(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • नऊ रंगाच्या पैठण्या

    गणेशोत्सव मंडळांमध्ये असलेल्या स्पर्धेचे स्वरुप नवरात्रोत्सव मंडळांमध्ये सुध्दा बघायला मिळते आहे. गरबा नाच करणाऱ्यांसाठी विविध व आकर्षक बक्षिसे, रंगीबेरंगी साड्या, पैठण्या , फॅन्सी ड्रेस आणि मग बक्षीस समारंभ आणि पुरस्कार सोहळे. नऊ दिवस कार्यक्रमांची नुसती रेलचेल सुरू असते.

      October 3, 2019


  • विसरु नको, श्रीरामा मला

    माझी मुलगी दिपाली पाच वर्षांची झाली. माझ्याकडे आई आली होती. आम्ही दोघी गप्पा मारत बसलो होतो. दिपालीनं खाऊ खाताना जमिनीवर थोडा सांडला होता. हे अचानक घरी आले. सांडलेला खाऊ व पसरलेली खेळणी पाहून माझ्यावर खवळले.

      January 5, 2022


  • रुद्रा – कादंबरी – भाग १२

    कालच्या ‘राजयोग’ डिनरच्या वेळची राधाने दिलेली माहिती राघव पुन्हा पुन्हा आठवत होता.आणि त्या बरोबर खळखळून हसणारी सुंदर राधा पण नजरे समोरून हालत नव्हती! तरी त्याने आपले मन केस वर फोकस केले. तो मनोहर नेमका कोण होता? तो संतुकरावांना कशासाठी भेटायला गेला होता? त्या दोघात कसलेही साम्य नव्हते.

      March 15, 2019


  • रुद्रा – कादंबरी – भाग १९

    राघवन ते पाकीट उघडले. त्यात एक आठ गिबिचे कार्ड होते. त्याने ते समोरच्या लॅपटॉपमध्ये इन्सर्ट केले. आणि डोळे फाडून स्क्रीनकडे पहात राहिला. त्यात रुद्रा संतुकरावांच्या खुर्चीमागे उभाराहून त्यांचे तोंड दाबत होता आणि ते हातपाय झाडात होते, मरे पर्यंत!
    या रुद्राला फासावर जाण्याची इतकी कसली घाई झाली आहे? देशभरातीत सगळ्या न्यूज चॅनल्सवर एकच ब्रेकिंग न्यूज होती.’संतुकराव सहदेव यांच्या खुन्यास अटक!’

      April 9, 2019


  • डॉ. शांताराम कारंडे यांच्या ‘वेश्या’ या कवितेचे रसग्रहण

    डॉ. शांताराम कारंडे यांच्या ‘आयुष्य’ या नुकत्याच प्रकाशित झालेल्या कवितासंग्रहातील माझी सर्वात आवडती म्हणजे माझ्या मनाला भावलेली कविता ‘वेश्या’ या कवितीचे रसग्रहण मी येथे लिहणार आहे. आपल्या या कवितेत डॉ.शांताराम कारंडे सुरवातीच्या चार ओळीत लिहतात...
    मी पण एक स्त्री आहे,
    अडगळीत पडलेली
    ‘वेश्या’ म्ह्णतात मला,
    पोटासाठी अडलेली
    या चार ओळीतून कविला सुचवायचे आहे की वेश्येकडे समाजाने एक उपभोगाची वस्तू म्ह्णून न पाहता एक स्त्री म्ह्णून पाहायला हवे जसे आपण आपल्या आया - बहिणींकडे पाहात असतो. आणि त्या जे काही व्यवसाय म्ह्णून करत आहेत आहेत ते आपल्या पोटापाण्यासाठी आपल्या मनाविरूद्ध करत आहेत हे ही लक्षात घ्यायला हवे.
    इच्छा मन भावना माझ्या,
    सार्‍या काही मेलेल्या
    उरल्या – सुरल्या त्याही,
    किंमत मोजून गेलेल्या
    या पुढच्या चार ओळीत
    या ओळीतून कविने हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की कोणतीही स्त्री स्वतःच्या मर्जीने वेश्या झालेली नसते. वेश्या होण्यापूर्वी तिने आपल्या मनाला आपल्या भाव-भावनांना आवर घातलेला असतो असं नाही तर तिने त्यांचा गळा घोटून त्यांना ठार मारलेले असते. इतक करूनही जर काही भावना जिवंत राहिल्याच तर त्याही त्या त्यांना पैशाच्या बदल्यात विकाव्या लागलेल्या असतात.
    उघड्या डोळ्यांनी अनुभवतो,
    स्वतःवरील बलात्कार...
    तरीही आशेवर जगतो,
    घडेल काही चमत्कार...
    या पुढच्या ओळींमध्ये कवितेत दडलेली दाहकता जाणवते. कोणतीही स्त्री स्वतःच्या मर्जीने वेश्या झालेली नसते त्यामुळे तिचा जेंव्हा जेव्हा पुरूषांशी शारीरिक संबंध येतो तेंव्हा प्रत्येक वेळी तो तिच्या मनाच्या विरूद्धच असतो त्यामुळे त्या प्रत्येक वेळी तिला तिच्यावर बलात्कार झाल्याचाच अनुभव येत असतो. पण ती हे सारं निमूटपणे सहन करत असते. आणि कधी तरी आपली सुटका करणारा कोणीतरी आपल्या आयुष्यात येईल या आशेवर जगत असतात. हे कवीने अगदी नेमक्या शब्दात मांडलेले आहे.
    रोजच होतो मधुचंद्र,
    तरीही हक्काचा नसतो कोणी
    मंगळसूत्र फक्त शोभेला,
    कुंकवाचा नसतो धनी
    या ओळीत कवीने वेश्यांच्या मनाला हात घालण्याचा प्रयत्न केलेला आहे मधुचंद्र या गोष्टीला प्रत्येकाच्या जीवनात एक वेगळे महत्व असते. पण वेश्या व्यवसाय करणार्‍या स्त्रियांना तो अनुभव जीवघेणा वाटत असतो कारण त्यांच्या मनाविरूद्ध त्यांचा रोजच मधुचंद्र होत असतो.
    वेश्या व्यवसाय करणार्‍या काही स्त्रिया विवाहित ही असतात पण त्यांच्या नवर्‍यांनीच त्यांना या व्यवसायात ढकलेले असते अथवा यांच्या जीवावर ते जगत असतात बांडगुळासारखे. ते त्यांच्या कुंकवाचा आधार फक्त नावाला असतात प्रत्यक्षात त्यांना त्यांचा आधार कधीच मिळत नाही.
    पोटच्या आमच्या गोळ्याला,
    नावं नसतं बापाचं
    जन्माआधीच मरण,
    भोगतो आमच्या पापाचं
    या चार ओळीत वेश्यांना होणार्‍या मुलांची बाप म्ह्णून कोणी जबाबदारी घेत नसतो आणि समाज त्यांच्याकडे एक पाप म्ह्णूनच पाहात असतो आणि पुढे जाऊन ते पापीच होणार हे त्यांच्या जन्मा अगोदरच गृहीत धरतो हे कवीने सुचविले आहे.
    तारूण्यात आमच्या,
    जगण्याला असतो ‘अर्थ’
    म्हातारपणात मात्र
    जगणंच होतं व्यर्थ
    जो पर्यंत वेश्या व्यवसाय करणार्‍या स्त्रिया तरूण असतात तोपर्यत त्यांचा उपभोग घेणार्‍यांचा राबता असतो पण त्यांचे तारूण्य ओसरले की सारेच त्याच्याकडे पाट फिरवतात आणि त्यांच्या जगण्यालाही काही अर्थ उरत नाही हे कविने या चार ओळींतुन अगदी सहज सुचविले आहे.
    लखलखत्या प्रकाशात असताना,
    आंम्ही स्वतःच करायचो अंधार
    आता रोज सूर्य उगवतो तरी,
    आयुष्याचा झालाय अंधार
    या कवितेच्या शेवटच्या चार ओळीत कवी
    सुचवतो की काही स्त्रियां आपल्या सौंदर्याच्या अभिमानात आणि तारूण्याच्या जोशात आणि पैशाच्या हव्यासापायी स्वतःच्या मर्जीनेही वेश्या व्यवसाय व्यवसाय म्ह्णून स्वीकारतात त्यांच्या वाटयाला ही शेवटी फक्त अंधारच येत असतो हे सत्य मांडलेले आहे.

    लेखक – निलेश बामणे

      February 22, 2016


  • गोगलगाई बारशाला जातात

    सकाळ झाली. गोगलबाई उठल्या. आपल्या पाठीवरच्या घरातून बाहेर अंगणात आल्या. सकाळचे कोवळे ऊन खात बसून राहिल्या. तेवढ्यात त्यांची एक मैत्रीण चिऊताई समोरून येताना दिसली. तिला पाहून गोगलबाईनी विचारले, “काय चिऊताई, आज सकाळीच कसे येणे केले?” चिऊताई म्हणाली, “मी आले आहे, बोलावणे करायला. उद्या किनई माझ्या बाळाचे बारसे आहे. मुद्दाम तुम्हांला सांगायला आले आहे.

      October 5, 2025


  • माझा चड्डी यार – भाग २

    आम्ही दोघे एकाच वर्गांत व एकाच शाळेत. जिल्ह्याचे ठिकाण बीडचे. असे ऐकले की बीडचे पुर्वीचे नाव चंपावती नगरी होते. तेथेच चंपावती विद्यालय ही शाळा स्थापन झाली होती. त्याच शाळेंत आम्ही दोघे आठवीच्या वर्गांत होतो. त्या वेळी तोच शाळेमधला सर्वांत मोठा वर्ग समजला जाई.

      November 17, 2018


  • नाद

    आता कळ्तय त्याच्या भोवती भिरभिरणार्याो त्या फुलपाखरांच रहस्य ! प्रतिभाला स्वतःचाच अधिका अधिक राग येत होता. पण ! आता तिचा अहंकार अभिमान थोडा- थोडा दूर होऊ लागला होता. विजयच्या वेळेची किंमत प्रतिभाला कळू लागली होती. विजयने तिच्यासाठी जो वेळ खर्च केला होता त्या वेळेत तो कित्येकांच्या वेदनेला वाचा फोडू शकत होता. त्यांच्य वेदना जगापर्यत पोहचवू शकत होता. त्यांच्या वेदनेवर औषध शोधू शकत होता. तिच्यासाठी त्याने खर्च केलेल्या वेळेची किंमत अमूल्य होती हे तिच्या लक्षात आल होत आणि आता तर तिला खरोखरच त्याचा नाद लागला होता.

      February 9, 2016


  • भोग सरंल, सुख येईल

    आपली ‘हेच माझे माहेर’ मध्ये साकारलेली ‘शकू’ची भूमिका अविस्मरणीय ठरली. या भूमिकेने आपणास पुन्हा राज्य पुरस्कार मिळवून दिला.

      August 12, 2021


  • खडूचे अभंग

    येता जाता दंश करायला , समाजातील चिल्लरातील चिल्लर माणसाला शिक्षकच सापडतो . इतर कर्मचारी त्याला दिसत नाहीत वा त्यांच्या उपद्रव क्षमतेमुळे कुणीही त्यांच्या वाट्याला जात नाही . शिक्षक बरा , त्याला झोडताही येतो आणि फोडताही येतो …

      January 2, 2020