नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत वडीलांकडून आणि आमच्या गुरुजींकडून मी जो मार खाल्लाय, तो मी कधी जन्मात विसरणार नाही. या माराने मला जीवन शिक्षणाचे पहिले धडे दिले. आमच्या मराठी शाळेचे नावच मुळी होते, ‘जीवन शिक्षण विद्यामंदिर.’ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात फोंडाघाट या गावातली ही प्राथमिक शाळा अख्ख्या पंचक्रोशीत गाजलेली.
कोणतीही भाषा शिकणे ही अवघड गोष्ट असते. मात्र, योग्य मार्गदर्शन असेल, तर शिकणे सुलभ होते. त्या दृष्टीने काही पुस्तके जवळ असणे आवश्यक असते. अ. वा. कोकजे आणि वर्षा जोगळेकर यांचे हे पुस्तक उपयुक्त ठरावे.
चेरोबा आणि पारदेवाच्या चौथऱ्यासारखे बांधकाम केलेले आहे. पण आमच्या शेतांच्या जवळ असलेला म्हसोबा देव बांधावरच आहे. मूर्ती नसलेले आणि शेंदूर फासलेले दगड हेच आमचे गावदेव आहेत. गावात सगळ्यात जास्त चेरोबा देवाला मानतात. म्हसोबा देवाला तिथं आसपास ज्यांची शेती आहे ते लोकं जास्त मानतात. ह्या गावदेवांना गावातली लोकं वर्षातून एकदा तरी कोंबड्याचा निवद म्हणजे नैवेद्य देत असतात.
पृथ्वीवर सगळंच नवं नवं होतं, तेव्हा सगळी जनावरं एकसारखी होती. त्यांची शिंगं वेगळी आहेत, त्यांच्या अंगावरची कातडी चमकदार पिवळी तांबडी आहे आणि तिच्यावर काळे ठिपके आहेत असं काहीच नव्हतं. सृष्टिनिर्माता निर्माण करीत असलेल्या विशाल व्यवस्थेला पूर्ण स्वरूप देण्यात गढलेला होता. त्याने नाना प्रकारची शिंगं बनवली. आकार, लांबी, रुंदी ह्यात अफाट वेगवेगळेपणा ठेवला. नाना प्रकारची कातडी केली. केसाळ, रंगीबेरंगी, ठिपकेवाली, पट्टेवाली. काम झालं तेव्हा निर्मात्याने शिंगं, कातडी सरोवराच्या काठी असलेल्या एका गुहेत ठेवली.
“काका आपल्या अंधश्रद्धा विशेषकांसाठी तुम्ही कायदामंत्री श्री. खुशालरावजी चिंधडे यांची घेतलेली मुलाखत आपल्या वाचकांना फारच आवडली. वाचकांची नुसती पत्रावर पत्र येताहेत.”
रोजची पहाटचे संपादक, विशेषांक सम्राट, सूर्याजीराव रविसांडे आपले वार्ताहर काका सरधोपट यांच्यावर फारच खूश झाले होते.
“होय साहेब, कायदेमंत्र्यांनी अंधश्रद्धा निमूर्लन कायद्यामध्ये अंधश्रद्धावाले आणि अंधश्रद्धा निर्मूलनवाले या दोघांचेही कसे समाधान केले आहे ते अगदी छान पटवून दिले होते.”

प्रदीप निफाडकरांची गझल
“माझ्या एकट्यासाठी आपल्या गावात शाळा सुरु होणार आहे “., रावसाहेब -मालकांनी स्वत: मला सांगितलाय “, ही गोष्ट भेटेल त्याला चंदर सांगत होता.
गावातील पुरुष मंडळी चुलाणावर भाताचे हंडे किंवा मोठ्या पातेल्यात भात शिजवत असत तेव्हा तांदूळ वेचून. निवडून. सांभाळून वापरत फक्त सजवणे हे मात्र नव्हते. तिथे जागा मिळेल तिथे बसायचे. आणि तेही जमिनीवर.
अजन्मा पहाडावर बसला होता . सोबतीला बालमित्र सुदामा होता .पण तो काहीसा अंतर ठेवून बसला होता . केवढा तरी पहाड वर चढून येणं त्याला भयंकर वाटत होतं . पण अजन्म्याच्या अंगात प्रचंड उत्साह संचारला होता .
रमेश आता पूर्ववत झाल्यामुळे आणि त्याच्या भोवती प्रसिद्धीचा वलय वाढल्यामुळे त्याच्या जुन्या मैत्रिणी त्याच्या अधिक जवळ येऊ पहात होत्या त्यामुळे त्याच रमाकडे दुर्लक्ष होऊ लागलं होत.
Copyright © 2025 | Marathisrushti