं जातीच महान व वंदनीय आहेत,
मी मात्र काहीच कामाचा नाही..!"
गुलज़ार महोदय “खामोशी” त म्हणून गेले- ” प्यार को प्यार ही रहने दो कोई नाम न दो I” लताने आपल्या तलम आवाजात त्याचं भरजरी सोनं केलं. पण हे आख्ख गाणं चक्क एक नितांतसुंदर, हळुवार चित्रपट बनून पडद्यावर येईल हे त्याकाळी गुलज़ार /लता /वहिदा /हेमंतकुमार यांच्या दूरवरच्या स्वप्नातही आलं नसावं.
दिवाळी जवळ आली होती. शकुंतला हॅास्पिटलमधील नित्याची कामे पटापट करत होती. संवयीने बिनचूक करत होती पण आज तिच्या मनांत मुलाची काळजी होती. मुलगा राजस आता नऊ वर्षांचा झाला होता. घरी एकटाच होता. वर्षांपूर्वी आजी गेली आणि तो खरंच एकटा पडला. आजी गेली तेव्हां बाबा येऊन लगेच परत गेले. जास्त रजा नव्हती त्यांना. आता परत कधी येतील, कुणास ठाऊक? सैनिकाचा काय भरोसा? त्याचे सुखरूप येणे हेच महत्वाचे! यंदा दिवाळीला फक्त दोघंच असणार होती घरी, ती आणि राजस. दिवाळीची कांहीच तयारी तिला करतां आली नव्हती. बऱ्याच सहकारी नर्सेस रजेवर होत्या. तिला रजा तर मिळत नव्हतीच पण अधून मधून डबल ड्यूटी करावी लागत होती. दोन दिवसांवर दिवाळी आली होती. विशेष खरेदी तर सोडाच पण निदान फराळासाठी लागणारं सामान आणि राजस साठी थोडे कपडे घ्यायला हवे होते ना! ह्यांतल कांही तिला करतां येत नव्हतं. तिला मदत करायलाही कुणी नव्हतं. राजस घरी एकटाच असायचा. शेजारी चांगले होते पण ते सतत कसे पहाणार. कितीही चांगल्या ठीकाणी राजस रहायला तयार नव्हता. तो आता पाळणाघरांत रहायला काय लहान होता काय?
श्रावण म्हणजे माहेर ! घरी जाऊन सण साजरे केल्याशिवाय माहेरवाशीण कधी तृप्त होत नाही. खऱ्याखुऱ्या झाडांना बांधलेल्या झोपाळ्यांवर झुलल्याशिवाय तिच्यासाठी श्रावणाची सांगता होत नाही. त्याकाळी श्रावण हा “इव्हेंट “झाला नव्हता.
नऊ नंबर मशिन ठिक करुन वेद ड्रॉइंग करण्याच्या लाकडी चौकटीजवळ उभा होता. त्याची नजर सभोवार दहाही मशिन्सवर फिरत होती. व्हिवर तत्परतेने तुटलेले धागे जोडत होते. धागे जोडताना क्षणभर थांबलेल्या मशिन्स, धाडधाड आवाज करीत पुन्हा चालू होत होत्या.
भारत अमेरिकेची तुलना होऊ शकणार नाही. तो देश दोनशे वर्षा पासून स्वतंत्र आहे, आपण त्यामानाने खूप उशिरा स्वतंत्र झालोय. चांगल्या गोष्टी आपण आत्मसात करत गेलो, तर कोणत्याही प्रगत देशा पेक्षा आपण मागे रहाणार नाही. अन एक दिवस, ‘सारे जहासे अच्छा हिंदूस्ता हमारा!’ आपणच अभिमानाने म्हणू. शेवटी एकच सांगावस वाटत, स्वर्ग काय अन अमेरिका काय? या गोष्टी फक्त पहायच्या असतात, राहायच्या नसतात. शेवटी ‘आपला गाव बरा!’ हेच सत्य असत!
सकाळी मोकळ्या रस्त्यावरून चालताना विजय कविताला म्हणतो,’ मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचे बोलायचे आहे ! ‘ ते ऐकून दोघेही एका झाडाखाली थांबतात…
Copyright © 2025 | Marathisrushti