(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

  • मुखी केव्हा काय घ्यावे (सुमंत उवाच – ३७)

    सुमंत जयंत परचुरे. 

    मुळात आपण हे कोणाविषयी बोलत असताना आपण आपल्या स्वभावातले दुर्गुण उघडे करतोय हेच आपल्याला समजत नाही.

  • आंबा

    त्या वेळी जागतिकीकरणाचे वारे एवढ्या वेगाने वाहत नव्हते. भारतीय अर्थव्यवस्थाही खुली व्हायची होती. मी जपानला गेलेलो होतो. तिथलं जीवन, सुबत्ता, सांस्कृतिक आणि सामाजिक बदल पाहत होतो. अनेकांना भेटत होतो. जपानी माणसांची घरं लहान; पण ते अशी सजवितात की ती मोठी वाटावीत. अर्थात, तिथं पाहुण्यांना घरी बोलावून मेजवानी करावी, अशी पद्धत नाही. स्वतचं खासगीपण अत्यंत निष्ठेनं जपणारी ही माणसं. जपानच्या या दौर्‍यात घरचं जेवण मिळायला हवं असं वाटत होतं अन् त्यासाठी आम्ही गळ घालीत होतो ती आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी नेमलेल्या मुलीला. खूप प्रयत्न केल्यानंतर अखेर ती आम्हाला निमंत्रित करायला राजी झाली. तिचं घरही छोटसंच होतं. दोन खोल्या, बाल्कनी आणि स्वच्छतागृह. घरात येतानाच तिनं प्रत्येकाला सपाता दिल्या. घरात वापरण्यासाठी. प्रत्येक घरात असतातच त्या. घराच्या सजावटीत एक निसर्गचित्र असं लावलं होतं, की घरालाच एखाद्या बगिचाचं स्वरूप यावं. तिनं आमच्यासाठी `सुशी' केली होती. सुशी हा जपानमधला खास लोकप्रिय आणि पारंपरिक पदार्थ. वेगवेगळ्या प्रकारचे मासे कच्च्या स्वरूपात खायचे असतात, हे सारं आता आठवावं, याला कारणही तसंच आहे. कालच एक बातमी वाचली... आता भारतीय आंबा जपानला निर्यात होण्याची शक्यता वाढलीय. भारतीय आंब्यांच्या उत्पादन पद्धतीपासून घटक नियंत्रणापर्यंतची तपासणी केल्यानंतर या हंगामात काही प्रमाणात आंबे जपानला जाऊ शकतील, अशी ती बातमी होती. तर, त्या वेळच्या आमच्या जेवणाच्या टेबलावर सुशी होत्या, ब्रेडचे वेगवेगळे प्रकार होते आणि एक मद्याची बाटली. सहज पाहायची म्हणून ती बाटली पाहिली. `इंडियन हनी' असा ठळक उल्लेख त्यावर होता. स्वाभाविकपणे चर्चा सुरू झाली ती भारतीय पदार्थांवर. जपानच्या छोट्या-मोठ्या उत्पादनावर आणि दोन्ही देशांच्या संबंधावर. सहजी विषय निघाला आंब्याचा. मी म्हटलं,`तू हापूसचा आंबा खाल्लायस?' उत्तर नकारार्थीच होतं. आंबा हा काही वर्णन करून सांगायचा प्रकार नाही. तो अनुभवायचा असतो. त्याचा स्वाद सांगायचा नसतो, घ्यायचा असतो. आंबा खाल्ल्यानंतर हाताला दरवळणारा गंध साठवायचा असतो; पण त्या दिवशी आंबा हा आस्वादाचा नव्हे, तर गप्पांचा विषय होता. त्या वेळी लक्षात आलं, की बोलण्यासारखं खूप आहे, आंब्याबद्दल. जगात फळांचा राजा म्हणून त्याचं असलेलं निर्विवाद स्थान आम्हाला आंब्याविषयी बोलताना अभिमानाचा विषय वाटत होता. आमच्या चौघामध्ये मी मराठी, तर मालविका संघवी ही मुंबईत राहिलेली पत्रकार होती. आमच्या या गप्पात आमच्या यजमानबाईच्या मनात आंब्याविषयी कौतुकमिश्रित उत्सुकता निर्माण करण्यात आम्ही यशस्वी झालो होतो. कारण आता आंब्याविषयीचे प्रश्न पलीकडून येत होते. आंबा न खाताही आणि सुशी खाऊन दात आणि दाढांची कसोटी लागलेली असतानाही आम्ही तो आस्वाद घेतला होता. ज्या वेळी समारोपाचं बोलणं सुरू झालं तेव्हा आमच्यापैकी एक जण म्हणाला, `तुझा पत्ता आहे माझ्याकडे. भारतात गेल्यानंतर आंब्याचा आस्वाद घेण्यासाठी काही पाठवून देऊ. म्हणजे आंबा आणि त्यातही हापूसचा आंबा काय असतो, ते कळेल.' आता यजमानबाई पुढे आल्या. धन्यवाद म्हणाल्या; पण तेवढ्यावरच थांबलं नाही. त्या म्हणाल्या, `कृपा करा आणि आंबा काही पाठवू नकात. मी त्याचा स्वीकार नाही करू शकणार.' काही तांत्रिक अडचण असेल तर दूर करता येईल, असं कोणी म्हणालं; पण त्यावर त्या म्हणाल्या, `तसं नाहीये. मीच नव्हे पण अनेकांनी हापूस आंब्याविषयी ऐकलं आहे. काहींनी भारतात तो खाल्लाही आहे; पण आम्ही तो भेट म्हणूनही नाकारतो. कारण तो जर इतका छान असेल तर त्याचा मोह नाही टाळता येणार. आणि एकदा आवड आणि मोह वाढला की भारतातून तो आयात करावा लागेल. आम्हाला तसं काही व्हावं, असं वाटत नाही.' आता अवाक् होण्याची वेळ आमच्यावर आली होती. जपानमधील एक महिला. सुशिक्षित महिला आपल्या देशाच्या अर्थकारणाचा, त्याच्या हितसंबंधांचा इतक्या व्यक्तिगत पातळीवरही विचार करीत होती.

    जपानमधून परतताना पांडुरंग नावाच्या मराठी माणसाच्या मदतीनं मी जपानच्या बाजारात किरकोळ का होईना खरेदी केली होती. भारतात सहजी उपलब्ध असणाऱयाच त्या साऱया गोष्टी होत्या. त्या घेतानाही आपण एका अर्थानं जपानमधून या वस्तूंची आयात करतो आहोत, ही भावनाही मनात आलेली नव्हती. आज तर भारतीय बाजारपेठात अशी एकही वस्तू नसावी की जी भारतात मिळत नाही. तरीही भारतीय बाजारपेठेवर जपान नव्हे तर चिनी वस्तूंचं वर्चस्व दिसू शकतं. ती बातमी वाचली अन् विचार आला मनात आला... फळांचा हा राजा जपानवरही वर्चस्व मिळविणार... पण ती छोटी बाब कायम लक्षात राहिली. एखादा देश छोटा किंवा मोठा होतो तो त्या देशातल्या माणसांवर, त्यांच्या मनोवृत्तीवर, विचारपद्धतीवर... वाटलं, आपण कधी मोठे होणार?

    -- किशोर कुलकर्णी

  • समाधान

    माझ्या मनातलं

  • आज पुन्हां (पुन्हां) एकदां

    …..यांतली गंमत अशी कीं त्या अशा खळखळून हंसल्या हे मला दोन दिवसांनी निगेटिव्हचा रोल ‘धुवून’ (?) हातात प्रत्यक्ष फोटो प्रिंट मिळाली तेव्हां कळलं, तोपर्यंत जीवात जीव नव्हता, कां ते त्या काळात निगेटिव्ह-रोल फोटोग्राफी करीत असलेल्यानांच समजेल.

  • मुक्ती दूत

    मी चोचीने पंखात अडकलेली ती शुष्क काडी काढून टाकली. चोचीनेच पंखाची पिस सारखी केली. तेव्हड्यात माझे लक्ष समोर गेले. तो लिंग देह एका वृद्ध स्त्रीचा होता. मी माझ्या एकुलत्या एक डोळ्याने निरखून पहिले. तीने साधारण साठी ओलांडलेली होती. म्हणजे बऱ्यापैकी जगलेली होती. खात्यापित्या घरची असावी. तरी पण ती दुःखी दिसत होती.

  • भारतमातेच्या वीरांगना – ५४ – अक्कमा चेरियन

    अक्कमा चेरीयन ह्यांनी राज्य कांग्रेसवर लागलेले सगळे प्रतिबंध रद्द करण्यासाठी थंपनूर ते कोडीयार महाला पर्यंत एका विशाल मोर्च्यांचे नेतृत्व केले ज्यात सगळ्यांनी खादी टोपी घातली होती. ब्रिटिश अधिकाऱ्यानी पोलिसांना मोरच्यावर गोळीबार करायला सांगितला, त्यावेळी अक्कमा चेरीयन ह्यांनी गर्जून सांगितले, ‘मी ह्या मोर्च्याची नेता आहे, गोळ्या झाडायच्याच असतील तर माझ्यापासून सुरवात करा.’ अक्कमा चे हे रूप पाहून पोलिसांनी आपले आदेश मागे घेतले. गांधींपर्यत त्रावणकोर ची वार्ता पोचली, त्यांनी अक्कमा चेरीयन ह्यांना ‘त्रावणकोर ची झाशी ची राणी’ अशी उपाधी दिली. १९३९ साली त्यांनी निषिद्ध आदेशांचे उल्लंघन केले अश्या आरोपाखाली ब्रिटिशांनी त्यांना कैद केले.

  • सोहळे साजरे करुनि घ्यावे (सुमंत उवाच – ५९)

    सुमंत जयंत परचुरे. 

    अमावस्या म्हणजे वाईट, या दिवशी काही चांगलं करू नये, बाहेर जाऊ नये या सगळ्या गोष्टी मोडून काढत गटारीला या उलट गोष्टी कश्या करता येतील याला महत्व दिलं जाऊ लागलं. श्रावण सुरू व्हायच्या आदल्या दिवशी यथेच्छ मांसाहार, मद्य प्राशन करावे आणि दुसऱ्या दिवशी पासून कडक उपास करण्यास तयार राहावे.

  • हेच खरे प्रेम! हाच खरा विश्वास (कथा)

    संज्ञा आणि सुकृत बालसोबती. दोघांची घरे शेजारी शेजारी होती. त्यामुळे दोन्ही घरात छान एकोपा होता. एकाच्या घरात शिजले तर दुसऱ्याच्या घरी द्यावे एवढेच नाहीतर एकाला वेदना झाली तर त्याची सल दुसऱ्याला जाणवायची. अशा प्रेमळ आणि सुसंस्कारित वातावरणात संज्ञा आणि सुकृत वाढत होते.

  • सिनेमाच्या चिठ्ठया

    आमचा हात पुरणार नाही अशा उंचीवर विराजमान झालेला मर्फी रेडिओ हे लहानपणीचे आमचे करमणुकीचे दुसरे साधन. फक्त वडील, क्वचित आई आणि अगदीच क्वचित बिघाड झाल्यावर दुरुस्त करणारे वाणी काका यांनाच रेडिओला स्पर्श करायची परवानगी होती.

  • ओळख नर्मदेची – भाग पाच

    आमची परिक्रमा जशी झाली तशी -

    केल्याने देशाचे पर्यटन, सभेत संचार ।
    शास्त्र न कळुजा, चातुर्य येतसे फार ॥

    या उक्ती प्रमांणे ज्ञानार्जनासाठी व दैनंदिन कार्यातुन विरंगुंळा म्हणुन आपण प्रवास/सहलीला जातो. जास्त कालावधी करता शक्य असेल तर आपण लांबच्या ठिकाणी पर्यटनाला जातो. पर्यटनाव्यतिरीक्त लांब पल्याचा पायी खडतर प्रवास, भावनेपोटी विठुरायाच्या दर्शनाला, ज्ञानदेव व तुकारामाच्या पालख्या घेऊन दर आषाढी एकादशीला वारकरी पंढरपुरला करतातच. ही झाली धार्मिक बाब . गेल्या काही वर्षांत केंद्र सरकार ने कर्मचार्यांकरता एल टी सी योजना लागु केल्याने पर्यटनाच्या विविध सुखसोई उपलब्ध झाल्या, ज्या मुख्यत्वे सिमला, कुलु मनाली, काश्मिर, केरळ, गोवा सारख्या सुखवस्तु ठिकाणांसाठी आहेत. अजुन ही एक मोठा वर्ग धार्मिक द्रृष्टीनी यात्रा करण्या साठी जातो व तो नेमका वरिष्ठ नागरिकत्वांचा असतो. उदा: चारधाम, वैष्णवदेवी, पशुपतिनाथ, कैलास मानसरोवर, अमरनाथ, रामेश्वर व तितकीच महत्वाची समजली जाणारी नर्मदा परिक्रमा. ह्या सगळ्याच कठीण समजल्या जातात ,नव्हे, तर आहेत,कारण सगळ्यांना वेळ खुप लागतो,कष्टदायक,शरिराला क्लेष देणार्या व बर्याच प्रमाणात निसर्गाच्या मुड वर अवलंबुन असतात.बस वगैरेने प्रवास सुसह्य ,कमी वेळात,होतो,समाधान होते पण तथाकथीत अनुभव (जसे अश्वस्थामा भेटणे, तेथील लोकांचे अगत्य,मदतीचा हांत,वगैरे.)सहसा येतीलच असे नाही.समाधान ही वैयक्तीक बाब आहे,पण उद्देशपुर्ती निश्चितच होते.

    पुर्वानुभावामुळे यशोधन ट्रैव्हलस या प्रसिध्द कंपनी बरोबर जाण्याचे आम्ही उभयतांनी ठरवले. नियोजित कार्यक्रमाप्रमाणे, २५ मार्च २०१८ रोजी पुण्याहुन रेल्वेने निघालो व २६ ता ला इंदोर ला पोहोचलो, कंपनीच्या लोकांनी उतरतांच आमचे सामान पुढे जायच्या बसमध्ये ठेवले व एका हॉटेलमध्ये जेवणाची व्यवस्था होती, ते आटोपुन ओंकारेश्वरसाठी प्रस्थान केले.

    माझ्या वाचनांत आले नव्हते त्यामुळे इथे आल्यावर कळले की इंदोर केंद्र सरकारच्या “स्वच्छता अभियान “स्कीमअंतर्गत,भारतातले सर्वात स्वच्छ शहर म्हणुन गौरव प्राप्त झाला आहे. तसा अनुभव आला पण. इंदोरला पुर्वी खुपदा आलो तेव्हा गलिच्छ नसले तरी इतके स्वच्छ नव्हते. राजनितिक इच्छा शक्ती असेल व नागरिकांचा सहयोग असेल तर काहीच अशक्य नाही ह्याचे हे सुंदर उदाहरण होय. तसाच फरक उज्जैन च्या बाबतीत पण झाला आहे. नंतरच्या पुर्ण प्रवासांत, सामानाची ने - आण त्यांनीच केली.

    १७-१८ दिवसांचा प्रवास,म्हणुन सगळ्यांचेच सामान अर्थातच ज्यास्त व ह्या वयांत आम्हाला सामान कुठेच उचलावे लागले नाही ही केवढी सोय. बसमधे बरोबरच त्यांचे किचन युनीट असल्याने यथासमय चहा, नास्ता, जेवण नीट, व्यवस्थीत, घरच्यासारखे (तेलकट,तुपकट नाही) मिळाले ही दुसरी मोठ्ठी बाब. कंपनीचे मालक श्री प्रकाश मोळक स्वत: बरोबर असल्याने ते सगळ्यांचे हवे नको बघायचे त्यामुळे मोठ्ठा आधार वाटायचा हे सांगणे न लगे. मुख्य म्हणजे खुपच महत्वाची बाब म्हणजे प्रत्येक ठिकाणी पोचण्याच्या आधी ते स्वत:स्थानाचे महत्व, पौराणीक संदर्भ, इतिहास, स्थानिक भुगोल, इतकी अद्यावत माहिती सांगायचे की एखादा गाईड काय सांगेल. आम्ही १९ जण प्रवासी होतो त्यांना ते परिक्रमे संदर्भात म्हणतात तसे “मुर्ती” म्हणुन संबोधायचे. आम्ही “मैया”, ”माताजी “अगर “बाबाजी “नाही झालो हे नशिब. तिकडच्या भागांत अख्ख आयुष्य गेल्याने तिकडच्या चालीरिती, हवामान, भाषा काही नवीन नव्हते. पुर्ण प्रवासात रुटीन असे होते की सकाळी पहाटेच उठायचे (वेक अप कौल विथ tea), लगेच तयार होऊन निघायंच, निजताना चहा, बिस्कीट वगैरे, ७ते८ दरम्यान प्रवास सुरू,मोक्याच्या जागी थांबुन ब्रेकफास्ट,वाटेत कुठेतरी घाटावर थांबुन नर्मदेत कुणाकुणाच्या आंघोळी, आरती, मग पुढे जायचे. दुपारी १-२ च्या सुमारास ढाबा/हॉटेल ला थांबुन inhouse बनवलेले जेवण,मग पुन्हा प्रवास,५-६ वाजता चहा व बरोबर काहीतरी. संध्याकाळी कुठेतरी नर्मदा दर्शन, आरती (सकाळी झाले नसेल तर) आणि मुक्कामा साठी हॉटेल .तिथे जेवण व झोपायचे.संध्याकाळी आरती झाली नसल्यास सगळ्यांनी बाटल्यांमधे भरून आणलेली नर्मदा टेबलावर ठेऊन क्रमवार एका -एका मुर्तीतर्फे आरती व प्रसाद .स्तुतिपर आरती खुपच सुंदर आहे व तितकेच श्रवणीय नर्मदाष्टक.

    असे रोजचे रुटीन जमले होते. नर्मदेची क्रृपा म्हणायची की वाटेत कुणाचीच तब्येत बिघडली नाही, बस व्यवस्थीत चाल, एक पंक्चर पण नाही इ. वाटेत तर खुपच देवळ आहेत, त्यापैकी ऐतिहासीक पौराणीक महत्वाची मंदिरे बघितली व नदीमध्ये फुलवातींचे दिवे सोडले. संध्याकाळी ते द्रृष्य विहंगम वाटायचे.पुर्ण प्रवासात नदी न ओलांडण्याची खबरदारी घेतलीगेली.इंदोर हुन via बडवाह, मोरटक्का ओंकारेश्वरला आलो.

    -- सतीश परांजपे